मानसशास्त्र अशाब्दिक संवाद

देहबोलीतून माणसाच्या मनातील विचार समजू शकतात का?

2 उत्तरे
2 answers

देहबोलीतून माणसाच्या मनातील विचार समजू शकतात का?

1
फक्त थोडे तांदूळ, राजदरबार आणि खोटं बोलणारा माणूस यांच्यात तीळमात्र देखील संबंध असू शकतो का? जरी काही संबंध असला तरी नेमका काय असेल? तुम्हाला जरा कल्पना करून त्यांच्यात काही संबंध जोडता येतो का? चला, जाऊ दे…मीच सांगतो!

प्राचीन चीनमध्ये राजदरबारात एखादा व्यक्ती खोटं बोलला का खरं हे पाहण्यासाठी त्याच्या तोंडात त्याला थोडे कोरडे तांदूळ धरायला सांगितले जायचे, प्रश्न विचारला जायचा आणि तांदूळ चावत चावत बोलायला लावायचे. थोड्या वेळाने ते तांदूळ त्या व्यक्तीला तोंडातून बाहेर काढायला सांगितले जायचे. जर तांदूळ कोरडे दिसले तर मानले जायचे की ती व्यक्ती खोटं बोलत आहे आणि ओलसर/भिजलेले दिसले तर ती व्यक्ती खरं बोलत आहे असे मानले जायचे. हि पद्धत आजपासून ३००० वर्षे आधी उपयोगात आणल्याचे दाखले मिळाले आहेत.

कोरडे तांदूळ म्हणजे खोटं आणि ओलसर तांदूळ म्हणजे खरं ही भानगड नेमकी आहे तरी काय? तोंडाचे पाणी पळणे हे काय ज्यांना माहित आहे त्यांना कदाचित लवकर समजेल. माणुस ज्यावेळी अतिशय चिंताग्रस्त किंवा घाबरलेला असतो त्यावेळी त्याचा तोंडात लाळ  बनण्याची प्रक्रिया मंदावते किंवा थांबते. त्याचमुळे त्याचे तोंड कोरडे पडते. अपराधी भावनेमुळे उत्तर देताना अशा व्यक्तीच्या तोंडातील तांदूळ देखील कोरडेच राहतात आणि त्याचा दोष/अपराध सिद्ध होतो. मग आहे ना हि देहबोली एकदम प्रामाणिक?

देह बोली/शारीरिक भाषा  पाहून मानसिक अवस्था, विविध भावना, शारीरिक आवश्यकता, आरोग्याची स्थिती, प्रेरणा, प्रवृत्ती आणि उर्मी ह्या नक्कीच ओळखता येतात कारण आपल्या मेंदूच्या तीन मुख्य भागांपैकी दोन जुने/आदिम/प्राचीन भाग आपल्या सर्व शारीरिक प्रतिक्रियांना नियंत्रित आणि संचालित करतात. त्या दोन भागांना क्रमशः सरीसृप मस्तिष्क आणि हस्तपाद मस्तिष्क  असे म्हंटले जाते.

आता मुळात विचार करणे म्हणजे नेमके काय? ते आधी थोडक्यात समजून घेऊया (विचार करण्यावर थोडा विचार करूया!). विचार करणे म्हणजे एखादा मुद्द्यावर तर्कशुद्ध चिंतन करणे आणि त्याआधारे कल्पना, मत किंवा निर्णय बनविणे. विचार करणे ही मेंदूच्या अशा भागाची करामत आहे जो आपल्या आतपर्यंत झालेल्या विकासाच्या इतिहासातील खूप अलीकडच्या काळात बनला आहे ज्याला नवमस्तिष्क  असे म्हणतात.




एखाद्या व्यक्तीचा फक्त चेहरा, डोळे, दृष्टीक्षेप आणि ढब/आसन  पाहून एखादा व्यक्ती विचार करत आहे हे देखील दुरून ओळखता येते आणि त्याचे विचार करताना बदलणारे हावभाव  आणि प्रतिक्षिप्त क्रियापाहून विचाराची सकारात्मकता किंवा नकारात्मकता देखील ओळखता येते. वर दाखवलेले 'विचार करणारा माणूस' हे शिल्प अत्यंत प्रसिद्ध आहे.

बोली भाषाहे विचार रचण्याचे, मांडण्याचे, व्यक्त करण्याचे आणि पसरवायचे एक अजोड माध्यम आहे त्यामुळे केवळ देहबोली पाहून थेट मनात/मेंदूत नेमके काय विचार घोळत आहेत ते ओळखणे आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांचा सविस्तर शाब्दिक तपशील  ) मिळवणे किंवा समजणे हे अतिशय अवघड, दुरापास्त किंवा अशक्य आहे.





माणसाचा चेहरा व राहणीमान हा फक्त एक देखावा आहे. खरी ओळख तर त्याचे बोलणे व व्यवहार यामुळेच होते. असे का म्हटले जाते?

भिन्न प्रजातीतील अथवा प्रवर्गातील प्राणी-पक्षी एकमेकांसोबत संवाद साधू शकतात का?

माणूस हा खोटं बोलणारा एकमेव प्राणी आहे का?


उत्तर लिहिले · 7/6/2022
कर्म · 53710
0

उत्तर: होय, देहबोलीतून माणसाच्या मनातील विचार बऱ्याच अंशी समजू शकतात. देहबोली म्हणजे आपले हावभाव, चेहऱ्यावरीलexpressions, बोलण्याची पद्धत, हातवारे आणि देहयष्टी. या सर्वांच्या निरीक्षणातून समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे, हे ओळखता येते.

उदाहरणार्थ:

  1. चेहऱ्यावरील हावभाव: जर एखादी व्यक्ती हसली तर ती आनंदी आहे, हे कळते. त्याचप्रमाणे, जर कोणी रागावले असेल तर त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसते.
  2. डोळे: डोळे खूप काही बोलतात. जर एखादी व्यक्ती डोळे चोरत असेल, तर ती काहीतरी लपवत आहे, असे समजू शकते.
  3. हातवारे: बोलताना हातवारे करणे आत्मविश्वास दर्शवते, तर हात बांधून उभे राहणे बचावात्मक पवित्रा दर्शवते.
  4. शरीराची ठेवण: एखादी व्यक्ती ताठ उभी असेल, तर ती आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे, असे दिसते.

देहबोलीचे ज्ञान असल्यास, आपण लोकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करू शकतो आणि प्रभावीपणे संवाद साधू शकतो.

टीप: देहबोली ही एक क्लिष्ट बाब आहे आणि ती व्यक्तीनुसार बदलू शकते. त्यामुळे, केवळ देहबोलीच्या आधारावर कोणाबद्दलही निश्चित निष्कर्ष काढणे योग्य नाही.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंक बघू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

तंटा हा नेहमी माणसातच का होतो, व्यवहारात का होत नाही?
व्यक्तिमत्व मानसशास्त्र या शाखेविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा?
प्राथमिक संबंधाचे स्वरूप निर्धारित करणाऱ्या आवश्यक अटी कोणत्या ते स्पष्ट करा?
सामाजिक बुद्धिमत्तेचे घटक सविस्तर लिहा?
शालेय मानसशास्त्रामध्ये कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो ते स्पष्ट करा?
मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः न घेता सारखं सारखं दुसर्‍यांना विचारत असतो आणि त्यामुळे मी काय करावे मला काही कळत नाही?
मनातून भीती कशी घालवावी?