अध्यात्म हिंदु धर्म नाथ पंथ धर्म

नाथ पंथाची दीक्षा कशी घ्यावी?

2 उत्तरे
2 answers

नाथ पंथाची दीक्षा कशी घ्यावी?

1

नवनाथ म्हणजे नऊ नाथ यांच्यातील पहिले नाथ हें स्वामी मच्छिन्द्रनाथ यांनी साक्षात शिवा कडून ज्ञान प्राप्ती घेतली होती, व पुढे दत्त गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ पंथची स्थापन केली, आता यात बऱ्याच कथा आहेत, शिवा कडून घेतली तर दत्त गुरूंनच मार्गदर्शन कशासाठी मुळात हिंदू धर्मात शिव, विष्णू व ब्रम्ह हें एकच स्वरूप अस्तित्व आहेत, आणि नवनाथ हें सर्व नाथ पूर्व जन्मी नवनारायण म्हणून ओळखले जातात.

द्वापार युगात भगवान कृष्णाने नव नारायण यांना बोलववून येणाऱ्या काळात धर्माच्या उन्नती साठी आपल्यलाला नवनाथ स्वरूपात कार्य करायचे आहे असे सांगितले होते. म्हणजे  नवनाथ हें शिव व विष्णू या दोन्हीही देवात समान पूजेला जातात.





नवनाथ हा नेमका कोणता पंथ आहे?

तसं पाहिलं तर हिंदू धर्मात प्रामुख्याने 3 च पंथ आहेत- 1) शैव- प्रमुख उपासना देव शिव/महादेव व त्यांची इतर रूपे 2) वैष्णव- प्रमुख उपासना- विष्णू व त्यांची इतर रूपे 3) शाक्त- प्रमुख उपासना देवी शक्ती/सती व तिची इतर रूपे. आता तसं आधी सांगितल्या प्रमाणे नवनाथ हें शैव व वैष्णव या दोन्हीही पंथाचे उपपंथच आहे.पण कुठल्याही नवनाथांचा मातृ पोटी जन्म नाही, पण नाथाची मुख्य विद्या ही शबरीविद्या, देवी ह्या स्वरूपात आहे आणि तिला ते माते सामानच मानतात म्हणून नवनाथ हा एक असा पंथ आहे जो कि हिंदू धर्माच्या प्रमुख तिन्ही ही पंथशी थेट सलग्न आहे.

भारताच्या अध्यात्मिक नकाशात नवनाथ पंथची प्रचंड मोठी व्याप्ती आहे, हें आपल्याला नाथ पंथची थोडीशी माहिती घेतली कि लगेच कळेल जसं कि, नऊनाथांन नंतर नाथ पंथात 84 सिद्ध हें प्रमुख सिद्ध होऊन गेले ज्यांनी नाथ पंथचा अद्वितीय विस्तार केला. हें सिद्ध भारताच्या कान्या कोपऱ्यात नाथांची शिकवण पसरवण्यात खूप यशस्वी झाले होते. अजून आपल्याला हेही समजेल कि नाथाच्या अस्तित्वाचा पुरावा आपल्याला भारताच्या व भारता बाहेर ही दिसून येईल, जस कि गोरखपूर (UP) हें शहर गुरुं गोरक्षनाथ यांच्या नावामुळे पडले, जालंधार (पंजाब ) हेही नाव गुरुं जालंधार नाथ याच्या मुळे पडले आहे. नेपाळ या भागात स्वामी मछिंद्र नाथ व मीना नाथ यांना खूप मानतात त्यांची तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपासना केली जाते.

आजच्या काळातील बरचसे आखाडे व पंथ हें नवनाथ संप्रदायशी जोडलेले आहेत, जसं कि कानफाट्या संप्रदाय, उदासी पंथ, नाथ जोगी, नागा नाथ पंथ व इतर अनेक. श्री गुरु नानक देव जे कि सिख धर्माचे संस्थापक होते त्यांचे मोठे चिरंजीव श्री बाबा श्रीचंद हें सुद्धा एक अति महान नाथ योगी होते, त्यांनीच उदासी पंथची सुरवात केली, आणि आजही हा भारतातील एक प्रमुख पंथ म्हणून ओळखला जातो कुंभ मेल्यातील शाही स्नान विधी मध्ये उदासी आखाडा किंवा पंथातील योग्यांना किंवा साधूंना खूप मोठा मान आहे. त्याच प्रमाणे राजस्थान मधील बाबा बालक नाथ हें सुद्धा खूप प्रसिद्ध नाथ योगी होऊन गेलेत.




नवनाथ यांच्या समाधी व प्रमुख ठिकाण कोणत?

मछिंद्रनाथ यांची समाधी मायंबा

गिरनार या पवित्र पर्वतावर अगदी सगळ्यात उंच ठिकाणी गुरु दत्तात्रये व गुरु गोरखनाथ यांची मंदिरे आहेत.

मढी अहमदनगर- श्री कानिफनाथ महाराज यांची समाधी.

विटा,सांगली- श्री रेवण नाथ महाराज यांची समाधी.

मी इथे मोज कीच नाव देऊ शकतो कारण नाथांची उपस्थिती ही देशाच्या काना कोपऱ्यात आहे.

आता नाथाची दिक्षा कशी प्राप्त होऊ शकते?

सगळ्यात अगोदर आपण साध्या सरळ भावाने नवनाथ यांची उपासना करावी, त्यांच्या कार्य पद्धती जाणून घ्याव्यात. आपण केवळ आणि केवळ श्रद्धा हाच आपल्या सेवेचा पाया व कळस मानवा.

नाथ पंथ हा तसं पहिला तर खूप मोठ्या प्रमाणात योगीक पंथ आहे- हठ योग हा नाथ योग्यांचा केंद्र बिंदू आहे व गुरूं गोरख नाथानीं हट योगा ला प्रचंड उंचीवर नेऊन ठेवल आहे कि त्याची व्याप्ती कळणार नाही आणि ती कळण्याचा सुरवातीलाच हट्ट ही करू नये. कारण जो पर्यंत नाथाची आज्ञा होतं नाही तो पर्यंत त्यात किंचित ही गती प्राप्त होतं नाही. दुसरा सहज सिद्ध योग हा सुद्धा नाथानीं उदयास आणलेला योग मार्ग आहे,मुळात याचे खरे स्वामी हें गुरूं दत्तात्रेय आहेत जे स्वतः नऊ नाथाचे गुरूं आहे.ह्या सर्व साधना गुरूं आज्ञा असल्या शिवाय करू नये.अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

आज कालच्या काळात अंगाला फिट्ट चिकटलेले कपडे घालून काही कलाकार बाबा किंवा ट्रेंडी गुरूं जी  हट योगाचे धडे देतात व ज्यात स्त्री असो कि पुरुष एकाच वर्गात अगदी दीड दीड फुटाच्या अंतरावर योगा करता तो हट किंवा सहज सिद्ध योग मुळीच नव्हे ती एक छान exercise असू शकते पण योगिक पद्धती नव्हे.

नाथ पंथ दिक्षा घेण्या पूर्वी आपल्याला आपल्या श्रद्धेच्या बऱ्याच कसोट्या द्याव्या लागतात, गुरूं ह्या परीक्षा घेतो. म्हणून आपल्याला असे कोणी खरे नाथ पंथाचे गुरूं, अध्यात्मिक विश्वस्त माहिती असतील तर त्यांना सतत भेटत राहणे गरजचे आहे. कृपया आपली पडताळणी करून घ्या कि ते व्यक्ती खरे आहेत कि नही अन्यथा आपल्याला त्याचा त्रास नको. दिक्षा मिळेलच कि नाही हें आपल्या श्रद्धा आणि सेवा भाव ह्यावर निर्भर आहे पण जर तुम्ही नव नाथानं वर श्रद्धा ठेवाल तर ते तुम्हाला सदैव योग्य मार्ग दाखवतील.

‼️ आदेश ‼️
‼️ अल्लक निरंजन ‼️


उत्तर लिहिले · 5/6/2022
कर्म · 53710
0

नाथ पंथाची दीक्षा घेण्याची प्रक्रिया नाथ पंथातील परंपरेनुसार बदलते. दीक्षा घेण्यासाठी काही सामान्य गोष्टी खालीलप्रमाणे:

  1. योग्य गुरूची निवड: नाथ पंथात दीक्षा घेण्यासाठी योग्य गुरूची निवड करणे आवश्यक आहे. गुरू हे मार्गदर्शक असतात आणि ते दीक्षा देण्यास सक्षम असतात.
  2. गुरूंसोबत चर्चा: गुरूंची निवड केल्यानंतर, त्यांच्याशी नाथ पंथाबद्दल आणि दीक्षेबद्दल चर्चा करा.
  3. तयारी: गुरू तुम्हाला दीक्षेसाठी तयार राहण्यास सांगू शकतात. त्यात काही विशिष्ट आचरणे,service (सेवा),आणि अभ्यासक्रम असू शकतात.
  4. दीक्षा समारंभ: योग्य वेळी,गुरू तुम्हाला दीक्षा देतील. दीक्षा समारंभात मंत्रोच्चार, विधी आणि उपदेश यांचा समावेश असतो.
  5. अनुशासन: दीक्षा घेतल्यानंतर, नाथ पंथाच्या शिकवणुकीनुसार आणि गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगावे लागते.

टीप: दीक्षा घेण्यापूर्वी, नाथ पंथाबद्दल आणि परंपरेबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही नाथ पंथाच्या मठांना भेट देऊ शकता किंवा अधिकृत वेबसाइट्स आणि पुस्तके वाचू शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1100