2 उत्तरे
2
answers
सापांच्या हल्ल्यांपासून कोण संरक्षण करते?
0
Answer link
माणूस व सापामधील संघर्ष सनातन असला तरी दुस-या बाजूस सापांची मुक्तता करून त्यांना सुरक्षित स्थळी नेऊन सोडणारे असंख्य सर्पमित्र संपूर्ण देशभरात आहेत. सापांचे वास्तव्य असलेली पर्यावरणस्थिती, त्यांची जगण्याची पद्धती व अन्य पैलूंबाबत देशात आजवर झालेले संशोधन मात्र विस्कळीत स्वरूपाचे आहे. त्यामुळे सापांची मुक्तता व विविध जातींच्या सापांचे संरक्षण करणे या प्रयत्नांमध्ये दरी निर्माण झाली आहे. साप व त्यांचे अधिवास यांचे संरक्षण करण्यासाठी अधिक नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज आहे.
भारतातील सापांच्या नव्या जाती शोधून काढण्यासाठी चाललेल्या संशोधनात काही प्रमाणात प्रगती झाली आहे. त्यामुळे भारतीय सापांच्या यादीमध्ये नवी भरही पडली आहे. मात्र, विशिष्ट जातींच्या सापांचे अधिवास व त्यांच्या भोवतालची पर्यावरणस्थिती यांच्या संदर्भात मात्र ठोस स्वरूपाचा शास्त्रीय अभ्यास व त्याचे दस्तऐवजीकरणाचे खूपच कमी प्रयत्न आपल्या देशात झालेले आहेत. सापांच्या विविध जातींना अनुकूल असणारी पर्यावरणस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे या सापांचे जतन करण्याचे दखलपात्र ठरावे, असे प्रयत्नही झालेले नाहीत.
विशिष्ट संकटकालीन परिस्थितीत सापडलेल्या सापाची त्यातून सुटका केली की सापाचे संरक्षण झाले, असा मर्यादित दृष्टिकोन अनेकदा बाळगला जातो. मुक्तता केलेल्या सापांना काही विशिष्ट ‘सुरक्षित’ ठिकाणी नेऊन सोडले जाते. ब-याचदा या जागा बदलण्याचे भानही राखले जात नाही. सापाची मुक्तता करणारी व्यक्ती अनेकदा आपल्या हाती किती वेळ शिल्लक आहे याचा हिशेब करून स्वत:ला सोयीस्कर वाटणा-या ‘सुरक्षित’ ठिकाणी सापांना सोडून देते. मात्र, ज्या जागी सापांना सोडून देण्यात येते, तो परिसर त्यांच्या सुरक्षिततेसाठी खरेच योग्य आहे का, तसेच हा साप येण्याने त्या परिसरातील अन्य प्राण्यांच्या जीवनशैलीवर काय परिणाम होत असतो, याबद्दलची कोणतीही माहिती किंवा शास्त्रीय अभ्यासाचे निष्कर्ष कुठेही उपलब्ध नाहीत. ही स्थिती दुर्दैवी म्हणावी लागेल.
एका ठिकाणाहून पकडून दुस-या सुरक्षित ठिकाणी सोडून दिलेले साप हे तेथील परिस्थितीशी कसे जुळवून घेतात, स्वत:च्या जीवनशैलीमध्ये कोणते सूक्ष्म बदल घडवून आणतात याबाबतचे सखोल संशोधन जगभरात काही ठिकाणी सुरू आहे. कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील अगुम्बे रेनफॉरेस्ट संशोधन केंद्रामध्ये किंग कोब्रा टेलिमेट्री प्रकल्प राबवण्यात येत आहे. किंग कोब्राच्या नैसर्गिक जीवनपद्धतीचा इतिहास, या सापाचा अधिवास यांचा सर्वंकष अभ्यास करणे हा या संशोधन प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. त्यातून हाती येणा-या निष्कर्षांच्या आधारे किंग कोब्रा जातीच्या सापाच्या संरक्षणासाठी सुनियोजित प्रयत्न करणे अधिक सोपे जाईल. कोणत्याही विशिष्ट जातीच्या सापाच्या संरक्षणासाठी देशात असा रेडिओ टेलिमेट्री प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जात आहे.
सापांच्या संरक्षणासाठी काही छोटे छोटे संशोधन प्रकल्प देशाच्या विविध भागांत शास्त्रज्ञांनी राबवले आहेत. मात्र, या संशोधनातून ठोस अंतिम निष्कर्ष काढण्याच्या स्थितीपर्यंत मात्र अद्याप ते पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे या प्रयोगांतून आजवर हाती लागलेल्या माहितीचा विविध जातींचे साप व त्यांचे अधिवास यांच्या संरक्षणाकामी ठामपणे उपयोग करणे शक्य होत नाही. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेऊन सोडलेल्या सापांच्या बदलेल्या जीवनपद्धतीबद्दल तसेच त्यांच्यामध्ये अगोदरच्या अधिवासाबद्दलची ओढ नेमकी किती कायम राहिलेली असते याबद्दलचे संशोधन रायगड जिल्ह्यातल्या रोहा येथील एक सर्पमित्र संघटना करू इच्छित होती. मात्र, त्या संघटनेला परवानगी देण्याचा मुद्दा अद्यापही सरकारी लालफितीत अडकून पडला आहे.
सापांचे अधिवास, त्यांची नैसर्गिक जीवनपद्धती, त्यांच्या वर्तनाचा अर्थ समजून घेणे या संदर्भात प्रयत्न करण्याऐवजी सापाला जिवंत राखणे या संकल्पनेला कवटाळूनच सापाच्या संरक्षणाबद्दलचे सारे प्रयत्न होताना सध्या तरी दिसत आहे. एखाद्या सापाला विशिष्ट ठिकाणी सोडून दिल्यानंतर तो तिथे किती काळ जिवंत राहू शकेल? त्या जागेतील अन्य प्राण्यांवर या सापाच्या आगमनामुळे नेमका काय परिणाम होणार आहे? ज्या जागेतून सापाची मुक्तता केली असेल तिथून त्याला हलवल्यानंतर त्या परिसरातील अन्नसाखळीमध्ये कोणते असंतुलन निर्माण होत असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधणे खरे तर आवश्यक असते. पण तसे प्रयत्न फार होताना दिसत नाही. आपण जेवढे या प्रश्नांच्या मुळाशी जाऊ तितकेच आणखी अनेक प्रश्न आपल्या नजरेला दिसू लागतील. या नवनवीन प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणखी सखोल संशोधन करण्याची गरज आहे, याची जाणीव आपल्याला होईल.
निकोबार बेटावर सापडलेल्या अजगराला मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील ‘सुरक्षित’ अधिवासात रुळवण्याचा प्रयत्न अलीकडेच झाला होता. मात्र, या प्रयत्नांत नियोजनाचा संपूर्ण अभाव होता. एखाद्या भूप्रदेशात विशिष्ट प्राण्याचे अस्तित्वच नसेल व दुस-या ठिकाणाहून आणलेला प्राणी त्याला संपूर्णपणे अपरिचित असलेल्या प्रदेशात किती गोंधळून जाईल, हे वेगळे सांगायला नकोच. एक तर अपरिचित प्रदेशात हा विशिष्ट प्राणी स्वत:ला सुरक्षित समजणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्या नैसर्गिक जीवन पद्धतीला तो प्रदेश मानवेलच असेही नाही. त्यामुळे सापांची मुक्तता केल्यानंतर ‘सुरक्षित’ जागी त्यांचे स्थलांतर करताना योग्य ती सर्व काळजी घ्यायलाच हवी. सापाच्या संरक्षणाच्या प्रयत्नांमध्ये असलेल्या अनेक त्रुटी नव्या पिढीचे संशोधक आपल्या प्रयत्नांनी, सखोल संशोधनाद्वारे निश्चितच भरून काढतील, अशी आशा वाटते. त्यातूनच सापाची मुक्तता अधिक शास्त्रीय पद्धतीने करणे शक्य होईल.
0
Answer link
सापांच्या हल्ल्यांपासून अनेक प्राणी आणि पक्षी संरक्षण करतात, त्यापैकी काही प्रमुख खालीलप्रमाणे आहेत:
- मुंगूस: मुंगूस हा सापाचा नैसर्गिक शत्रू आहे. तो चपळाईने सापावर हल्ला करतो आणि त्याला मारतो.
- गरुड: गरुड आणि इतर शिकारी पक्षी सापांना पकडून खातात.
- घुबड: घुबड देखील निशाचर प्राणी असल्याने सापांना खातात.
- को Kind: काही प्रकारचे को Kind सापांना मारून खातात.
- माणूस: माणूस योग्य उपाययोजना करून सापांच्या हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतो.
याव्यतिरिक्त, काही विशिष्ट प्रकारचे साप इतर सापांना देखील खातात, जसे की किंग कोब्रा (King Cobra), जो इतर सापांना खातो.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: