2 उत्तरे
2
answers
गृहपाठ म्हणजे काय?
0
Answer link
गृहपाठ म्हणून मुलांना साधारण दोन किंवा तीन विषयांच्या धड्यातील प्रत्येक विषयाच्या एखाद्या धड्यातील २५ शब्द पाच वेळा लिहिणे, दिलेली गणिते सोडविणे, पाठाखालील प्रश्न उत्तरे लिहिणे आदी गोष्टी सांगितल्या जातात. आधीच मुले दिवसभर शाळेत आणि पालक दिवसभर नोकरी, व्यवसायाच्या ताणाने थकलेले असतात.
गृहपाठ म्हणजे घरचा अभ्यास. वर्गात शिकवलेल्या गोष्टींची घरी जाऊन केलेली उजळणी. आपल्यापैकी प्रत्येकानेच शाळेच्या दिवसात गृहपाठ केलेला असतो. कितीतरी वेळा मनात नसताना देखील शिक्षकांच्या धाकापाई आपल्याला हा अभ्यास करावा लागे. पण सध्या हे चित्र बदलताना दिसून येणार आहे. कारण अभ्यासापासून लहान मुलांची सुटका होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना गृहपाठमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पत्रकानुसार पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया केंद्रीय विकास मंत्रालयाच्या या निर्णयाविषयीची मते.
प्रमाण कमी करावे
बदल्यत्या काळानुसार अभ्यासाचे स्वरूप देखील बदलेले आहे. शाळा, टय़ूशन, या सगळ्यांमुळे २४ तास मुले अभ्यासामध्ये गुंतलेली असतात. यातून जो काही थोडा फार वेळ मिळतो तो देखील अभ्यासामध्ये जातो. मुलांवर ताण येतो. कित्येक वेळेला पालकांनाच तो अभ्यास पूर्ण करावा लागतो. या सगळ्यांमुळे गृहपाठ पूर्णपणे बंद न करता त्याचे प्रमाण हे कमी केले पाहिजे.
–
गृहपाठ हा पूर्णपणे बंद न करता या गृहपाठाचे स्वरूप बदलेले पाहिजे. मुलांना त्यांच्या छंदाला अनुसरून घरचा अभ्यास द्यायला हवा. असे केल्यास मुलांना तोच-तोचपणाचा कंटाळा न येता उत्साहाने गृहपाठ पूर्ण करतील. यामुळे त्यांचा छंद देखील जोपासला जाईल.
गृहपाठ हवाच
गृहपाठ हवाच. गृहपाठ नसेल तर मुले घरी अभ्यासाकडे लक्ष देणार नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होऊ शकते. अभ्यास असेल तर विद्यार्थ्यांच्या मेंदूला घरी देखील चालना मिळू शकते. यामुळे शालेय जीवनात गृहपाठ एक महत्त्वाचा भाग आहे.
खूपच मोकळीक
विद्यार्थ्यांना प्रत्येक शिक्षेपासून माफी मिळत आहे. हे असेच होत राहिले तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व कधीच कळणार नाही. आठवीपर्यंत पास करणे, दप्तराचे वजन नको, आणि आता गृहपाठ नको. म्हणजे आता अभ्यासापासून पण सुटका मिळाली तर काय उपयोग? गृहपाठ नको हा निर्णय मुलांना खूपच मोठी मोकळीक देण्यासारखा आहे.
गृहपाठ हवा, पण शिक्षा नको
गृहपाठ असला पाहिजे, परंतु गृहपाठ न केल्यास मिळणारी शिक्षा यामध्ये बदल केला पाहिजे. शिक्षेमुळे विद्यार्थी तणावाखाली वारवरत असतो आणि त्यामुळे शाळेत जाण्यास घाबरतो. त्यामुळे गृहपाठ हवा, पण शिक्षा नको.
निर्णय स्वागतार्ह
आपली शिक्षण पद्धती परीक्षाकेंद्री आहे. गृहपाठच नाही तर परीक्षा तरी कशा घेणार आणि घेतल्याच तर प्रश्न तरी कुठले विचारणार? हा निर्णय स्वागतार्हच आहे. त्यामुळे निदान चिमुकल्यांना पहिली-दुसरीतच का होईना; गृहपाठाचे ओझे तरी वाटणार नाही.
0
Answer link
गृहपाठ म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासाव्यतिरिक्त घरी करण्यासाठी दिलेले काम.
हे काम अनेक प्रकारचे असू शकते, जसे की:
- वाचणे
- लेखन
- गणिते सोडवणे
- प्रश्नोत्तरे
- प्रकल्प
गृहपाठाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शिकलेल्या गोष्टींना अधिक दृढ करणे, स्वयंअध्ययनाची सवय लावणे आणि त्यांची शैक्षणिक प्रगती करणे हा असतो.
गृहपाठामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते आणि परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत होते.