अध्यात्म शब्द आत्मा

आत्म्याची साद असते, तोच संवाद । ती नसेल तर तो 'वधान' तुमच्या शब्दांत १० ते १२ ओळीत कसे स्पष्ट कराल?

3 उत्तरे
3 answers

आत्म्याची साद असते, तोच संवाद । ती नसेल तर तो 'वधान' तुमच्या शब्दांत १० ते १२ ओळीत कसे स्पष्ट कराल?

2
प्रत्येक माणूस अगदी आतल्या तळमनात अत्यंत एकटा असतो. तळमनाच्या या पापुद्र्यापर्यंत डूब घेणं प्रत्येकजण सहसा टाळतो, कारण या एकटेपणाच्या सत्याची जाणीव अत्यंत भयप्रद असते. या सत्याला सामोरी जाणं टाळणं, एकान्त टाळणं, सतत इतरांमध्ये राहणं आणि नाइलाजानं आलेल्या एकान्तात मन टीव्ही, मोबाइल यांसारख्या कुठल्यातरी साधनांत गुंतवणं असा प्रत्येकजण काही ना काही 'एस्केप रूट' अंगिकारतो. 'इंटरनेट', 'सोशल मीडिया' सारखी बहिर्मुखतेची अनंत साधनं सहज उपलब्ध झाल्यामुळं या आधुनिक जगात स्वतःशी 'एन्काउंटर' टाळणं आता अधिक सोपं झालेलं आहे. आणि कुठलाही 'प्रॉब्लेम' आपण जितका 'टाळत राहूतितकाच तो एखाद्या गळूसारखा आतल्या आत वाढत जातो हे एक नैसर्गिक सत्य आहे.

तळमनातलं हे व्यक्तित्व हेच आपलं मूळ अस्तित्व असतं. आपलं सध्याचं व्यक्तिमत्त्व हे संस्कार व 'कन्डिशनिंग'ची वर्षानुवर्षांची अनेक पुटं चढत जाऊन आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळं असं परकं अस्तित्व आपण स्वतःचं म्हणून जगत असतो. मनातल्या या एकल्या अस्तित्वाला भिऊन त्याच्यापासून दूर पळण्यापेक्षा सरळ जाऊन त्याला भिडणं, त्याच्याशी संवाद साधणं हा स्वतःला मुळापासून सुदृढ करणारा, एकटेपणाला एकात्मतेत परिवर्तीत करणारा खरा उपचार आहे.

एकान्त आणि एकटेपणा यांत मूलभूत फरकआहे. एकांतानं माणसाचं आत्मबळ वाढतं आणि एकटेपणानं उलट हे प्रकर्षानं कमी होतं असतं. आत्मभान जागृत ठेवून स्वतःचंच त्रयस्थ निरीक्षण करीत स्वतःशीच केलेला एकाग्र संवाद हा खरा सशक्त आत्मसंवाद असतो. आपण इतर कोणाशीच बोलत नसतो, अथवा कुठलंच कार्यालयीन स्वरूपाचं इतर काम करत नसतो, तेव्हा आपण सतत स्वतःशीच तर बोलत असतो असं आपल्याला वाटत असतं. अशा मधल्यामधल्या रिकाम्या काळात आपण करतो, तो असतो क्रिया-प्रतिक्रियात्मक विचार आणि तो आपण अगदी सतत दिनचर्येतले सगळे विधी-प्रात: विधी आटोपताना 'घरी, दारी, शय्येवरी, रतिसुखाच्या अवसरी' असा करत असतो. मनात उठणाऱ्या विविध वृत्ती व आंदोलनांनी प्रेरित असा हा क्रिया-प्रतिक्रियात्मक विचार असतो. एखाद्यावेठबिगार गुलामाला राबवावं तसं आपलं मन डोक्याला सतत त्याच्या मर्जीप्रमाणं वेगवेगळ्या विचारांत राबवत असतं. पूर्णपणे 'निर्विचार' असं डोकं किंवा पूर्णपणे 'भावनाविरहित' असं मन कधीच नसतं. अशी स्थिती जेव्हा केव्हा क्षण-दोन क्षणांकरता साधली जाते, तेव्हा तर तो आत्मसंवादाच्याही पलीकडचा असा विश्वशक्तीशी संपर्कसंवाद आपल्यात घडत असतो.

आपण एका दिवसात इतरांशी करत असलेल्या वेगवेगळ्या संवादात आपली एकाग्रतेची पातळी वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, आपण एखादं भाषण देत समुदायाशी संवाद साधत असू तेव्हा एकाग्रतेची पातळी महत्तम असते. एखाद्या शिक्षक किंवा प्राध्यापकाची वर्गात शिकवताना; छोट्यासमुदायासोबतच्या संवादांची एकाग्रतेची पातळी त्यापेक्षा थोडी खालची असते. ऑफिसमधली महत्त्वाची मीटिंग, हाताखालच्या लोकांना देत असलेले ‘ब्रीफिंग' या सगळ्यांत एकाग्रतेची पातळी आणखी उतरत्या भाजणीची असते. मित्रांशी शिळोप्याच्या गप्पा किंवा जेवताना कुटुंबीयांशी चर्चा यात ती अजूनच अधिक कमी होते. या सगळ्यांपेक्षा दिवसभर डोक्यात चालत असलेल्या भरकटत्या विचारांनी आपण स्वतःशी साधत असलेल्या संवादांची पातळी तर न्यूनतम असते. आयुष्यात सगळ्यात जवळचा आणि महत्त्वाचा माणूस म्हणजे आपण स्वतः असतो आणि आपण त्याच्याशीच एकाग्र संवादांची पातळी सगळ्यात न्यूनतम असते, हा एक 'पॅरॉडॉक्स' आहे आणि आपण हे असं करतो आहोत, हे आपल्या कधीच लक्षात येत नसतं.
उत्तर लिहिले · 25/3/2022
कर्म · 121765
0
  1. तू
उत्तर लिहिले · 25/3/2022
कर्म · 5
0
आत्म्याची साद असते, तोच संवाद! या उक्तीचा अर्थ तुमच्या शब्दांत १० ते १२ ओळीत स्पष्ट करण्यासाठी खालीलप्रमाणे मांडणी करता येईल:

आत्म्याची साद असते, तोच संवाद! याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतात, तेव्हा केवळ शब्दांचे आदानप्रदान महत्त्वाचे नसते, तर त्या शब्दांमागील भावना आणिconnection महत्त्वाचे असते.

खरा संवाद तोच असतो, जो हृदयापासून येतो आणि दुसऱ्याच्या हृदयाला स्पर्श करतो. जर संवादामध्ये प्रेम, आपुलकी, सहानुभूती आणि समजूतदारपणा असेल, तर तो संवाद सार्थक ठरतो.

परंतु, जर संवाद केवळ दिखावा असेल, शब्दांमध्ये भावना नसेल, तर तो संवाद 'वधान' ठरतो. 'वधान' म्हणजे केवळ शब्दांचा गोंधळ, ज्यातcore नसतं. असा संवाद निरर्थक असतो, ज्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो.

म्हणून, संवाद साधताना नेहमी आपल्या भावना व्यक्त करा आणि दुसऱ्याच्या भावना समजून घ्या. कारण आत्म्याची साद असेल, तरच तो खरा संवाद असतो, अन्यथा तो केवळ शब्दांचा 'वधान' ठरतो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1760

Related Questions

निवृत्ती नाथ दिंडी शास्र?
वारकरी संप्रदायाचा आचारधर्म स्पष्ट करा?
मोक्षावर टीप लिहा?
विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
भगवान शंकर यांना भोळा सांब का म्हणतात?
माळकरी माणसाने नॉनव्हेज हॉटेल मध्ये जॉब करावा का?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?