उच्च शिक्षण विचार वैयक्तिक विचार

'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' याबाबत आपलं काय मत आहे?

3 उत्तरे
3 answers

'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' याबाबत आपलं काय मत आहे?

2
राहणीमानापेक्षा आपली विचारसरणी चांगली असावी. माणूस म्हणून आपण चांगले पाहिजे, आपल्याकडील चांगले विचार लोकांपर्यंत जाऊन त्यांनी त्याचे उत्तम विचारसरणीचे अनुकरण करायला शिकले पाहिजे. आपल्याकडील विद्या आपण दुसऱ्याला पण वेळ आली तर शिकविली पाहिजे.
उत्तर लिहिले · 26/1/2022
कर्म · 240
1
साधी राहणी, उच्च विचारसरणी

हे वाक्य नक्की कशा संदर्भात वापरतात याबद्दल थोडा संभ्रम आहे.

"जी लोक साधेपणाने राहतात, त्यांचे विचार उच्च असतात" असा अर्थ असेल तर यात काही विशेष तथ्य वाटत नाही. पण लोकांच्या मनात अस भरवण्याचा कायम प्रयत्न मात्र केला जातो. बहुधा लोक अशा आभासी संकल्पनांच्या आहारी जात असावी.

किंवा,

"साध्या राहणीमानात राहून विचार उच्च ठेवावे" अशा अर्थाने वापरल तर ठिक आहे. पण त्यात पण विशेष काही वाटत नाही. प्रत्येकाला स्वतःला स्वतःच्या स्थरानुसार इतरांना त्रास न देता जस राहणीमानात राहायचय त्यात ईतरांनी वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही. एखादी व्यक्ती आपली कर्तव्ये आणि कायदे पाळून भोगविलासाच आयुष्य जगत असेल तर त्यात काही वाईट आहे अस मला वाटत नाही.

बऱ्याचश्या अशा नोकऱ्या/व्यवसाय आहेत जिथे इतरांवर छाप पाडण्यासाठी बडेजाव पद्धतीच राहणीमान — निदान महागडे, ब्रँडेड कपडे — वगैरे दाखवाव लागत. त्यामुळे इथेही विशेष खटकण्यासारखं काही नाही.

थोडक्यात, उच्च विचारसरणी महत्त्वाची आहे. राहणीमान प्रत्येकाने आपल्याला आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मानवेल तस ठेवावे.

एकदा प्रसिद्ध झालात पर तुमच्या राहणीमानाने कोणाला काही फरक पडत नाही. मुकेश अंबानी आयपीएलचे सामने बघताना सर्वसाधारण दिसणारा हाफ शर्ट घालून जात असतील तर त्यात काही विशेष नाही. सगळ्यांना माहीत आहे ते कोण आहेत.


(
पण जेव्हा एखादा स्टार्टअप उद्योजक एखादा मोठा गुंतवणूकदारासोबत मिटींग करत असेल तर त्याने आपल्याला व्यवसायाला साजेस समोरच्याला प्रभावित करेल असे कपडे घालणे उचित ठरेल. मिटींगसाठी चहाच्या टपरीवर भेटण्यापेक्षा एखाद उच्चभ्रू रेस्टॉरंटमधे भेटणे योग्य ठरेल.

थोडक्यात, "साधी राहणी उच्च विचारसरणी" मधे विशेष काही तथ्य नाही. पण सर्वसामान्य जनता मात्र हे वाक्य जास्तच मनावर घेते. त्यामुळे नेतेमंडळीही त्यांच्या गरीब मतदानकर्त्यांना भेटायला जातात तेव्हा साध्या कपड्यात जातात.


सध्याच्या काळाविषयी बोलायचे झाले तर होय. अगदी बरोबर. लोकांना दिखाऊपणा करण्यात अधिक मजा वाटते आणि स्वतःच्या पैशाची श्रीमंती वारंवार झळकावण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत असतात.

पण, या सगळ्यामध्ये हे चूक की बरोबर सांगता येणार नाही, पण दिखाऊपणाच्या या दुनियेत तुम्ही कोण आहात यापेक्षा कसे दिसता, कसे राहता या गोष्टींना फार महत्त्व आहे. त्यामुळे अनेकदा परवडत नसतानाही अनेकजण फॅशनेबल कपडे, ब्रँडेड ऍक्सेसरीज, महागडे फोन, लक्झरी लाईफस्टाइल यांच्या आहारी जातात. नाही तो आव आणण्याचा केविलवाणा आटापिटा करतात. अर्थात थोडं खरवडलं, की त्यांचं सामान्यपण उघड होतंच.
उत्तर लिहिले · 13/1/2022
कर्म · 121765
0

'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' हे एक सुंदर जीवनशैलीचे वर्णन आहे. या उक्तीचा अर्थ असा आहे की माणसाने आपले जीवन साधे ठेवावे, पण आपले विचार उच्च आणि उदात्त असावेत.

या उक्तीचा अर्थ:

  • साधी राहणी: याचा अर्थ असा आहे की जीवनातील गरजा कमी ठेवाव्यात. भौतिक वस्तूंना जास्त महत्त्व देऊ नये. दिखाऊपणा आणि अनावश्यक खर्च टाळावेत.
  • उच्च विचारसरणी: याचा अर्थ असा आहे की आपले विचार मोठे आणि उदात्त असावेत. ज्ञान, नैतिकता आणि मानवता यांसारख्या मूल्यांना महत्त्व द्यावे. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा असावी.

या उक्तीचे फायदे:

  • समाधान: साधे जीवन जगल्याने मनात समाधान आणि आनंद मिळतो.
  • शांती: भौतिक वस्तूंमुळे होणारा तणाव कमी होतो आणि मानसिक शांती मिळते.
  • प्रगती: उच्च विचारसरणीमुळे व्यक्ती आणि समाजाची प्रगती होते.
  • पर्यावरण: साधे जीवन जगल्याने पर्यावरणावर कमी परिणाम होतो.

आजच्या युगात या उक्तीचे महत्त्व:

आजच्या जगात भौतिक वस्तूंच्या मागे धावण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' हे एक आदर्श जीवनशैली असू शकते.

या उक्तीनुसार जगणे निश्चितच एक चांगले जीवन जगण्याचा मार्ग आहे.

अधिक माहितीसाठी आपण हे संदर्भ पाहू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, त्याची विचार पद्धती याचे दर्शन होते, हे विधान साने गुरुजींच्या 'सुंदर पत्रे' या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, त्याची विचारपद्धती यांचे दर्शन होते हे विधान सानेगुरुजींच्या सुंदर पत्रांमधील लेखावरून स्पष्ट करा.
पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, त्यांची विचार पद्धती याचे दर्शन होते हे विधान साने गुरुजींच्या 'सुंदर पत्रां'मधील लेखावरून स्पष्ट करा.
चांगला आहे. जर तुम्ही करामत अलीच्या जागी असता, तर या संदर्भात तुमचे विचार काय असते? (इयत्ता 10 वी)
लेखिकेने सांगितलेल्या आनंदाचे स्वरूप तुमच्या शब्दांत लिहा?
जान्हवी जाधव, तुमचे उत्तर वाचले की अगदी मोबाईलसारखी फुल चार्जिंग होते. तुम्ही खरंच माझ्यासाठी गुरू आहात का?