2 उत्तरे
2 answers

विरेचन म्हणजे काय?

1
 :- विरेचन म्हणजे काय

आयुर्वेदिक पद्धतीमध्ये कोणताही आजार मुख्यतः दोन मार्गांनी दूर केला जातो.

1. औषधं उपचार करून आजार नियंत्रणात आणून, आजार बरा करणे, या पद्धतीला शमन म्हणतात.

2. आजार मुळापासून नष्ट करून शरीराबाहेर काढून टाकणे, या पद्धतीला शोधन म्हणतात.

आयुर्वेदामध्ये शोधन प्रक्रियेत पंचकर्म चिकित्सा किंवा उपचार पद्धती येते. पंचकर्म विशिष्ट आजारामध्ये आजार शरीरातून पूर्ण नष्ट करण्यासाठी केला जातो किंवा एखादा आजार होऊचं नये म्हणून शरीर शुद्धीसाठी पंचकर्म केले जाते.

या पंचकर्म चिकित्सेमध्ये एकूण पाच प्रकारचे कर्म किंवा पाच प्रकारच्या चिकित्सा केल्या जातात.

1. वमन 2. विरेचन 3. बस्ती 4. नस्य 5. रक्तमोक्षण

विरेचन हे पंचकर्म चिकित्सेमधील एक कर्म आहे, एक चिकित्सा पद्धती आहे. विरेचन मध्ये विशिष्ट प्रकारच्या औषधी वनस्पती पासून बनवलेले तूप देऊन नंतर पित्त शौचाच्या मार्गाने बाहेर काढून टाकली जाते, एकंदरीत विशिष्ट पद्धतीने जुलाब करविले जातात. या पद्धतीला विरेचन म्हणतात. विरेचन या पद्धतीतं मुख्यतं शरीरातील पित्तदोष बाहेर काढले जातात. एकंदरीत पित्ताने होणाऱ्या रोगांना बाहेर काढण्यासाठी विरेचन ही उत्तम चिकित्सा आहे.

साधारण ही१०-१५ दिवसांची प्रक्रिया असतें.यांतही तीन भाग येतात

1. पूर्व कर्म 2.प्रधान कर्म 3. पश्च्यात कर्म

पूर्व कर्म मध्ये आपल्या शरीराची प्रकृती,स्तिथी पहिली जाते म्हणजेच पूर्व चिकित्सा किंवा तपासणी करून आपल्याला औषधि वनस्पती पासून बनवलेले तूप किंवा तेल कधी व कोणकोणत्या प्रमाणातं द्यायचे ते ठरवून त्याप्रमाणे ते औषधं रोज दिले जाते. साधारण तीन चार दिवस ही प्रक्रिया होते. यामुळे शरीरात सर्वत्र जमा झालेला पित्त एका ठिकाणी म्हणजेच अमाशयात जमा होतो. त्या सोबतच स्नेहन, स्वेदन यांसारख्या प्रक्रिया सुद्धा येतात. त्यानंतर प्रधान कर्म मध्ये मुख्य दिवशी जुलाबाचे औषधं-गोळ्या देऊन जुलाब करवले जातात, त्यामुळे शरीरातील सर्व मळ तसेंच पित्त बाहेर पडून शरीर शुद्ध होते. त्यानंतर पश्च्यात कर्म मध्ये काही पथ्य बंधन पाळायला सांगितली जातात व शरीराला पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असा विशिष्ट प्रकारचा आहार पद्धतशीर दिला जातो.अशा प्रकारे या पूर्ण प्रक्रियेत साधारण १०-१५ दिवस लागतात.

पंचकर्म किंवा पंचकर्म मधील कोणतेही कर्म नेहमी डॉक्टरांच्या सल्याने, डॉक्टरांच्या निगराणीत, पंच कर्म चिकित्सा केंद्रातच करावेत. रुग्णाची प्रकृती, पूर्वी झालेला आजार, सध्याचा आजार, शारीरिक क्षमता, रुग्णाचे वय, कोणता ऋतूकाळ सुरू आहे या सर्वांचा विचार करून रुग्णाला नेमका कुठला उपचार द्यायचा हे ठरवितात. त्यामुळे घरी स्वतः हून करणे शरीरासं त्रासदायक व घातक ठरू शकते.





वात पित्त कफ समान पातळीवर कसे ठेवावेत यासाठी हे उत्तर ही पहा..

वात, पित्त आणि कफ शरीरात समान पातळीवर कसे ठेवावेत
उत्तर लिहिले · 27/11/2021
कर्म · 121765
0
विरेचन म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी, खालील माहिती उपयुक्त ठरू शकते:

विरेचन:

  • विरेचन ही एक आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे.
  • यामध्ये औषध देऊन पोटातील দোষ (मल) बाहेर काढले जातात.
  • हे पंचकर्म नावाच्या शुद्धिकरण प्रक्रियेचा एक भाग आहे.
  • विशिष्ट औषधे वापरून विरेचन केले जाते, ज्यामुळे आतड्यांतील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पित्त बाहेर काढण्यास मदत होते.

विरेचनाचे फायदे:

  • त्वचेचे रोग, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि यकृताचे विकार यांवर उपयुक्त.
  • शरीरातील वात, पित्त आणि कफ या दोषांचे संतुलन राखण्यास मदत करते.
  • रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

विरेचन कसे करावे:

  • विरेचन नेहमी तज्ञांच्या देखरेखेखाली करावे.
  • डॉक्टर तुमच्या प्रकृतीनुसार औषध आणि मात्रा ठरवतात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1620