भारताचा इतिहास
महाराष्ट्र राज्य
ब्रिटिश_राज
इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
1848 मध्ये सातारचे राज्य कोणी खालसा केले?
2 उत्तरे
2
answers
1848 मध्ये सातारचे राज्य कोणी खालसा केले?
1
Answer link
१८४८ साल सातारा येथील राजा शहाजी भोसले याचा सुरू झाला. त्यापूर्वी त्याचा भाऊ प्रतापसिंह याचाही खुलासा झाला होता. आणि संतती नसलेल्या घटकनीही इंग्रज रेसिडेंट विधियुक्त दत्तक विधान केलेले होते. पण डलहौसीने या दत्तक विधानास परवानगी न देता राज्य खालसा केले.
ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील महाराष्ट्र राज्यातील एक संस्थान. १८४८ मध्ये सातारचे राजे आप्पासाहेब ऊर्फ शहाजी यांचे निधन झाले. त्यांस मुलगा नव्हता, परंतु मृत्युआधी त्यांनी कंपनीची परवानगी न घेता एक मुलगा दत्तक घेतला होता. लॉर्ड डलहौसी याने हा दत्तक नामंजूर करून ‘आश्रित’ राज्यांच्या नावाखाली हे राज्य ब्रिटिश साम्राज्यामध्ये १८४८ मध्ये विलीन केले. कंपनीसरकारच्या संचालकांनी या कृतीचे समर्थन करताना म्हटले की, ‘भारतातील कायदा आणि प्रथेनुसार नियंत्रणाखालील म्हणजे आश्रित राज्यांना कंपनीच्या परवानगीशिवाय दत्तक घेण्याचा अधिकार नाही.ʼ
0
Answer link
1848 मध्ये लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर करून सातारचे राज्य खालसा केले. सातारा राज्याचे शेवटचे छत्रपती शाहू महाराज ( Appasaheb ) हे होते.