2 उत्तरे
2
answers
उपहास करणे म्हणजे काय?
1
Answer link
उपहास करणे म्हणजे...थोडक्यात, उप-वास म्हणजे मन व शरीर शुद्धीचा यज्ञ आहे. या विषयावर सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात, 'नुसता उपवास करून किंवा व्रतवैकल्ये करून ईश्वरप्राप्ती होत नाही. उपवास हे मन व शरीर शुद्धीसाठी करावेत.
आषाढी एकादशीची संध्याकाळ. खिडकीतून बाहेर नजर टाकली तर रस्त्यावर गणेशोत्सवाप्रमाणे गर्दी दिसली. भक्तीभावाचा सामाजिक ’कोशंट’ वाढला की काय अशी शंका येईतो, त्या गर्दीचे केंद्रबिंदू हे ’गरमागरम साबुदाणा वडे’वाले आहेत हे उलगडलं. तुलनेने विठ्ठल मंदिराजवळ गर्दी कमी होती. विठोबाच्या नावाने बटाटा व तत्सम अभारतीय आणि पचवायला भयंकर जड अशा खाद्यपदार्थांनी पोटोबा करत ’एकादशी’च्या उपवासाचे ’रिच्युअल’ करणे याहून मोठी अंधश्रद्धा ती काय असणार ! मूळात ’उपवास’ संकल्पनेचा फारच चुकीचा पगडा आजच्या समाज-मनावर आहे. एकतर स्वतःच्या पोटावर जाणुनबुजून पाय देणे किंवा नेहमीच्या आहारापेक्षा अधिक जड असे पदार्थ गटविणे! दोन्ही गोष्टींनी नक्की काय साध्य होते हा एक वेगळाच संशोधनाचा विषय आहे. बटाट्याचे वेफर्स खाऊन जर पुण्याची कमाई होत असेल व त्या पुण्याला वरण-भाताचा एखादा घास खाऊन ओहोटी लागत असेल, तर चित्रगुप्ताच्या दरबारी भ्रष्टाचारी कारकून कामाला लागले असावेत यात शंका नाही. पण मग उपवास म्हणजे तरी नक्की काय? याठिकाणी आयुर्वेदामध्ये निर्दिष्ट एक संदर्भात सांगावासा वाटतो – ’उपावृतस्य पापेभ्यः सहवासो गुणे हि य:। उपवासः स विज्ञेयो न शरीरस्य शोषणम्॥’ अर्थात् आपण आपल्या व्यक्तिमत्त्वातील, मनातील नकारात्मक बाबींपासून सजगतेने दूर जाण्याचा प्रयत्न करत मनःशांतीसाठी पूरक अशा गुणांजवळ येण्याचा प्रयत्न करणे म्हणजे उपवास. शरीराचे शोषण करणे म्हणजे उपवास नव्हे! उलटपक्षी जर मनाला शांत करायचे असेल तर शरीर स्वस्थ असणे अत्यंत आवश्यक आहे. आजारी मनुष्य चित्तशुद्धीसाठी फार काळ प्रयत्नशील राहू शकत नाही. आपल्या शरीराचे सर्व व्यापार सुरळीत चालण्यामागे महत्त्वाची भूमिका आपल्या पचनसंस्थेची असते. या पचनसंस्थेला साजेसा, पण तरीही सकस आहार घेतला तर आजारी पडण्याची वेळ येणार नाही. याच पचनसंस्थेची ताकद वर्षा ऋतू व त्यानंतर येणाऱ्या शरद ऋतूमध्ये कमी होत असते. या ऋतुबदलांचा आदर करून योग्य असा आहार घ्यावा ही खरं तर निसर्गाचे अपेक्षा! या अपेक्षापूर्तीसाठी आपल्या संस्कृतीमध्ये चातुर्मासाची युक्तीपूर्वक योजना केली आहे. चातुर्मासातील चार महिन्यांमध्ये तब्येत सांभाळण्यासाठी आहार-बदल अपेक्षित आहेत, ते उपवासाच्या रूपाने सांगितले आहेत. उपवास म्हणजे भूक मारणे असे अपेक्षित नसून, हलके मात्र स्वास्थ्य टिकवून ठेवण्याची क्षमता असलेले पदार्थ युक्ती कालानुरूप घेणे होय. धरलेला उपवास सोडताना, वसुलीच्या मानसिकतेने खाण्यावर ताव मारण्यास सुरुवात होणार असेल तर या उपासाच्या काय फायदा ?
मागील लेखांकामध्ये उपवास या संकल्पनेबद्दल थोडक्यात पाहिलं होतं. त्या उपवासांचा, येऊ घातलेल्या श्रावणाच्या व चातुर्मासाच्या निमित्ताने शारीरिक आरोग्यासाठी कसा उपयोग करुन् घेता येईल याची झलक आज पाहूयात.
पावसाळ्यामध्ये पचनशक्ती बरीच कमी होते. त्याचप्रमाणे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने वातावरणाप्रमाणेच शरीरामधील ओलावा-आर्द्रतासुद्धा वाढत जाते. म्हणूनच पचायला हलके आणि या जास्तीच्या आर्द्रतेला कमी करणारे फुटाणे श्रावणी शुक्रवारला तर लाह्या नागपंचमीला देण्याची पद्धत आहे. श्रावणी सोमवारांमध्ये तांदूळ, तीळ, मूग, जवस यांच्या मुठी हे या धान्यांचे श्रावणातील महत्त्व सांगण्याची योजना आहे.
या श्रावण मासी होणाऱ्या शरीरबदलांसाठी आहारातील तुलनेने अयोग्य घटक म्हणजे पालेभाज्या! पालेभाज्या या मूळातच पचायला जड. पावसाळ्यामध्ये जमिनीजवळ उगवणाऱ्या पालेभाज्यांची गुणवत्ता नैसर्गिकरीत्याच कमी असल्यामुळे त्या निषिद्ध सांगितल्या आहेत. तीच गत कंदमुळांची. जमिनीखाली व जमिनीजवळ होणाऱ्या भाज्यांची गुणवत्ता पाण्याच्या सततच्या संपर्कामुळे खालावते. याउलट जमिनीपासून दूर, झाडावर चढणाऱ्या पडवळीसारख्या भाज्या पथ्याच्या ठरतात. त्याचप्रमाणे उंचीवरच येणाऱ्या नारळाचा स्वयंपाकामध्ये सदुपयोग करण्याची प्रथा नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने लक्षात राहू शकते.
नवरात्र असो, गणेशोत्सव असो, विविध एकादशी असोत, पचनसंस्थेवरील ताण हलका करून नंतर सणाच्या निमित्ताने हलके पण गोड, पोषक पदार्थ पोटात जाण्याची सोय मोठ्या खुबीने चातुर्मासामध्ये केलेली आढळते. दिवाळी म्हणजे चातुर्मासाचे अखेरचे पर्व! तोवर थंडीची चिन्हे दिसायला लागतात व क्रमशः भूक वाढायला लागते. म्हणूनच उपवासांची वारंवारिता कमी होऊन फराळाकडे मोर्चा वळतो.
थोडक्यात उपवास ही शारीर-स्वास्थ्य उत्तम ठेऊन मन:स्वास्थ्यासाठी प्रयत्न करण्याची कला आहे. अशाप्रकारे आरोग्य पालनाचे सर्वंकष दिग्दर्शन करणारे चातुर्मासाचे चातुर्य आपल्या आयुष्यातून हरवता कामा नये, यासाठी आपण सर्वांनीच डोळस राहायला काय हरकत आहे?
0
Answer link
उपहास करणे म्हणजे एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा गोष्टीची खिल्ली उडवणे, तिची निंदा करणे किंवा तिला कमी लेखणे.
उपहासाचे काही प्रकार:
- व्यंगचित्र (Caricature): एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट हावभावांचे किंवा वैशिष्ट्यांचे अतिशयोक्तीपूर्ण चित्रण करून खिल्ली उडवणे.
- विडंबन (Parody): एखाद्या प्रसिद्ध साहित्यकृती, कलाकृती किंवा शैलीची नक्कल करून उपहास करणे.
- तिरकस टिप्पणी (Sarcasm): बोलण्यातून किंवा हावभावातून उपरोधिकपणे टोमणे मारणे.
उपहास अनेक प्रकारचा असू शकतो, जसे की:
- विनोदी उपहास: केवळ मनोरंजन करणे किंवा हसवणे.
- Bodily उपहास: एखाद्याला दुखवणे किंवा अपमानित करणे.
- सामाजिक उपहास: समाजातील वाईट गोष्टींवर टीका करणे.
उपहास हा एक शक्तिशाली शस्त्र आहे. त्याचा उपयोग चांगल्या आणि वाईट दोन्ही कामांसाठी केला जाऊ शकतो. म्हणूनच, उपहास करताना नेहमी विचारपूर्वक वागणे आवश्यक आहे.
टीप: उपहास करणे बर्याचवेळा नकारात्मक मानले जाते, कारण ते दुसर्या व्यक्तीला दुखावStorage शकते.