भूगोल गाव निबंध

डोंगरमाथ्यावरचे गाव यावर निबंध लिहा.

3 उत्तरे
3 answers

डोंगरमाथ्यावरचे गाव यावर निबंध लिहा.

4

माझ्या गावामध्ये गावच्या मध्यभागी महादेवाचे मंदिर आहे माझ गाव डोंगरदऱ्यांनी सजला आहे. माझ्या गावाच्या चारी बाजूंनी वृक्ष आहेत. ती झाडे दिसावयास खूप मोहक आहेत. माझ्या गावाच्या शेजारी अनेक छोटी-मोठी गावे वसलेली आहेत. माझा गाव अतिशय सुंदर आहे. माझ्या गावामध्ये ग्रामपंचायती द्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी एक मोठी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे.


 
गावचा विकास करण्यासाठी महिन्यातून एकदा माझ्या गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन केले जाते. माझे गाव अतिशय कष्टाळू आहे. माझ्या गावातील लोकांचा व्यवसाय प्रामुख्याने शेती आहे. आणि शेतीवर आधारित इतर जोड व्यवसाय सुद्धा केली जातात. जसे शेळी पालन, मेंढी पालन, दुग्ध व्यवसाय आणि इतर कुटिरोद्योग इत्यादी.


माझ्या गावामध्ये एकूण पाच देवांची मंदिरे आहेत. महादेवाचे मंदिर, गणपतीचे मंदिर, रामाचे मंदिर, मारुतीचे मंदिर, आणि वेताळाचे मंदिर इत्यादी. प्रत्येक मंदिरामध्ये एका पुजार्‍याची व्यवस्था केली गेली आहे. माझ्या गावामध्ये अनेक शिबिरे भरवली जातात. रक्तदान शिबिर, अन्नदान, आणि श्रमदान इत्यादी. माझ्या गावामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. गावच्या सार्वजनिक विकासकामांमध्ये तरुणांचा सहभाग सर्वात जास्त असतो.

रोज संध्याकाळी गावातील प्रत्येक मंदिरात भजन गायले जाते. गावातील सर्व मंडळी वर्षातील सर्व सण मोठ्या आनंदाने साजरी करतात. माझ्या गावांमध्ये मुलांसाठी खूप मोठी शाळा आहे. गावामध्ये प्राथमिक शाळा तसेच हायस्कूल पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यावेळी लहानपणी गावाकडे सुट्टीला जायचो त्यावेळी सगळे एकत्र सोबत मज्जा करायचो. माझे गाव खूप स्वच्छ व सुंदर आहे गावाकडे मित्र-मैत्रिणी खूप चांगले आहेत खुप आठवण येते त्यांची अशीच प्रेम अन मैत्री आजकालच्या मैत्रीमध्ये दिसत नाही.


माझ्या गावच्या बाजूने एक मोठी नदी वाहते, त्या नदीच्या तीरावर आम्ही सर्व मासे पकडन्यासाठी जायचो. पाण्यामध्ये उड्या मारायचो. माझ्या गावांमध्ये खूप मोठी मंदिरे आहेत. त्या सर्व मंदिरामध्ये दररोज पहाटे सकाळी पाच वाजता काकड आरती असते. माझ्या आईला देवांचे खूप वेड आहे. आमच्या गावामध्ये दररोज सकाळी गावातील सर्व माणसे गणपतीच्या दर्शनाला जातात.


सकाळी सकाळीच मंदिरातील घंट्याचा नाद घुमू लागतो. गावांमध्ये खूप मोठी यात्रा भरते. खूप मज्जा येते, देवाचे लग्न असते, हळद असते खूप भारी वाटत असत त्यावेळी आम्ही सगळे देवाचे लग्न लावताना हळद लावतो एकमेकांना हळदीने भरवतो. इकडून तिकडे नुसती पळापळ चाललेली असते. देवाच्या दर्शनासाठी खूप गर्दी असते मंदिरामध्ये लांबलांबून माणसे आलेले असतात.

गावामध्ये खूप मोठी यात्रा असते, यात्रेवेळी पाळणे खेळणी, खाऊ विकणारे हे सर्व जन येतात. मुलींसाठी सजण्यासाठी खूप मोठी दुकाने येतात. आम्ही मित्र मैत्रिणी सोबत त्यावेळी खूप मज्जा करतो. वेगवेगळे खेळ खेळत असतो, गावाकडे खूप मजा येते, खूप मोठी फॅमिली जमा होते. काका, काकू, मामा, मामी, आजी, आजोबा व आम्ही सर्व मुले मुली मिळून आनंदाने राहतो. गावाकडच्या माणसांमध्ये खूप आपुलकी व माणुसकी असते. आम्ही गावामध्ये रानात जातो. रानामध्ये गहु, आणि ज्वारी लावतो, भाजीपाला पिकवतो.


 
गावाकडची ती नागमोडी वळणे, नदीचा तीर, अवतीभवतीची झाडेझुडपे, मावळणारा सूर्य, खूप छान दिसायला मनमोहक दृश्य वाटत असते. गावाकडे प्रत्येक सोमवारी बाजार भरतो, मोठी जागा असते खूप लांब लांब पर्यंत शेतकरी लोक भाजी घेऊन विकायला बसतात तेव्हा आठवड्यातून एक दिवस खूप गर्दी असते. सगळे लोक महिला भाजी मंडईत येतात.


थोडे पुढे गेले की  व काकांचं वडापावचा सुंदर असा वास येतो. बाजारला गेलो की वडापाव हा खाणारच, कारण दुकानातील काकांच्या हाताला चव निराळी आहे. ओली भेळ, भजी, खारी बटर घेऊन यायची आई. तिन्हीसांजेच्या वेळी दिवाबत्ती झाली की आजोबा गोष्टी सांगायचे. माझे गाव खूप मनमोहक आहे स्वच्छ सुंदर निसर्गमय गाव आहे.



 

उत्तर लिहिले · 31/10/2021
कर्म · 121765
0
डोंगर माथ्यावरील गाव मराठी निबंध
उत्तर लिहिले · 31/10/2021
कर्म · 10
0

डोंगरमाथ्यावरचे गाव

डोंगरमाथ्यावर वसलेले गाव म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असलेले एक रमणीय ठिकाण. शहराच्या धावपळीपासून दूर, शांत आणिisolated जीवनशैली असलेले हे गाव असते. डोंगरमाथ्यावरचे गाव अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असते.

भौगोलिक रचना:

  • डोंगरमाथ्यावरील गावे सहसा दुर्गम ठिकाणी वसलेली असतात.
  • येथे हवामान थंड आणि आल्हाददायक असते.
  • डोंगरांमध्ये असल्याने पाण्याची उपलब्धता बेताचीच असते, त्यामुळे नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून राहावे लागते.

जीवनशैली:

  • डोंगरमाथ्यावरच्या लोकांचे जीवन साधे आणि निसर्गावर आधारित असते.
  • शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय असतो. तेथे प्रामुख्याने नागली, वरी, भात आणि भाजीपाला पिकवला जातो.
  • डोंगराळ भाग असल्यामुळे शेती करणे थोडे कठीण असते, परंतु लोक पारंपरिक पद्धतीने शेती करतात.

संस्कृती आणि परंपरा:

  • डोंगरमाथ्यावरच्या गावांची संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असते.
  • येथील लोक आपल्या परंपरा आणि रूढी जपतात.
  • गावांमध्ये जत्रा, उत्सव आणि पारंपरिक नृत्य यांचे आयोजन केले जाते, ज्यात सर्व लोक एकत्र सहभागी होतात.

समस्या:

  • डोंगरमाथ्यावरच्या गावांमध्ये अनेक समस्या असतात.
  • शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या सुविधांची कमतरता असते.
  • रोजगाराच्या संधी कमी असल्याने लोकांना शहरांकडे स्थलांतर करावे लागते.
  • पायाभूत सुविधांचा अभाव असतो, ज्यामुळे विकासाला मर्यादा येतात.

उपसंहार:

डोंगरमाथ्यावरचे गाव हे निसर्गाचे एक सुंदर रूप आहे. तेथील साधे जीवन, संस्कृती आणि निसर्गरम्य वातावरण आपल्याला खूप काही शिकवते. या गावांचे जतन करणे आणि तेथील लोकांचे जीवनमान सुधारणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1620

Related Questions

पृथ्वीतलावर किती तापमान असतं?
भारतात किती तालुके?
महाराष्ट्रातील खेड्यांच्या वसाहतीचे प्रमुख प्रकार स्पष्ट करा?
आदिवासींच्या स्थळ घटकावर थोडक्यात माहिती लिहा?
पृथ्वीचे अंतरंग किती व कोणत्या थरांपासून बनलेले आहे? याविषयी सविस्तर माहिती लिहा.
खारे वारे (Land breeze) आणि मतलई वारे (Sea breeze) संकल्पना आकृतीसह स्पष्ट करा?
ज्वालामुखी ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?