2 उत्तरे
2 answers

राज्य शास्त्राचे जनक कोण?

1
अ‍ॅरिस्टटल याला राज्यशास्त्राचा जनक मानले  जाते राज्यशास्त्राचा जनक कॅरिअरस्टाॅटल मानले जाते
अपरिस्टॉटल हा राज्यशास्त्र, शरीरशास्त्र, वनस्पतिशास्त्र ज्ञान जाणकार सुधारक, मध्यमार्गी तत्त्वज्ञ होता. कॅरिअरस्टॉटल अनेक निर्णय आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळा होता. त्याने खाजगी जीवनमूल्ये, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र किंवा दोन भिन्न ज्ञान शाखा आहेत, हे स्पष्टपणे मांडलेले आहे. त्याआधी किंवा दोन गोष्टींत भेद केला जात होता. अपरिस्टॉटलचा आणखी एक मार्ग पॅलू म्हणजे त्याने आज राजाचा विचार केला, आजची चाल चालली रूढी-परंपरा-रीतिरिवाजला प्राधान्य दिले. आज कॅरिअरस्टॉटल लागू राज्यशास्त्र जनक प्रदर्शन केले जाते.
 



ग्रीक संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतंपैकी एक. पूर्वीपासून अनेक शतके ही संस्कृत स्वप्रभेने नांदत होती. ग्रीस अनेक नगरराज्ये होती. एक मध्यवर्ती बलवान असे सत्ताेंद्र केंद्र. त्याला भौगोलिक परिस्थिती कारणीभूत होती. तीन पक्षी समुद्र आणि एक डोंगररांगा या प्रदेशात अनेक लहान-मुलांची बेटी होती. या पुत्र लोकांची जीवनशैली, धर्म संकल्पना, रीतिरिवाज साम्य होते, तुम्ही ही राज्ये होती. लोकशाही ही याच नगरराजील जगदिला देणगी आहे. काही ठिकाणी राजेशाही असायची, त्यांची राजेशाही इव्हेंटील राजा प्रजा निवडून देत आहे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण भाग. येथे अनेक तत्त्वज्ञ, विचारवंत, शास्त्रज्ञ जन्माला आले. सगळी जग इथला इतिहास आणि संस्कृती किंवा कुतुहल असते.
 
ग्रीसमधील स्टेगिरस या अशाच नगरराज्यात अ‍ॅरिस्टॉटलचा जन्म झाला. तो काळ होता इसवीसनपूर्व ३८४. त्याच्या वडिलांचे नाव निकोमार्क्स आणि आई फॅस्टिस. यांचे घराणे वैद्यकीचे. निकोमार्क्स हे जगज्जेता अलेक्झांडर म्हणून इतिहासात प्रसिद्ध असणाऱ्या राजाच्या आजोबांचे राजवैद्य होते. अ‍ॅरिस्टॉटलला आईवडिलांचे छत्र अल्पकाळ लाभले, परंतु घराणे श्रीमंत असल्याने त्याच्या शिक्षणात खंड पडला नाही. तत्कालीन प्रथेनुसार त्याने सुरुवातीला नीतिशास्त्र, काव्यशास्त्र, होमरचे काव्य यांचा अभ्यास केला, तसेच राजवैद्याच्या घराण्यातील असल्याने शरीरशास्त्र व वनस्पतिशास्त्र अभ्यासले. त्यात त्याला अत्यंत उत्तम गती होती. पुढे जाऊन हा मुलगा राज्यशास्त्राचा तत्त्वज्ञ होईल असे तेव्हा कोणालाही वाटले नसते. मात्र वयाच्या १७व्या वर्षी विद्येचे माहेरघर असलेल्या अथेन्समध्ये अ‍ॅरिस्टॉटलला पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले. सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो याच्या विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला आणि त्याच्या नव्या जीवनाचा प्रारंभ झाला.
या गुरुशिष्यांच्या साखळीचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. एकमेकांविषयी नितांत आदर ठेवून या तत्त्वज्ञांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आपले विचार मांडले. गुरूचे सगळे विचार मान्य करण्याची आणि त्याच धर्तीवर तत्त्व मांडण्याची परंपरा त्यांनी बदलली.
अ‍ॅरिस्टॉटल अनेक बाबतीत आपल्या पूर्वसुरींपेक्षा वेगळा होता. त्याने खाजगी जीवनमूल्ये, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन भिन्न ज्ञान शाखा आहेत, हे स्पष्टपणे मांडले. त्याआधी या दोन गोष्टींत भेद केला जात नसे. अ‍ॅरिस्टॉटलचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याने कायद्याच्या राज्याचा विचार करताना, आजवर चालत आलेल्या रूढी-परंपरा-रितीरीवाज यांना प्राधान्य दिले. मानवाने आपली सामाजिक चौकट बांधत असताना जे अनुभवसिद्ध सामुदायिक ज्ञान जमा केले, ते प्लेटोने, सोफिस्ट विचारवंतांनी बऱ्याच अंशी नाकारले होते. मात्र अ‍ॅरिस्टॉटलने परंपरागत कायद्यांची पाठराखण केली.
त्याच्यावर सर्वाधिक टीका होते ती त्याने गुलामगिरीचे समर्थन केले म्हणून. पण अ‍ॅरिस्टॉटल हा सावकाश सुधारणा कराव्यात अशा मताचा होता. त्याच्या मते सर्व माणसे समान नसतात, त्यामुळे काही श्रम करण्यासाठी व काही बौद्धिक कार्य करण्यासाठी जन्मलेली असतात. त्यातही त्याने सर्वत्र असणारी गुलामगिरी, त्यावर अवलंबून असलेल्या सामाजिक व आर्थिक व्यवस्था यांचा सर्वंकष विचार केला होता. गुलामांना अचानक मुक्त केले, तर आहे ती व्यवस्थात्मक चौकट उद्ध्वस्त होईल, याची त्याला भीती होती. पुन्हा त्यांना राजकीय अधिकार नव्हते, त्यांचाही वेगळा विचार करावा लागला असता, म्हणून तो मालकांच्या दयाबुद्धीला आवाहन करतो. विशेष क्षमतांच्या गुलामांना मुक्त करावे असेही आग्रहाने म्हणतो. परंतु सरसकट क्रांतिकारक विचार त्याला अमान्य होता.
प्लेटोबद्दल अत्यंत आदर बाळगून, परंतु त्याच्या तत्त्वज्ञ राजाच्या कल्पनेला आणि संपत्तीच्या दृष्टीकोनाला त्याने विरोध केला आहे. त्याने १५८ नगरराज्यांच्या घटनांचे नीट अध्ययन केले आणि तौलनिक अभ्यासावरून तो म्हणतो की कायद्याचे राज्य हेच मानवाला सामाजिक न्याय, सुख व विकास यासाठी मोकळीक देऊ शकते. अलेक्झांडर दि ग्रेट याला आठ वर्षे त्याने शिक्षण दिले. अर्थात हा शिष्य बौद्धिक प्रांतात काम न करता राज्यविस्ताराच्या मागे लागला. मात्र त्याला शिकवताना, अ‍ॅरिस्टॉटलने अनेकपदरी अनुभव जमा केले.
मनुष्याकडे व्यक्तिगत संपत्ती असेल, तरच मनुष्याला जीवनात रस निर्माण होतो. मालकी हक्क असेल तर मनुष्य त्याचा विनियोग करताना सद्गुण जोपासून इतरांच्या प्रगतीला साहाय्यक होतो. कायद्यासमोर सगळे समान असतील व सर्व नागरिकांना समान अधिकार, स्वातंत्र्य असेल (गुलाम, युद्धकैदी हे त्या काळी नागरिकांमध्ये मोडत नसत) असे सुधारणावादी विचार त्याने मांडले. मात्र अधिकांश रूढीप्रिय, गुलामगिरीच्या प्रथेचे सर्मथन करणारा या कारणांमुळे त्याला आधुनिक युगात क्रांतिवाद्यांनी नाकारले. राज्यशास्त्राला तौलनिक अध्ययन करून स्वतंत्र शास्त्र म्हणून या शाखेला अधिष्ठान देणारा अ‍ॅरिस्टॉटल तत्त्वज्ञांमध्ये मात्र नेहमीच अग्रणी राहील.
ही इव्हिसन सिटी ३२२ मध्ये डिपार्टमेंटमध्ये बसली होती. एकाच वेळी काव्य, राज्यशास्त्र, शरीरशास्त्र, वनस्पतिशास्त्र जाणकार हा सुधारणा करणारा, मध्यमार्गी तत्त्वज्ञ म्हणाला होता, "तुमची आंतरिक गोष्ट सिद्ध करण्याचा निर्णय घ्या. पश्चात्ताप हा दुर्गुणी व्यक्तीचा परिचित गुण आहे, संकट आहे. त्याला सुखी, समाधानी लोक, जेसीस फार फार खळबळ न माजवणारे राज्य सुरक्षित होते. आज्ञावली स्थापन केली. आपले विचार मांडले. आजच्या कार्यालयीन राज्यशास्त्राचा जनक मानला बाजार.
      

उत्तर लिहिले · 14/9/2021
कर्म · 121765
0

ॲरिस्टॉटल (Aristotle) यांना राज्यशास्त्राचे जनक मानले जाते.

ॲरिस्टॉटल हे प्राचीन ग्रीसमधील एक महान तत्वज्ञानी आणि विचारवंत होते. त्यांनी राजकारण, नैतिकता, तर्कशास्त्र, जीवशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले. 'पॉलिटिक्स' नावाच्या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथात, त्यांनी शासनाचे विविध प्रकार, राज्याची रचना आणि नागरिकांचे कर्तव्य यांविषयी विस्तृत चर्चा केली आहे. त्यांच्या याच योगदानाला आदराने गौरवण्यासाठी त्यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1660

Related Questions

स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री कोण?
ग्रामीण राजकीय नेतृत्वाचा अर्थ स्पष्ट करा?
ग्रामसंस्थेची प्रमुख कामे स्पष्ट करा?
वारली आदिवासींच्या राजकीय जीवनाचे वर्णन करा?
वारली अधिवेशनाच्या राजकीय जीवनाचे वर्णन करा?
ग्राम संस्थेची प्रमुख कामे स्पष्ट करा?
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?