भूगोल इतिहास

मराठवाड्याचा प्रवेशद्वार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

मराठवाड्याचा प्रवेशद्वार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात?

2
बार्शी सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. ... बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे.


बार्शी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका उस्मानाबाद जिल्हालगत सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असून यास मराठवाड्याचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. येथील उड़ान फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय आहे . बार्शी सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. बार्शी हे शहर कला, क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय,औद्योगिक, सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत समृद्ध असे शहर आहे. बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे.

  ?बार्शी
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: भगवंत नगरी
— 

• 

बार्शी (भारत)
तालुक्यातील गावे 
आगळगाव
अलीपूर (बार्शी)
आळजापूर
अंबाबाईवाडी
आंबेगाव (बार्शी)
अरणगाव
बाभुळगाव (बार्शी)
बाळेवाडी
बार्शी
बावी
बेळगाव (बार्शी)
भाळगाव
भांदेगाव
भंसाळे
भातांबरे
भोईंजे
भोयरे
बोरगाव (बार्शी)
बोरगाव खुर्द
चारे
चिखर्डे
चिंचखोपण
चिंचोळी
चुंब
दादशिंगे
दहिताणे
देवगाव
धामणगाव
धामगाव
धानोरे
ढेबरेवाडी
ढोराळे
धोत्रे
गाडेगाव
गाताचीवाडी
गौडगाव
घाणेगाव
घारी
घोळवेवाडी
गोडसेवाडी
गोरमाळे
गुळपोळी
हळदुगे
हात्तिज
हिंगणी
इंदापूर
इरले
इरलेवाडी
जहानपूर
जामगाव
जावळगाव
जोतिबाचीवाडी
काळांबावाडी
कळंबवाडी
काळेगाव
कांदळगाव
कापसी
कारी
कासारी
कासरवाडी
काटेगाव
कव्हे
खडकाळगाव
खाडकोनी
खामगाव
खांडवी
कोरेगाव
कोरफळे
कुसलांब
लाडोळे
लक्ष्याचीवाडी
महागाव
मालेगाव
माळवंडी
मामदापूर
मांडेगाव
माणेगाव
मिर्झानपूर
मौजे ताडवळे
मुंगाशी
नागोबाचीवाडी
नांदणी (बार्शी)
नारी
नारीवाडी
निंबाळक
पांधरी (बार्शी)
पाणगाव
पांगरी (बार्शी)
पाथरी (बार्शी)
फाफळवाडी
पिंपळगाव (बार्शी)
पिंपळवाडी (बार्शी)
पिंपरी (बार्शी)
पुरी (बार्शी)
राळेरास (बार्शी)
रास्तापूर
रातांजण
राऊळगाव (बार्शी)
रूई (बार्शी)
साकट
संगमनेर (बार्शी)
सर्जापूर
सारोळे (बार्शी)
सासुरे
सौंदरे
सावरगाव (बार्शी)
शेळगाव (बार्शी)
शेंदरी
शिराळे (बार्शी)
श्रीपतपिंपरी
सुरडी (बार्शी)
ताडसौदणे
तांबेवाडी
तांदुळवाडी (बार्शी)
तावडी
तुर्कपिंपरी
उकडगाव
उंबरगे
उंदेगाव
उपळाई
उपळे (बार्शी)
वैराग
वागाचीवाडी
वाळवड
वाणेवाडी
वांगरवाडी
यावळी (बार्शी)
येळंब
झाडी
झारेगाव
पार्श्वभूमी संपादन करा
धार्मिक महत्त्व संपादन करा
भगवंत मंदिर संपादन करा
जुन्या काळी "भगवंताची नगरी" म्हनुन बार्शी ची ओळख आढळते. बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर हे विष्णु देवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील एकमेव विष्णु मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर बांधण्यात आले. तसेच संपूर्ण आशिया खंडातील हेमाड हया पाषाणामधील कोरलेले एकमेव मंदिर आहे. मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे. गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीर्ष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणुक शहरातुन काढली जाते. प्रत्येक पूर्णिमेस छबीना बाहेर नेह्ण्यात येतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका भगवंत भक्ताची समाधी आहे. एकूण 12 महादेवाची मंदिरे असल्यामुळे बार्शी हे नाव पडल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे बार्शी हे लोकप्रिय मानले जाते.

इतर आकर्षणे संपादन करा
बार्शी शहरापासून २३ कि.मी वर श्री संतनाथ नगरी आहे. ज्‍याला वैराग असे म्‍हटले जाते. वैराग हे वैराग्‍याची भुमी म्‍हणुन ओळखले जाते. येथे श्री संतनाथ महाराज यांची समाधी आहे. वैरागचा दर बुधवारी बाजार भरतो. वैराग मधील शेळीचा बाजार प्रसिद्ध आहे. वैराग हे ठिकाण आता एक शिक्षणाच्‍या दष्‍टीने वाढत आहे. येथे सौ. सुवर्णलता गांधी महाविदयालय, विदयामंदीर कॉलेज असे काही मोठी कॉलेजेस व महाविदयालये आहेत. वैरागमध्‍ये भोगावती सहकारी साखर कारखाना आहे. बार्शी पासून ८ किलोमीटरवर दडशिंगे गाव आहे. येथे बाळपीर देवाची यात्रा भरते. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे.

वैराग पासुन १३ कि.मी वर माढा रोडवर तडवळे हे ठिकाण आहे. येथे श्री भगवती मातेचे मंदीर आहे. हे मंदीर भव्‍य असुन या देवीची अशी कथा सांगितली जाते की या देवीची मुर्ती ही गावातील भोगावती नदीत सापडली असुन ती मुर्ती त्‍यावेळी तळहाताएवढया आकाराची होती व सध्‍या ही मुर्ती 5 ते साडे पाच फुट एवढया आकाराची आहे. ही मुर्ती अगदी तुळजापुरच्‍या देवीप्रमाणे असुन, या देवीची तुळजापुरच्‍या देवीप्रमाणे पौर्णीमेला यात्रा भरते. पौर्णीमेला पूर्ण गावातुन देवीचा छबिणा काढला जोतो. गावातील भगवती माता ही जागृत देवी असुन गावातील लोकांची गावकऱ्यांची खुप श्रध्‍दा आहे. भगवती माते ची मिरवणुक ही भव्‍या असते. गावच्‍या यात्रेस परगावचे लोग येतात. तडवळे हे गाव भोगावती नदीकाठी असुन, यावली व ढोराळे गावान‍जीक आहे.

श्री.स्वामीनारायण मंदिर संपादन करा
बार्शीमध्ये बी.ए.पी.एस.स्वामीनारायण संप्रदायाचे अत्यंत सुंदर असे श्री. स्वामीनारायण मंदिर बालाजी कॉलोनी, सोलापूर रोड येथे आहे. हे मंदिर व त्यातील मूर्ती अत्यंत आकर्षक आहेत. बालकांना व युवकांना या ठिकाणी संस्कार दिले जातात.

बार्शीमध्ये जैन मंदिर हे कुर्डुवाडी रोड येथे आहे.

बार्शीमध्ये भगवंत मंदिर आहे.

'श्री निलकंठेश्वर' मंदिर,पांगरी ता.बार्शी संपादन करा
बार्शी शहरापासुन 22 कि.मी.अंतरावर पुणे-लातूर राज्यमार्गावर पांगरी या निमशहरी गावाजवळ जागृत असे निलकंठेश्वर मंदिर आहे. प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या निलकंठेश्वर मंदिरात श्रावण महिण्यात व पोर्णिमा,अमावस्या, महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते.

शैक्षणिक[१] संपादन करा
बार्शी हे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे.

अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी बार्शीत 'भगवंत इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी' ही संस्था आहे. तर पदविका अभ्यासक्रमासाठी 'इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक' ही संस्था आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी 'इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग' हे महाविद्यालय बी. एस्सी. नर्सिंग हा अभ्यासक्रम चालवते.

औषधनिर्माण शास्त्राचा अभ्यासक्रम 'सोजर कॉलेज ऑफ फार्मसी' येथे शिकवला जातो.

उच्च माध्यमिक शिक्षणासाठी खालील महाविद्यालये आहे.

१.श्री शिवाजी महाविद्यालय (कला व विज्ञान)

२.श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय (कला व विज्ञान)

३.बी.पी.सुलाखे कॉलेज ऑफ कॉमर्स (वाणिज्य)

४.महाराष्ट्र विद्यालय (कला व विज्ञान)

बार्शीची नाट्य परंपरा ही सुद्धा अत्यंत जुनी आहे.अनेक टी.व्ही सिरिअल आणि चित्रपटामध्यही बार्शीच्या कलाकारांनी काम केले आहे. बार्शीचे खारमुरे खूप प्रसिद्ध आहेत. बार्शीमधील जयशंकर मिल ही भारतातील दुसरी सुत गिरणी आहे जी आज पर्यंत चालू आहे. बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल हे नावाजलेले हॉस्पिटल असून मुंबई नंतर बार्शीमध्ये अशी दोनच कॅन्सरची हॉस्पिटल एकेकाळी देशामध्ये होती. डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल हे देखील सर्व सुविधेने संपन्न हॉस्पिटल आहे. त्याच तोडीचे या हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टर्स सेवा देतात. त्याच तोडीचे यादव हॉस्पिटल आहे. तसेच डाॅ. बी. वाय. यादव हे बार्शीतील नामांकित डॉक्टर आहेत आणि श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील ते 30 वर्षे कार्यरत आहेत. ही शाहीर अमर शेख यांची जन्मभूमी आहे. बार्शीमध्ये 12 ज्योर्तिलिंग आहेत म्हणून बार्शीला बार्शी असे नाव पडले अशी आख्यायेका सांगितली जाते. बार्शी हे शिक्षणाचे माहेरघर म्हणतात.

मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी संपादन करा
मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी नावाची संस्था बार्शीमध्ये कार्यरत असून या प्रतिष्ठान मार्फत विविध योजना राबविल्या जातात. आजाराचे मुख्य कारण दुषित पाणी आहे त्यामुळे शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे ही गरज ओळखून प्रतिष्ठानने अनेक गावात आर.ओ.प्लांट बसविलेले आहेत. 3 ते ५ वर्ष वयाच्या मुलांना मोफत तपासणी आरोग्य कार्ड दिली जातात ज्यामध्ये संपूर्ण एक वर्ष ह्या मुलांना बार्शीतील बालरोग तज्ञ डॉक्टर्स मोफत तपासणी करतात. केशर आंब्याची रोपे लावून त्याचे संवर्धन केले आहे. खेड्यामध्ये बसथांबे नसतात ही गरज ओळखून निवारा शेड उभी केलेली आहेत.

मातृभूमी प्रतिष्ठानचा महात्वाकांशी प्रकल्प "अन्नपूर्णा योजना " ज्याद्वारे निराधार, अपंग, वयोवृद्ध लोकांना दोन वेळेचे जेवणाचा डबा घरपोच दिला जातो. सध्या खामगाव,सुर्डी व बार्शी येथे एकूण १८० लाभार्थी याचा लाभ घेत आहेत.



 

उत्तर लिहिले · 3/9/2021
कर्म · 121765
0

मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून बीड जिल्ह्याला ओळखले जाते.

बीड जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या हा जिल्हा महत्त्वाचा आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2220

Related Questions

दहाशे मध्ये रिचार्ज नावाचे ॲप राज्य क्षेत्रातर्फे समांतर आहे का?
जगात सर्वात उंच व मोठे झाड कोठे आहे आणि त्यांची लांबी, रुंदी व उंची किती आहे, याची माहिती द्या?
लांजा तालुक्यातील गावांची माहिती द्या?
भारतात ऐनवरे नावाची किती गावे आहेत?
ठोसेघर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
पृथ्वीवरील सात खंड खालीलप्रमाणे आहेत?
कोतवाल, गाव, रायगड जिल्हा माहिती द्या?