2 उत्तरे
2
answers
नामदेवांचे गुरु कोण होते?
2
Answer link
नामदेवांचे गुरू विसोबा खेचर होते.
-वारकरी पंथात एक अभंग आहे --
'ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया ।।
नामा त्याचा किंकर।त्याने रचिले आवार ।।
म्हणजे ज्ञानदेवांनी पाया घातलेल्या भागवत धर्माचा विस्तार संत नामदेवांनी पंजाब पर्यंत केला? राघोबा
पेशव्यांनी मराठी सत्तेचा विस्तार अटकेपार केला.तर त्यांच्याही पूर्वी एकट्या नामदेवांनी मराठी विठ्ठल भक्तीची ध्वजा पंजाबात रोवली.आजही पंजाब मधील घुमान गावी
नामदेवांचे स्मारक मंदिर आहे!
अशा श्रेष्ठ संतास घडविलेला गुरुही तितकाच श्रेष्ठ होता, ते म्हणजे संत विसोबा खेचर!त्यांची समाधी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावात अत्यंत अडबाजूला
दुर्लक्षित ठिकाणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे!!
एकदा ज्ञानेश्वर, त्यांची भावंडे व तात्कालीन संत
मंडळी यांनी भारतातील तीर्थयात्रा समूहाने कराव्यात असे ठरविले.त्यात ज्ञानदेव व भावंडे, संत चोखोबा,संत जनाबाई, संत गोरा कुंभार अशी मंडळी होती.हे सर्व पंढरपूरात ठरले. सर्व मंडळींनी नामदेवांना बरोबर येण्याचा आग्रह केला.परंतु नामदेवांना आपल्या प्रिय विठ्ठलाचा विरह साहवेना.ते तयार होईनात.शेवटी विठ्ठलानीच त्यांना सर्वांबरोबर जाण्यास सांगितले तेंव्हा नामदेवांनी अत्यंत दुःखाने विठ्ठलाचा निरोप घेतला.
प्रवासात फिरत ही संत मंडळी वाटेत संत गोरोबा काकांच्या तेर येथील घरी उतरली.गोरोबा काकांसारख्या थोर संतांच्या घरी थांबण्यात सर्वांनाच आनंद वाटत होता.
परंतु संत नामदेवांचे चित्त मात्र थाऱ्यावर नव्हते.मनी विठ्ठलाच्या दुराव्याचे दुःख होते.इतर कशात रस वाटत नव्हता. "पंढरपूर सारखे एकमेव विठ्ठल क्षेत्र सोडून इतरत्र
देव धुंडाळण्याचा वेडेपणा ही मंडळी का करीत असतील"
असे नामदेवांना वाटत असताना,"मीच खरा एकमेव लाडका विठ्ठल भक्त आहे, फक्त विठ्ठल हाच खरा देव आहे, तो तर फक्त आपणासच वश आहे!ही सर्व संत मंडळी अज्ञानाचा खेळ खेळत आहेत.हे कसले भक्त?याना काय कळते भक्ती?आणि तरीही माझ्या सारख्या विठ्ठलाच्या लाडक्या भक्ताला हे कसल्या तीर्थावळ करण्यास नेत आहेत? वेडे कुठले!"
असे अहंकारी, गर्व विचार नामदेवांच्या मनात घोळत असताना ते छोट्या मुक्ताबाईने ओळखले. तिथे गोरोबांच्या अंगणात एक मडके थापटने पडले होते, ते गोरोबांच्या हाती देऊन मुक्ता त्यांना म्हणाली,
" काका, इथे सर्व भक्त रुपी मडकी जमली आहेत,त्यात कोणती कच्ची ,पक्की आहेत हे जरा थापटून आपटून पहा बरे!"
संत गोरा कुंभार यांनी थापटने प्रत्येकाच्या डोक्यावर आपटून पाहू लागले. प्रत्येकाला थापटून पुढे सरकू लागले. होता होता नामदेवांच्या डोईवर थापटने आपटणार तो नामदेवांनी डोईवर हात आडवा धरून थापटून घेण्यास नकार दिला.आणि गोरोबा काकांनी निर्णय दिला की " हे
(नामदेव)मडके कच्चे आहे"
यावर सर्व संत मंडळी गम्मत म्हणून खो खो हसली! संत नामदेवांना याचा (आपणासकच्चेमडकेम्हटल्याचा--आपण तर सर्वात ज्ञानी, लाडके भक्त असताना) मोठा अपमान वाटला!
ते दुःखी उदास झाले.त्यांनी आपली कैफियत ज्ञानदेवांकडे मांडली .ज्ञानदेवानी समजावले,
"आपण थोर भक्त यात वाद नाही.पण खऱ्या ज्ञान प्राप्ती शिवाय भक्तीला अर्थ नाही! खरे ज्ञान सद्गुरु शिवाय मिळत नाही, आपण तर अद्यापही गुरूशरण नाहीत.त्यामुळे आपण दुःखी!!"
नामदेवांनी यावर उपाय विचारला.तेंव्हा ज्ञानदेवांनी त्यांना औंढ्याच्या नागनाथ मंदिरात विसोबा खेचर नावाच्या गुरू शोधात जाण्यास सांगितले.
नामदेव औंढ्याच्या नागनाथ शिव मंदिरात गेले. तिथे
सदर विसोबा नामक वृद्ध शिवपिंडीवर पाय टाकून कण्हत पहुडल्याचे नामदेवांना दिसले. नामदेवांनी याबद्दल असे का म्हणून विचारलेअसता ते म्हणाले, ' मी खूप थकलो आहे,
अगळीक घडली असेल, कृपया मला मदत करा. पिंडी वरून पाय उचलून जिथे शिव पिंडी नसेल तिथे पाय ठेवा'(
नामदेवांनी बारावेळा पाय इतरत्र ठेवले, परंतु प्रत्येक वेळी पायाखाली नवीन शिव पिंडी निर्माण होई!!
नामदेवांना आश्चर्य वाटले, मनीं उमज झाली.ते विसोबाना शरण गेले. विसोबानी अद्वैताचा मूलमंत्र सांगितला,
" ईश्वर फक्त तुझ्या विठ्ठलमूर्तीतच नसून विश्वाच्या कणाकणात तो भरलेला आहे "
संत नामदेवांच्या ज्ञानाला उजाळा मिळाला!!
त्यांच्या भक्तीजीवनाला झळाळी मिळाली, ते थोर संत
पदाला पोहचले!
अशा थोर संत नामदेवांचे थोर सद्गुरू म्हणजे
हे बार्शी समाधी स्थित विसोबा खेचर होय!!
असा मस्त खुलासा झाला की आशय आणि विषय पक्का लक्षात राहतो!
खरंय ना?काय वाटले ,एवढे तरी कळवा! धन्यवाद!!!
( आजही औंढ्याच्या शिव मंदिरात बारा ठिकाणी बारा
शिव पिंडी आहेत, व पुढे काही काळाने आल्यावर मंदिरात संत नामदेवांनी कीर्तन करताना ब्राह्मणाच्या दुरागृहामुळे
मंदिर पुर्वदिशा स्थित मंदिर द्वार पश्चिमाभिमुख केले ते। आजही तिथे पहायला मिळते.जमेल त्याने हे पाहून यावे!
हा सारा श्रद्धेचा भाग आहे! नास्तिक वितंडवादि साठी या गोष्टी नाहीत!पटले ते घ्यावे, ना ते सोडून द्यावे, काही चुकले असल्यास क्षमा करावी!!!)
0
Answer link
नामदेवांचे गुरु विसोबा खेचर होते. नामदेव हे विठ्ठलाचे भक्त होते आणि त्यांनी अनेक अभंग लिहिले. विसोबा खेचर हे एक महान संत होते आणि त्यांनी नामदेवांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: