संत लेखन साहित्य

संत रामदास यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

3 उत्तरे
3 answers

संत रामदास यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

1
संत रामदास हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत आहेत. 
समर्थ रामदास यांचे मूळ नाव नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी (ठोसर) असे आहे. 

यांचा जन्म सन १६०८ मध्ये  महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जांब येथे रामनवमीच्या दिवशी माध्यान्ह वेळी झाला.



यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत कुलकर्णी होते. ते सुर्यदेवाचे उपासक होते. ते दररोज 'आदित्यहृद्य ' स्त्रोताचे पठन करायचे. 

रामदासांच्या आईचे नाव राणूबाई होते. ही संत एकनाथांच्या परिवाराची नातेवाईक होती. ही सुद्धा सूर्य नारायणाची उपासिका होती. 

सूर्याजी पंत यांना गंगाधर स्वामी आणि नारायण (समर्थ रामदास) ही  दोन पुत्र होती.


संत रामदास यांनी 'दासबोध' , 'आत्माराम' , 'मनोबोध' इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत. 



यांचा प्रमुख ग्रंथ 'दासबोध' हा आहे. हा ग्रंथ गुरुशिष्य संवाद रुपात आहे. हा ग्रंथ रामदासांनी त्यांचे परमशिष्य योगिराज कल्याण स्वामी यांच्याकडून महाराष्ट्रातील 'शिवथर घल' या रम्य तसेच दुर्गम गुहेमध्ये  लिहून घेतला आहे. 

रामदासांनी ९० पेक्षा अधिक आरत्या लिहल्या आहेत. ह्या आरत्या महाराष्ट्रातील घराघरात गायल्या जातात. तसेच त्यांनी सेकडो अभंग सुद्धा लिहले आहेत. 

उत्तर लिहिले · 5/8/2021
कर्म · 25850
0


समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. समाजाला उपदेश करण्यासाठी समर्थांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना रामदास स्वामींनी केली. 
    
समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. रामदास स्वामी आणि संत तुकाराम समकालीन होते. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. समाजाला उपदेश करण्यासाठी समर्थांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना रामदास स्वामींनी केली.



१७ व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो. दासबोधाच्या माध्यमातून रामदास स्वामींनी नेटका उपदेश समाजाला केले आहे. लग्नाच्या बोहल्यावर सावधान झालेल्या रामदासांनी संसार कसा करावा, संसार कसा असावा, याचे नेमके ज्ञान दिले. सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र रामदासांनी दिला आहे. मनावर ताबा मिळवल्यास अनेक गोष्टी सुलभ होतात, याचे ब्रह्मज्ञान रामदासांनी सकलजनांना दिले.

विचारः दैवाला दोष देण्यापेक्षा कर्मावर श्रद्धा ठेवा


दासबोधाचा जन्म

रामदास स्वामी यांनी आपले पट्टशिष्य कल्याण स्वामी यांच्याकरवी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. दासबोधाला ग्रंथराजाची उपमा दिली जाते. १७ व्या शतकात रामदासांनी दासबोध रचला. माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबीड अरण्यात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंधाची निर्मिती करण्यात आली.


विचारः गौतम बुद्धांचा ज्ञान प्राप्तीचा गुरुमंत्र

दासबोधाची रचना


दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक दशकात १० समास आहेत. यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती-पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात. समर्थांनी दोन वेळा दासबोधाची निर्मिती केली असे म्हटले जाते. पहिला दासबोध ग्रंथ २१ समासाचा होता आणि नंतरचा दासबोध २०० समासी असल्याचे सांगितले जाते. जुन्या आणि नंतरच्या दासबोधाचे एकत्रिकरण करून त्यावर संपादकीय संस्कार करून अनेक प्रकाशकांनी दासबोधांच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या. दासबोधात सर्व अध्यात्मिक ग्रंथांचे सार आहे, असेही म्हटले जाते.

सुफी मुस्लिम साजरी करतात वसंत पंचमी


दासबोधाची वैशिष्ट्ये

गुरु-शिष्य संवाद असे दासबोध ग्रंधाचे स्वरुप असून, पारंपरिक पद्धतीने केले जाणारे गणेश वंदन, सरस्वती वंदन, गुरू वंदन दासबोधात आढळत नाही. हा ग्रंथ कोणता, त्याचे नाव काय, या ग्रंथात प्रामुख्याने काय सांगितलेले आहे, या ग्रंथामुळे काय मिळेल, अशी माहिती देणाऱ्या ओव्या दासबोध ग्रंथाच्या प्रारंभी येतात. दासबोधातून रामदासांनी निश्चयात्मक आणि विवेकपूर्ण लिखाण केल्याची प्रचिती प्रत्येक समासात येते. मूर्खांची लक्षणे, नवविधा भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे. दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे.


श्रीमद्भगवद्गीतेमधील 'हे' मंत्र ठरतील यशाचे सोपान

दासबोधातील दशकांची नावे

स्तवनाचा दशक, मूर्खलक्षणांचा दशक, स्वगुण परीक्षा, नवविधा भक्ती, मंत्रांचा दशक, देवशोधन, चौदा ब्रह्मांचा दशक, मायोद्भवनाम ज्ञानदशक, गुणरूप दशक, जगज्जोतिनाम दशक, भीम दशक, विवेक वैराग्य दशक, नामरूप दशक, अखंड ध्याननाम दशक, आत्म दशक, सप्ततिन्वयाचा दशक, प्रकृती पुरुष दशक, बहुजिनसी दशक, शिकवण दशक आणि पूर्ण दशक. या दशकांच्या केवळ नावावरून समर्थ रामदास स्वामींनी मानवी जीवनाचा आणि मानवी मनाचा किती सखोल अभ्यास केला आहे, याची प्रचिती येते. आजच्या काळातही समर्थ रामदासांची शिकवण किती तंतोतंत लागू पडते, याचा प्रत्यय येतो. मनाचे श्लोक रचणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचा उल्लेख केवळ ग्रंथराज असाच करता येईल.



उत्तर लिहिले · 5/8/2021
कर्म · 121765
0

संत रामदास स्वामींनी 'दासबोध' नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांच्या प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या कार्यांपैकी एक आहे. यात त्यांनी अध्यात्मिक ज्ञान, व्यावहारिक मार्गदर्शन, आणि सामाजिक विचार व्यक्त केले आहेत.

दासबोध हा ग्रंथ अनेक दशकांपासून लोकांना मार्गदर्शन करत आहे आणि आजही तो तितकाच महत्त्वाचा मानला जातो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080

Related Questions

वैचारिक लेखन काय असते?
लेखनातील अडचणी व अडचणी दूर करण्याचे उपाय सांगा?
प्रथम पुरूषी निवेदन?
लेखनातील तारकसांगत म्हणजे काय?
लेखन म्हणजे काय?
लेखनासाठी प्राथमिक कौशल्ये काय आहेत?
लेखकाचा दृष्टीकोन म्हणजे काय?