गणित शोध

शून्याचा शोध कोणी लावला ?

3 उत्तरे
3 answers

शून्याचा शोध कोणी लावला ?

3
शून्याचा शोध इ. स ५०० च्या सुमारास भारतातील आर्यभट्ट ह्यांनी लावला होता. ... शून्याचा शोध लागण्यापूर्वी गणित मध्ये १ ते ९ अंकांचा वापर केला जात होता.                     


शून्य 0 चा शोध कोणी लावला ? | 0 Cha Shodh Koni Lavla
ह्या जगात अनेक शोध लागले, ज्यामुळे मानव जीवन पूर्णतः बदलून गेले आहे, अशाच एक इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्व पूर्ण शोध हजरो वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात लागला. हा शोध होता शून्याचा, हा इतका महत्वपूर्ण शोध होता जो अस्तित्वात आला नास्ता तर कदाचित वर्तमान काळात अस्तित्वात असणारे अनेक शोध लागलेच नसते. 

जसे कि, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते, ज्याचा पाय हा संगणक आहे. अनेक लोकांचे असे सांगणे आहे कि, संगणक हे ऑपरेटिंग सिस्टिम च्या आधारे कार्य करते, तर अनेक लोक प्रोग्रॅमींग मुळे संगणक कार्य करते असे म्हणतात, हि माहिती संपूर्ण बरोबर नाही आणि चुकीची देखील नाही. संपूर्ण संगणक प्रणाली हि बायनरी भाषेच्या आधारे कार्य पार पाडत असते. बायनरी म्हणजे दोन. हि भाषा दोन अंकांना एकत्रित करून तयार करण्यात आली आहे, त्यातील पहिला अंक शून्य असून दुसरा अंक एक हा आहे. ह्या वरून आपण समजूच शकतो कि शून्याचा शोध नसता लागला, तर कदाचित आज संगणक प्रणाली इतकी प्रगत झालीच नसती किंवा अस्तित्वातच आली नसती. 


 
इतक्या महत्वाच्या शोधाचा सर्वाना परिचय तर आहे, परंतु कोणत्या भारतीय व्यक्तीने ह्याचा शोध लावला हे बऱ्याच लोकांना माहित म्हणून, ह्या लेख द्वारे आपण शून्य 0 चा शोध कोणी लावला, शून्याचा इतिहास आणि इतर बऱ्याच घटकांची माहिती पाहणार आहोत. 

शून्य एक गणिती अंक आहे, ज्याचा साधारणतः उपयोग हा आकडेमोड करण्यासाठी आणि मोठमोठे गणिती समीकरणे सोडविण्यासाठी केला जातो. कदाचितच असे समीकरण असेल जे शून्य शिवाय सोडवले जाऊ शकते. असा हा शून्य गणिती जगात असाधारण आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का, कि ह्या असाधारण संख्येयची स्वतःची काहीच किंमत नाही हेच शून्याचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य आहे. स्वतःची काहीच किंमत नाही परंतु, जर हाच शून्य दुसऱ्या संख्येचा पाठी लावला, कि त्या संख्येची किंमत आहे त्यापेक्षा दहा पटीने वाढते आणि ह्या उलट एखाद्या संख्येच्या आदि शून्य लावला कि, त्या संख्येच्या किमती मध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही, हेच शून्याचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य आहे. 

शुन्याचा शोध लागण्यापूर्वी गणिती विश्वात १,२,३,४,५,६,७,८,९ केवळ ह्याच संख्या वापरल्या जात होत्या, परंतु जेव्हा पासून शून्य अस्तित्वात आले तेव्हा पासून असंख्य संख्या अस्तित्वात आल्या जसे कि १०२,१०३,१०३,१०४ ... इत्यादी. 


 
शून्या 0 चा शोध कोणी लावला ?
शुन्य 0 चा शोध भारतात इ.स. ५०० च्या दशकात लागला असून, हा शोध भारतीय ज्योतिषतज्ञ आणि गणितज्ञा आर्यभट्ट ह्यांनी लावला. हा शोध नेमक्या कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला लागला हे अद्याप कोणालाच माहित नसून ह्या बाबत वैज्ञानिकांनी विविध तर्क लावले आहेत. 

आर्यभट्ट हे प्राचीन भारतातील खूप मोठे गणितज्ञ होते, ज्यांचा जन्म ४७६ ह्या साली कुसूमपूर भारतात झाला, ही माहिती आर्यभट्टानि लिहिलेल्या ग्रंथातून प्राप्त झाली आहे. 

आर्यभट्ट ह्यांनी आर्किमिडीज च्या देखील आधी हे घोषित केले होते कि, पृथ्वी हि स्वतःभोवती फिरते आणि तेही अगदी अचूक. आर्यभट्टानि अनेक महत्व पूर्ण शोधनामध्ये आपले योगदान दिले असून, कालांतराने हि माहिती लुप्त होत गेली. 


 
आपण काय शिकलो ?
शून्याचा शोध इ.स ५०० च्या सुमारास भारतातील आर्यभट्ट ह्यांनी लावला होता. 
आर्यभट हे एक जोतिषतज्ञ आणि गणिततज्ञा होते. 
शून्य एखाद्या संख्येयची किंमत मूळ किमतीपेक्षा १० पटीने वाढवू शकतो. 
शून्याचा शोध लागण्यापूर्वी गणित मध्ये १ ते ९ अंकांचा वापर केला जात होता. 
आर्यभट्ट ह्यांचा जन्म ४७६ मध्ये भारतातील कुसुमपुर येथे झाला होता. 


उत्तर लिहिले · 5/9/2021
कर्म · 121765
2

भारतीय गणितज्ञांनी शून्य या संख्येची संकल्पना जगाला दिली, हे आता सर्वमान्य झालं आहे, त्यामुळे उणे संख्येला गणितात स्थान मिळाले तसंच कोणत्याही दोन संख्यांची वजाबाकी करणं शक्य झालं. गणिताचा वापर हा सर्वच क्षेत्रांना आधार देणारा असल्यामुळे एकंदरीतच सर्व ज्ञानशाखांचा विस्तार होण्यात या संकल्पनेची कळीची भूमिका राहिली आहे.

तरीही नेमक्या कोणी या संकल्पनेचं स्पष्ट विवरण केलं, याविषयी कालपरवापर्यंत फारशी माहिती नव्हती. पण आता त्या महान विद्वानाची ओळख पटली आहे. एवढंच नाही, तर केवळ शून्याची संकल्पना ही एकच देणगी त्यानं दिलेली नसून, गणित आणि खगोलशास्त्र या प्राचीन ज्ञानशाखांची अनेक दालनं त्याच्या कर्तृत्वाने समृद्ध झालेली असल्याचंही दिसून आलं आहे.

या विद्वानाचं नाव आहे ब्रह्मगुप्त, राजस्थानातील भिल्लमल शहरात इसवी सन ५९८ मध्ये त्याचा जन्म झाला. सम्राट हर्षवर्धनाच्या साम्राज्यातील राजा व्याप्रमुखाचा राजाश्रय ब्रह्मगुप्ताला लाभला होता. उज्जैन येथील वेधशाळेचा तो प्रमुख होता. त्याला ७२ वर्षांचं आयुष्य मिळालं होतं.

'ब्रह्मस्फुटसिद्धान्त ही त्याची मौलिक रचना आहे. त्यात अनेक गणितीय सूत्रं श्लोकांच्या रूपात दिलेली आहेत. शून्यासाठी जे गोलाकार चिन्ह वापरलं जातं, तेही त्यानंच सुचवलं होतं. एवढंच नाही, तर एकम्, दशम्, शतम् अशा पद्धतीनं संख्या लिहून त्या संख्येतील निरनिराळ्या स्थानांचे मूल्य निर्धारित करण्याची कल्पनाही ब्रह्मस्फुटसिद्धान्तात परत परत सांगितलेली आहे. बेरीज, वजाबाकी यासारख्या मूलभूत अंकगणिती अभिक्रियांमध्ये शुन्याचा बापर कसा होतो, हेही त्यानं स्पष्ट केलं होतं. कोणत्याही संख्येला शून्यानं गुणल्यास गुणाकार शून्यच येतो, हीही संकल्पना त्यानंच दिलेली आहे. दोन समान संख्यांच्या वजाबाकीचं उत्तर शून्य येतं तसंच कोणत्याही संख्येची बेरीज शून्याशी केल्यास त्या संख्येत कोणताही बदल होत नाही, या संकल्पनाही त्यानंच विकसित केल्या होत्या. म्हणूनच त्याची गणना, शून्याचा जनक अशी केली जाते.

शून्याविषयी इतकं विस्तारपूर्वक आणि तर्कसंगत विवरण करणारा ब्रह्मस्फुटसिद्धान्त हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. शून्याचा विचार त्यापूर्वी केवळ स्थानांच्या निर्देशासाठी केला जात होता; पण शून्य हा इतर कोणत्याही अंकाइतकाच असल्याचे प्रतिपादन ब्रह्मगुप्तानंच सर्वप्रथम आणि वस्तुनिष्ठ विचारातून केलं आहे.
उणे संख्या जर अधिक संख्येतून वजा केली तर त्या दोघांची बेरीज होते, उणे संख्येनं अधिक संख्येला गुणल्यास गुणाकार उणे येतो, उणे संख्येनं उणे संख्येला गुणल्यास गुणाकार अधिक येतो वगैरे संकल्पनाही ब्रह्मगुप्मानंच विकसित केल्या आहेत. बीजगणित आणि भूमिती यांचं स्वरूप बदलण्यातही ब्रह्मगुप्ताचा सिंहाचा वाटा आहे.

उज्जैन येथील वेधशाळेमध्ये असताना त्यानं खगोलशास्त्राला गणिताचा पाया दिला. अनेक खगोलशास्त्रीय समस्यांची उकल त्यानं गणिती पद्धतीनं केली. त्याच्या ग्रंथाविषयी व्याख्यान देण्यासाठी आठव्या शतकातील गणिती कंक याला अरबी राजांनी पाचारण करून ब्रह्मगुप्ताच्या सिद्धान्तांची तपशीलवार ओळख करून घेतली. त्यातूनच त्यानंतरच्या अरबी गणिताचा विकास होत गेला.


साभार
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन*
उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
0

शून्याचा शोध कोणी लावला याबद्दल निश्चित माहिती नाही, परंतु भारतीय गणितज्ञांनी शून्याचा उपयोग सर्वप्रथम केला असे मानले जाते.

आर्यभट्ट यांचा शून्याच्या शोधात महत्वाचा वाटा आहे. त्यांनी शून्याचा उपयोग केवळ एक संख्या म्हणून केला नाही, तर त्यास एक संकल्पना म्हणून विकसित केले.

शून्याच्या शोधाने गणित आणि विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवली.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1240

Related Questions

क्रांतीचा शोध कोणी लावला?
एडिसन ने विजेचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा?
एडिसनने विजेचा शोध लावण्यासाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा?
वास्को द गामा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता?
जोशेप स्वान कोण होते?
सन 1498 मध्ये भारतात येणारा पोर्तुगीज खलाशी कोण?
चाकाचा शोध मानवाच्या कोणत्या काळात लागला?