कथा साहित्य शिक्षण खरेदी आंबा नैतिक मूल्ये लिखाण

पुढील मुद्द्यांवरून गोष्ट कशी तयार करावी? मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू - प्रामाणिक मुलगा, वाईट मित्रांची संगत, शिक्षकांना काळजी, मुलाला घेऊन बाजारात फेरफटका, उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी, एक खराब झालेला आंबा, दोन दिवसांनी पाहणी, नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब - संदेश.

5 उत्तरे
5 answers

पुढील मुद्द्यांवरून गोष्ट कशी तयार करावी? मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू - प्रामाणिक मुलगा, वाईट मित्रांची संगत, शिक्षकांना काळजी, मुलाला घेऊन बाजारात फेरफटका, उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी, एक खराब झालेला आंबा, दोन दिवसांनी पाहणी, नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब - संदेश.

6
ही कथा फार सोपी आणि मार्मिक आहे बघा.
एका गावात एक मुलगा होता. स्वतः प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्टाने तो शाळेत जात असे. त्याच्या या गुणाने तो शिक्षकांमध्येही प्रिय होता.
मात्र त्याला वाईट मित्रांची संगत लागली. त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. शाळा बुडवणे, व्यसने करणे अशा वाईट मार्गाला तो लागला.
त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाल्याने शिक्षकांच्या ते लक्षात आले.
त्याला शिकवण मिळावी म्हणून शिक्षकांनी त्याला एक दिवस बाजारात नेले. तेथे काही चांगले आंबे घेतले आणि त्यात एक सडका आंबाही घेतला. आणि ते सर्व आंबे त्याच्याकडे दिले.
दोन दिवसांनी शिक्षकांनी त्याला आंबे आणायला सांगितले, बघतो तर काय, सगळे आंबे नासले होते.

तेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्याला समजावून सांगितले, जसे की एका सडक्या आंब्यामुळे इतर चांगले आंबेही सडून गेले. त्याचप्रमाणे खराब मित्रांमुळे तुझ्यातले चांगले गुण नष्ट होत आहेत, आणि तूझे आयुष्य वाया जात आहे. याचा विद्यार्थ्यांवर परिणाम झाला, आणि त्याने वाईट मित्रांची संगत सोडून परत जोमाने अभ्यासाला लागून चांगल्या आयुष्याची कास धरली.

संदेश: वाईट संगत लागल्यास आयुष्य वाईट मार्गाला लागते.
उत्तर लिहिले · 26/2/2021
कर्म · 61495
4
: शाळेत जाणारा कष्टाळू व प्रामाणिक मुलगा, वाईट मित्रांची संगत, शिक्षकांना काळजी, मुलाला घेऊन बाजारात फेरफटका, उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी, एक खराब झालेला आंबा, दोन दिवसांनी पाहणी, नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब - संदेश.
उत्तर लिहिले · 25/2/2021
कर्म · 90
0

गोष्ट:

एका गावात, शाळेत जाणारा एक कष्टाळू आणि प्रामाणिक मुलगा होता. त्याचे नाव राजू होते. राजू नेहमी शाळेत नियमितपणे जायचा आणि त्याचे शिक्षक त्याच्या प्रामाणिक स्वभावामुळे त्याला खूप आवडायचे. राजू अभ्यासात हुशार होता, पण त्याला काही वाईट मित्रांची संगत लागली.

राजूचे शिक्षक त्याच्या वागणुकीतील बदल पाहून चिंतेत होते. त्यांनी राजूला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. एक दिवस, शिक्षकांनी राजूला शाळेनंतर भेटायला बोलावले आणि त्याला बाजारात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

बाजारात फिरताना, शिक्षकांनी एका फळ विक्रेत्याकडून उत्तम प्रतीचे आंबे खरेदी केले. त्या आंब्यांमध्ये एक आंबा खराब निघाला. शिक्षकांनी राजूला तो खराब झालेला आंबा दाखवला आणि त्याला दोन दिवसांनी परत येऊन पाहण्यास सांगितले.

दोन दिवसांनंतर, जेव्हा राजू आणि त्याचे शिक्षक परत आले, तेव्हा त्यांनी पाहिले की त्या नासलेल्या आंब्यामुळे बाकीचे आंबे सुद्धा खराब झाले होते. हे पाहून शिक्षकांनी राजूला समजावले की, 'एका वाईट व्यक्तीच्या संगतीमुळे चांगल्या लोकांवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे वाईट मित्रांपासून दूर राहावे.'

संदेश: वाईट संगती नेहमीच हानिकारक असते.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

कथापूर्ती कशी कराल? शाळेत जाणारा कष्टाळू - प्रामाणिक मुलगा - वाईट मित्रांची संगत - शिक्षकांना काळजी - मुलाला घेऊन बाजारात फेरफटका - उत्तम प्रतीच्या आंब्यांची खरेदी - एक दगडलेला - दोन दिवसांनी पाहणी - नासक्या आंब्यामध्ये - बाकीचे आंबे खराब. तात्पर्य?
खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा: शाळेत जाणारा कष्टाळू, प्रामाणिक मुलगा, वाईट मित्रांची संगत, शिक्षकांना काळजी, मुलाला घेऊन बाजारात फेरफटका, उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी, एक खराब झालेला आंबा, दोन दिवसांनी पाहणी, नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब, संदेश?