Topic icon

नैतिक मूल्ये

1


शिर्षक - नासका आंबा.



एका गावात महेश नावाचा मुलगा एक मुलगा राहत होता. महेश हा गरीब परिस्थितीतून कष्ट करून आपले शिक्षण पूर्ण करणारा असा एक कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता.


शाळेचे शिक्षण पूर्ण करीत असतानाच तो जसा वेळ मिळेल तसा आपल्या आईवडिलांना ही कामात मदत करीत असे जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यास मदत मिळू शकेल. अभ्यासाची आवड आणि त्याला कष्टाची साथ यामुळे महेश आपल्या वर्गात नेहमीच प्रथम क्रमांक मिळवत असे.त्याची ही अभ्यासाची जिद्द पाहून त्याच्या शिक्षकांनाही त्याचा नेहमी अभिमान वाटत असे.


महेशचे लक्ष नेहमी शाळा आणि त्याचे घर यावरच असायचे. बाकीची मुले दंगा, मस्ती करायची परंतु तो तसे काहीही करत नसे. त्याला त्याच्या घरच्या आर्थिक परिस्थितीची पूर्णपणे कल्पना होती व चांगले शिक्षण घेऊन त्याला त्याच्या कुटूंबाला हातभार लावायचा होता हे तो कधीच विसरत नसे.


एके दिवशी त्याच्या शाळेतील काही वाईट मुलांनी त्याला आपल्याबरोबर आपल्या संगतीत ओढले आणि न कळतपणे महेश त्या वाईट मुलांच्या संगतीत सामील होऊ लागला. महेशच्या वागण्या बोलण्यातील फरक त्याच्या शिक्षकांच्या लगेच लक्षात आला आणि त्यांना या गोष्टीचे फारच वाईट वाटले. आणखी वाचा.....


वरील कथा संपूर्ण वाचण्यासाठी www.sopenibandh.com 


उत्तर लिहिले · 4/10/2022
कर्म · 1100
0
ठीक आहे, मी तुमच्यासाठी गोष्ट तयार करतो:

राजू नावाचा एक मुलगा एका लहान गावात राहत होता. तो शाळेत जाणारा एक कष्टाळू आणि प्रामाणिक मुलगा होता. त्याचे वडील शेतकरी होते आणि आई गृहिणी. राजू नेहमी आपल्या आई-वडिलांना मदत करत असे.

एक दिवस, राजूची ओळख काही वाईट मुलांशी झाली. हळूहळू तो त्यांच्या संगतीत रमू लागला. त्याचे अभ्यासात लक्ष लागेना. शिक्षक त्याच्याबद्दल चिंतित होते. त्यांनी त्याच्या आई-वडिलांना बोलावून सांगितले की राजूची प्रगती खालावली आहे.

एक दिवस, राजूचे वडील त्याला बाजारात घेऊन गेले. त्यांनी उत्तम प्रतीचे आंबे खरेदी केले. घरी आल्यावर त्यांनी ते आंबे एका टोपलीत ठेवले. त्या आंब्यांमध्ये एक आंबा खराब निघाला.

दोन दिवसांनी, राजुच्या आईने टोपलीतील आंबे पाहिले, तेव्हा त्यांना धक्का बसला. नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबेही खराब झाले होते.

हे पाहून राजुच्या वडिलांनी त्याला बोलावले आणि समजावले, "बेटा, जसा एक नासका आंबा बाकीच्या चांगल्या आंब्यांना खराब करतो, त्याचप्रमाणे वाईट मित्रांची संगत आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम करते. त्यामुळे वाईट संगतीपासून दूर राहा आणि चांगल्या मित्रांची निवड कर."

या घटनेनंतर, राजूला जाणीव झाली आणि त्याने वाईट मित्रांची संगत सोडली. तो पुन्हा अभ्यासात लक्ष देऊ लागला आणि एक चांगला विद्यार्थी बनला.

या गोष्टीमधून हा संदेश मिळतो की, वाईट संगतीमुळे आपल्या आयुष्यात नकारात्मक बदल होऊ शकतात. त्यामुळे चांगल्या मित्रांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440
6
ही कथा फार सोपी आणि मार्मिक आहे बघा.
एका गावात एक मुलगा होता. स्वतः प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्टाने तो शाळेत जात असे. त्याच्या या गुणाने तो शिक्षकांमध्येही प्रिय होता.
मात्र त्याला वाईट मित्रांची संगत लागली. त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. शाळा बुडवणे, व्यसने करणे अशा वाईट मार्गाला तो लागला.
त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाल्याने शिक्षकांच्या ते लक्षात आले.
त्याला शिकवण मिळावी म्हणून शिक्षकांनी त्याला एक दिवस बाजारात नेले. तेथे काही चांगले आंबे घेतले आणि त्यात एक सडका आंबाही घेतला. आणि ते सर्व आंबे त्याच्याकडे दिले.
दोन दिवसांनी शिक्षकांनी त्याला आंबे आणायला सांगितले, बघतो तर काय, सगळे आंबे नासले होते.

तेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्याला समजावून सांगितले, जसे की एका सडक्या आंब्यामुळे इतर चांगले आंबेही सडून गेले. त्याचप्रमाणे खराब मित्रांमुळे तुझ्यातले चांगले गुण नष्ट होत आहेत, आणि तूझे आयुष्य वाया जात आहे. याचा विद्यार्थ्यांवर परिणाम झाला, आणि त्याने वाईट मित्रांची संगत सोडून परत जोमाने अभ्यासाला लागून चांगल्या आयुष्याची कास धरली.

संदेश: वाईट संगत लागल्यास आयुष्य वाईट मार्गाला लागते.
उत्तर लिहिले · 26/2/2021
कर्म · 61495