2 उत्तरे
2
answers
भारताचा राष्ट्रध्वज कोठे बनतो?
8
Answer link
हुबळीचे एकमेव केंद्र पुरवते राष्ट्रध्वज
https://bit.ly/312TEa5
हुबळी - राष्ट्रध्वज बनवणारे देशभरात एकच अधिकृत केंद्र आहे , ते म्हणजे हुबळीजवळचे बेंगेरी खादी ग्रामोद्योग केंद्र. यंदा या केंद्रातून सुमारे एक कोटी रुपयांची ध्वजविक्री झाली आहे . गेली दोन वर्षेही साधारण एक कोटीच्या घरात विक्री झाल्याची माहिती आहे .🇮🇳
राष्ट्रध्वज बनवण्याचे तीन मुख्य टप्पे आहेत ; सूतकताई , रंगकाम आणि शिलाई. कापसापासून चरख्याद्वारे सूतकताई करून ध्वजाचे कापड विणले जाते. या कापडाच्या एक चौरस इंचात 32 उभे आणि 32 आडवे धागे असले पाहिजेत , असा निकष भारतीय मानक विभागाने ( ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डस ) ठरवला आहे . त्यामुळे हे कापड बनवण्याचे काम फक्त बागलकोट ( कर्नाटक ) जिल्ह्यातील तुलसगिरी व वेलूरमध्ये चालते . सूत विणून बनलेले कापड फिकट तपकिरी रंगाचे असते . या कपड्याचे तागे हुबळीच्या बेंगेरी केंद्रात मागवले जातात.
*रंगकाम*
बागलकोटहून कापडाचे तागे हुबळीत आल्यानंतर पहिल्यांदा त्याचे "ब्लीचिंग ' करून ते कापड पांढरे शुभ्र बनवले जाते. त्यानंतर काही ताग्यांना केशरी रंग , तर काही ताग्यांना हिरवा रंग दिला जातो . रंगांचा " पीएच' आणि " स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक व्हॅल्यू ' बीआयएसच्या मानकाप्रमाणे असते . त्यानंतर पांढऱ्या कापडावर निळ्या रंगाचे अशोक चक्र स्क्रीन प्रिंटिंग तंत्राद्वारे छापले जाते.♍ https://bit.ly/312TEa5
*शिलाई*
तिरंगा ध्वज सलग एकाच कापडाचा नसतो , तर तीन कापडे जोडून शिवलेला असतो. तीन एकक लांबी आणि दोन एकक रुंदी होईल , अशा प्रमाणात तीन रंगांचे तुकडे शिलाई मशिनवर जोडले जातात. केशरी तुकडा पांढऱ्या तुकड्याला जोडताना शिलाईसाठी केशरी दोरा वापरला जातो . तर हिरवा तुकडा पांढऱ्या तुकड्याला जोडताना हिरवा दोरा वापरला जातो . त्यामुळे दुरून पाहिले असता एकाच कपड्याला तीन रंग दिले असल्याचा भास होतो . प्रत्यक्षात तिरंगा बनतो तो तीन रंगांचे प्रमाणबद्ध कापलेले तुकडे जोडून !
*खास खोबण*
तिन्ही तुकडे एकमेकांना शिलाईने जोडल्यानंतर एका बाजूला खास शिवून तयार केलेली खोबण ( स्लीव्ह ) जोडली जाते. ही खोबण हातमागावर तयार केलेली असते . ती वरून खाली अशी जोडली जाते. शिवाय , खोबणीचे वरचे तोंड बंद केले जाते . एकदा ध्वज शिवून तयार झाला की तो " स्टीम इस्त्री ' केला जातो . त्यानंतर तो पिशवीबंद केला जातो . हुबळीतील या केंद्रात बीआयएसच्या मानकानुसार 9 विविध आकारांचे राष्ट्रध्वज तयार केले जातात.♍
https://bit.ly/2CsBvJ1

https://bit.ly/312TEa5
हुबळी - राष्ट्रध्वज बनवणारे देशभरात एकच अधिकृत केंद्र आहे , ते म्हणजे हुबळीजवळचे बेंगेरी खादी ग्रामोद्योग केंद्र. यंदा या केंद्रातून सुमारे एक कोटी रुपयांची ध्वजविक्री झाली आहे . गेली दोन वर्षेही साधारण एक कोटीच्या घरात विक्री झाल्याची माहिती आहे .🇮🇳
राष्ट्रध्वज बनवण्याचे तीन मुख्य टप्पे आहेत ; सूतकताई , रंगकाम आणि शिलाई. कापसापासून चरख्याद्वारे सूतकताई करून ध्वजाचे कापड विणले जाते. या कापडाच्या एक चौरस इंचात 32 उभे आणि 32 आडवे धागे असले पाहिजेत , असा निकष भारतीय मानक विभागाने ( ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डस ) ठरवला आहे . त्यामुळे हे कापड बनवण्याचे काम फक्त बागलकोट ( कर्नाटक ) जिल्ह्यातील तुलसगिरी व वेलूरमध्ये चालते . सूत विणून बनलेले कापड फिकट तपकिरी रंगाचे असते . या कपड्याचे तागे हुबळीच्या बेंगेरी केंद्रात मागवले जातात.
*रंगकाम*
बागलकोटहून कापडाचे तागे हुबळीत आल्यानंतर पहिल्यांदा त्याचे "ब्लीचिंग ' करून ते कापड पांढरे शुभ्र बनवले जाते. त्यानंतर काही ताग्यांना केशरी रंग , तर काही ताग्यांना हिरवा रंग दिला जातो . रंगांचा " पीएच' आणि " स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक व्हॅल्यू ' बीआयएसच्या मानकाप्रमाणे असते . त्यानंतर पांढऱ्या कापडावर निळ्या रंगाचे अशोक चक्र स्क्रीन प्रिंटिंग तंत्राद्वारे छापले जाते.♍ https://bit.ly/312TEa5
*शिलाई*
तिरंगा ध्वज सलग एकाच कापडाचा नसतो , तर तीन कापडे जोडून शिवलेला असतो. तीन एकक लांबी आणि दोन एकक रुंदी होईल , अशा प्रमाणात तीन रंगांचे तुकडे शिलाई मशिनवर जोडले जातात. केशरी तुकडा पांढऱ्या तुकड्याला जोडताना शिलाईसाठी केशरी दोरा वापरला जातो . तर हिरवा तुकडा पांढऱ्या तुकड्याला जोडताना हिरवा दोरा वापरला जातो . त्यामुळे दुरून पाहिले असता एकाच कपड्याला तीन रंग दिले असल्याचा भास होतो . प्रत्यक्षात तिरंगा बनतो तो तीन रंगांचे प्रमाणबद्ध कापलेले तुकडे जोडून !
*खास खोबण*
तिन्ही तुकडे एकमेकांना शिलाईने जोडल्यानंतर एका बाजूला खास शिवून तयार केलेली खोबण ( स्लीव्ह ) जोडली जाते. ही खोबण हातमागावर तयार केलेली असते . ती वरून खाली अशी जोडली जाते. शिवाय , खोबणीचे वरचे तोंड बंद केले जाते . एकदा ध्वज शिवून तयार झाला की तो " स्टीम इस्त्री ' केला जातो . त्यानंतर तो पिशवीबंद केला जातो . हुबळीतील या केंद्रात बीआयएसच्या मानकानुसार 9 विविध आकारांचे राष्ट्रध्वज तयार केले जातात.♍
https://bit.ly/2CsBvJ1

0
Answer link
भारताचा राष्ट्रध्वज कर्नाटकातील धारवाड येथे बनवला जातो.
अधिक माहिती:
- कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ (Karnataka Khadi Gramodyoga Samyukta Sangha - KKGSS) ही एकमेव संस्था आहे जी भारतीय ध्वज बनवण्यासाठी अधिकृत आहे.
- ही संस्था धारवाडमध्ये आहे.
संदर्भ: