सुरक्षा प्राणी समाज प्राणी कल्याण

मिलिटरी रिटायर्ड कुत्र्यांना का मारतात?

2 उत्तरे
2 answers

मिलिटरी रिटायर्ड कुत्र्यांना का मारतात?

5
   भारतीय सेना आपल्या रिटायर्ड  कुत्र्यांना का मारून टाकते  ?   _

             *_कुत्रा हा मानवाचा सर्वात निष्ठावान आणि विश्वासू सहकारी आहे. कुत्र्यांमध्ये असणार्‍या बुध्दीमत्ता आणि स्वामीनिष्ठेमुळं पुरातन काळापासूनच माणसानं त्यांना आपल्या आयुष्यात  एका विशेष सोबत्याचं स्थान दिलेलं आहे. आजही अपंग व्यक्तींच्या देखरेखीपासून अगदी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेततही हे श्वान अत्यंत महत्वाची भुमिका बजावताना दिसतात. सैन्यात तर कुत्र्यांच्या कामगिरीला खूप महत्त्व आहे. या श्वानांना तिथं  सेनेतले बॉम्ब, ड्रग्ज, हत्त्यारे आणि शत्रूचा ठावठिकाणा शोधण्याचं  विशेष प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यांच्या सेवेमुळं आपल्या सेनेला खूपच मोलाची मदत होत असते._*
पण आपल्या सहकाऱ्यांचे प्राण रक्षण करणारे हेच श्वान जेव्हा सेवेतून निवृत्त होतात, तेव्हा मात्र त्यांना  सेनेकडून मारून टाकलं जातं. मध्यंतरी ही बाब लोकांसमोर आल्यानंतर बर्‍याच लोकांनी आणि प्राणी मित्र संघटनांनी या गोष्टीवर नापसंती दर्शविली.

*पण हे करण्यामागचं कारण सेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. सेनेचाच एक भाग असल्यामुळे या श्वानांना सेनेच्या बर्‍याच गुप्त ठिकाणांबद्दल माहिती असते. अशात रिटायर झालेले हे श्वान देशविघातक कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तीच्या हाती लागले, तर देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. असं घडू नये म्हणूनच या श्वानांना मृत्यू दिला जातो. सेवेत असणारे एखादे श्वान आजारी पडल्यास त्याच्यावर सर्व आवश्यक ते उपचार केले जातात. पण जर एका महिन्याच्या कालावधीत त्याचं आजारपण न संपल्यास त्याला मृत्यू देण्यात येतो.अमेरिकेत दरवर्षी जवळपास ३०० श्वान सेनेतून रिटायर होतात. पण तिथं त्यांना नागरिक किंवा सेनेच्याच लोकांकडून पाळण्यासाठी घेतलं जातं.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,रशियामध्येही या श्वानांना त्यांच्याच हॅन्डलरकडून दत्तक घेतलं जातं आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाते. भारतातही काही राज्यात श्वानपथकांमधून निवृत्त झालेल्या श्वानांना दत्तक दिलं जातं. पण वस्तुस्थिती अशी आहे की बऱ्याच श्वानांना मारून टाकण्यात येतं..
बोबाटा वकून साभार

0
सैन्य दलातून निवृत्त झालेल्या कुत्र्यांना मारले जात नाही. उलट त्यांची चांगली काळजी घेतली जाते. अनेक संस्था आणि व्यक्ती त्यांना दत्तक घेण्यास तयार असतात.
निमलष्करी दलातील श्वानपथके (K9 units) देशासाठी खूप महत्त्वाची कामगिरी बजावतात. ते अनेक वर्षे आपले कर्तव्य बजावतात. त्यांची सेवा संपल्यानंतर त्यांना euthanasia ( euthanasia म्हणजे कायदेशीररित्या मारणे ) दिली जाते' अशा अनेक चुकीच्या बातम्या social media वर पसरवल्या जातात.
पण सैन्यातून निवृत्त झालेल्या कुत्र्यांसाठी अनेक पुनर्वसन (rehabilitation) केंद्रे आहेत. जिथे त्यांची चांगली काळजी घेतली जाते. त्यांना आवश्यक सुविधा पुरवल्या जातात आणि त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते.
* पुनर्वसन प्रक्रिया: * दत्तक योजना: निवृत्त श्वानपथकांना दत्तक देण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. * कुटुंबाचा भाग: अनेक सैनिक आणि सामान्य नागरिक या कुत्र्यांना दत्तक घेऊन त्यांना कुटुंबाचा भाग बनवतात. * विशेष काळजी: त्यांची शारीरिक आणि मानसिक गरज पूर्ण केली जाते.
त्यामुळे, सैन्यातून निवृत्त झालेल्या कुत्र्यांना मारले जाते ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

एस.सी. समाजात कोण येतं?
संयुक्त कुटुंब म्हणजे काय? संयुक्त कुटुंबाचे चार फायदे लिहा.
संयुक्त कुटुंब म्हणजे काय? संयुक्त कुटुंबाचे फायदे लिहा.
एकत्र कुटुंब पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
विवाहासाठी आवश्यक असलेले गुणधर्म कोणते?
आदिवासी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने काय करायला हवे?
आदिवासी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना स्पष्ट करा?