गाव समाज मानसिकता

महाराष्ट्रामध्ये पागल लोकांचे गाव कोठे आहे?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्रामध्ये पागल लोकांचे गाव कोठे आहे?

2
. पागल लोकांच गाव   

             *_अमरावती जिल्ह्यातल्या एका गावात एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय. आठराशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात 50 मनोरुग्ण आहेत. भयंकर प्रकार म्हणजे त्यांना एकतर साखळदंडांनी बांधून ठेवलं जातं किंवा खोलीत कायमचं कोंडलं जातंय... या मनोरुग्णांसाठी स्थानिक डॉक्टरांनी शिबिर घेतलं असलं, तरी अधिक व्यापक प्रयत्न होण्याची गरज आहे..._*
अमरावतीपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेले वडुरा हे नांदगाव-खंडेश्वर तालुक्यातलं गाव... बाहेरून हे गाव अन्य गावांसारखंच दिसत असलं, तरी वडु-यात सुमारे 50 मनोरुग्ण आहेत.. या मनोरुग्णांना साखळदंडांनी बांधून ठेवलेलं असतं. अनेकांना कायमस्वरुपी एका खोलीतच कोंडलेल्या अवस्थेत राहावं लागतंय...

*अतिशय कमी लोकसंख्या असताना मनोरुग्णांची इतकी मोठी संख्या धक्कादायक आहे... हे प्रमाण बुचकळ्यात टाकणारं असल्याचं गावातल्या सरकारी डॉक्टरांचं म्हणणं आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलेल्या या बातमीत गावाचा उल्लेख `पागल लोकांचं गाव` असा करण्यात आल्याबद्दल इथं नाराजी असली, तरी मनोरुग्णांचं इथलं प्रमाण जास्त असल्याचं गावकरीही मान्य करतात. मनोरुग्णांचं जास्त प्रमाण ही जशी एक समस्या आहे, तसंच या मनोरुग्णांना दिली जाणारी वागणूक आणि उपचारांचा आभाव ही अडचणही मोठी आहे... या दोन्ही प्रश्नांची उत्तर सुसंस्कृत म्हणवणा-या समाजाला लवकरात लवकर शोधावी लागतील..

0

महाराष्ट्रामध्ये 'पागल लोकांचे गाव' म्हणून कोणतीही अधिकृत ओळख नाही. त्यामुळे या नावाने कोणतेही गाव अस्तित्वात नाही.

समाजामध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि मानसिक रुग्णांना समा acceptance देणे आवश्यक आहे. त्यांना समाजात समानतेने वागवले पाहिजे.

जर तुम्हाला मानसिक आरोग्य आणि समुपदेशनासंबंधी माहिती हवी असेल, तर तुम्ही शासकीय आरोग्य विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

धाडस आणि आत्मविश्वास यात फरक कोणता आहे?
धैर्याची आवश्यकता कशासाठी लागते?
अहिंसा आणिcompassion या दोन शब्दांना जीवनपद्धतीत महत्त्व आहे?
कोरोनामुळे तुम्ही कुठली नवीन गोष्ट शिकलात?
नशीब म्हणजे नक्की काय असतं?
गारकर सर इतरांना पैसा काय वाटतो? त्याने तो पैसा मेहनतीने कमावलेला असो वा गैरमार्गाने....मी एका गरीब घरातला मुलगा आहे, तरीसुद्धा माझ्या मेहनतीने माझ्याकडे भरपूर पैसा आला....तरी पण माझ्याकडे पैसा असो वा नसो मला काही फरक पडत नाही...मी जसा आता आहे तसाच नंतर पण राहणार....?
इच्छा आणि अपेक्षा यात फरक काय?