2 उत्तरे
2
answers
प्लास्टिक बाटलीतून पाणी चांगले आहे का?
6
Answer link
तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का…? मग हे नक्की वाचा…
*_मिनरल वॉटरच्या नावावर बाजारात या प्लास्टिक बॉटल मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. कुठल्याही हॉटलमध्ये गेलो की वेटर लगेचचं विचारतो, “सर, साधा पानी चलेगा या बिसलरी लाऊ…?” आणि –आपणही हाच विचार करतो की माहित नाही इथलं पाणी कसं असेल, कुठून येत असेल, म्हणून आपण मिनरल वॉटरची बाटली मागवतो. पण – हे पाणी मागवताना, आपण डोळे झाकून विश्वास करतो की, बाटलीतलं पाणी सुरक्षितच असणार! तसं लेबल असतं ना त्यावर…!_*
प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरले गेले आणि ती बाटली किती वेळा रीयूज करता येऊ शकते.
*लेबल असलेली बाटली (पीईटी किंवा पीईटीई) फक्त एका वापरासाठी सुरक्षित असते . सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.3 किंवा 7 (पीव्हीसी आणि पीसी) लेबल असणाऱ्या बाटल्या घेणं शक्यतोवर टाळा. कारण त्यातून काही विषारी रसायने बाहेर टाकली जातात आणि ती तुमच्या पेयात समाविष्ट होतात. तसेच या बॉटल जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्या पाण्यातून अथवा पेयातून आपल्याला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.आधी हे जाणून घ्या की, हे मिनरल वॉटर म्हणजे नक्की काय. तर मिनरल वॉटर म्हणजेच खनिज पाणी, ज्या पाण्यात काही उपयोगी खनिजे मिळविल्या जाते असं पाणी म्हणजे मिनरल वॉटर. खनिजांच्या उपस्थितीमुळे पाण्याची चव बदलतेच, तसेच त्याचे औषधीय महत्व देखील आहे. मिनरल वॉटर हे एखाद्या नैसर्गिक खनिजयुक्त झरा किंवा पिण्याच्या पाण्याच्या इतर स्रोतांद्वारे मिळवितात. खनिजयुक्त पाण्यात सल्फर आणि इतर साल्ट्स असतात.
मिनरल वॉटर विकणाऱ्या अनेक कंपन्या आपल्या पॅकेजिंगवर एखादा नयनरम्य झरा किंवा तलाव दाखवून ते पाणी तिथून येत असल्याचा भास तयार करतात. पण खरं तर त्या बाटलीतलं पाणी हे आपल्या घरच्या पिण्याच्या पाण्यासारखंच असतं. तुम्ही बाटलीवर स्वतः बघू शकता, सर्वसाधारणपणे एका छोट्याशा मजकुरात ते पाणी कुठ्न आलं हे लिहिलेलं असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक कंपनी ही पाणी स्त्रोत किंवा मुख्य पाणी पुरवठा पॅकेजिंगवर स्पष्ट करण्यास बांधील असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीने पाणी म्हणजे एखादी अस्वच्छ वस्तू चाटण्या सारखेच किंवा ते त्याहीपेक्षा वाईट असू शकते. कारण पृथ्वीवर जेवढी संख्या माणसांची आहे त्यापेक्षा जास्त जिवाणू एका माणसाच्या तोंडात असतात. त्यामुळे दुसऱ्याने वापरलेलय बाटलीतून पाणी पिण्यास टाळावे. तसेच बाटली नेहमी कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशने स्वच्छ करावी. बाटली स्वच्छ करतो पण बाटलीचं तोंड आणि झाकण नीट स्वच्छ करत नाही, पण तुम्हाला माहितीये का, अर्ध्याहून जास्त जिवाणू हे त्या बाटलीच्या तोंडावरच असतात.
हे मिनरल वॉटर बनविणाऱ्या कंपन्या लोकांना तसेच युवा पिढीला आपल्या प्रोडक्टकडे आकर्षित करण्यासाठी त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट त्यात ऍड करून त्यांची जाहिरात करतात आणि ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे असा दावा देखील करतात. पण, खरं बघता यात एवढी साखर मिसळविली जाते जेवढी सोड्यात असते, त्यामुळे नुसतं जाहीरांतींवर विश्वास ठेऊ नका, लेबल वाचूनच ते विकत घ्या.
*_मिनरल वॉटरच्या नावावर बाजारात या प्लास्टिक बॉटल मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. कुठल्याही हॉटलमध्ये गेलो की वेटर लगेचचं विचारतो, “सर, साधा पानी चलेगा या बिसलरी लाऊ…?” आणि –आपणही हाच विचार करतो की माहित नाही इथलं पाणी कसं असेल, कुठून येत असेल, म्हणून आपण मिनरल वॉटरची बाटली मागवतो. पण – हे पाणी मागवताना, आपण डोळे झाकून विश्वास करतो की, बाटलीतलं पाणी सुरक्षितच असणार! तसं लेबल असतं ना त्यावर…!_*
प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरले गेले आणि ती बाटली किती वेळा रीयूज करता येऊ शकते.
*लेबल असलेली बाटली (पीईटी किंवा पीईटीई) फक्त एका वापरासाठी सुरक्षित असते . सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.3 किंवा 7 (पीव्हीसी आणि पीसी) लेबल असणाऱ्या बाटल्या घेणं शक्यतोवर टाळा. कारण त्यातून काही विषारी रसायने बाहेर टाकली जातात आणि ती तुमच्या पेयात समाविष्ट होतात. तसेच या बॉटल जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्या पाण्यातून अथवा पेयातून आपल्याला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.आधी हे जाणून घ्या की, हे मिनरल वॉटर म्हणजे नक्की काय. तर मिनरल वॉटर म्हणजेच खनिज पाणी, ज्या पाण्यात काही उपयोगी खनिजे मिळविल्या जाते असं पाणी म्हणजे मिनरल वॉटर. खनिजांच्या उपस्थितीमुळे पाण्याची चव बदलतेच, तसेच त्याचे औषधीय महत्व देखील आहे. मिनरल वॉटर हे एखाद्या नैसर्गिक खनिजयुक्त झरा किंवा पिण्याच्या पाण्याच्या इतर स्रोतांद्वारे मिळवितात. खनिजयुक्त पाण्यात सल्फर आणि इतर साल्ट्स असतात.
मिनरल वॉटर विकणाऱ्या अनेक कंपन्या आपल्या पॅकेजिंगवर एखादा नयनरम्य झरा किंवा तलाव दाखवून ते पाणी तिथून येत असल्याचा भास तयार करतात. पण खरं तर त्या बाटलीतलं पाणी हे आपल्या घरच्या पिण्याच्या पाण्यासारखंच असतं. तुम्ही बाटलीवर स्वतः बघू शकता, सर्वसाधारणपणे एका छोट्याशा मजकुरात ते पाणी कुठ्न आलं हे लिहिलेलं असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक कंपनी ही पाणी स्त्रोत किंवा मुख्य पाणी पुरवठा पॅकेजिंगवर स्पष्ट करण्यास बांधील असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीने पाणी म्हणजे एखादी अस्वच्छ वस्तू चाटण्या सारखेच किंवा ते त्याहीपेक्षा वाईट असू शकते. कारण पृथ्वीवर जेवढी संख्या माणसांची आहे त्यापेक्षा जास्त जिवाणू एका माणसाच्या तोंडात असतात. त्यामुळे दुसऱ्याने वापरलेलय बाटलीतून पाणी पिण्यास टाळावे. तसेच बाटली नेहमी कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशने स्वच्छ करावी. बाटली स्वच्छ करतो पण बाटलीचं तोंड आणि झाकण नीट स्वच्छ करत नाही, पण तुम्हाला माहितीये का, अर्ध्याहून जास्त जिवाणू हे त्या बाटलीच्या तोंडावरच असतात.
हे मिनरल वॉटर बनविणाऱ्या कंपन्या लोकांना तसेच युवा पिढीला आपल्या प्रोडक्टकडे आकर्षित करण्यासाठी त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट त्यात ऍड करून त्यांची जाहिरात करतात आणि ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे असा दावा देखील करतात. पण, खरं बघता यात एवढी साखर मिसळविली जाते जेवढी सोड्यात असते, त्यामुळे नुसतं जाहीरांतींवर विश्वास ठेऊ नका, लेबल वाचूनच ते विकत घ्या.
0
Answer link
प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही, कारण:
- রাসায়নিক মিশळे: प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीए (BPA) सारखी रसायने असू शकतात, जी पाण्यात मिसळू शकतात. ही रसायने आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
- प्रदूषण: प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे प्रदूषण वाढते. प्लास्टिक विघटित व्हायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो.
- जीवाणूंचा धोका: प्लास्टिकच्या बाटल्या पुन्हा पुन्हा वापरल्याने त्यामध्ये जीवाणू वाढू शकतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे, प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिण्याऐवजी स्टील किंवा काचेच्या बाटलीचा वापर करणे अधिक चांगले आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: