2 उत्तरे
2
answers
आर्यांच्या मूळ वस्तिस्थानासंबंधीचे सिद्धांत स्पष्ट करा.
4
Answer link
आर्य मूळचे भारतीय होते की बाहेरून आले या प्रश्नावर गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा चर्चा, वाद-विवाद झाले आहेत. उजव्या विचारधारेच्या अनेक हिंदुत्ववादी संघटना आर्य हे बाहेरून आले नाहीत, ते मूळचे भारतीयच होते असा दावा करतात.
काही जण तर हडप्पा संस्कृती ही आर्य किंवा वैदिक संस्कृती असल्याचंही म्हणतात. या दाव्यांमधलं नेमकं तथ्य काय आहे हे शोधणं आता सोपं होणार आहे. नवीन संशोधनानुसार प्राचीन DNAचा अभ्यास करून भारतातील प्रागैतिहासिक कालखंडाचं पुनर्लेखन करण्यात आलं आहे. प्राचीन भारतीय संस्कृती ही एका विशिष्ट समुदायामुळं नाही तर वेगवेगळ्या स्थलांतरितांमुळं विकसित होत गेली आहे.
भारतीय संस्कृती ही स्वतःला आर्य म्हणवून घेणाऱ्या लोकांपासून विकसित झाली असं हिंदू उजवे अभ्यासक मानतात. आर्य हे मुळात भटके होते. घोडेस्वारी, पशुपालन करणारे आर्य कुशल योद्धेही होते. हिंदू धर्माचे सर्वांत प्राचीन धार्मिक ग्रंथ अर्थात वेदांची रचना ही आर्यांनीच केल्याचं मानलं जातं. आर्य हे मूळचे भारतीयच होते आणि भारतातूनच ते आशिया तसंच युरोपच्या अन्य भागात पसरले, असा युक्तिवादही हिंदुत्त्ववादी करतात.
कोकणात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी कुणी काढल्या या गूढ आकृत्या?
सिंधुदुर्गात आढळली हजारो वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीतील मृतांची स्मारकं
इंडो-युरोपियन भाषासमूह, ज्यांतील भाषा आजही भारत आणि युरोपमधले लोक बोलतात, त्यांचा विकास आर्यांमुळेच झाल्याचं मानलं जातं.
19व्या शतकातील युरोपियन अभ्यासकांनीही आर्य हा एकमेव शुद्ध वंश असल्याचं मानलं होतं. अडॉल्फ हिटलरचं आर्यांच्या वांशिक शुद्धतेबद्दलचं मतही सर्वांना परिचित आहे. युरोप जिंकणाऱ्या आर्यांचे आपण वंशज आहोत, असं हिटलर अभिमानानं सांगायचा.
आर्य ही संकल्पना भाषिक
अभ्यासक जेव्हा 'आर्य' ही संज्ञा वापरतात, तेव्हा त्यांना 'इंडो-युरोपियन' भाषा बोलणारा समुदाय अपेक्षित असतो. मीदेखील या लेखात 'आर्य' हा शब्द त्याच संदर्भानं वापरला आहे. हिटलर किंवा उजव्या कट्टरपंथी विचारवंतांप्रमाणे आर्यांचा उल्लेख वांशिक संदर्भाने केलेला नाही.
अनेक भारतीय विद्वान आर्य हे भारताबाहेरून आले होते, या सिद्धान्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आर्य किंवा इंडो-युरोपियन भाषा बोलणाऱ्या समुदायांपैकी एक समूह भारतातील एका संस्कृतीचा अस्त होत असतानाच्या कालखंडात इथे आला. ही लोप पावणारी संस्कृती म्हणजेच हडप्पा किंवा सिंधू संस्कृती. ज्यावेळी जगाच्या अन्य भागात इजिप्शियन आणि मेसोपोटेमियन संस्कृती अस्तित्त्वात होत्या, त्याच काळात भारताच्या वायव्य भागात (जो आता पाकिस्तानात आहे) हडप्पा संस्कृती अस्तित्त्वात होती. मात्र हिंदू उजवे विचारवंत हे हडप्पन संस्कृती आर्य किंवा वैदिक संस्कृतीचाच एक भाग असल्याचं मानतात.
काही जण तर हडप्पा संस्कृती ही आर्य किंवा वैदिक संस्कृती असल्याचंही म्हणतात. या दाव्यांमधलं नेमकं तथ्य काय आहे हे शोधणं आता सोपं होणार आहे. नवीन संशोधनानुसार प्राचीन DNAचा अभ्यास करून भारतातील प्रागैतिहासिक कालखंडाचं पुनर्लेखन करण्यात आलं आहे. प्राचीन भारतीय संस्कृती ही एका विशिष्ट समुदायामुळं नाही तर वेगवेगळ्या स्थलांतरितांमुळं विकसित होत गेली आहे.
भारतीय संस्कृती ही स्वतःला आर्य म्हणवून घेणाऱ्या लोकांपासून विकसित झाली असं हिंदू उजवे अभ्यासक मानतात. आर्य हे मुळात भटके होते. घोडेस्वारी, पशुपालन करणारे आर्य कुशल योद्धेही होते. हिंदू धर्माचे सर्वांत प्राचीन धार्मिक ग्रंथ अर्थात वेदांची रचना ही आर्यांनीच केल्याचं मानलं जातं. आर्य हे मूळचे भारतीयच होते आणि भारतातूनच ते आशिया तसंच युरोपच्या अन्य भागात पसरले, असा युक्तिवादही हिंदुत्त्ववादी करतात.
कोकणात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी कुणी काढल्या या गूढ आकृत्या?
सिंधुदुर्गात आढळली हजारो वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीतील मृतांची स्मारकं
इंडो-युरोपियन भाषासमूह, ज्यांतील भाषा आजही भारत आणि युरोपमधले लोक बोलतात, त्यांचा विकास आर्यांमुळेच झाल्याचं मानलं जातं.
19व्या शतकातील युरोपियन अभ्यासकांनीही आर्य हा एकमेव शुद्ध वंश असल्याचं मानलं होतं. अडॉल्फ हिटलरचं आर्यांच्या वांशिक शुद्धतेबद्दलचं मतही सर्वांना परिचित आहे. युरोप जिंकणाऱ्या आर्यांचे आपण वंशज आहोत, असं हिटलर अभिमानानं सांगायचा.
आर्य ही संकल्पना भाषिक
अभ्यासक जेव्हा 'आर्य' ही संज्ञा वापरतात, तेव्हा त्यांना 'इंडो-युरोपियन' भाषा बोलणारा समुदाय अपेक्षित असतो. मीदेखील या लेखात 'आर्य' हा शब्द त्याच संदर्भानं वापरला आहे. हिटलर किंवा उजव्या कट्टरपंथी विचारवंतांप्रमाणे आर्यांचा उल्लेख वांशिक संदर्भाने केलेला नाही.
अनेक भारतीय विद्वान आर्य हे भारताबाहेरून आले होते, या सिद्धान्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आर्य किंवा इंडो-युरोपियन भाषा बोलणाऱ्या समुदायांपैकी एक समूह भारतातील एका संस्कृतीचा अस्त होत असतानाच्या कालखंडात इथे आला. ही लोप पावणारी संस्कृती म्हणजेच हडप्पा किंवा सिंधू संस्कृती. ज्यावेळी जगाच्या अन्य भागात इजिप्शियन आणि मेसोपोटेमियन संस्कृती अस्तित्त्वात होत्या, त्याच काळात भारताच्या वायव्य भागात (जो आता पाकिस्तानात आहे) हडप्पा संस्कृती अस्तित्त्वात होती. मात्र हिंदू उजवे विचारवंत हे हडप्पन संस्कृती आर्य किंवा वैदिक संस्कृतीचाच एक भाग असल्याचं मानतात.
0
Answer link
आर्यांच्या मूळ वस्तिस्थानासंबंधी अनेक सिद्धांत आहेत, त्यापैकी काही प्रमुख सिद्धांत खालीलप्रमाणे आहेत:
1. मध्य आशियाई सिद्धांत:
हा सिद्धांत सर्वात जास्त मानला जातो. या सिद्धांतानुसार, आर्य मध्य आशियातून भारतात आले. मॅक्स मुल्लर या विद्वानाने हा सिद्धांत मांडला.
- पुरावे: भाषिक समानता (इंडो-युरोपियन भाषा), सांस्कृतिक समानता, आणि काही प्राचीन अवशेष.
- तर्क: मध्य आशिया हा आर्य संस्कृतीच्या विकासासाठी अनुकूल होता.
2. आर्कटिक प्रदेश सिद्धांत:
बाळ गंगाधर टिळक यांनी हा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते, आर्य मूळतः आर्कटिक प्रदेशात (उत्तर ध्रुवीय प्रदेश) राहत होते.
- पुरावे: ऋग्वेदातील काही श्लोकांमध्ये दीर्घकाळ चालणाऱ्या रात्री आणि दिवसांचा उल्लेख आहे, जो आर्कटिक प्रदेशात आढळतो.
- तर्क: हवामानातील बदलांमुळे आर्य दक्षिणेकडे सरकले.
3. युरोपियन सिद्धांत:
काही विद्वानांच्या मते, आर्य हे युरोपमध्ये राहत होते आणि तेथून पूर्वेकडे स्थलांतरित झाले.
- पुरावे: भाषिक आणि सांस्कृतिक समानता.
- तर्क: युरोपमध्ये अनेक इंडो-युरोपियन भाषा बोलल्या जातात.
4. भारतीय सिद्धांत:
हा सिद्धांत आर्य हे भारताचेच मूळ रहिवासी होते असे मानतो. या सिद्धांतानुसार, आर्य बाहेरून आलेले नाहीत.
- पुरावे: भारतीय साहित्यात आर्यांच्या स्थलांतराचा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही.
- तर्क: सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृतीमध्ये समानता आढळते.
निष्कर्ष:
आर्यांच्या मूळ वस्तिस्थानाबद्दल निश्चितपणे काहीही सांगणे कठीण आहे, परंतु मध्य आशियाई सिद्धांत सर्वाधिक स्वीकारला जातो.