2 उत्तरे
2
answers
विवाह म्हणजे नेमकं काय आणि कशासाठी केला जातो?
14
Answer link
"विवाह" हे व्यक्तिंममधील नाते संबध (नाते) निर्माण करणारे सामाजिक बंधन अथवा कायदेशीर करार होय. विवाह संस्था संस्कृती आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विवीध पद्धतीने व्य्क्ती अंतर्गत नाते ,सहसा जवळकीचे आणि लैंगिक मान्य करते.अशा संबधास विवाह म्हणतात , आणि जी प्रक्रिया किंवा समारंभ या नात्याची सुरूवात करून देतो त्यास लग्न असे म्हणतात, व या नात्यास लग्न गाठ असे संबोधले जाते. लग्न हे दोन व्यक्तीमध्ये नसून त्यामध्ये दोन परिवार जोडले जातात. लग्न हे पवित्र बंधन आहे.
नागरिक खालील पैकी एक अथवा अनेक कारणांकरिता लग्न करतातः कायदेशिर, सामाजिक भावनिक, अर्थकारण, आध्यात्मिक, व धार्मिक. त्यामध्ये जमवलेले, पारिवारिक दायित्वातुन करणे होय.
दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी संततीची प्राप्ती आणि तिचे संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यापूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय.
नागरिक खालील पैकी एक अथवा अनेक कारणांकरिता लग्न करतातः कायदेशिर, सामाजिक भावनिक, अर्थकारण, आध्यात्मिक, व धार्मिक. त्यामध्ये जमवलेले, पारिवारिक दायित्वातुन करणे होय.
दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी संततीची प्राप्ती आणि तिचे संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यापूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय.
0
Answer link
विवाह म्हणजे काय:
विवाह हा दोन व्यक्तींमधील एक सामाजिक, धार्मिक आणि कायदेशीर बंधन आहे, ज्यामुळे ते दोघे एकत्र कुटुंब सुरू करू शकतात.
- सामाजिक बंधन: विवाह दोन कुटुंबांना एकत्र आणतो आणि सामाजिक संबंध मजबूत करतो.
- धार्मिक बंधन: अनेक धर्मांमध्ये विवाहाला पवित्र मानले जाते आणि तो एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे.
- कायदेशीर बंधन: विवाह दोन व्यक्तींना कायद्याने एकत्र बांधतो आणि त्यांना काही अधिकार आणि कर्तव्ये देतो.
विवाह कशासाठी केला जातो:
- कुटुंब सुरू करण्यासाठी: विवाहाचा मुख्य उद्देश म्हणजे दोन व्यक्तींनी एकत्र येऊन कुटुंब सुरू करणे आणि मुलांचे संगोपन करणे.
- companionship (सोबती): जीवनभर एकमेकांना साथ देणे, emotionally आणि physically आधार देणे.
- प्रेम आणि आपुलकी: एकमेकांवर प्रेम करणे, आदर करणे आणि आपुलकी जपणे.
- सामाजिक मान्यता: समाजाकडून एकत्र राहण्याची मान्यता मिळवणे.
- वारसा पुढे चालवणे: कुटुंबाचा वारसा पुढे चालवण्यासाठी विवाह महत्त्वाचा आहे.
इतर काही कारणे:
- आर्थिक सुरक्षा
- सामाजिक प्रतिष्ठा
- भावनिक गरज
विवाह ही एक व्यक्तिगत निवड आहे आणि तो प्रत्येकासाठी वेगळा अर्थ आणि महत्त्व असू शकतो.
अधिक माहितीसाठी: