2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्रामध्ये कोण-कोणती वृक्ष आढळतात?
4
Answer link
🌳 *वृक्षराजी महाराष्ट्रातील* 🌳
******************************
महाराष्ट्र राज्य खूप पसरलेले आहे, मोठे आहे, याची जाणीव आपले गाव सोडल्याशिवाय होत नाही. विदर्भातला माणूस कोकणात जातो, तेव्हा तेथील डोंगर दऱया त्याला लोभावून टाकतात. विविध वृक्षराजींची जंगले तो पाहत असतो. याउलट कोकणातला एखादा मराठवाड्यातील सपाटी किंवा नगर सोलापूर जिल्ह्यातील उघडीबोडकी माळराने पाहून अवाक होतो. तरीही या भौगोलिक विविधतेवर, हवामानाच्या टोकाच्या बदलांवर मात करीत काही वृक्षराजी सर्वत्र पसरून राहिली आहे. ना या वृक्षराजीला गरज भासते निगराणीची, मुद्दाम करायच्या लागवडीची, खतपाण्याची. सावली, आडोसा, गावकऱयांना लाकूडफाटा, विविध प्रजातींच्या पक्षांना मुक्कामाला ठिकाण म्हणून ही वृक्षराजी मदत तर करतेच, पण आपल्या नकळत त्यातील वैविध्य, उपयुक्तता निसर्गत जोपासत असतो. *वड, पिंपळ, कडुलिंब, पळस, बाभूळ, खैर, बेल' आपटा, कांचन, गुलमोहर, हिवर, बदाम, चंदन, निवडुंग, कोरफड, चिंच, अौदुंबर, करवंदे यांपैकी अनेक झाडे महाराष्ट्रभर सहज पाहायला मिळतात. सालई, ताम्हण ही सर्व जंगलात सापडतात. तर एरंड कुठेही फोफावलेला आढळतो. त्याच्या बियांतून निघणाऱ्या तेलापासून विविध रसायने व एरंडतेल मिळते.
वडाचे झाड त्याच्या पारंब्यांमुळे सहज लक्षात येते. हा खूप मोठा वृक्ष होतो. त्याच्या पारंब्या पुन्हा जमिनीपर्यंत पोहोचून त्यांची मुळे बनतात व विस्तारही वाढत जातो. सळसळणारी पिंपळपाने त्यांच्या आकारानेही लक्ष वेधून घेतात. आंबा व पिंपळ यांची डेरेदार वाढ व भरपूर उंची यांमुळे सावली मिळते. दोन्ही झाडांना गोलाकार पार बांधून गावकऱयांचा अड्डा त्यावर फावल्या वेळात बसल्याचे दृश्य कोणत्याही छोट्या गावात सहज दिसते. अनेक पक्ष्यांची वस्तीस्थाने वड, पिंपळ, आंबा यांच्या आधारानेच असतात.
बाभुळ व कडूलिंब ही सर्वत्र पसरलेली झाडे. यांना ऊन वारा पाऊस किंवा दुष्काळ कशाचीच पर्वा नसते. बाभळीचे काटे टोकदार असल्याने तिचे स्वरक्षण होते. कडुलिंब औषधी आहे. त्याच्या बियांचे तेल त्वचारोगावरील औषधासाठी वापरतात. नीमकेक या नावाने बनवलेले पाल्याचे खत विविध किडींपासून फळझाडे, फुलझाडे, नारळ यांचे रक्षण करते, पोषक असते. शेतीच्या छोट्या मोठ्या व घरगुती अवजारांसाठी बाभळीचे लाकूड उपयोगी पडते. कोरफड व निवडुंगही अशीच अत्यंत कमी पाण्यावरसुद्धा वाढणारी, फोफावणारी, कॅक्टस या प्रजातीतील वनस्पती. कोरफडीच्या जाड पानातला गर औषधी असतो. सौंदर्यवर्धक लेपात त्याचा वापर अलीकडे खूप वाढला आहे. निवडुंग सहसा लक्ष वेधत नाही, पण त्याची लालचुटूक बोंडे फुलल्यावर मात्र प्रत्येकाचे लक्ष तिकडे सहज जाते. शेताच्या कडेला जनावरांना अडवण्यासाठी कुंपण म्हणून बाभूळ, कोरफड, निवडुंग मुद्दाम लावले जातात. कडूलिंब बांधावर वा पायवाटेच्या कडेने वाढवतात.
गुलमोहर व पळसाचे झाड फुलते, तेव्हा प्रत्येकाचे लक्ष वेधले जाते. लालभडक रंगाने फुललेली फुले ही दोघांची वैशिष्टे. पळसाच्या फांद्या ठिसूळ असतात. वाळक्या फांद्यांचा उपयोग जळणासाठी केला जातो. पत्रावळी, द्रोण बनवण्यासाठी अनेक वर्षे पानांचा उपयोग केला जातो. बेलाला येणारी टणक, गोलाकार पिवळी फळे औषधी असतात. त्यांतील गराचा उपयोग पोटाच्या विकारासाठी केला जातो. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने 'सोने म्हणून घेण्याची पद्धत आहे. आपटा हल्ली कमी होत चालल्याने त्यासाठी कांचनच्या पानांचाही वापर केला जातो. आपटा व कांचन यांची पाने जुळी, एकमेकांवर बरोबर जुळणारी, एकाच देठाने जोडलेली असतात. कांचनाला सुंदर जांभळी, गुलाबी, पिवळ्या रंगाची नाजूक फुलेही येतात.
खैर, सांग, चंदन, जंगली बदाम, हिवर, अंजन ही सारी वृक्षराजी छोट्या मोठ्या जंगलाला धरून वाढते. अर्थातच क्वचित सुटी झाडेसुद्धा आढळतात. उदाहरणार्थ, चंदन किंवा बदामाचे मोठे झाड एखाद्या बागेतसुद्धा दिसते; पण सहसा देवराया, जंगले येथे यांची मोठी वाढ सापडते. घाटमाथ्याकडून उताराकडे येताना संपूर्ण सह्याद्रीमध्ये त्यांची दाट जंगले आढळतात. उत्तम लाकूड, सुवासिक लाकूड, कोरीव कामासाठी वापरले जाणारे लाकूड म्हणून या झाडांची तोड करून आपणच ही वृक्षराजी नष्ट करत आहोत. उंच वाढणाऱ्या या झाडांमुळे पर्यावरणाला होणारी मदत व त्यांच्या सान्निध्याने वाढणारे जैववैविध्यही त्यामुळे कमी होत आहे.
चिंचेचे वृक्ष गावात, शेतात, जंगलात कुठेही आढळतात. आंबट गोड पालाही खायला छान लागतो. चिंचेचा वापर अनेक पद्धतींनी केला जातो. खाण्याच्या पदार्थांसाठी जशी ती आवश्यक असते, तसाच त्यातील आम्ल गुणधर्मामुळे स्वयंपाकाची भांडी घासण्यासाठी तांबे पितळ पारंपरिक पद्धतीत तिचा वापर केला जाई. स्टेनलेस स्टीलमुळे हा वापर कमी होत गेला आहे.
अौदुंबर खूप मोठा होणारा हा वृक्ष त्याच्या अंजीराच्या आकाराच्या गोडसर फळांनी लगडून जातो. त्यावर विविध पक्षी, माकडे अक्षरश: तुटून पडतात.
महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारे काही वृक्ष आहेत, मात्र ते फळवृक्ष म्हणून आपण ओळखतो. त्यांची फळांसाठी लागवडही केली जाते. सरसहा लागवडीशिवायही ते दिसतात म्हणून त्यांचा उल्लेख येथे केला आहे. जांभूळ व करवंदे ही आवडीने खाल्ली जाणारी फळे. जांभळाचा मोठा वृक्षच असतो. करवंदांच्या झुडपांनी बनलेल्या जाळ्या डोंगरउतारावर पहायला मिळतात. फणस, आंबा, जांभूळ यांचे मोठे वृक्ष बनतात. त्यांच्या फळांच्या आकारात, चवीत अनेक प्रकार पाहिला मिळतात. तिन्हींची फळे, त्यापासून बनवलेले पदार्थ व एवढेच नव्हे, तर तिन्हींच्या बियांपासून बनवलेल्या पावडरीचा औषधी वापरही गेल्या काही वर्षांत सुरू झाला आहे.
आवळा व शेवगा ही दोन झाडे अत्यंत उपयुक्त आहेत. औषधी आवळा व शेवगाच्या शेवग्याच्या शेंगा यांचा वापर सरसकट केला जातो. शेवग्याचा पाला भाजीसाठी ग्रामीण भागात वापरतात. कितीही वेळा तोडला, तरी सहज पुन्हा फोफावणारा शेवगा सर्वत्र आढळतो.
बोराचे झाड सर्वत्र आढळते. विविध प्रकारची बोरं सध्या पहायला मिळतात. चण्यांच्या आकाराच्या आंबटगोड बोरांपासून टपोऱ्या मोठ्या बोरांपर्यंत आढळणारे अनेक प्रकार आता लागवडीमुळे लोकप्रिय झाले आहेत. पण गावठी बोर सहजपणे कुठेही आढळते. पंधरा वीस फूट उंचीपर्यंत वाढणारे हे झाड काट्यांनी युक्त अशा फांद्यांचे असते. बोरांचे विविध पदार्थ, जॅम, सरबते करण्याचे प्रयत्न आता यशस्वी झाले आहेत. बोरीचे लाकूडही उपयुक्त ठरते.
सागरी प्रदेशातील नारळ व सुपारी व सरसहा दिसणारा ताड त्यांच्या उंचीमुळे लक्ष वेधून घेतात. नाराळाच्या बागा, सुपारीच्या बागा, हे सागरी किनारपट्टीजवळचे दृष्य. बागायत या प्रकारातही ही वृक्षराजी वाढवली जाते. पण अन्यथा नारळाची झाडे घरच्या नारळासाठी महाराष्ट्रभर लावली गेली आहेत. ताडाची झाडे ठिकठिकाणी दिसतात पण ताडी व नीरा मिळविण्यासाठी मुद्दाम लागवडसुद्धा केलेली आढळते.
निलगिरी, सुबाभूळ, साग या तिन्हींची मुद्दाम लागवड करून त्याचा वनीकरणासाठी, पर्यावरणासाठी फायदा करण्याचे प्रयत्न गेल्या पंचवीस तीस वर्षांत झाले आहेत. त्यामुळे त्यांची जंगलेही काही भागात आढळतात. तसेच तेंदुपत्ता व मोहाच्या झाडांचीही लागवड आणि जोपासना केली जाते. मात्र सरसकट नैसर्गिक वृक्षराजी असे त्यांचे स्वरूप त्यामानाने सर्वत्र आढळत नाही.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
******************************
महाराष्ट्र राज्य खूप पसरलेले आहे, मोठे आहे, याची जाणीव आपले गाव सोडल्याशिवाय होत नाही. विदर्भातला माणूस कोकणात जातो, तेव्हा तेथील डोंगर दऱया त्याला लोभावून टाकतात. विविध वृक्षराजींची जंगले तो पाहत असतो. याउलट कोकणातला एखादा मराठवाड्यातील सपाटी किंवा नगर सोलापूर जिल्ह्यातील उघडीबोडकी माळराने पाहून अवाक होतो. तरीही या भौगोलिक विविधतेवर, हवामानाच्या टोकाच्या बदलांवर मात करीत काही वृक्षराजी सर्वत्र पसरून राहिली आहे. ना या वृक्षराजीला गरज भासते निगराणीची, मुद्दाम करायच्या लागवडीची, खतपाण्याची. सावली, आडोसा, गावकऱयांना लाकूडफाटा, विविध प्रजातींच्या पक्षांना मुक्कामाला ठिकाण म्हणून ही वृक्षराजी मदत तर करतेच, पण आपल्या नकळत त्यातील वैविध्य, उपयुक्तता निसर्गत जोपासत असतो. *वड, पिंपळ, कडुलिंब, पळस, बाभूळ, खैर, बेल' आपटा, कांचन, गुलमोहर, हिवर, बदाम, चंदन, निवडुंग, कोरफड, चिंच, अौदुंबर, करवंदे यांपैकी अनेक झाडे महाराष्ट्रभर सहज पाहायला मिळतात. सालई, ताम्हण ही सर्व जंगलात सापडतात. तर एरंड कुठेही फोफावलेला आढळतो. त्याच्या बियांतून निघणाऱ्या तेलापासून विविध रसायने व एरंडतेल मिळते.
वडाचे झाड त्याच्या पारंब्यांमुळे सहज लक्षात येते. हा खूप मोठा वृक्ष होतो. त्याच्या पारंब्या पुन्हा जमिनीपर्यंत पोहोचून त्यांची मुळे बनतात व विस्तारही वाढत जातो. सळसळणारी पिंपळपाने त्यांच्या आकारानेही लक्ष वेधून घेतात. आंबा व पिंपळ यांची डेरेदार वाढ व भरपूर उंची यांमुळे सावली मिळते. दोन्ही झाडांना गोलाकार पार बांधून गावकऱयांचा अड्डा त्यावर फावल्या वेळात बसल्याचे दृश्य कोणत्याही छोट्या गावात सहज दिसते. अनेक पक्ष्यांची वस्तीस्थाने वड, पिंपळ, आंबा यांच्या आधारानेच असतात.
बाभुळ व कडूलिंब ही सर्वत्र पसरलेली झाडे. यांना ऊन वारा पाऊस किंवा दुष्काळ कशाचीच पर्वा नसते. बाभळीचे काटे टोकदार असल्याने तिचे स्वरक्षण होते. कडुलिंब औषधी आहे. त्याच्या बियांचे तेल त्वचारोगावरील औषधासाठी वापरतात. नीमकेक या नावाने बनवलेले पाल्याचे खत विविध किडींपासून फळझाडे, फुलझाडे, नारळ यांचे रक्षण करते, पोषक असते. शेतीच्या छोट्या मोठ्या व घरगुती अवजारांसाठी बाभळीचे लाकूड उपयोगी पडते. कोरफड व निवडुंगही अशीच अत्यंत कमी पाण्यावरसुद्धा वाढणारी, फोफावणारी, कॅक्टस या प्रजातीतील वनस्पती. कोरफडीच्या जाड पानातला गर औषधी असतो. सौंदर्यवर्धक लेपात त्याचा वापर अलीकडे खूप वाढला आहे. निवडुंग सहसा लक्ष वेधत नाही, पण त्याची लालचुटूक बोंडे फुलल्यावर मात्र प्रत्येकाचे लक्ष तिकडे सहज जाते. शेताच्या कडेला जनावरांना अडवण्यासाठी कुंपण म्हणून बाभूळ, कोरफड, निवडुंग मुद्दाम लावले जातात. कडूलिंब बांधावर वा पायवाटेच्या कडेने वाढवतात.
गुलमोहर व पळसाचे झाड फुलते, तेव्हा प्रत्येकाचे लक्ष वेधले जाते. लालभडक रंगाने फुललेली फुले ही दोघांची वैशिष्टे. पळसाच्या फांद्या ठिसूळ असतात. वाळक्या फांद्यांचा उपयोग जळणासाठी केला जातो. पत्रावळी, द्रोण बनवण्यासाठी अनेक वर्षे पानांचा उपयोग केला जातो. बेलाला येणारी टणक, गोलाकार पिवळी फळे औषधी असतात. त्यांतील गराचा उपयोग पोटाच्या विकारासाठी केला जातो. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने 'सोने म्हणून घेण्याची पद्धत आहे. आपटा हल्ली कमी होत चालल्याने त्यासाठी कांचनच्या पानांचाही वापर केला जातो. आपटा व कांचन यांची पाने जुळी, एकमेकांवर बरोबर जुळणारी, एकाच देठाने जोडलेली असतात. कांचनाला सुंदर जांभळी, गुलाबी, पिवळ्या रंगाची नाजूक फुलेही येतात.
खैर, सांग, चंदन, जंगली बदाम, हिवर, अंजन ही सारी वृक्षराजी छोट्या मोठ्या जंगलाला धरून वाढते. अर्थातच क्वचित सुटी झाडेसुद्धा आढळतात. उदाहरणार्थ, चंदन किंवा बदामाचे मोठे झाड एखाद्या बागेतसुद्धा दिसते; पण सहसा देवराया, जंगले येथे यांची मोठी वाढ सापडते. घाटमाथ्याकडून उताराकडे येताना संपूर्ण सह्याद्रीमध्ये त्यांची दाट जंगले आढळतात. उत्तम लाकूड, सुवासिक लाकूड, कोरीव कामासाठी वापरले जाणारे लाकूड म्हणून या झाडांची तोड करून आपणच ही वृक्षराजी नष्ट करत आहोत. उंच वाढणाऱ्या या झाडांमुळे पर्यावरणाला होणारी मदत व त्यांच्या सान्निध्याने वाढणारे जैववैविध्यही त्यामुळे कमी होत आहे.
चिंचेचे वृक्ष गावात, शेतात, जंगलात कुठेही आढळतात. आंबट गोड पालाही खायला छान लागतो. चिंचेचा वापर अनेक पद्धतींनी केला जातो. खाण्याच्या पदार्थांसाठी जशी ती आवश्यक असते, तसाच त्यातील आम्ल गुणधर्मामुळे स्वयंपाकाची भांडी घासण्यासाठी तांबे पितळ पारंपरिक पद्धतीत तिचा वापर केला जाई. स्टेनलेस स्टीलमुळे हा वापर कमी होत गेला आहे.
अौदुंबर खूप मोठा होणारा हा वृक्ष त्याच्या अंजीराच्या आकाराच्या गोडसर फळांनी लगडून जातो. त्यावर विविध पक्षी, माकडे अक्षरश: तुटून पडतात.
महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारे काही वृक्ष आहेत, मात्र ते फळवृक्ष म्हणून आपण ओळखतो. त्यांची फळांसाठी लागवडही केली जाते. सरसहा लागवडीशिवायही ते दिसतात म्हणून त्यांचा उल्लेख येथे केला आहे. जांभूळ व करवंदे ही आवडीने खाल्ली जाणारी फळे. जांभळाचा मोठा वृक्षच असतो. करवंदांच्या झुडपांनी बनलेल्या जाळ्या डोंगरउतारावर पहायला मिळतात. फणस, आंबा, जांभूळ यांचे मोठे वृक्ष बनतात. त्यांच्या फळांच्या आकारात, चवीत अनेक प्रकार पाहिला मिळतात. तिन्हींची फळे, त्यापासून बनवलेले पदार्थ व एवढेच नव्हे, तर तिन्हींच्या बियांपासून बनवलेल्या पावडरीचा औषधी वापरही गेल्या काही वर्षांत सुरू झाला आहे.
आवळा व शेवगा ही दोन झाडे अत्यंत उपयुक्त आहेत. औषधी आवळा व शेवगाच्या शेवग्याच्या शेंगा यांचा वापर सरसकट केला जातो. शेवग्याचा पाला भाजीसाठी ग्रामीण भागात वापरतात. कितीही वेळा तोडला, तरी सहज पुन्हा फोफावणारा शेवगा सर्वत्र आढळतो.
बोराचे झाड सर्वत्र आढळते. विविध प्रकारची बोरं सध्या पहायला मिळतात. चण्यांच्या आकाराच्या आंबटगोड बोरांपासून टपोऱ्या मोठ्या बोरांपर्यंत आढळणारे अनेक प्रकार आता लागवडीमुळे लोकप्रिय झाले आहेत. पण गावठी बोर सहजपणे कुठेही आढळते. पंधरा वीस फूट उंचीपर्यंत वाढणारे हे झाड काट्यांनी युक्त अशा फांद्यांचे असते. बोरांचे विविध पदार्थ, जॅम, सरबते करण्याचे प्रयत्न आता यशस्वी झाले आहेत. बोरीचे लाकूडही उपयुक्त ठरते.
सागरी प्रदेशातील नारळ व सुपारी व सरसहा दिसणारा ताड त्यांच्या उंचीमुळे लक्ष वेधून घेतात. नाराळाच्या बागा, सुपारीच्या बागा, हे सागरी किनारपट्टीजवळचे दृष्य. बागायत या प्रकारातही ही वृक्षराजी वाढवली जाते. पण अन्यथा नारळाची झाडे घरच्या नारळासाठी महाराष्ट्रभर लावली गेली आहेत. ताडाची झाडे ठिकठिकाणी दिसतात पण ताडी व नीरा मिळविण्यासाठी मुद्दाम लागवडसुद्धा केलेली आढळते.
निलगिरी, सुबाभूळ, साग या तिन्हींची मुद्दाम लागवड करून त्याचा वनीकरणासाठी, पर्यावरणासाठी फायदा करण्याचे प्रयत्न गेल्या पंचवीस तीस वर्षांत झाले आहेत. त्यामुळे त्यांची जंगलेही काही भागात आढळतात. तसेच तेंदुपत्ता व मोहाच्या झाडांचीही लागवड आणि जोपासना केली जाते. मात्र सरसकट नैसर्गिक वृक्षराजी असे त्यांचे स्वरूप त्यामानाने सर्वत्र आढळत नाही.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
0
Answer link
महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारची वृक्षसंपदा आढळते. भौगोलिक विविधता आणि पर्जन्याचे प्रमाण यानुसार वनांचे प्रकार बदलतात. खाली काही प्रमुख वृक्ष प्रजातींची माहिती दिली आहे:
1. साग (Teak):
- साग हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे वृक्ष आहे.
- हे मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रातील वनांमध्ये आढळते.
- सागाचे लाकूड टिकाऊ आणि मजबूत असते, त्यामुळे ते फर्निचर आणि बांधकामसाठी उपयुक्त आहे.
2. শাল (Sal):
- शाल वृक्ष पूर्व विदर्भातील वनांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.
- हे लाकूड देखील मजबूत असून बांधकाम आणि फर्निचरसाठी वापरले जाते.
3. खैर (Catechu):
- खैर हा वृक्ष महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.
- या वृक्षाचा उपयोग कातडी कमावण्यासाठी आणि औषधी कामांसाठी होतो.
4. चंदन (Sandalwood):
- चंदन महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आढळतो.
- या वृक्षाचे लाकूड सुगंधी असते आणि ते तेल, सौंदर्य प्रसाधने आणि धार्मिक विधींमध्ये वापरले जाते.
5. बांबू (Bamboo):
- बांबूची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते.
- हे बांधकाम, फर्निचर आणि हस्तकला वस्तूंसाठी वापरले जाते.
6. इतर वृक्ष:
- आंबा (Mango): हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा फळझाड आहे आणि तो सर्वत्र आढळतो.
- फणस (Jackfruit): हा देखील मोठ्या प्रमाणावर आढळणारा वृक्ष आहे.
- जांभूळ (Java Plum): जांभूळ हा वृक्ष नैसर्गिकरीत्या वाढतो आणि त्याचे फळ औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते.
- वड (Banyan): वड हा भारतीय संस्कृतीत पवित्र मानला जातो आणि तो अनेक ठिकाणी आढळतो.
- पिंपळ (Peepal): पिंपळ देखील धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे.
याव्यतिरिक्त, महाराष्ट्रात कडुलिंब, अर्जुन, मोह, हिवर, पांगारा, आणि शिसम यांसारखे अनेक वृक्ष आढळतात. प्रत्येक वृक्षाचे स्वतःचे महत्त्व आहे आणि ते स्थानिक परिसंस्थेचा भाग आहेत.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: