4 उत्तरे
4
answers
भारतातील सर्वात उंच शिखर कोणते?
5
Answer link
कांचनगंग
सिक्कीम हिमालय
कांचनगंगा
चौदा फेरी, सिक्कीममधून कांचनगंगा
कांचनगंगा
कांचनगंगा शिखराचे भारत-नेपाळ सीमेजवळील स्थान
उंची२८,१६९ फूट (८,५८६ मीटर)उंचीमध्ये
क्रमांक३ठिकाण
पर्वतरांग हिमालय
गुणक 27°42′09″N 88°08′54″E
पहिली चढाई२५ मे १९५५
कांचनगंगा (नेपाळी: कञ्चनजङ्घा) हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के२यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्यासिक्कीम राज्यात असून भारतीय भूमीतील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ८,५८६ मी (२८,१६९ फूट) इतकी आहे. याचे खरे स्थानिक लिम्बू भाषेतील नाव सेवालुंग्मा असे असून त्याचा अर्थ ज्याला आम्ही शुभेच्छा देतो असा पर्वत असा होतो. किरन्त धर्मामध्ये सेवालुंग्मा म्हणजे धार्मिक असे समजले जाते.
भारतीय चलनातील १०० रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय. नेपाळ व भारतातील सिक्कीम राज्यालगतच्या सीमेवर हे शिखर वसलेले आहे. १९५५ साली ज्यो ब्राउन व जॉर्ज ब्रँड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी ‘माउंट कांचनगंगा’वर सर्वात पहिली यशस्वी चढाई केली.
कांचनजंगा शिखर सर करण्यात महाराष्ट्रातून गिर्यारोहक हर्षद राव हा पहिला मानांकित ठरला आहे.

कांचनगंगा त्रिमितीय
कांचनगंगाच्या पर्वत रांगेत खालील शिखरे आहेत
शिखराचे नावउंची मीटरमध्ये फूट कांचनगंगा८,५८६२८,१६९
कांचनगंगा पश्चिम Yalung Kang८,५०५२७,९०४
कांचनगंगा मध्य८,४८२२७,८२८
कांचनगंगा दक्षिण८,४९४२७,८६७
कांगबाचेन७,९०३२५,९२५
दार्जिलिंगमधून कांचनगंगा पर्वतरांग
0
Answer link
भारतातील सर्वात उंच शिखर कांचनगंगा आहे.
उंची: 8,586 मीटर (28,169 फूट)
हे शिखर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे हिमालय पर्वतरांगेत भारत आणि नेपाळच्या सीमेवर स्थित आहे.
के2 (K2) हे शिखर भारतातील सर्वात उंच शिखर मानले जाते, परंतु ते पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (POK) आहे. त्यामुळे, अधिकृतपणे कांचनगंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे.
अधिक माहितीसाठी: