पक्षी प्राणी नैसर्गिक जग

पक्षी मरताना कुठे जातात?

2 उत्तरे
2 answers

पक्षी मरताना कुठे जातात?

15
*पक्षी मरतांना कुठे जातात?*

नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा मी केलेला अनुवाद

प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर बसुन नेहमीप्रमाणे आजुबाजुच्या घनदाट वटवृक्षांवर  चिवचिवाट करणार्‍या माझ्या सोयर्‍यांना ऐकत होतो. सर्वच जण तिथे कायमचेच रहिवासी होतो. माझी सकाळ आणि त्यांचे वटवृक्षांमधुन चिवचिवणे हा दररौजचा उपक्रम. त्या दिवशी मात्र माझ्या मनात माहित नाही पणगेली कित्येक वर्षे मी या माझ्या मित्रांना चिवचिवाट करतांना, भांडतांना ,मारामार्‍या करतांना बघीतलेय पण आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन  कुठे आमच्या काँलनीच्या परिसरात मृतावस्थेत  पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही. हा एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षि आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.
मग पक्षी काय अमर असतात का ? की त्यांना नैसर्गीक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे मी गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दीले नाही. अनेक पक्षी निरिक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही.

आणि मग ह्या प्रयत्नातच मला एक रंजक लेख वाचायला मिळाला "Dying pattern of Birds"
ह्या लेखात काॅर्क बिशप ल्युसी  यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय, लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच  असे आव्हान दीलेय की कुणीही जगात नैसर्गीक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा.  आजपर्यंत तरी त्याचे हे आव्हान कुणीहि स्विकारलेले नाही. लेखकाने मरण्याच्या कारणांची स्पष्ट वर्गवारी दीलिय, एकीकडे नैसर्गीक कारण दूसरीकडे शिकार, अपघात, मूद्दाम पक्षीहत्या अशी वेगळी कारणे. परंतु मजेची गोष्ट अशी की आजपर्यत तरी नैसर्गिक कारणाने मृत असा एकही पक्षी कुणी पुरावा म्हणून सादर करु शकले नाहीय,
पक्षी शास्त्रज्ञसुध्दा ह्या बाबतित ठोस सांगु शकत नाही. दरवर्षी पक्ष्यांची गणना करुन ते सरासरी पक्ष्यांचा मृत्युदर ठरवतात.
ह्या बिशप ल्युसींचा मधमाश्यांच्या जिवनक्रमावरचे संशोधन जगमान्य आहे, ते सांगतात मधमाशा मृत्यु समिप आला की खूप उंच वरच्या उच्च दबावाच्या हवेत स्वतःला घेउन जातात आणि तिथे दबावामुळे त्यांचे अक्षरशः नैसर्गीक विघटन होते आणि त्या नष्ट होउन जातात. यावरुन बीशप म्हणतात की पक्ष्यांना सुध्दा मधमाशाप्रमाणे अंतःप्रेरणेच एक इंद्रीय असावे जे त्यांना जाणीव करुन देते की आता शेवटचा क्षण आला आहे किंवा जिवनकाल संपत आलाय. आणि ही जाणिव हौताच पक्षि आकाशात स्वःतला उंच उंच घेउन जातात जो पर्यत त्यांचे विघटन होत नाही तो पर्यत ते वरती वरतीचचढत जातात. बीशप ची ही थेअरी मला तरी स्विकारार्ह वाटते  कारण दूसरे कुठलेच लाॅजिकल स्पष्टीकरण सध्या तरी नाही.
अजुनपर्यत तरी ह्या थेअरीला शास्त्रज्ञांकडुन कुठलेही खंडन झालेले नाही. ह्या एका गोष्टीवरुन आपण एक गोष्ट निश्चितच म्हणु शकतो की पक्षी मानवापेक्षा  उत्कांतीच्या पुढच्या पायरीवर आहेत की त्यांना ही जाणीव  होउ शकते की आपला अंत्यसमय आलाय जे माणसालाअजुनही अज्ञात आहे. पक्षी निश्चीत ठरवु शकतो की त्याने खूप जगुन झालेय,बघून झालेय आणि तो आनंदाने कसलिही खंत चिंता न बाळगता उंच उडून  शरीराचे  विघटन करुन टाकतो.न वयानूसार येणार्‍या व्याधी,न सोसायचे दुःख. आपल्या पेक्षा ते पुढेच आहेत कुठेही जाण्याचे, विहाराचे स्वातंत्र्य, कुठलीही सिमा नाही , पासपोर्ट नाही, पिल्ले मोठी झाली की त्यांच्यापासुन सहजगत्या स्वतःला सोडवुन परत कधीही न भेटणे सहज स्विकारणारी. आणि स्वतःच्या मृत्युची वेळ पण स्वतःच निश्चित करणारी... मोक्ष अजुन काय वेगळा असतो?
उत्तर लिहिले · 29/12/2018
कर्म · 569245
0

पक्षी मरताना कुठे जातात हा एक असा प्रश्न आहे ज्याचे निश्चित उत्तर देणे कठीण आहे. याबद्दल अनेक शक्यता आणि तर्कवितर्क आहेत.

1. नैसर्गिक मृत्यू:
  • जंगलात किंवा त्यांच्या अधिवासात मृत्यू: बहुतेक पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच मरतात. ते शिकारी प्राण्यांपासून लपण्याचा प्रयत्न करतात किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाऊन अखेरचा श्वास घेतात.
  • वृद्धत्व आणि आजार: वृद्धत्वामुळे किंवा आजारपणामुळे कमजोर झालेले पक्षी एखाद्या शांत ठिकाणी जाऊन मरतात.
2. मानवी हस्तक्षेप:
  • शहरीकरण आणि प्रदूषण: शहरांमध्ये प्रदूषणामुळे आणि नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे अनेक पक्षी मरतात.
  • विजेचे खांब आणि इमारती: अनेक पक्षी विजेच्या खांबांना किंवा उंच इमारतींना धडकून मरतात.
3. शिकारी प्राणी:
  • शिकारी प्राण्यांची शिकार: अनेक पक्षी हे इतर प्राण्यांचे शिकार बनतात. त्यामुळे त्यांचे अवशेष क्वचितच सापडतात.

वैज्ञानिक दृष्टिकोन: पक्षी मरताना लपून राहतात कारण ते कमजोर झालेले असतात आणि त्यामुळे ते शिकारी प्राण्यांना सहज बळी पडू शकतात. त्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी जाऊन मरतात. त्यांचे शरीर नैसर्गिकरित्या विघटित होते आणि क्वचितच त्यांचे अवशेष सापडतात.

या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2200

Related Questions

माणसाला चावल्यानंतर मधमाश्या खरोखरच मरतात का?
एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
नर मांजर दोन दिवसांपासून घरी आले नाही?
डायनासोरचे हात आखूड का होते?
सर्वात बुद्धिमान मासा कोणता?
ॲनिमल डे च्या होम रिचर्डच्या वार्तापत्रातील परिणाम काय आहेत?