2 उत्तरे
2
answers
कटक मंडळ म्हणजे काय?
3
Answer link
कटक मंडळ हे सैनिकी वास्तव्य असलेल्या प्रदेशाचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी असतात. कॅन्टॉन्मेंट म्हणजेच कटक याचा अर्थ सैनिक तुकड्यांचे तात्पुरते मुक्कामस्थान होय. सैनिकांनासोयीसुविधा पुरवणाऱ्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या इतर नागरी लोकांचा समावेशही यात केला जातो. भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशातही कटक मंडळ हा स्थानिक स्वशासनाचा एक भाग मानण्यात आलेला आहे. कटक मंडळाला छावणी मंडळ असेही म्हटले जाते.
ब्रिटिशांनी इ.स. १९२४ साली संमत केलेल्या कॅन्टॉन्मेंट अधिनियमानुसारच कटक मंडळांचा कारभार चालतो. ही मंडळे सैनिकी प्रशासनाचा भाग म्हणूनच कार्यरत असतात व ती स्वायत्त असतात. भारतातील कटक मंडळांचे नियमन भारत सरकारच्यासंरक्षण खात्याकडून केले जाते. कटक मंडळांना स्वत:ची मालमत्ता प्राप्त करता येते, सांभाळता येते व तिची विल्हेवाटही लावता येते.
स्वातंत्र्यपूर्व काळात या मंडळांमध्ये ब्रिटिश सदस्यांचेच पूर्ण वर्चस्व होते. स्वातंत्र्यानंतर या मंडळांचा आढावा घेण्यासाठी भारत सरकारने इ.स. १९५३ साली एस.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींवरुन सध्या छावणी मंडळामध्ये सैनिकी व नागरी सदस्यांचे समसमान प्रमाण करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात देहू, खडकी, पुणे कॅम्प, भिंगार (अहमदनगर), देवळाली (नाशिक), औरंगाबाद आणि कामठी (नागपूर) अशा सात ठिकाणी व अठवे कटक मंडल हे सतारा येठे हाहे मंडळे आहेत. लोकसंख्येच्या आधारे कटक मंडळाचे तीन प्रकार पाडले जातात. १० हजार पेक्षा जास्त नागरी लोकसंख्या असणारी प्रथम श्रेणी कटक मंडळे (30 सदस्य), किमान २५०० आणि कमाल १० हजार नागरी लोकसंख्या असणारी द्वितिय श्रेणी कटक मंडळे (19 सदस्य), व २५०० पेक्षा कमी नागरी लोकसंख्या असणार्या क्षेत्रासाठी तृतीय श्रेणी कटक मंडळे (13 सदस्य) असतात
स्रोत:- विकिपीडिया
ब्रिटिशांनी इ.स. १९२४ साली संमत केलेल्या कॅन्टॉन्मेंट अधिनियमानुसारच कटक मंडळांचा कारभार चालतो. ही मंडळे सैनिकी प्रशासनाचा भाग म्हणूनच कार्यरत असतात व ती स्वायत्त असतात. भारतातील कटक मंडळांचे नियमन भारत सरकारच्यासंरक्षण खात्याकडून केले जाते. कटक मंडळांना स्वत:ची मालमत्ता प्राप्त करता येते, सांभाळता येते व तिची विल्हेवाटही लावता येते.
स्वातंत्र्यपूर्व काळात या मंडळांमध्ये ब्रिटिश सदस्यांचेच पूर्ण वर्चस्व होते. स्वातंत्र्यानंतर या मंडळांचा आढावा घेण्यासाठी भारत सरकारने इ.स. १९५३ साली एस.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींवरुन सध्या छावणी मंडळामध्ये सैनिकी व नागरी सदस्यांचे समसमान प्रमाण करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात देहू, खडकी, पुणे कॅम्प, भिंगार (अहमदनगर), देवळाली (नाशिक), औरंगाबाद आणि कामठी (नागपूर) अशा सात ठिकाणी व अठवे कटक मंडल हे सतारा येठे हाहे मंडळे आहेत. लोकसंख्येच्या आधारे कटक मंडळाचे तीन प्रकार पाडले जातात. १० हजार पेक्षा जास्त नागरी लोकसंख्या असणारी प्रथम श्रेणी कटक मंडळे (30 सदस्य), किमान २५०० आणि कमाल १० हजार नागरी लोकसंख्या असणारी द्वितिय श्रेणी कटक मंडळे (19 सदस्य), व २५०० पेक्षा कमी नागरी लोकसंख्या असणार्या क्षेत्रासाठी तृतीय श्रेणी कटक मंडळे (13 सदस्य) असतात
स्रोत:- विकिपीडिया
0
Answer link
कटक मंडळ (Cantonment Board) ही भारतातील एक प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ही संस्था छावणी क्षेत्रात (Cantonment area) नागरी प्रशासन पुरवते.
कटक मंडळाची रचना:
- कटक मंडळ हे केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
- कटक मंडळ कायद्याद्वारे (Cantonments Act, 2006) याची स्थापना होते.
- मंडळात सदस्य दोन प्रकारचे असतात: निर्वाचित (elected) आणि नामनिर्देशित (nominated).
- लष्करी स्टेशनचे स्टेशन कमांडर हे कटक मंडळाचे अध्यक्ष असतात.
- मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) हा कटक मंडळाच्या प्रशासनाचा प्रमुख असतो, जो संरक्षण मंत्रालयाद्वारे नियुक्त केला जातो.
कटक मंडळाची कार्ये:
- पाणीपुरवठा, मलनिस्सारण (sewerage), कचरा व्यवस्थापन या सारख्या आवश्यक सेवा पुरवणे.
- रस्ते, दिवाबत्ती, उद्यान आणि इतर सार्वजनिक सुविधांची व्यवस्था करणे.
- जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे.
- शैक्षणिक संस्था आणि आरोग्य सेवा चालवणे.
भारतात एकूण ६२ कटक मंडळे आहेत.
अधिक माहितीसाठी: