4 उत्तरे
4
answers
झाडे लावा, झाडे जगवा?
16
Answer link
झाडे लावा, झाडे जगवा, झाडांचे संगोपन करा
मात्र कोणती झाडे लावायची याचा विचार करून ती झाडे लावा.
महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागांत, कोरड्या हवेत, दमट हवेत, पाणी असलेल्या ठिकाणी, पाणी नसलेल्या ठिकाणी कोणती झाडं लावावीत, सावली देणारी झाडं कोणती, निसर्ग चक्र वाढविणारी झाडे कोणती, फळं देणारी झाडं कोणती, शहराच्या सुशोभीकरणासाठी कोणती झाडं याविषयीचा अभ्यास वृक्षारोपण करण्यापुर्वी करणे आवश्यक आहे.
पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाते, परंतु अनेकदा कोणती झाडे लावावीत या विषयी नागरिकांना माहिती नसते. तसेच अशी रोपे लावल्यानंतर त्यांची पुरेशी काळजी न घेतली ती रोपे खुप काळ तग धरू शकत नाहीत.
कचरा करणारी, निरुपयोगी, पोकळ, हलक्या प्रतीची, आपल्या भागातील पर्यावरणात टिकू न शकणारी,वादळ-वारयात उपटुन पडणारी अशी झाडे लावू नका. पर्यावरण पुरक, उपयोगी, निसर्गचक्राचे रक्षण करणारी, औषधी गूणधर्माने उपयुक्त झाडे लावणे अगत्याचे आहे.
औषधी वनस्पतीत झाडांत कदम्ब, कुटज,कवठ, बेल ,सप्तपर्णी, औदुंबर, आंबा, रोहितक, वरुण, अर्जुन, अग्निमंथ, आरग्वध, आवळा, पळस, हिरडा, बेडहा, शेवगा, शिरीष, पारिजातक, जांभूळ, चंदन, शाल्मली, पुत्रजीवक, अर्जून, रोहितक, निर्गुण्डी, खदीर, कडूनिंब, वड, पिंपळ, कुटज , सिताअशोक, आकाशनिंब,बकूळ,वरुण,नारळ अशा झाडांची लागवड व उपलब्ध जागेनुसार झाडांची निवड करा.
१) शाळा, कॉलेज चे मैदान असेल त्या ठिकाणी वड, पिपळ, आंबा, हिरडा, बेहडा, कदंब,कडिनिंब अशी वरच्या बाजुस पसरणारी मोठी वृक्षे लावावीत.
२) मंदिराचा परिसर असेल त्याठिकाणी बेल, पारिजातक, औदुंबर, चंदन , वड, नारळ, कदंब, शमी, नागचाफा, जास्वंद,तुळ्स अशी धार्मिक कार्यासाठी उपयुक्त झाडे लावावी.
३) शहरातील सार्वजनिक जागा उदा. स्मशानभूमी, बाजाराची जागा इ. ठिकाणी जादा कचरा न करणारी, काटे नसलेली, नेहमी हिरवी असणारी, उंच वाढणाऱ्या, झाडांची लागवड करावी. या ठिकाणी कदंब, वड, पिंपळ, सप्तपर्णी, कवठ, सारख्या मोठ्या झाडांची, स्मशानभुमीमध्ये तुळस, कडुनिंब सारख्या या सारख्या लहान मोठ्या झाडांची लागवड करणे अत्यावश्यक आहे.
४) शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी उंच जाणारी, वर जाऊन न पसरणारी अशी बकूळ, आकाशनिंब, खोटा अशोक ही झाडे महत्वाची आहेत. तसेच प्रदुषित वातावरणाला दिलासा म्हणून जास्त ऑक्सिजन सोडणारी झाडे लावणे आवश्यक असावी.
५) शहराच्या ग्रीन बेल्ट मध्ये जैव विविधता वाढविणारी झाडे आवश्यक आहेत. यामध्ये वड, उंबर, पिंपळ ही फायकस जातीची झाडे अत्यावश्यक आहेत तसेच आयुर्वेदिक गुणधर्माची लहान मोठी झाडे लावता येतील. निसर्गतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बागेत वड,पिंपळ,उंबराचं झाड असल्यास तिथं विविध पक्षी, फुलपाखरू, सरडा व खारी यांच्या वसाहती होतात. हे वृक्ष म्हणजे पक्ष्यांची वसाहतच असते. पक्ष्यांना आपलं घरटं बनवण्यासाठी हे झाड ऐसपैस वाटतं. त्यांना एकांत प्राप्त होतो. त्यांना तिथं मानवी किंवा अन्य उपसर्ग नसतो. या झाडाच्या पानांवर फुलपाखरू अंडी सोडतं. पानावरचा हा गोड चिकट पदार्थ खारींसाठी ‘नाश्ता’ असतो! उन्हाळ्यात जेंव्हा सर्व झाडे, माळरान ओसाड होतात अशा काळात पळस, बहावा, काटशेवर, गुलमोहर ही झाडे मोठ्या एटित फुलतात. दुरुनही ही गडद रंगांची झाडं लक्ष वेधुन घेतात व डोळ्यांना सुख व शितलता प्रदान करतात.
६) रस्त्याच्या कडेला उंच सरळ एका दिशेत जाणारी, वाहतूकीला अडथळा न करणारी, शोभिवंत अशी आकाशनिंब, नारळ, शाल्मली, बहावा, अशोक, कांचनार, तामण, नागचाफा, सोनचाफा, रक्तरोहिडा ही सौंदर्य, मनमोहकता वाढवणारी झाडे लावणे गरजेचे आहे. आज कित्येक ठिकाणी वर जाऊन पसरट झालेली गुलमोहरासारख्या झाडांची छटाई होत असलेले दिसून येत आहे कारण रस्त्या च्या कडेला असलेल्या विद्यत तारांना त्यांचा अडथळा निर्माण होत आहे. थोड्याश्या वादळ-वारयात ही झाडे मोडुन पडत आहेत.
७) गायराने, पडीक जागा इ. ठिकाणी बहुउद्देशीय वनस्पती यात गुरांना चारा देणारी, जळणासाठी लाकूड देणारी, औषधी, इमारती लाकूड देणारी, जंगली फळझाडे इ. प्रकारची झाडे लागवड करावीत. उदा. अंजनी, बोर, पांगारा, सुबाभूळ, कवठ, इलायती चिंच, आवळा, हिरडा, बेहडा, कडुनिंब, बाभूळ, ऑस्ट्रेलियन बाभूळ, बिबळा, कॉपरपॉड ट्री, सुरू, निलगिरी, सलई, बेल, पाडळ, टेटू, शिवण, फणस, बिब्बा, मोह, पळस, कोकम, पांढरा कुडा, काळाकुडा, सावर, काटेसावर इ. झाडे लागवड करावीत.
८) घरामध्ये, परस बागेत, घराच्या गच्चीवर जागेच्या उपलब्धतेनूसार कोणती झाडे लावावीत याचे नियोजन देखील महत्वाचे आहे. घरामध्ये देवपुजेसाठी व स्वयंपाक घरात उपयोगी , शोभीवंत , फुले असणारी झाडे महत्वाची आहेत.
९) सरकारी दवाखाने, सरकारी ऑफिसेस, शासकीय कर्मचारी यांच्या वसाहती, बस स्टॅड, मोठे कारखाने, एमआयडीसी मधील जागा यामध्ये नियोजन बद्ध झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे.
याबरोबरच फक्त उंच उंच मोठी झाडे न लावता जागेच्या उपलब्ध्तेनुसार लहान झाडे, वेली लावण्याचे नियोजन देखील व्हायला हवे. वॄक्षारोपणामध्ये विविधता आणणे खुप महत्वाचे आहे. आपल्याकडे सध्या फक्त गुलमोहर, सप्तपर्णी, कडूनिंब, पिंपळ, वड, पाम अशी झाडे लावली जात आहेत. विदेशी जातीच्या झाडांना हद्दपार करण्याची गरज आहे.
वृक्षतोडीनं ढग गेले, ढगाविना पाऊस गेला,पावसाविना समृद्धी गेली, इतके अनर्थ वृक्षतोडीनं केले! तापमान वाढ, उष्माघात, दुष्काळ, पाणीटंचाई याची झळ लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जाणवलेली आहे. झाडं लावणं, झाडं जगवणं, झाडांचं संगोपन करणे याला आता कोणताही पर्याय नाही, याची जाणीव जवळपास प्रत्येकालाच आता होऊ लागली आहे; पण या जाणिवेला प्रत्यक्ष- नियोजन बध्द कृतीची, आणि दृढ इच्छाशक्तीची जोड हवी.
ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्या प्रत्येकांनी भरपूर झाडं लावायला हवीत. तरीही आपण जितकी जास्त झाडं लावू, तितकी ती कमीच ठरतील! एक व्यक्ती, एक घर, एक झाड ही संकल्पना प्रत्यक्षात राबविणे अत्यावश्यक आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी, वायुप्रदूषण रोखण्यासाठी, आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी, पर्जन्यमान वाढवण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी, ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी, जमीनीची धुप कमी करण्यासाठी, दुष्काळ निवारणासाठी ‘झाडं लावणं-झाडं जगवणं-झाडांचे संगोपन करणे’ याला पर्याय नाही.
मात्र कोणती झाडे लावायची याचा विचार करून ती झाडे लावा.
महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागांत, कोरड्या हवेत, दमट हवेत, पाणी असलेल्या ठिकाणी, पाणी नसलेल्या ठिकाणी कोणती झाडं लावावीत, सावली देणारी झाडं कोणती, निसर्ग चक्र वाढविणारी झाडे कोणती, फळं देणारी झाडं कोणती, शहराच्या सुशोभीकरणासाठी कोणती झाडं याविषयीचा अभ्यास वृक्षारोपण करण्यापुर्वी करणे आवश्यक आहे.
पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाते, परंतु अनेकदा कोणती झाडे लावावीत या विषयी नागरिकांना माहिती नसते. तसेच अशी रोपे लावल्यानंतर त्यांची पुरेशी काळजी न घेतली ती रोपे खुप काळ तग धरू शकत नाहीत.
कचरा करणारी, निरुपयोगी, पोकळ, हलक्या प्रतीची, आपल्या भागातील पर्यावरणात टिकू न शकणारी,वादळ-वारयात उपटुन पडणारी अशी झाडे लावू नका. पर्यावरण पुरक, उपयोगी, निसर्गचक्राचे रक्षण करणारी, औषधी गूणधर्माने उपयुक्त झाडे लावणे अगत्याचे आहे.
औषधी वनस्पतीत झाडांत कदम्ब, कुटज,कवठ, बेल ,सप्तपर्णी, औदुंबर, आंबा, रोहितक, वरुण, अर्जुन, अग्निमंथ, आरग्वध, आवळा, पळस, हिरडा, बेडहा, शेवगा, शिरीष, पारिजातक, जांभूळ, चंदन, शाल्मली, पुत्रजीवक, अर्जून, रोहितक, निर्गुण्डी, खदीर, कडूनिंब, वड, पिंपळ, कुटज , सिताअशोक, आकाशनिंब,बकूळ,वरुण,नारळ अशा झाडांची लागवड व उपलब्ध जागेनुसार झाडांची निवड करा.
१) शाळा, कॉलेज चे मैदान असेल त्या ठिकाणी वड, पिपळ, आंबा, हिरडा, बेहडा, कदंब,कडिनिंब अशी वरच्या बाजुस पसरणारी मोठी वृक्षे लावावीत.
२) मंदिराचा परिसर असेल त्याठिकाणी बेल, पारिजातक, औदुंबर, चंदन , वड, नारळ, कदंब, शमी, नागचाफा, जास्वंद,तुळ्स अशी धार्मिक कार्यासाठी उपयुक्त झाडे लावावी.
३) शहरातील सार्वजनिक जागा उदा. स्मशानभूमी, बाजाराची जागा इ. ठिकाणी जादा कचरा न करणारी, काटे नसलेली, नेहमी हिरवी असणारी, उंच वाढणाऱ्या, झाडांची लागवड करावी. या ठिकाणी कदंब, वड, पिंपळ, सप्तपर्णी, कवठ, सारख्या मोठ्या झाडांची, स्मशानभुमीमध्ये तुळस, कडुनिंब सारख्या या सारख्या लहान मोठ्या झाडांची लागवड करणे अत्यावश्यक आहे.
४) शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी उंच जाणारी, वर जाऊन न पसरणारी अशी बकूळ, आकाशनिंब, खोटा अशोक ही झाडे महत्वाची आहेत. तसेच प्रदुषित वातावरणाला दिलासा म्हणून जास्त ऑक्सिजन सोडणारी झाडे लावणे आवश्यक असावी.
५) शहराच्या ग्रीन बेल्ट मध्ये जैव विविधता वाढविणारी झाडे आवश्यक आहेत. यामध्ये वड, उंबर, पिंपळ ही फायकस जातीची झाडे अत्यावश्यक आहेत तसेच आयुर्वेदिक गुणधर्माची लहान मोठी झाडे लावता येतील. निसर्गतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बागेत वड,पिंपळ,उंबराचं झाड असल्यास तिथं विविध पक्षी, फुलपाखरू, सरडा व खारी यांच्या वसाहती होतात. हे वृक्ष म्हणजे पक्ष्यांची वसाहतच असते. पक्ष्यांना आपलं घरटं बनवण्यासाठी हे झाड ऐसपैस वाटतं. त्यांना एकांत प्राप्त होतो. त्यांना तिथं मानवी किंवा अन्य उपसर्ग नसतो. या झाडाच्या पानांवर फुलपाखरू अंडी सोडतं. पानावरचा हा गोड चिकट पदार्थ खारींसाठी ‘नाश्ता’ असतो! उन्हाळ्यात जेंव्हा सर्व झाडे, माळरान ओसाड होतात अशा काळात पळस, बहावा, काटशेवर, गुलमोहर ही झाडे मोठ्या एटित फुलतात. दुरुनही ही गडद रंगांची झाडं लक्ष वेधुन घेतात व डोळ्यांना सुख व शितलता प्रदान करतात.
६) रस्त्याच्या कडेला उंच सरळ एका दिशेत जाणारी, वाहतूकीला अडथळा न करणारी, शोभिवंत अशी आकाशनिंब, नारळ, शाल्मली, बहावा, अशोक, कांचनार, तामण, नागचाफा, सोनचाफा, रक्तरोहिडा ही सौंदर्य, मनमोहकता वाढवणारी झाडे लावणे गरजेचे आहे. आज कित्येक ठिकाणी वर जाऊन पसरट झालेली गुलमोहरासारख्या झाडांची छटाई होत असलेले दिसून येत आहे कारण रस्त्या च्या कडेला असलेल्या विद्यत तारांना त्यांचा अडथळा निर्माण होत आहे. थोड्याश्या वादळ-वारयात ही झाडे मोडुन पडत आहेत.
७) गायराने, पडीक जागा इ. ठिकाणी बहुउद्देशीय वनस्पती यात गुरांना चारा देणारी, जळणासाठी लाकूड देणारी, औषधी, इमारती लाकूड देणारी, जंगली फळझाडे इ. प्रकारची झाडे लागवड करावीत. उदा. अंजनी, बोर, पांगारा, सुबाभूळ, कवठ, इलायती चिंच, आवळा, हिरडा, बेहडा, कडुनिंब, बाभूळ, ऑस्ट्रेलियन बाभूळ, बिबळा, कॉपरपॉड ट्री, सुरू, निलगिरी, सलई, बेल, पाडळ, टेटू, शिवण, फणस, बिब्बा, मोह, पळस, कोकम, पांढरा कुडा, काळाकुडा, सावर, काटेसावर इ. झाडे लागवड करावीत.
८) घरामध्ये, परस बागेत, घराच्या गच्चीवर जागेच्या उपलब्धतेनूसार कोणती झाडे लावावीत याचे नियोजन देखील महत्वाचे आहे. घरामध्ये देवपुजेसाठी व स्वयंपाक घरात उपयोगी , शोभीवंत , फुले असणारी झाडे महत्वाची आहेत.
९) सरकारी दवाखाने, सरकारी ऑफिसेस, शासकीय कर्मचारी यांच्या वसाहती, बस स्टॅड, मोठे कारखाने, एमआयडीसी मधील जागा यामध्ये नियोजन बद्ध झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे.
याबरोबरच फक्त उंच उंच मोठी झाडे न लावता जागेच्या उपलब्ध्तेनुसार लहान झाडे, वेली लावण्याचे नियोजन देखील व्हायला हवे. वॄक्षारोपणामध्ये विविधता आणणे खुप महत्वाचे आहे. आपल्याकडे सध्या फक्त गुलमोहर, सप्तपर्णी, कडूनिंब, पिंपळ, वड, पाम अशी झाडे लावली जात आहेत. विदेशी जातीच्या झाडांना हद्दपार करण्याची गरज आहे.
वृक्षतोडीनं ढग गेले, ढगाविना पाऊस गेला,पावसाविना समृद्धी गेली, इतके अनर्थ वृक्षतोडीनं केले! तापमान वाढ, उष्माघात, दुष्काळ, पाणीटंचाई याची झळ लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जाणवलेली आहे. झाडं लावणं, झाडं जगवणं, झाडांचं संगोपन करणे याला आता कोणताही पर्याय नाही, याची जाणीव जवळपास प्रत्येकालाच आता होऊ लागली आहे; पण या जाणिवेला प्रत्यक्ष- नियोजन बध्द कृतीची, आणि दृढ इच्छाशक्तीची जोड हवी.
ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्या प्रत्येकांनी भरपूर झाडं लावायला हवीत. तरीही आपण जितकी जास्त झाडं लावू, तितकी ती कमीच ठरतील! एक व्यक्ती, एक घर, एक झाड ही संकल्पना प्रत्यक्षात राबविणे अत्यावश्यक आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी, वायुप्रदूषण रोखण्यासाठी, आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी, पर्जन्यमान वाढवण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी, ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी, जमीनीची धुप कमी करण्यासाठी, दुष्काळ निवारणासाठी ‘झाडं लावणं-झाडं जगवणं-झाडांचे संगोपन करणे’ याला पर्याय नाही.
12
Answer link
पाऊस पाहिजे?
तापमान कमी पाहिजे?
स्वच्छ हवा, पाणी पाहिजे?
जमिनीत पाण्याची पातळी वाढली पाहिजे?
इतर ब-याच गोष्टी आपल्याला पाहिजे?
कश्या मिळतील?
खालील आकडेवारी वाचा.
विचार करा.
दरडोई झाडांचे प्रमाण :
१.कॅनडा : ८९५२ झाडे
२.रशिया : ४४६१ झाडे
३.अमेरिका : ७१६ झाडे
४.चीन : १०२ झाडे
५.(महान ) भारत : २८ झाडे
जगातील सगळ्यात कमी दरडोई झाडांचे प्रमाण आपल्या देशात आहे.
" वसुंधरा दिनानिमित्त " हे प्रमाण आले आहे.अत्यंत दयनीय परिस्थिती आहे.वॉर फुटिंगवर झाडे वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत,अन्यथा आपल्या पुढील पिढ्यांचे जगणे अवघड होईल आणि त्याला जबाबदार आपल्या व मागील पिढ्यांना धरण्यात येईल.
बघा वेळीच जागे व्हा
झाडे लावा
झाडे जगवा
पाणी जपुन वापरा
जागर पाण्याचा निसर्गाच्या रक्षणाचा
आता तरी जागे व्हा !!
मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से असलेले
तापमान आज ४3पार केले आहे.
पुढील प्रत्येक ५:५ वर्षात
४५:५० नंतर ६० अंश से
पर्यंत जाईल
तेव्हा अशी रडायची वेळ
येईल कि आहे ती झाडेही
सुकतील. तुमचा २२ हजारांचा ऐसी तुम्हाला दगा देईल .दिल्लीवाले पण
बुलेट ट्रेनने पानी पाठवणार नाहीत.
आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला
वेळ लागणार नाही..
रडू नका
लक्ष्यात असुद्या
तमाम नागरिकांना
जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.
१.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा
३ वर्ष पोटच्या मुलासारखे
संगोपन करा.
२. पानी वाचवण्याचा संदेश प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास
मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा
५ वर्षात 2 कोटी 50 लाख झाडे
मनापासून विचार करा
सर्वांनी एकत्र या
हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी
घर सोडा, एक दिवस पर्यावरन,संवर्धनासाठी द्या.
सैराट चे message पाठवण्यापेक्क्षा हा १०० वेळा पाठवा.सुखी व्हाल..
धन्यवाद !!
तापमान कमी पाहिजे?
स्वच्छ हवा, पाणी पाहिजे?
जमिनीत पाण्याची पातळी वाढली पाहिजे?
इतर ब-याच गोष्टी आपल्याला पाहिजे?
कश्या मिळतील?
खालील आकडेवारी वाचा.
विचार करा.
दरडोई झाडांचे प्रमाण :
१.कॅनडा : ८९५२ झाडे
२.रशिया : ४४६१ झाडे
३.अमेरिका : ७१६ झाडे
४.चीन : १०२ झाडे
५.(महान ) भारत : २८ झाडे
जगातील सगळ्यात कमी दरडोई झाडांचे प्रमाण आपल्या देशात आहे.
" वसुंधरा दिनानिमित्त " हे प्रमाण आले आहे.अत्यंत दयनीय परिस्थिती आहे.वॉर फुटिंगवर झाडे वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत,अन्यथा आपल्या पुढील पिढ्यांचे जगणे अवघड होईल आणि त्याला जबाबदार आपल्या व मागील पिढ्यांना धरण्यात येईल.
बघा वेळीच जागे व्हा
झाडे लावा
झाडे जगवा
पाणी जपुन वापरा
जागर पाण्याचा निसर्गाच्या रक्षणाचा
आता तरी जागे व्हा !!
मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से असलेले
तापमान आज ४3पार केले आहे.
पुढील प्रत्येक ५:५ वर्षात
४५:५० नंतर ६० अंश से
पर्यंत जाईल
तेव्हा अशी रडायची वेळ
येईल कि आहे ती झाडेही
सुकतील. तुमचा २२ हजारांचा ऐसी तुम्हाला दगा देईल .दिल्लीवाले पण
बुलेट ट्रेनने पानी पाठवणार नाहीत.
आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला
वेळ लागणार नाही..
रडू नका
लक्ष्यात असुद्या
तमाम नागरिकांना
जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.
१.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा
३ वर्ष पोटच्या मुलासारखे
संगोपन करा.
२. पानी वाचवण्याचा संदेश प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास
मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा
५ वर्षात 2 कोटी 50 लाख झाडे
मनापासून विचार करा
सर्वांनी एकत्र या
हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी
घर सोडा, एक दिवस पर्यावरन,संवर्धनासाठी द्या.
सैराट चे message पाठवण्यापेक्क्षा हा १०० वेळा पाठवा.सुखी व्हाल..
धन्यवाद !!
0
Answer link
झाडे लावा, झाडे जगवा' या घोषणेचा अर्थ आणि महत्त्व:
अर्थ:
- झाडे लावा: अधिकाधिक झाडे लावा जेणेकरून आपले पर्यावरण सुरक्षित राहील.
- झाडे जगवा: फक्त झाडे लावून उपयोग नाही, तर त्यांची काळजी घेणे आणि त्यांना मोठे करणे देखील महत्त्वाचे आहे.
महत्व:
- पर्यावरणाचे रक्षण: झाडे पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात, ज्यामुळे हवा शुद्ध राहते.
- पावसाचे प्रमाण: झाडे जमिनीतील पाणी टिकवून ठेवतात आणि पावसाचे प्रमाण वाढवतात.
- जमिनीची धूप थांबवते: झाडे मातीला घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे जमिनीची धूप कमी होते.
- नैसर्गिक अधिवास: झाडे अनेक प्राणी आणि पक्ष्यांसाठी घर आहेत, त्यामुळे जैवविविधता टिकून राहते.
आपण काय करू शकतो:
- जास्तीत जास्त झाडे लावा.
- झाडे लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करा.
- झाडांची नियमित काळजी घ्या.
- प्लास्टिकचा वापर कमी करा.
झाडे लावणे आणि त्यांचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.