3 उत्तरे
3
answers
भीक म्हणून पैसे देणं बंद केलं तर काय होईल?
17
Answer link
*भिकार्यांना (अन्न + पाणी+वस्त्र) तर देऊ पण एक ही रुपया देणार नाही.*

*ताटात उष्ट अन्न ठेवण्याआगोदर एकदा हा फोटो zoom करून नक्की पहा ...*
*खूप छान फोटो आहे हा. समाजाला खूप काही शिकवून जातोय*👌👌👌
*भिकार्यांना (अन्न + पाणी+वस्त्र) तर देऊ पण एक ही रुपया देणार नाही.*
अशी मुंबईत एक वेगळी चळवळ सुरू झाली आहे मग ते कोणत्याही प्रकारचे भिकारी असो.
आणि ही चळवळ योग्यच आहे.
*कोणत्याही प्रकारची (महिला / पुरुष / वृद्ध / अपंग / मुलं) व्यक्ती भीक मागत असेल तर आम्ही पैशांएवजी (अन्न + पाणी+वस्त्र) देऊ, पण आजपासून पैशांची भीक देणार नाही*
याचा परिणाम म्हणून असे होईल की आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य स्तरावर "भिकारी" या गटातील टोळ्या तुटतील आणि मग लहान मुलाचं अपहरण स्वत:हून बंद होईल. गुन्हेगारांच्या जगातील अशा टोळ्यांचा अंत होईल.
*या मोहिमेशी सहमत असल्यास हा विचार पुढे पाठवा*.
* * * 🙏
1
Answer link
काही लोकांनी भीक मागणे हा धंदाच सुरु केला आहे. त्यामुळे डोळसपणे अशांना ओळखणे गरजेचे आहे. पण जे दुर्लक्षित, वयस्कर, पीडित व शारीरिक व्याधीने ग्रस्त असतील, अशांची जरूर मदत करावी.
0
Answer link
जर आपण भीक म्हणून पैसे देणं बंद केलं, तर त्याचे अनेक परिणाम होऊ शकतात:
- बेघरांवर परिणाम: अनेक बेघर लोक त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी भीक मागण्यावर अवलंबून असतात. पैसे मिळणे बंद झाल्यास, त्यांच्यासाठी अन्न, पाणी आणि निवारा मिळवणे अधिक कठीण होऊ शकते.
- गुन्हेगारीत वाढ: काही लोक, विशेषत: ज्यांच्याकडे उपजीविकेचे दुसरे साधन नाही, ते गुन्हेगारी कृत्यांकडे वळू शकतात.
- सामाजिक अशांती: यामुळे समाजात अशांती आणि असंतोष निर्माण होऊ शकतो, कारण लोक त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवू शकतात.
- गैर-सरकारी संस्थांवर ताण: बेघरांना मदत करणाऱ्या संस्थांवर जास्त ताण येऊ शकतो, कारण त्यांना अधिक लोकांची काळजी घ्यावी लागेल.
- सकारात्मक परिणाम: काही तज्ञांचे मत आहे की, भीक देणे बंद केल्याने बेघरांना अधिक टिकाऊ उपाय शोधण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते, जसे की सरकारीprogramमध्ये भाग घेणे किंवा नोकरी शोधणे.
भीक देणे थांबवणे हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. यावर कोणताही एकच उपाय नाही.