4 उत्तरे
4
answers
भाषेचा उगम कसा झाला?
22
Answer link
मराठी भाषेचा उगम आणि विस्तार कसा झाला?*
_*"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।"*_
भाषे विषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. पूर्वीपासूनच लोकांमध्ये भाषेच्या उगमाबद्दल, इतिहासाबद्दल विविध माहिती, लिखाण, शिलालेख , प्रचलित होते . भाषा हे आपले भावना, विचार, वस्तूंची देवाणघेवाण इत्यादि व्यक्त करण्याचे साधन आहे. पण मराठी ही आपली मातृभाषा. ति आपण बोलतो, लिहतो.
मराठी भाषा नेमकी केव्हा अस्तित्वात आली हे सांगणं कठीण आहे. पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा किती मागच्या काळापर्यंत शोधता येतात ह्याचा शोध इतिहासकार घेत असतात. याबद्दल अनेकांची वेगवेगळी मत आहेत .वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात .
_*मराठी भाषा–उदय आणि विस्तार*_
मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणार्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे.
मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली जाते. इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली.महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामा यण आदि ग्रंथांची भर घातली.
◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆
*मराठी भाषा आणि तिचा उदय*
_इ.स.११३० मध्ये कोरलेला मराठी शिलालेख_
शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला.
इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. राजा केसिदेवराय याचे कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात जुना आजपर्यंत सापडलेला शिलालेख आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख – “चामुण्डराजे करवियले” हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. ती समजूत आता मागे पडली असून तो मान अक्षी शिलालेखाला मिळाला आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*"गी सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-*
*मुद्रधीपती ।श्री कोंकणा चक्री –*
*वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा –*
*न भइर्जु सेणुई तसीमीनी काले*
*प्रव्रतमने । सकु संवतु : ९३४ प्रधा-*
*वी संवसरे: अधिकु दिवे सुक्रे बौ-*
*लु । भइर्जुवे तथा बोडणा तथा नौ*
*कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु*
*मीची वआण । लुनया कचली ज -।"*
----------------------------------
*प्रा. हरी नरके यांचा नवा सिद्धांत*
प्रा. हरी नरके यांनी नव्यानेच मांडलेल्या सिद्धान्ताप्रमाणे मराठी ही इसवी सनाच्या पूर्वीपासून असलेली भाषा आहे. त्यांच्या मते माहाराष्ट्री उर्फ प्राचीन मराठी हिच्यापासून शौरसेनी निघाली. शौरसेनीपासून कालांतराने मागधी व पैशाची या दोन भाषा निघाल्या. तेव्हा मागधी व पैशाची ही दोन्ही प्राचीन मराठीची नातवंडे होत. शौरसेनीची खरी आई म्हणजे प्राचीन मराठी भाषा
हालाच्या सप्तशतीतील काव्यही लोकवाङ्मय आहे. कुठल्यातरी राज्याच्या राजकवीने केलेले ते काव्य नसून महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या लोकप्रिय काव्याचे ते संकलन आहे. त्यात राजांच्या दरबाराचे चित्र नसून गावगाड्याचे, पाटलाचे, पाटलाच्या सुनेचे म्हणजेच महाराष्ट्राच्या साध्या ग्रामीण जीवनाचे चित्र पाहायला मिळते. लीलावती ही अद्भुतरम्य कथा हाल या राजाबद्दल आहे. त्यातही महाराष्ट्राचा प्राण जे प्रतिष्ठान नगर(पैठण) व तेथील गोला उर्फ गोदावरी नदी व तीत नाहणाऱ्या, अंगाला हळद फासणाऱ्या महाराष्ट्र सुंदरीचे वर्णन आढळते. हा कवी आपल्या भाषेला ‘मरहठ्ठ देसी भाषा’ असे नाव देतो.
दुर्गा भागवतांनी राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना म्हटले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. यांवरून मराठी भाषा ही हजारो वर्षे जुनी असल्याचे दिसून येते, आधीच्या पाचव्या म्हणजे ती कन्नड आणि तेलुगू यांच्यापेक्षा जास्त जुनी किंवा निदान तितकीच जुनी असली पाहिजे.
असा हजारो वर्षांचा इतिहास जपणारी आपली मराठी भाषा आहे. अशा मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झालेला दिसतो .
असेही मानले जाते की, मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाला, याबाबत सर्व भाषातज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याची सुरुवात देखील अंबाजोगाई येथे मराठी शाळा स्थापना करून केलेली आहे. आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधु या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या समितीने भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापण करावे याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल शासनास सादर केलेला आहे. जागतिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात वेळोवेळी याबाबतचे ठराव झाले आहेत, असे असताना शासनाने मराठी भाषेचे पहिले अभिमत विद्यापीठ मुंबई येथे सुरू करण्याचा निर्णय घेणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे अंबागाई येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी केली.
राज्य शासन मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असताना त्यांना मराठी भाषेची जननी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्याचा विसर पडलेला आहे. राज्यातील भाषा तज्ञांनी मराठी भाषेचा उगम अंबाजोगाई येथे झाल्याचे पुराव्यानिशी सांगितले असून याबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही.आद्यकवी मुकुंदराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे.त्यांनी विवेकसिंधू सारख्या महान ग्रंथाची रचना याच भूमीत केली. वेळोवेळी विविध साहित्य संमेलनात ठराव घेऊन साहित्यिकांनी भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे करण्याची मागणी केलेली आहे.

_*"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।"*_
भाषे विषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. पूर्वीपासूनच लोकांमध्ये भाषेच्या उगमाबद्दल, इतिहासाबद्दल विविध माहिती, लिखाण, शिलालेख , प्रचलित होते . भाषा हे आपले भावना, विचार, वस्तूंची देवाणघेवाण इत्यादि व्यक्त करण्याचे साधन आहे. पण मराठी ही आपली मातृभाषा. ति आपण बोलतो, लिहतो.
मराठी भाषा नेमकी केव्हा अस्तित्वात आली हे सांगणं कठीण आहे. पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा किती मागच्या काळापर्यंत शोधता येतात ह्याचा शोध इतिहासकार घेत असतात. याबद्दल अनेकांची वेगवेगळी मत आहेत .वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात .
_*मराठी भाषा–उदय आणि विस्तार*_
मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणार्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे.
मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली जाते. इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली.महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामा यण आदि ग्रंथांची भर घातली.
◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆
*मराठी भाषा आणि तिचा उदय*
_इ.स.११३० मध्ये कोरलेला मराठी शिलालेख_
शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला.
इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. राजा केसिदेवराय याचे कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात जुना आजपर्यंत सापडलेला शिलालेख आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख – “चामुण्डराजे करवियले” हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. ती समजूत आता मागे पडली असून तो मान अक्षी शिलालेखाला मिळाला आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*"गी सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-*
*मुद्रधीपती ।श्री कोंकणा चक्री –*
*वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा –*
*न भइर्जु सेणुई तसीमीनी काले*
*प्रव्रतमने । सकु संवतु : ९३४ प्रधा-*
*वी संवसरे: अधिकु दिवे सुक्रे बौ-*
*लु । भइर्जुवे तथा बोडणा तथा नौ*
*कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु*
*मीची वआण । लुनया कचली ज -।"*
----------------------------------
*प्रा. हरी नरके यांचा नवा सिद्धांत*
प्रा. हरी नरके यांनी नव्यानेच मांडलेल्या सिद्धान्ताप्रमाणे मराठी ही इसवी सनाच्या पूर्वीपासून असलेली भाषा आहे. त्यांच्या मते माहाराष्ट्री उर्फ प्राचीन मराठी हिच्यापासून शौरसेनी निघाली. शौरसेनीपासून कालांतराने मागधी व पैशाची या दोन भाषा निघाल्या. तेव्हा मागधी व पैशाची ही दोन्ही प्राचीन मराठीची नातवंडे होत. शौरसेनीची खरी आई म्हणजे प्राचीन मराठी भाषा
हालाच्या सप्तशतीतील काव्यही लोकवाङ्मय आहे. कुठल्यातरी राज्याच्या राजकवीने केलेले ते काव्य नसून महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या लोकप्रिय काव्याचे ते संकलन आहे. त्यात राजांच्या दरबाराचे चित्र नसून गावगाड्याचे, पाटलाचे, पाटलाच्या सुनेचे म्हणजेच महाराष्ट्राच्या साध्या ग्रामीण जीवनाचे चित्र पाहायला मिळते. लीलावती ही अद्भुतरम्य कथा हाल या राजाबद्दल आहे. त्यातही महाराष्ट्राचा प्राण जे प्रतिष्ठान नगर(पैठण) व तेथील गोला उर्फ गोदावरी नदी व तीत नाहणाऱ्या, अंगाला हळद फासणाऱ्या महाराष्ट्र सुंदरीचे वर्णन आढळते. हा कवी आपल्या भाषेला ‘मरहठ्ठ देसी भाषा’ असे नाव देतो.
दुर्गा भागवतांनी राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना म्हटले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. यांवरून मराठी भाषा ही हजारो वर्षे जुनी असल्याचे दिसून येते, आधीच्या पाचव्या म्हणजे ती कन्नड आणि तेलुगू यांच्यापेक्षा जास्त जुनी किंवा निदान तितकीच जुनी असली पाहिजे.
असा हजारो वर्षांचा इतिहास जपणारी आपली मराठी भाषा आहे. अशा मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झालेला दिसतो .
असेही मानले जाते की, मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाला, याबाबत सर्व भाषातज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याची सुरुवात देखील अंबाजोगाई येथे मराठी शाळा स्थापना करून केलेली आहे. आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधु या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या समितीने भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापण करावे याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल शासनास सादर केलेला आहे. जागतिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात वेळोवेळी याबाबतचे ठराव झाले आहेत, असे असताना शासनाने मराठी भाषेचे पहिले अभिमत विद्यापीठ मुंबई येथे सुरू करण्याचा निर्णय घेणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे अंबागाई येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी केली.
राज्य शासन मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असताना त्यांना मराठी भाषेची जननी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्याचा विसर पडलेला आहे. राज्यातील भाषा तज्ञांनी मराठी भाषेचा उगम अंबाजोगाई येथे झाल्याचे पुराव्यानिशी सांगितले असून याबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही.आद्यकवी मुकुंदराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे.त्यांनी विवेकसिंधू सारख्या महान ग्रंथाची रचना याच भूमीत केली. वेळोवेळी विविध साहित्य संमेलनात ठराव घेऊन साहित्यिकांनी भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे करण्याची मागणी केलेली आहे.

12
Answer link
प्राकृतापासून मराठी भाषा निर्माण झाली असे मत आहे. पण कोणत्या प्राकृत भाषेपासून याचेही नेमकेपणाने उत्तर मिळत नाही. संस्कृत,प्राकृत, अपभ्रंश या भाषेचे थोडे थोडे गुण दिसतात. पण याच प्राकृतपासून मराठी जन्माला आली असे म्हणता येत नाही. प्राकृत भाषेपासून आधुनिक भाषा तयार झाल्या आहेत जश्या शौरसेनीपासून हिंदी, सिंधी, अपभ्रंशीपासून गुजराती, तर बंगाली मागधीपासून. मराठी भाषेच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. जेव्हा एखादी भाषा एखाद्या विशिष्ट भाषेपासून तयार झाली असे आपण म्हणतो तेव्हा तिचे मूळ भाषेच्या व्याकरणाचेसर्व रूपे स्वीकारलेली दाखविता आले पाहिजे. मराठीचे संदर्भात असे दिसते की, नामविभक्तीचा भाग मराठीने अपभ्रंश भाषेपासून तर आख्यात -विभक्ती क्रियापदाचे प्रत्यय वगैरे महाराष्ट्रीपासून घेतलेले दिसतात.
आधुनिक भारतीय भाषेत निरनिराळ्या प्राकृत भाषेच्या ज्या लकबी दिसतात त्यावरून त्या प्राकृत भाषेपासून ती आधुनिक भाषा निर्माण झाली असे समजले जाते. मराठीच्या बाबतीत असे ठामपणे म्हणता येत नाही.
आधुनिक भारतीय भाषेत निरनिराळ्या प्राकृत भाषेच्या ज्या लकबी दिसतात त्यावरून त्या प्राकृत भाषेपासून ती आधुनिक भाषा निर्माण झाली असे समजले जाते. मराठीच्या बाबतीत असे ठामपणे म्हणता येत नाही.
0
Answer link
भाषेचा उगम हा मानवी इतिहासातील एक रहस्यमय आणि गुंतागुंतीचा विषय आहे. भाषेचा नेमका उगम कधी झाला हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे, परंतु अनेक सिद्धांत आणि पुरावे याबद्दल माहिती देतात.
भाषा उगमाचे काही प्रमुख सिद्धांत:
- नैसर्गिक ध्वनी सिद्धांत (Natural Sound Theory): या सिद्धांतानुसार, भाषा ही निसर्गातील ध्वनींचे अनुकरण करून विकसित झाली. उदाहरणार्थ, प्राण्यांचे आवाज, वाऱ्याचा आवाज, किंवा पाण्याच्या आवाजाचे अनुकरण केले गेले आणि त्यातून शब्द तयार झाले.
- हावभाव सिद्धांत (Gesture Theory): काही अभ्यासकांच्या मते, भाषा ही हावभावांवरून विकसित झाली. আদিম मानवांनी संवाद साधण्यासाठी सर्वप्रथम हातवारे आणि शारीरिक हावभाव वापरले, आणि हळूहळू त्या हावभावांना ध्वन्यात्मक रूप दिले गेले.
- सामाजिक गरज सिद्धांत (Social Necessity Theory): भाषा ही सामाजिक गरजातून निर्माण झाली, असे काही सिद्धांत मानतात. मानवांना एकमेकांशी सहयोग करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आणि सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भाषेची गरज भासली, ज्यामुळे भाषेचा विकास झाला.
- देवदत्त सिद्धांत (Divine Gift Theory): काही धार्मिक मान्यतांनुसार, भाषा ही देवाने दिलेली देणगी आहे.
पुरावे आणि संशोधन:
- पुराणlinguistics (Paleolinguistics): भाषेच्या अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो. भाषाशास्त्रज्ञ विविध भाषांमधील साम्ये आणि फरक यांचा अभ्यास करून भाषेच्या उगमाबद्दल अनुमान काढतात.
- आनुवंशिक संशोधन (Genetic Research): मानवी डीएनए (DNA) चा अभ्यास करून भाषा आणि मानवी स्थलांतर यांच्यातील संबंध शोधला जातो. काही संशोधनानुसार, विशिष्ट भाषिक गटांतील लोकांमध्ये काही विशिष्ट जनुकीय (genetic) समानता आढळतात.
- জীवाश्ম (Fossils): मानवी जीवाश्मांचा अभ्यास करून मानवी vocal tract (घशातील अवयव) आणि मेंदूचा विकास कसा झाला, हे पाहिले जाते. vocal tract आणि मेंदूच्या विकासाने मानवाला ध्वनी निर्माण करण्यास आणि भाषा वापरण्यास मदत केली.
भाषेचा उगम एक क्रमविकास प्रक्रिया (Evolutionary Process) आहे:
भाषा ही एकाएकी निर्माण झालेली गोष्ट नाही. ती हळूहळू हजारो वर्षांमध्ये विकसित झाली आहे. मानवाच्या आकलनशक्तीमध्ये (cognitive abilities) झालेल्या बदलांमुळे भाषा अधिक जटिल (complex) होत गेली.
भाषेचा उगम हा एक बहुआयामी (multi-dimensional) विषय आहे आणि याबद्दल अजूनही संशोधन चालू आहे।