समृद्धी महामार्ग कोणत्या तालुक्यातून आणि कोणत्या गावातून जाणार आहे, त्याचा रोड मॅप कसा आहे?
समृद्धी महामार्ग कोणत्या तालुक्यातून आणि कोणत्या गावातून जाणार आहे, त्याचा रोड मॅप कसा आहे?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प मुंबई – नागपुर ” समृद्धी महामार्ग ”
हा मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतुक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प म्हणून अलीकडे खुपच चर्चिला जात आहे.
mahasamruddhimahamarg.com
सध्या स्थितीत मुंबई ते नागपूर अंतर कापवयास जवळपास १४ तास लागतात. जवळपास ८१२ किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर ७०० किमी होईल व फक्त ८ तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. तसेच औरंगाबादहुन दोन्ही ठिकाणी जाण्यास केवळ ४ तास लागणार. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय मानकांनूसार उभारण्यात येईल हे विशेष! यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एम.एस.आर.डि.सी काम पाहणार आहे.
मुंबई येथिल भारताचे सर्वात व्यस्त बंदर जवाहरलाल नेहरु बंदर ते नागपुर स्थित मिहान (multi model international cargo hub and airport nagpur ) यांना देखील जोडणारा हा महामार्ग आहे. बंदरातून जलद वाहतूक करुन आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहचवणे शक्य होणार आहे. त्याच बरोबर प्रवासी वाहतूकीला वेल बचतीचा फायदा होणार आहे.
समृद्धी महामार्ग नागपुर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यातून जाणार आहे. हे जिल्हे पुढिल प्रमाणे –
नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई!
तसेच पाच महसुल विभाग येतात.
अप्रत्यक्षपणे काही जिल्हे
चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बिड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतूकीचा फायदा होणार आहे.
जवळपास २६ तालुके व ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.
esakal.com
औरंगाबाद येथिल प्रस्तावित डि.एम.आय.सी प्रकल्प, कार्गो एअर पोर्ट, जालना येथे प्रस्तावित ड्रायपोर्ट यांच्या साठी जड वाहतुक जलद होण्यास मदत होणार आहे. आजच्या घडीला मराठवाडा-विदर्भातुन मुंबईला भाजीपाला, फळे व इतर नाशवंत माल यांसाठी बाजारपेठ उपलब्ध होत नाही, कारण वेळ व अंतर यामुळे पाहिजे त्यावेळेत पोहचणे शक्य होत नाही. पण समृद्धी महामार्गामुळे जलद वाहतुकीच्या मदतीने मुंबईची बाजारपेठ सहज उपलब्ध होणार आहे. ह्या महामार्गाचा सर्वाधिक लाभ विदर्भाला होणार आहे. विदर्भातून ४०० किमी, मराठवाड्यातुन १६० किमी व उर्वरित महाराष्ट्रातून १४० किमी असा समस्त महाराष्ट्राला हा महामार्ग दिशादर्शक ठरणार आहे.
समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत.
यात NH 3, NH 6, NH 7, NH 69, NH 204, NH 211, NH 50 यांचा समावेश होतो.
महामार्गाची एकुण रुंदी १२० मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अश्या आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका हि २२.५ मिटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनूसार आहे. प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा १५० किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करावयाची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही हे विशेष. महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इ. उभारण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या दोन्हीही बाजूस सर्विस रोड आसणार आहे. तो अंडर बायपास ने जोडला जाईल. जवळपास ५० पेक्षा जास्त उड्डाणपुल, २४ हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच ५ बोगदे प्रस्तावित आहे.बोगद्यांमध्ये लाईटिंग, पुलांचे सौदर्यिकरण, डिजीटल माहिती फलक इ.प्रस्तावित आहेत. महामार्गाच्या कामासाठी स्थानिक सामान वापरणार असे ऐकिवात आहे. संपुर्ण महामार्गात सिसिटिव्ही कॅमेरा, मोफत फोन केंद्र, मोफत वायफाय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या महामार्गात ४०० वाहनांसाठी व ३०० पादचाऱ्यांसाठी विशेष जागा देण्यात आली आहे. यामुळे महामार्गाला जोडताना स्थानिक वाहतूक सुरळीत व सुरक्षित असणार आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही कमी होईल, कारण झिरो अॅक्सिडेंटल कॉरिडोर असणारा हा देशातील पहिलाच महामार्ग ठरणार असे म्हटले जात आहे. हा महामार्ग खाजगी भागिदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार व तो स्वयंचलित असणार आहे. या महामार्गाचा वापर गॅस पाईप लाईन, इलेक्ट्रिक लाइन वा आप्टिकल फायबर केबलसाठी करण्याचा मानस आहे. युद्धजन्य परिस्थितीत अथवा नैसर्गिक आपत्ति दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे असणार आहे.
maharashtratoday.in
ग्रिन फिल्ड कॉरिडोर हे एक वैशिष्ट्य या समृद्धी महामार्गाचे असणार आहे. या महामार्गा दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन साधले जाईल. .महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षणीय स्थळे जोडण्यास हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. या महामार्गाचे प्रमुख मध्यवर्ती स्थानक औरंगाबाद असणार आहे. डि.एम.आय.सी मुळे औरंगाबादचे औद्योगीक महत्व वाढत आहे, त्यासाठी जलद दळणवळण आवश्यक आहे. म्हणुन समृद्धी महामार्ग “बूस्ट “देणारा ठरणार यात शंका नाही.
नविन आधुनिक शहरे या महामार्गावर वसवली जाणार आहेत. यांत वीस कृषी समृद्धी केंद्र उभारण्याचे ठरले आहे. या केंदांमुळे शेतकरी – ग्राहक जोडले जातील. जेणेकरून कृषी आधारित अर्थव्यवस्था मजबुत होईल. जालना येथे इंडस्ट्रिअल हब, करमाडला लॉजिस्टिक हब, सावंगी येथे निवासी संकुले, दौलताबाद येथे टुरिझम हब व लासुर येथे आयटी हब उभारण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्ग हा रोजगार निर्मितीचे महत्वाचे काम करणार आहे. तब्बल २५ लाख रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा दावा आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ५० हजार करोड रुपयांचा खर्च येणार आहे. व त्यासाठी पन्नास हजार एकर जमिन लागणार आहे. त्यासाठी २०,४८९ खाते धारकांच्या जमिनीचा भाग हा महामार्गासाठी संपादित केला जाणार आहे. जे शेतकरी भूमिहीन होणार त्यांना पर्यायी जमिन देण्याचे सरकार आश्वासन देत आहे.
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अमरावती पॅटर्नप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे. लोड पुलिंग व रेडिरेकनरच्या पाच पट भाव देवून सरकार जमिन अधिग्रहण करणार आहे. जोड रस्ते व स्थापन होणाऱ्या वसाहतींसाठी स्वेच्छेने, विनासंघर्ष जमिन घेण्याचे सरकारचे प्रयत्न आहे. कुटुंबातील एका व्यक्तिस मोफत व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संपादित जमिन पुर्नविक्रीचाही पर्याय देण्यात येत आहे.
एवढे नक्की आहे की मुंबईला जोडणारी कनेक्टिवीटी मराठवाडा-विदर्भासाठी मैलाचा दगड ठरु शकतो.
राज्याचा सर्वंकष विकास साधण्यासाठी राज्याचा दुर्गम भाग विकसित भागाशी गतीमान आणि सुरक्षित रस्त्यांनी जोडून महाराष्ट्रातील जनतेला प्रमुख व्यापार केंद्रांशी, पर्यटन स्थळांशी, बंदरांशी आणि विमानतळांशी जोडणे हे या शीघ्रसंचार द्रुतगती मार्गाचं उद्दिष्ट आहे.
शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग
या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचा हेतू हा प्रवासी आणि मालवाहतुक जलदगतीनं आणि सुरळीतपणे शक्य व्हावी असा आहे. ज्यासाठी त्यामध्ये उत्कृष्ट सार्वजनिक वाहतुक व्यवस्थांच्या आधारे दुर्गम भागांत रस्ते पोहचवण्याचं महत्वाचं काम अंतर्भूत आहे. या द्रुतगती महामार्गामुळे देशातील जनतेला मोठ्या प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत पोचता येईल. या ठिकाणांजवळ नोकरी-व्यवसायाच्या, आरोग्य सेवेच्या, व्यापाराच्या, उद्योग-धंद्याच्या, शिक्षणाच्या संधी आणि इतर गरजेच्या सेवा अगदी सहजपणे उपलब्ध असतील.
हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यातून जात असून तो नागपूरला मुंबईपर्यंत तर जोडेलच पण त्यामुळे हे सर्व जिल्हे व अन्य १४ जिल्हे मुंबईतील JNPT सारख्या देशातल्या एका सर्वात मोठ्या मालवाहू बंदराशीही जोडले जातील. यामुळे राज्याच्या आयात-निर्यातीमध्ये वाढ होईल.
महामार्गावरील सर्व महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी राज्यमार्ग व अंतर्गत रस्त्यांचे जाळे विकसित केले जाईल. यामुळे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड हे १४ जिल्हेही या मार्गाशी जोडले जातील. म्हणजे राज्यातले एकूण २४ जिल्हे या द्रुतगती मार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत.

या द्रुतगती महामार्गालगत असलेली महत्त्वाची पर्यटन स्थळंही जोडली जाणार आहेत.
यामध्ये
पेंच राष्ट्रीय उद्यान ९५ कि.मी
ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प १२४ कि.मी
रामटेक ४८ कि.मी
रामधाम थीम पार्क ४० कि.मी
सेवाग्राम ६ कि.मी
चिखलदरा ८० कि.मी
लोणार १८ कि.मी
शेगाव ७४ कि.मी
अजिंठा ९५ कि.मी
वेरूळ १२ कि.मी
दौलताबादचा किल्ला १७ कि.मी
गौताळा वन्यजीव अभयारण्य ६८ कि.मी
बीबी का मकबरा ५ कि.मी
शिर्डी ५ कि.मी
पांडवलेणी ७ कि.मी
त्र्यंबकेश्वर मंदिर १४ कि.मी
सुला वाईन निर्मिती केंद्र ८ कि.मी
तानसा वन्यजीव प्रकल्प ६० कि.मी
शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाची काही वैशिष्ट्ये
- हा द्रुतगती महामार्ग ७०० कि.मी. लांबीचा असेल आणि १० जिल्ह्यांतील २६ तालुक्यांना आणि ३९२ गावांना थेट जोडेल.
- या महामार्गावरील वेगमर्यादा १५० कि.मी. असेल यामुळे नागपूर आणि मुंबई यामधला प्रवास केवळ ८ तासांचा होईल. यामुळे नागपूर ते औरंगाबाद हे अंतर ४ तासांत तर औरंगाबाद तेमुंबई हे अंतर पुढच्या फक्त ४ तासांमध्ये पार होऊ शकेल.
- या महामार्गामुळे अनेक औद्योगिक क्षेत्रं एकमेकांशी जोडली जाणार आहेत. जसे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी), वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डब्ल्यूडीएफसी), वर्धा व जालना येथील ड्राय पोर्ट आणि मुंबईचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे बंदर ही सर्व ठिकाणं एकमेकांना जोडली जातील.
- हा महामार्ग १२० मीटर रुंदीचा असेल. यामधला मध्यवर्ती दुभाजकाचा भाग हा २२.५ मीटर्सचा आहे. यामध्ये दोन्ही बाजूला चार-चार अशा एकूण आठ मार्गिका (लेन्स) असतील. जर भविष्यात एखादी मार्गिका वाढवायची झाली तर त्यासाठी रस्त्याच्या मध्यात असलेल्या मोकळ्या भागाचा उपयोग करता येईल. त्यामुळे भविष्यात ज्यावेळी नव्या मार्गिका हव्या असतील तेव्हा त्यासाठी १२० मीटर्सच्या आखणीबाहेरील जमिनीची गरज लागणार नाही.
- महामार्गाच्या दोन्ही बाजूला पूरक रस्ते (सर्व्हिस रोड्स) असतील. हे रस्ते द्रुतगतीमार्गाच्या खालून जाणाऱ्या भुयारी मार्गाशी जोडले जातील.
- या प्रकल्पात ५० हून अधिक उड्डाणपूल आणि २४ हून अधिक छेदमार्ग (इंटरचेंजेस) असणार आहेत. या खेरीज या मार्गावर ५ पेक्षा जास्त बोगदे, वहानांसाठी ४०० हून अधिक भुयारी मार्ग तर पादचाऱ्यासाठी ३०० हून अधिक भुयारी मार्ग इतके महामार्गाच्या खालून जाणारे रस्ते अनेक मोक्याच्या ठिकाणांवर बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुख्य द्रुतगती महामार्गावरील वाहतुक कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीत चालू राहील. तसंच स्थानिक जनतेलाही महामार्गाचा कोणताच अडथळा त्यांच्या दळणवळणात होणार नाही आणि अपघात टाळले जातील.
- महामार्गावर सर्वत्र लँडस्केपिंग केले जाईल. बोगद्यांमध्ये, भुयारी मार्गावर दिवे, तसंच पुलाचे सुशोभीकरण, रस्त्यांवरचे सुधारित दिवे आणि डिजिटल दिशादर्शक चिन्हांचा वापर होईल.
- जिथे जिथे शक्य आहे तिथे स्थानिक संसाधनांचा वापर केला जाईल, तसेच रस्ते बांधणीसाठी उर्जाप्रकल्पातील राख आणि प्लास्टिकचाही वापर केला जाईल. याबरोबरच महामार्गाच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचेही संकलन करून त्याचा पुनर्वापर केला जाईल.
- या द्रुतगती मार्गावरील प्रवेश व बाहेर पडण्याची ठिकाणे नियंत्रित असतील. महामार्गावर जेवढे अंतर कापले गेले त्यानुसार टोल आकारला जाईल. महामार्गावर स्वयंचलित टोल आकारणी बसवण्याचा प्रस्ताव आहे.
- हा द्रुतगती महामार्ग “शून्य अपघात महामार्ग” असेल; यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यानी नजर ठेवली जाईल आणि प्रत्येक ५ कि.मी वर दूरध्वनी सेवा असेल, ज्यामुळे जर अपघात झालाच तर किंवा इतर निकडीच्या प्रसंगांमध्ये परिस्थितीची सूचना लवकरात लवकर देता येऊ शकेल.
- या द्रुतगती महामार्गाच्या कडेला असलेल्या पूरक मार्गामध्ये सेवावाहिन्या जसे ओएफसी केबल्स, गॅस पाइपलाइन्स आणि वीज वाहतुक सुविधा टाकल्या जातील.
मी तुम्हाला समृद्धी महामार्गाच्या मार्गाबद्दल तपशीलवार माहिती देतो.
समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्र राज्यातील १० जिल्ह्यांतील २६ तालुक्यांतून जातो. त्यातील गावांविषयी आणि तालुका Wise माहिती खालीलप्रमाणे आहे:
* जिल्हे:*
- नागपूर
- वर्धा
- अमरावती
- वाशीम
- बुलढाणा
- जालना
- औरंगाबाद
- नाशिक
- अहमदनगर
- ठाणे
*तालुका आणि गावे:*
प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांची आणि त्यातील गावांंची माहिती खालीलप्रमाणे आहे:
१. नागपूर जिल्हा:
- तालुका: नागपूर ग्रामीण, सावनेर
- गावे: या महामार्गातील नागपूर जिल्ह्यातील गावांंची माहिती मिळवण्यासाठी, आपण गुगलवरती (Nagpur Samruddhi Mahamarg route villages) असे सर्च करू शकता.
२. वर्धा जिल्हा:
- तालुका: वर्धा, सेलू, देवळी
- गावे: वर्धा जिल्ह्यातील गावांंची माहिती मिळवण्यासाठी, आपण गुगलवरती (Wardha Samruddhi Mahamarg route villages) असे सर्च करू शकता.
३. अमरावती जिल्हा:
- तालुका: अमरावती, चांदूर बाजार, मोर्शी,pathrut
- गावे: अमरावती जिल्ह्यातील गावांंची माहिती मिळवण्यासाठी, आपण गुगलवरती (Amravati Samruddhi Mahamarg route villages) असे सर्च करू शकता.
४. वाशीम जिल्हा:
- तालुका: वाशीम, मंगरूळपीर, मालेगाव
- गावे: वाशीम जिल्ह्यातील गावांंची माहिती मिळवण्यासाठी, आपण गुगलवरती (Washim Samruddhi Mahamarg route villages) असे सर्च करू शकता.
५. बुलढाणा जिल्हा:
- तालुका: सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, बुलढाणा, देऊळगाव राजा, चिखली
- गावे: बुलढाणा जिल्ह्यातील गावांंची माहिती मिळवण्यासाठी, आपण गुगलवरती (Buldhana Samruddhi Mahamarg route villages) असे सर्च करू शकता.
६. जालना जिल्हा:
- तालुका: जालना, बदनापूर, भोकरदन
- गावे: जालना जिल्ह्यातील गावांंची माहिती मिळवण्यासाठी, आपण गुगलवरती (Jalna Samruddhi Mahamarg route villages) असे सर्च करू शकता.
७. औरंगाबाद जिल्हा:
- तालुका: औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर
- गावे: औरंगाबाद जिल्ह्यातील गावांंची माहिती मिळवण्यासाठी, आपण गुगलवरती (Aurangabad Samruddhi Mahamarg route villages) असे सर्च करू शकता.
८. नाशिक जिल्हा:
- तालुका: सिन्नर, इगतपुरी
- गावे: नाशिक जिल्ह्यातील गावांंची माहिती मिळवण्यासाठी, आपण गुगलवरती (Nashik Samruddhi Mahamarg route villages) असे सर्च करू शकता.
९. अहमदनगर जिल्हा:
- तालुका: कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी
- गावे: अहमदनगर जिल्ह्यातील गावांंची माहिती मिळवण्यासाठी, आपण गुगलवरती (Ahmednagar Samruddhi Mahamarg route villages) असे सर्च करू शकता.
१०. ठाणे जिल्हा:
- तालुका: शहापूर, कल्याण
- गावे: ठाणे जिल्ह्यातील गावांंची माहिती मिळवण्यासाठी, आपण गुगलवरती (Thane Samruddhi Mahamarg route villages) असे सर्च करू शकता.
तुम्हाला या महामार्गावरील गावांविषयी किंवा इतर माहिती हवी असल्यास, तपशीलवार माहितीसाठी तुम्ही अधिकृत सरकारी वेबसाइटला भेट देऊ शकता.