2 उत्तरे
2
answers
१८५७ चा उठाव कोणी केला?
4
Answer link
1857 चा उठाव (1857 cha uthav)
पार्श्वभूमी -------------
इंग्रज व्यापारी म्हणून भारतात आले आणि साम्राज्य करते बनले. इंग्रजांनी व्यापार करण्यासाठी भारतात ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. कालांतराने तिचे भारतावरील वर्चस्व वाढत गेले. ईस्ट इंडिया कंपनीची भारतात प्रमुख दोन कामे होती एक म्हणजे साम्राज्य विस्तार करणे दुसरे म्हणजे व्यापारी शोषण करणे. इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतात अराजकता माजली होती. ईस्ट इंडिया कंपनिमुळे येथील उद्योगांचा र्हास झाला होता.
1857 च्या उठावा आधी झालेले काही महत्वपूर्ण उठाव खालीलप्रमाणे सांगता येतील.
· वेलोर मधील उठाव -1806
· बराकपूर – 1824
· फिरोझपूर – 1842
· 22 वी एन आय – 1849
· 66 वी एन आय – 1850
· 38 वी एन आय – 1852
· बरेलीचा उठाव – 1816
· कोळ्यांचे बंड – 1831-32
· संथालाचा उठाव – 1855-56
इंग्रज आधिकार्यांच्या अनेक अन्यायवादी धोरणामुळे 1857 सारखा उद्रेक घडून आला. लॉर्ड वेलस्ली याने तैनाती फौजेचा वापर करून हैदराबाद,निजाम, आयोध्येचा नवाब, शिंदे, होळकर, पेशवे या सर्वांना मंडलिक बनवून आपला भूप्रदेश वाढवला. लॉर्ड डलहौसी सारख्या साम्राज्य वादी इंग्रज आधिकार्याने भारतीय राज्यांच्या दत्तक विधानास ना मंजूरी दिली. राज्यांना वारसा नसल्याच्या करना वरुण डलहौसी ने झाशी, सातारा, संबलपुर, जैतपुर अशी अनेक संस्थाने खालसा केली. 1849 साली इंग्रजांनी पंजाब ताब्यात घेतला त्यानंतर ती भारतातील सार्वभौम सत्ताधीश बनली.
1757 ते 1857 या काळात इंग्रजांनी भारतीयांवर अनेक अन्याय केले. कंपनी च्या राजवटीत बेकारी वाढली. इंग्रजांनी भारतीयांवर अनेक अन्यायकारक कर लादले. नोकरी देताना इंग्रज भारतीयां सोबत भेदभाव करत असे. अनेक महत्वाची पदे इंग्रजांना मिळत असे तर खालच्या दर्जाची पदे भारतीयांना दिली जात असे. एकाच प्रकारचे पद धारण करण्यार्या इंग्रज व भारतीय व्यक्ति यांच्यातील वेतनामध्ये देखील खूप फरक होता इंग्रज व्यक्तिला जास्त वेतन दिल्या जास्त असे. तर भारतीय व्यक्तिला कमी वेतन दिले जात असे. 1857 च्या उठवास धार्मिक, राजकीय, आर्थिक व सामाजिक अशी अनेक कारणे जिम्मेदार आहेत. लॉर्ड कॅनींग गोव्हर्नर जनरल असतांना आर्थिक,सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीमुळे जनतेत असंतोष निर्माण झाला. शेवटी शिपाया मधील बंडाची परिणीती व्यापक लढ्या मध्ये झाली. 1857 च्या उठावात सैनिका सोबत सामान्य जनता देखील सामिल झाली ज्या मध्ये शेतकरी, कारागीर इत्यादि सामील होते. ब्रिटिश सरकारची भारतीय धर्मा बद्दलची नीती भारतीय जनतेस र्हास आली नाही त्यामुळे जनतेत क्रोध निर्माण झाला. इंग्रज सरकार आम्हा भारतीयांचा धर्म बुडवणार असे भारतीयांना वाटू लागले यामुळे 1857 सारखा उठाव घडून आला. या उठावाने इंग्रज शासनाच्या मुळास धक्का लावला.
उठाव—
इंग्रज शासनाने सैनिकांसाठी नव्या व आधुनिक आशा एनफील्ड रायफल चा वापर करण्याचे ठरवले होते. परंतु आशा बंदुका साठी जी कडतूसे बनवली गेली होती त्या काडतुसास डुकराची व गायीची चरबी लावलेली होती. ही बातमी बराकपूर च्या सैन्या मध्ये पसरली.
बराकपूर (प. बंगाल) छावणीतील सैनिकांनी चरबियुक्त काडतूसे वापरण्यास नकार दिला. आशा सैनिकांच्या विरोधात शिस्तभांगाचा आरोप लाऊन त्यांच्या वर कार्यवाही करण्यात आली. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे नावाच्या शिपाहिने काडतूसे वापरण्यास नकार देऊन एका इंग्रज आधिकार्यास ठार केले. त्यामुळे 34 वी एन आय रेजिमेंट भंग करण्यात आली व गुन्हेगाराणा शिक्षा देण्यात आली.इंग्रज सरकारने 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे ला फाशी दिली. ही बातमी आगी सारखी भारतीय सैनिका मध्ये पसरली व मिरत ला जाऊन धडकली. मिरत ला वादळाची सुरुवात झाली. 1857 च्या उठावाची सुरुवात झाली. 10 मे 1857 ला मिरत येथील सैनिकांनी देखील कडतूसे वापरण्यास नकार दिला आणि इंग्रजा विरुद्ध उठाव केला आणि कैदेत असलेल्या आपल्या साथीदारांना त्यांनी सोडवले. ते सर्व दिल्लीस जाण्यास निघाले. इंग्रज आधिकारी जनरल हेवीट ने देखील भारतीय सैनिकांना आडवण्याचे साहस दाखवले नाही. 12 मे 1857 रोजी उठाव कर्त्यांनी दिल्लीवर ताबा मिळवला.तेथील इंग्रज आधिकारी लेफ्टनंट विलोबी यांनी उठाव वाल्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यास यश आले नाही. उठवाच्या सैन्याने दिल्लीतील काही युरोपीयांना ठार केले. दिल्ली बरोबर त्यांनी राजमहालवर देखील ताबा मिळवला. बहादुर शहा जफर ला उठाव वाल्यांनी सम्राट घोषित केले. लवकरच उठावाची आग उत्तर भारत आणि मध्य भारतात पसरली. लखनौ, अलाहाबाद, कानपुर,बनारस व बिहार चा काही भाग, झांशी व काही इतर परदेशात उठाव सुरू झाला.
दिल्ली हातातून गेल्यामुळे इंग्रजांना खूप नुकसान झाल्या सारखे वाटले कारण की दिल्ली संपूर्ण भारताची राजधानी होती तिचा मानसिक प्रभाव संपूर्ण भारतावर होता. दिल्लीस वापस मिळवणे हे इंग्रजा साठी खूप महत्वाचे होते. पण इंग्रजांचे सुदैव अनेक भारतीय राजे त्यांना एकनिष्ठ राहिले. त्यांनी उठाव मोडून काढण्यास इंग्रजांची खूप मदत केली. उठावाच्या वेळी भारतातील बर्याच क्षेत्रावर त्याचा प्रभाव कमी दिसून आला.
लखनौ मध्ये 4 जूनला उठाव सुरू झाला. हेनरी लॉरेन्स ने युरोपियना सह व एकनिष्ठ असलेल्या अंदाजे 2000 भारतीया सह तेथे असलेल्या इंग्रज रेसिडेंसी मध्ये आश्रय घेतला. शिपायांनी इंग्रज रेसिडेंसी ला वेढा घातला त्यात हेनरी लॉरेन्स मारला गेला. होवलोक आणि ओट्रमने लखनौ जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यातही त्यांस यश आले नाही. मार्च 1858 मध्ये इंग्रज सेनापती कोलीन कंपबेल ह्याने लखनौ वर पूर्ण ताबा मिळवला.
5 जून 1857 रोजी कानपूर इंग्रजांच्या हातून गेले. नानासाहेब पेशवा घोषित करण्यात आला. तेथील इंग्रज आधिकारी हयू व्हीलरने 27 जून 1857 ला शरणागती पत्करली तेथे अनेक इंग्रज मारले गेले. तेथे नानासाहेबाला त्याचा मुख्य मदतनीस तात्या टोपे याची मदत मिळाली. 6 डिसेंबर 1857 ला इंग्रज आधिकारी कॅम्पबेल ने कानपूर ताब्यात घेतले तात्या टोपे तेथून निसटला आणि झांसी ला जाऊन मिळाला.
जुन 1857 च्या प्रारंभी झांसी मधील सैनिकांनी उठाव केला. लक्ष्मीबाई राज्याची शासिका घोषित करण्यात आली. 3 एप्रिल 1858 रोजी हयू रोजणे झांशी वर आक्रमण करून झांशी वर पूर्ण ताबा मिळवला. बिहार मध्ये जगदीशपूर चा जमीनदार कुणवरसिंह ने बरेलीत बहादुर खान ने तसेच बनारस इत्यादि ठिकाणी उठाव झाले. ते संपूर्ण उठाव दडपून टाकण्यात आले.
उठावची प्रमुख केंद्रे -------
· दिल्ली----------------प्रमुख व्यक्ति – बहादूरशहा जफर व बख्त खां
तारीख—11,12 मे 1857
· कानपुर---------------प्रमुख व्यक्ति – नानासाहेब व तात्या टोपे
तारीख—5 जून 1857
· लखनौ --------------प्रमुख व्यक्ति – बेगम हजरत महल
तारीख—4 जून 1857
· झांसी-----------------प्रमुख व्यक्ति – रानी लक्ष्मी बाई
तारीख—जून 1857
· इलाहाबाद------------प्रमुख व्यक्ति – लियाकत आली
· जगदीशपूर-----------प्रमुख व्यक्ति – कूंवर सिंह
· बरेली-----------------प्रमुख व्यक्ति – खान बहादुर खां
· फैजाबाद--------------प्रमुख व्यक्ति – मौलवी अहमद उल्ला
· फतेहपुर--------------- प्रमुख व्यक्ति – आजीमुल्ला
पार्श्वभूमी -------------
इंग्रज व्यापारी म्हणून भारतात आले आणि साम्राज्य करते बनले. इंग्रजांनी व्यापार करण्यासाठी भारतात ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. कालांतराने तिचे भारतावरील वर्चस्व वाढत गेले. ईस्ट इंडिया कंपनीची भारतात प्रमुख दोन कामे होती एक म्हणजे साम्राज्य विस्तार करणे दुसरे म्हणजे व्यापारी शोषण करणे. इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतात अराजकता माजली होती. ईस्ट इंडिया कंपनिमुळे येथील उद्योगांचा र्हास झाला होता.
1857 च्या उठावा आधी झालेले काही महत्वपूर्ण उठाव खालीलप्रमाणे सांगता येतील.
· वेलोर मधील उठाव -1806
· बराकपूर – 1824
· फिरोझपूर – 1842
· 22 वी एन आय – 1849
· 66 वी एन आय – 1850
· 38 वी एन आय – 1852
· बरेलीचा उठाव – 1816
· कोळ्यांचे बंड – 1831-32
· संथालाचा उठाव – 1855-56
इंग्रज आधिकार्यांच्या अनेक अन्यायवादी धोरणामुळे 1857 सारखा उद्रेक घडून आला. लॉर्ड वेलस्ली याने तैनाती फौजेचा वापर करून हैदराबाद,निजाम, आयोध्येचा नवाब, शिंदे, होळकर, पेशवे या सर्वांना मंडलिक बनवून आपला भूप्रदेश वाढवला. लॉर्ड डलहौसी सारख्या साम्राज्य वादी इंग्रज आधिकार्याने भारतीय राज्यांच्या दत्तक विधानास ना मंजूरी दिली. राज्यांना वारसा नसल्याच्या करना वरुण डलहौसी ने झाशी, सातारा, संबलपुर, जैतपुर अशी अनेक संस्थाने खालसा केली. 1849 साली इंग्रजांनी पंजाब ताब्यात घेतला त्यानंतर ती भारतातील सार्वभौम सत्ताधीश बनली.
1757 ते 1857 या काळात इंग्रजांनी भारतीयांवर अनेक अन्याय केले. कंपनी च्या राजवटीत बेकारी वाढली. इंग्रजांनी भारतीयांवर अनेक अन्यायकारक कर लादले. नोकरी देताना इंग्रज भारतीयां सोबत भेदभाव करत असे. अनेक महत्वाची पदे इंग्रजांना मिळत असे तर खालच्या दर्जाची पदे भारतीयांना दिली जात असे. एकाच प्रकारचे पद धारण करण्यार्या इंग्रज व भारतीय व्यक्ति यांच्यातील वेतनामध्ये देखील खूप फरक होता इंग्रज व्यक्तिला जास्त वेतन दिल्या जास्त असे. तर भारतीय व्यक्तिला कमी वेतन दिले जात असे. 1857 च्या उठवास धार्मिक, राजकीय, आर्थिक व सामाजिक अशी अनेक कारणे जिम्मेदार आहेत. लॉर्ड कॅनींग गोव्हर्नर जनरल असतांना आर्थिक,सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीमुळे जनतेत असंतोष निर्माण झाला. शेवटी शिपाया मधील बंडाची परिणीती व्यापक लढ्या मध्ये झाली. 1857 च्या उठावात सैनिका सोबत सामान्य जनता देखील सामिल झाली ज्या मध्ये शेतकरी, कारागीर इत्यादि सामील होते. ब्रिटिश सरकारची भारतीय धर्मा बद्दलची नीती भारतीय जनतेस र्हास आली नाही त्यामुळे जनतेत क्रोध निर्माण झाला. इंग्रज सरकार आम्हा भारतीयांचा धर्म बुडवणार असे भारतीयांना वाटू लागले यामुळे 1857 सारखा उठाव घडून आला. या उठावाने इंग्रज शासनाच्या मुळास धक्का लावला.
उठाव—
इंग्रज शासनाने सैनिकांसाठी नव्या व आधुनिक आशा एनफील्ड रायफल चा वापर करण्याचे ठरवले होते. परंतु आशा बंदुका साठी जी कडतूसे बनवली गेली होती त्या काडतुसास डुकराची व गायीची चरबी लावलेली होती. ही बातमी बराकपूर च्या सैन्या मध्ये पसरली.
बराकपूर (प. बंगाल) छावणीतील सैनिकांनी चरबियुक्त काडतूसे वापरण्यास नकार दिला. आशा सैनिकांच्या विरोधात शिस्तभांगाचा आरोप लाऊन त्यांच्या वर कार्यवाही करण्यात आली. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे नावाच्या शिपाहिने काडतूसे वापरण्यास नकार देऊन एका इंग्रज आधिकार्यास ठार केले. त्यामुळे 34 वी एन आय रेजिमेंट भंग करण्यात आली व गुन्हेगाराणा शिक्षा देण्यात आली.इंग्रज सरकारने 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे ला फाशी दिली. ही बातमी आगी सारखी भारतीय सैनिका मध्ये पसरली व मिरत ला जाऊन धडकली. मिरत ला वादळाची सुरुवात झाली. 1857 च्या उठावाची सुरुवात झाली. 10 मे 1857 ला मिरत येथील सैनिकांनी देखील कडतूसे वापरण्यास नकार दिला आणि इंग्रजा विरुद्ध उठाव केला आणि कैदेत असलेल्या आपल्या साथीदारांना त्यांनी सोडवले. ते सर्व दिल्लीस जाण्यास निघाले. इंग्रज आधिकारी जनरल हेवीट ने देखील भारतीय सैनिकांना आडवण्याचे साहस दाखवले नाही. 12 मे 1857 रोजी उठाव कर्त्यांनी दिल्लीवर ताबा मिळवला.तेथील इंग्रज आधिकारी लेफ्टनंट विलोबी यांनी उठाव वाल्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यास यश आले नाही. उठवाच्या सैन्याने दिल्लीतील काही युरोपीयांना ठार केले. दिल्ली बरोबर त्यांनी राजमहालवर देखील ताबा मिळवला. बहादुर शहा जफर ला उठाव वाल्यांनी सम्राट घोषित केले. लवकरच उठावाची आग उत्तर भारत आणि मध्य भारतात पसरली. लखनौ, अलाहाबाद, कानपुर,बनारस व बिहार चा काही भाग, झांशी व काही इतर परदेशात उठाव सुरू झाला.
दिल्ली हातातून गेल्यामुळे इंग्रजांना खूप नुकसान झाल्या सारखे वाटले कारण की दिल्ली संपूर्ण भारताची राजधानी होती तिचा मानसिक प्रभाव संपूर्ण भारतावर होता. दिल्लीस वापस मिळवणे हे इंग्रजा साठी खूप महत्वाचे होते. पण इंग्रजांचे सुदैव अनेक भारतीय राजे त्यांना एकनिष्ठ राहिले. त्यांनी उठाव मोडून काढण्यास इंग्रजांची खूप मदत केली. उठावाच्या वेळी भारतातील बर्याच क्षेत्रावर त्याचा प्रभाव कमी दिसून आला.
लखनौ मध्ये 4 जूनला उठाव सुरू झाला. हेनरी लॉरेन्स ने युरोपियना सह व एकनिष्ठ असलेल्या अंदाजे 2000 भारतीया सह तेथे असलेल्या इंग्रज रेसिडेंसी मध्ये आश्रय घेतला. शिपायांनी इंग्रज रेसिडेंसी ला वेढा घातला त्यात हेनरी लॉरेन्स मारला गेला. होवलोक आणि ओट्रमने लखनौ जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यातही त्यांस यश आले नाही. मार्च 1858 मध्ये इंग्रज सेनापती कोलीन कंपबेल ह्याने लखनौ वर पूर्ण ताबा मिळवला.
5 जून 1857 रोजी कानपूर इंग्रजांच्या हातून गेले. नानासाहेब पेशवा घोषित करण्यात आला. तेथील इंग्रज आधिकारी हयू व्हीलरने 27 जून 1857 ला शरणागती पत्करली तेथे अनेक इंग्रज मारले गेले. तेथे नानासाहेबाला त्याचा मुख्य मदतनीस तात्या टोपे याची मदत मिळाली. 6 डिसेंबर 1857 ला इंग्रज आधिकारी कॅम्पबेल ने कानपूर ताब्यात घेतले तात्या टोपे तेथून निसटला आणि झांसी ला जाऊन मिळाला.
जुन 1857 च्या प्रारंभी झांसी मधील सैनिकांनी उठाव केला. लक्ष्मीबाई राज्याची शासिका घोषित करण्यात आली. 3 एप्रिल 1858 रोजी हयू रोजणे झांशी वर आक्रमण करून झांशी वर पूर्ण ताबा मिळवला. बिहार मध्ये जगदीशपूर चा जमीनदार कुणवरसिंह ने बरेलीत बहादुर खान ने तसेच बनारस इत्यादि ठिकाणी उठाव झाले. ते संपूर्ण उठाव दडपून टाकण्यात आले.
उठावची प्रमुख केंद्रे -------
· दिल्ली----------------प्रमुख व्यक्ति – बहादूरशहा जफर व बख्त खां
तारीख—11,12 मे 1857
· कानपुर---------------प्रमुख व्यक्ति – नानासाहेब व तात्या टोपे
तारीख—5 जून 1857
· लखनौ --------------प्रमुख व्यक्ति – बेगम हजरत महल
तारीख—4 जून 1857
· झांसी-----------------प्रमुख व्यक्ति – रानी लक्ष्मी बाई
तारीख—जून 1857
· इलाहाबाद------------प्रमुख व्यक्ति – लियाकत आली
· जगदीशपूर-----------प्रमुख व्यक्ति – कूंवर सिंह
· बरेली-----------------प्रमुख व्यक्ति – खान बहादुर खां
· फैजाबाद--------------प्रमुख व्यक्ति – मौलवी अहमद उल्ला
· फतेहपुर--------------- प्रमुख व्यक्ति – आजीमुल्ला
0
Answer link
१८५७ चा उठाव हा अनेक कारणांनी आणि अनेक व्यक्ती आणि समूहांनी केला होता. त्यापैकी काही प्रमुख व्यक्ती आणि समूह खालीलप्रमाणे आहेत:
- सैनिक: ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात काम करणारे भारतीय सैनिक (शिपाई) यांनी हा उठाव सुरू केला.
- नागरिक: सामान्य नागरिक, शेतकरी आणि जमीनदार ह्यांनी सुद्धा यात भाग घेतला.
- राणी लक्ष्मीबाई: झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला.
- मंगल पांडे: यांनी ब्रिटीश अधिकार्यांविरुद्ध बंड पुकारले. Britannica - मंगल पांडे
- तात्या टोपे: नानासाहेब पेशवे यांचे सहकारी तात्या टोपे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. Britannica - तात्या टोपे
- नानासाहेब पेशवे: यांनी उठावाचे नेतृत्व केले.
- बहादूर शाह जफर: मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांना उठावाचे नेते म्हणून घोषित करण्यात आले.
या व्यतिरिक्त, अनेक स्थानिक नेते आणि सरदारांनी आपापल्या भागांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला.