नोकरी कागदपत्रे पाटील पोलीस सरकारी नोकरी

पोलीस पाटील भरती कधी असेल, कागदपत्रे काय द्यावे लागतील आणि प्रक्रिया काय आहे?

3 उत्तरे
3 answers

पोलीस पाटील भरती कधी असेल, कागदपत्रे काय द्यावे लागतील आणि प्रक्रिया काय आहे?

5
पोलिस पाटलासंबंधी मूळ तरतूद ब्रिटिश सरकारने १८५७ला केलेल्या कायद्यात केली होती. तो प्रत्यक्षात १२डिसेंबर १८६७ लागू झाला. तेव्हापासून हे पद वंशपरंपरागत होते. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र्रात १९६७ ला ग्रामपोलिस अधिनियम संमत करण्यात आला. त्याची अंमलबजावणी ५ जून १९६८ पासून करण्यात आली व पोलिस पाटलाची नियुक्ती गुणवत्ता पध्दतीने करण्यात येऊ लागली.पोलिस पाटलाची निवड व नियुक्ती राज्यशासनाचा प्रतिनिधी या नात्याने जिल्हाधिकारी वा त्याने अधिकार प्रदान केल्यास प्रांताधिकारी करतो. त्याच्यावर नजिकचे नियंत्रण प्रांतांधिकार्याचेच असते. 
पात्रता१) वय वर्षे २५ ते ४५ दरम्यान असावे. 
२) 10 वी उत्तीर्ण (अपवाद ४ थी पास 
३) गावचा रहिवासी(अपवादात्मक शेजारच्या गावचा) 
४) शारीरिक बाबतीत सुदृढ 
५) चांगले चारित्र्य. 
पोलिस पाटलाची नियुक्ती ५ वर्षासाठी केली जाते, परंतु ५-५ वर्षाने ती वाढवली जाऊ शकते. मात्र, वयाच्या ६० वर्षानंतर त्याची पुर्ननियुक्ती करता येत नाही सध्या त्यास ५००0 रू मानधन मिळते व शासकीय सेवकांप्रमाणे त्यास आठ किरकोळ रजा मिळू शकतात. त्या मंजूर करण्याचा अधिकार तहसीलदारास आहे. त्याला ६ महिन्यापर्यंत बिनपगारी रजा घेता येते. पोलिस पाटलावर कर्तव्य कसुराबाबत कारवाईचा अधिकार प्रांताधिकार्यास व त्या समकक्ष अधिकार्यास असतो.कर्तव्ये१) सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने गावात बंदोबस्त ठेवणे.२) कार्यकारी दंडाधिकार्याच्या आदेशानुसार कार्ये करणे.३) पोलिस प्रशासनाला चौकशीसाठी मदत करणे.४) सार्वजनिक शांततेचा भंग करणारी गोपनीय माहिती मिळवून ती नजीकच्या पोलिस स्टेशनला कळविणे.५) चोरी , चोरीमाल, कैदी, संशयित मृत्यु, गुन्हे यासंबंधी माहिती वरिष्ठ व तालुका दंडाधिकार्यास देणे.६) साथीच्या रोगाची माहिती तलाठी व तहसीलदारास देणे.७) आजारी व असहाय्य प्रवाशांना मदत .८) गुन्हेगार व भटकणार्या टोळयांवर नजर ठेवणे.९) नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारास देणे.१०) मादक पदार्थ बंदीचा भंग झाल्यास तसा अहवाल तहसीलदारास देणे.११) स्थानिक सरकारी कर्मचार्यांना त्यांच्या कामातमदत करणे.१२) प्रामुख्याने तलाठी, पोलिस अधिकारी व ग्रामसेवकयांना सहकार्य करणे.१३) विनापरवाना हत्यार बाळगणार्यांची माहिती मिळविणे व वरिष्ठांना देणे.१४) गुन्हे व गुन्हेगारांची माहिती पोलिस स्टेशनला देणे.१५) शासनाच्या आदेशानुसार इतर जबाबदारी पार पाडणे.श्रेणीमहाराष्ट्र्र पोलिस पाटील अधिनियम १९६७ कलम ६ मध्ये पोलिस पाटील पदाची कार्ये नमूद करण्यात आली आहेत. पोलिस पाटील ग्रामीण मुलकी प्रशासनातील संरक्षण खात्याचा निम्न स्तरावरील घटक आहे.नेमणूक, निवड व राजीनामामहाराष्ट्र्र ग्रामपोलिस अधिनियम १९६७ अन्वये पोलिस पाटलाची नेमणूक प्रांताधिकारी वा जिल्हाधिकारी करतात. पोलिस पाटलाच्या गैरहजेरीत वानिलंबनाच्या काळात वा मृत्यू, आजारपण अशा दिर्घ रजेच्या काळात हंगामी पोलिस पाटलाची (सहा महिन्यांकरिता) नेमणूक करण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे.
उत्तर लिहिले · 25/7/2017
कर्म · 4405
2
यांच्या अगोदर मी  मतदान नोंदणी करत आहे. ७ ८.६ नंबर फॅर्म भरणे व लागणारे कागद पत्र जोडणे हे सर्व माहिती आहे .एकुण १९ प्रकारचे दाखले असतात.आता रहिवाशी दाखला देणे अगोदर त्या व्यक्तीचे आधार कार्ड पाहणे.आणि मग त्या व्क्तीला दाखला द्यावा.पात्रता१) वय वर्षे २५ ते ४५ दरम्यान असावे. 
२) 10 वी उत्तीर्ण (अपवाद ४ थी पास 
३) गावचा रहिवासी(अपवादात्मक शेजारच्या गावचा) 
४) शारीरिक बाबतीत सुदृढ 
५) चांगले चारित्र्य. 
पोलिस पाटलाची नियुक्ती ५ वर्षासाठी केली जाते, परंतु ५-५ वर्षाने ती वाढवली जाऊ शकते. मात्र, वयाच्या ६० वर्षानंतर त्याची पुर्ननियुक्ती करता येत नाही सध्या त्यास ५००0 रू मानधन मिळते व शासकीय सेवकांप्रमाणे त्यास आठ किरकोळ रजा मिळू शकतात. त्या मंजूर करण्याचा अधिकार तहसीलदारास आहे. त्याला ६ महिन्यापर्यंत बिनपगारी रजा घेता येते. पोलिस पाटलावर कर्तव्य कसुराबाबत कारवाईचा अधिकार प्रांताधिकार्यास व त्या समकक्ष अधिकार्यास असतो.कर्तव्ये१) सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने गावात बंदोबस्त ठेवणे.२) कार्यकारी दंडाधिकार्याच्या आदेशानुसार कार्ये करणे.३) पोलिस प्रशासनाला चौकशीसाठी मदत करणे.४) सार्वजनिक शांततेचा भंग करणारी गोपनीय माहिती मिळवून ती नजीकच्या पोलिस स्टेशनला कळविणे.५) चोरी , चोरीमाल, कैदी, संशयित मृत्यु, गुन्हे यासंबंधी माहिती वरिष्ठ व तालुका दंडाधिकार्यास देणे.६) साथीच्या रोगाची माहिती तलाठी व तहसीलदारास देणे.७) आजारी व असहाय्य प्रवाशांना मदत .८) गुन्हेगार व भटकणार्या टोळयांवर नजर ठेवणे.९) नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारास देणे.१०) मादक पदार्थ बंदीचा भंग झाल्यास तसा अहवाल तहसीलदारास देणे.११) स्थानिक सरकारी कर्मचार्यांना त्यांच्या कामातमदत करणे.१२) प्रामुख्याने तलाठी, पोलिस अधिकारी व ग्रामसेवकयांना सहकार्य करणे.१३) विनापरवाना हत्यार बाळगणार्यांची माहिती मिळविणे व वरिष्ठांना देणे.१४) गुन्हे व गुन्हेगारांची माहिती पोलिस स्टेशनला देणे.१५) शासनाच्या आदेशानुसार इतर जबाबदारी पार पाडणे.श्रेणीमहाराष्ट्र्र पोलिस पाटील अधिनियम १९६७ कलम ६ मध्ये पोलिस पाटील पदाची कार्ये नमूद करण्यात आली आहेत. पोलिस पाटील ग्रामीण मुलकी प्रशासनातील संरक्षण खात्याचा निम्न स्तरावरील घटक आहे.नेमणूक, निवड व राजीनामामहाराष्ट्र्र ग्रामपोलिस अधिनियम १९६७ अन्वये पोलिस पाटलाची नेमणूक प्रांताधिकारी वा जिल्हाधिकारी करतात. पोलिस पाटलाच्या गैरहजेरीत वानिलंबनाच्या काळात वा मृत्यू, आजारपण अशा दिर्घ रजेच्या काळात हंगामी पोलिस पाटलाची (सहा महिन्यांकरिता) नेमणूक करण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे.
उत्तर लिहिले · 17/11/2017
कर्म · 50
0

पोलीस पाटील भरती संदर्भात तुमची विचारलेली माहिती खालीलप्रमाणे:

भरती कधी असेल?

पोलीस पाटील भरती राज्य सरकारद्वारे वेळोवेळी आयोजित केली जाते. त्यामुळे, नेमकी भरती कधी निघेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये भरतीची जाहिरात पाहून माहिती मिळवू शकता.

कागदपत्रे काय लागतील?

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे जाहिरातीमध्ये दिली जातात. साधारणपणे खालील कागदपत्रे लागण्याची शक्यता असते:

  • ओळखपत्र (आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, इ.)
  • जन्म दाखला
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (10वी, 12वी, पदवी इ.)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • photographs (फोटो)
  • निवास दाखला
  • चरित्र प्रमाणपत्र
  • गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र

भरती प्रक्रिया काय आहे?

पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये साधारणपणे खालील टप्पे असतात:

  1. अर्ज सादर करणे: जाहिरात প্রকাশিত झाल्यावर, तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
  2. लेखी परीक्षा: अर्जदारांना लेखी परीक्षा द्यावी लागते, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि स्थानिक घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जातात.
  3. शारीरिक चाचणी (आवश्यक असल्यास): काही ठिकाणी शारीरिक चाचणी घेतली जाते.
  4. मुलाखत: लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
  5. निवड: लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारावर अंतिम निवड केली जाते.

अधिक माहितीसाठी, कृपया तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटला भेट द्या किंवा स्थानिक तहसील कार्यालयात संपर्क साधा.

टीप: वरील माहिती संभाव्य आहे. भरतीच्या जाहिरातीनुसार कागदपत्रे आणि प्रक्रियेत बदल होऊ शकतो.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5060

Related Questions

मी १२ वी नापास, वय ३५. तर मला सरकारी नोकरी मिळेल का?
पोलीस पाटील होण्यासाठी येणारे लेखी प्रश्न कोणते?
तुम्ही पोलीस पाटलाची नोकरी का करू इच्छिता?
तो सरकारी अधिकारी आहे किंवा नाही याची चौकशी कशी करावी?
सरकारी अधिकारी कामाच्या ठिकाणी जर राहत नसतील, तर माहिती अधिकार अर्ज कसा करावा?
विभागीय आयुक्तांच्या वरती कोणते अधिकारी असतात?
कलेक्टरच्या वरती कोणता अधिकारी असतो?