व्यक्तिमत्व चरित्रे इतिहास

क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या जीवनपटावर माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या जीवनपटावर माहिती मिळेल का?

6
क्रांतिवीर लहुजी राघोजी साळवे(१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) भारतीय क्रांतिकारक होते. तेलहुजी वस्तादनावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्मपुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटूंबात झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवाजीने आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले.१२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या२३ वर्षे वयाच्या लहुजी साळवें यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये हिंदवी स्वराज्याचे भगवे निशाण शनवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमानेलहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठीआणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवरमात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवकतालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने लोकमान्यबाळ गंगाधर टिळक,वासुदेव बळवंत फडके, महात्माजोतिबा फुले,गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे.
उत्तर लिहिले · 24/7/2017
कर्म · 210095
6
*___________________________*
💫 *_🇮M⃞    a⃞    h⃞    i⃞    t⃞    i⃞    🇮_*   💫

_*⭕  क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद  ⭕*_


✰✰✰✰✰✰
____________________________
   *_🇮माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव🇮_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
.        📯 *_🇮दि  १४  नोव्हेंबर २०१९🇮_* 📯
  .         *_एखादी महान व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे सर्वस्व अर्पण करते. मात्र ती व्यक्ती प्रसिद्धीपासून वंचित राहते. अशा महान व्यक्तीची जयंती व पुण्यतिथी कधी होऊन जाते हे लक्षातही येत नाही. असेच एक महान राष्ट्रपुरूष आहेत लहुजी राघुजी साळवे. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1774 रोजी झाला. लहुजी वस्तादांचे पूर्वज हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे होते._*
*_..............................................._*
╔══╗
║██║      _*M⃞    a⃞    h⃞    i⃞    t⃞    i⃞    *      _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ🇮*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=620187391712521&id=100011637976439
____________________________
त्यामुळे त्यांना लहानपणीच आपल्या वडिलांकडून शस्त्रविद्येचे शिक्षण मिळाले होते. घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, भाला फेकणे यात लहुजी साळवे निपुण होते. पुण्यात बुधवारपेठेतील गंजपेठेत त्यांची तालीम आहे. याच तालमीमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले व दिले.माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,1817 मध्ये झालेल्या घनघोर युद्धात इंग्रज सेनेने मराठी सैन्याचा पराभव केला.या लढाईमध्ये लहुजींचे वडील राघोजी मारले गेले. स्वातंत्र्यासाठी वडिलांचे बलिदान पाहून लहुजी पेटून उठले. पुणे इंग्रजांच्या ताब्यात गेले. शनिवारवाड्यावरचे भगवे निशाण उतरवून युनियन ज्ॉक चढवला गेला. त्याच वेळी लहुजी साळवे यांनी इंग्रजांचा बदला घेण्याचे ठरवले होते.̶M̶̶a̶̶h̶̶i̶̶t̶̶i̶ ̶s̶̶e̶̶v̶̶a̶ ̶g̶̶r̶̶o̶̶u̶̶p̶̶,̶ ̶P̶̶e̶̶t̶̶h̶̶v̶̶a̶̶d̶̶g̶̶a̶̶o̶̶n̶ पुणे येथील बजाज कंपनीसमोर लहुजींच्या वडिलांची समाधी आहे. लहुजींनी संपूर्ण युद्धशास्त्राचे ज्ञान अवगत केल्यानंतर गंजपेठेतील व्यायामशाळेत देशप्रेमाने भारावलेल्या तरुणांना ते शस्त्रविद्येचे प्रशिक्षण देत व मार्गदर्शन करीत असत.
आपले संपूर्ण आयुष्य खर्चून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढवय्यांची संघटना लहुजींनी उभी केली होती. 1857 च्या स्वातंत्र्य लढय़ात त्यांनीच प्रशिक्षित केलेले तरुण अधिक होते. त्यांच्या या महान कार्याला तोड नाही. अशा या थोर क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद यांची आज जयंती. त्यानिमित्त या कट्टर राष्ट्रभक्ताला कोटी कोटी प्रणाम!
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 🇮9890875498🇮* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*🇮माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव🇮*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛
*.............................................*
.       _*🇮ണคн¡т¡ รεvค🇮*_
.       *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
.            *༺♥༻​​*
0
नक्कीच, मी तुम्हाला क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या जीवनपटावर माहिती देतो:

क्रांतिकारक लहुजी साळवे (इ.स. १८४८ - इ.स. १८८१)

लहुजी राघोजी साळवे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक होते. त्यांनी समाजातील अन्याय आणि रूढीवादी विचारसरणीच्या विरोधात बंड पुकारले.

लहुजी साळवे यांचे जीवन:

  • जन्म: लहुजी साळवे यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात झाला.
  • वडील: राघोजी साळवे हे त्यांचे वडील होते, ते एक कुशल पहिलवान आणि वस्ताद होते.
  • शिक्षण: लहुजींनी पारंपरिक शिक्षण घेतले, ज्यात तलवारबाजी, कुस्ती आणि दांडपट्टा यांसारख्या युद्धकलांचा समावेश होता.
  • सामाजिक कार्य: लहुजींनी समाजातील गरीब आणि दलित लोकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला.
  • क्रांतिकारी विचार: त्यांनी जातीय भेदभावाला विरोध केला आणि सर्व माणसांना समानतेचा अधिकार मिळावा यासाठी प्रयत्न केले.
  • मृत्यू: लहुजी साळवे यांचे निधन इ.स. १८८१ मध्ये झाले.

लहुजी साळवे यांचे कार्य:

  • दलितोद्धार: लहुजींनी दलित समाजाला एकत्र करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला.
  • शिक्षण: त्यांनी लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
  • अन्यायाविरुद्ध लढा: त्यांनी समाजातील अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला.
  • Deshbhakti: लहुजी साळवे एक महान देशभक्त होते.

लहुजी साळवे यांचे विचार:

  • "धर्म कोणताही असो, माणूसकी सर्वात मोठी आहे."
  • "शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे शस्त्र आहे."
  • "संघर्ष केल्याशिवाय हक्क मिळत नाहीत."

लहुजी साळवे यांचे महत्त्व:

लहुजी साळवे हे एक महान क्रांतिकारक आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजासाठी केलेल्या योगदानाला लोक आजही आदराने स्मरण करतात.

संदर्भ:
लहुजी साळवे

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1420

Related Questions

संभाजी महाराज जन्म?
कर्‍हेचे पाणी हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
आकाशाशी जडले नाते हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
आकाशाशी जडले नाते हे कोणाचे आत्मचरित्र आहे, असे कोण म्हणत होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती पुस्तके लिहिली आहेत?
स्वातंत्र्य काळातील आत्मचरित्रांची यादी द्या?
मदर तेरेसांचा मृत्यू कसा झाला?