2 उत्तरे
2
answers
दादोबा पांडुरंग कोण होते?
5
Answer link
कौटुंबिक माहिती
दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणेठाणे जिल्ह्यातील वसईतालुक्यातील तरखड ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला. त्यांच्या इतर भावंडां पैकी भास्कर पांडुरंग तर्खडकर आणिआत्माराम पांडुरंग तर्खडकर हेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते.
शिक्षण
दादोबांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळांत झाले. ह्या काळातच त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने फार्शी आणि संस्कृत ह्या भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादित केले. १८२५ मध्ये त्यांना मुंबईच्या हैंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळीच्या(म्हणजेच दि बॉम्बे नेटिव स्कूल अॅन्ड स्कूल बुक सोसायटीच्या)शाळेत घालण्यात आले. पुढे ह्या शाळेचे नाव एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट झाले. १८३५ सालीदादोबा त्याच शाळेत "असिस्टंट टीचर" ह्या पदावर कामाला लागले.
मराठी व्याकरण
१८३३मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली.त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ सालीगणपत कृष्णाजीच्याछापखान्यात छापूनमहाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली.[१]१८५० साली शिक्षणविभागाकरता ह्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयारकेली. ही आवृत्ती शाळाखात्याकरता असल्यानेमेजर थॉमस कॅन्डी,कृष्णशास्त्री चिपळूणकरह्यांसारख्या शिक्षणविभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचे कसून परीक्षण करण्यात आले. ही आवृत्तीअमेरिकन मिशन प्रेसच्याछापखान्यात छापून प्रकाशित करण्यात आली.१८६५ साली दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्तीमराठी लघु व्याकरणह्यानावाने प्रकाशित केली. हे पुस्तक पुढे बराच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते. १८८२पर्यंत ह्या लघु व्याकरणाच्या १२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १९४४पर्यंत ह्या ग्रंथांच्या सुमारे १ लाख प्रती विकल्या गेल्या.दादोबांच्या मृत्यूपर्यंतमहाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या़७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १८७९च्या सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले. १८८१ साली दादोबांनीमोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिकाहा ग्रंथ प्रकाशित केला. ह्या ग्रंथात आपल्यामोठ्या व्याकरणात समाविष्ट करता न आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत.दादोजींचे मराठी व्याकरणविषयक अग्रेसर कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.
आत्मचरित्र
तर्खडकरांचे इ.स. १८४६सालापर्यंतचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यातयेते. हे आत्मचरित्र १९४७मध्येअ.का. प्रियोळकरयांनी संपादित करून पुन:प्रकाशित केले. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ट्येआहेत.या आत्मचरित्राचे ’दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत्त’ नावाचे मराठी रूपांतर
दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणेठाणे जिल्ह्यातील वसईतालुक्यातील तरखड ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला. त्यांच्या इतर भावंडां पैकी भास्कर पांडुरंग तर्खडकर आणिआत्माराम पांडुरंग तर्खडकर हेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते.
शिक्षण
दादोबांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळांत झाले. ह्या काळातच त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने फार्शी आणि संस्कृत ह्या भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादित केले. १८२५ मध्ये त्यांना मुंबईच्या हैंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळीच्या(म्हणजेच दि बॉम्बे नेटिव स्कूल अॅन्ड स्कूल बुक सोसायटीच्या)शाळेत घालण्यात आले. पुढे ह्या शाळेचे नाव एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट झाले. १८३५ सालीदादोबा त्याच शाळेत "असिस्टंट टीचर" ह्या पदावर कामाला लागले.
मराठी व्याकरण
१८३३मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली.त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ सालीगणपत कृष्णाजीच्याछापखान्यात छापूनमहाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली.[१]१८५० साली शिक्षणविभागाकरता ह्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयारकेली. ही आवृत्ती शाळाखात्याकरता असल्यानेमेजर थॉमस कॅन्डी,कृष्णशास्त्री चिपळूणकरह्यांसारख्या शिक्षणविभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचे कसून परीक्षण करण्यात आले. ही आवृत्तीअमेरिकन मिशन प्रेसच्याछापखान्यात छापून प्रकाशित करण्यात आली.१८६५ साली दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्तीमराठी लघु व्याकरणह्यानावाने प्रकाशित केली. हे पुस्तक पुढे बराच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते. १८८२पर्यंत ह्या लघु व्याकरणाच्या १२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १९४४पर्यंत ह्या ग्रंथांच्या सुमारे १ लाख प्रती विकल्या गेल्या.दादोबांच्या मृत्यूपर्यंतमहाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या़७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १८७९च्या सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले. १८८१ साली दादोबांनीमोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिकाहा ग्रंथ प्रकाशित केला. ह्या ग्रंथात आपल्यामोठ्या व्याकरणात समाविष्ट करता न आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत.दादोजींचे मराठी व्याकरणविषयक अग्रेसर कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.
आत्मचरित्र
तर्खडकरांचे इ.स. १८४६सालापर्यंतचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यातयेते. हे आत्मचरित्र १९४७मध्येअ.का. प्रियोळकरयांनी संपादित करून पुन:प्रकाशित केले. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ट्येआहेत.या आत्मचरित्राचे ’दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत्त’ नावाचे मराठी रूपांतर
0
Answer link
दादोबा पांडुरंग तरखडकर हे एक मराठी लेखक, व्याकरणकार आणि समाजसुधारक होते. ते १८१४ मध्ये जन्मले आणि १८८२ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना 'मराठी भाषेचे जनक' मानले जाते.
त्यांच्याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे आहे:
त्यांच्याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे आहे:
- जन्म: ९ मे १८१४, चौल, रायगड जिल्हा
- मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८२, मुंबई
- शिक्षण: एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई
- कार्य:
- 'परमहंस सभे'ची स्थापना (१८49)
- 'मानव धर्म सभे'चे सदस्य
- 'धर्मविवेचन' आणि 'यशोदा पांडुरंगी' यांसारख्या पुस्तकांचे लेखन
- मराठी व्याकरणावर 'मराठी भाषेचे व्याकरण' नावाचे पुस्तक लिहिले, ज्यामुळे ते 'मराठी भाषेचे जनक' म्हणून ओळखले जातात.
दादोबा पांडुरंग तरखडकर हे समाजसुधारक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी जातीय भेदभावाला विरोध केला आणि विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षणाचे समर्थन केले.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: