वसाहतवाद
5
Answer link
युरोपियनांचे भारतात आगमन :-
पूर्वी भारतातील माल इराणचे आखात कॉन्स्टॅटिनोपल इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे. परंतु १४५३ मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा
भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला कारण तुर्कानी युरोपियन व्यापार्यांचा मार्गच अडवून धरला. आता युरोपियनांपुृढे एकच मार्ग होता. तो म्हणजे भारताकडे जाणार्या समुद्रमार्गाचा शोध लावणे भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसर्या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते. या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जायार्या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तो १४९२ मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला. पुढे लवकरच पोर्तुगाल या देशास भारताकडे जाणारा मार्ग शोधून काढण्यास यश मिळाले. वास्को-द-गामा हा पोर्तृगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून २३मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला. या दिवसापासून भारताच्या इतिहासाला नवीन वळण लागले वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनार्यावरील पहिले पाऊल होते.
१६१५ मध्ये इंग्रज राजाचा प्रतिनिधी सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून प्रथमच व्यापारी सवलती मिळवल्या व त्यानंतर मच्छलीपट्टण, सुरत, मद्रास, कलकज्ञ्ल्त्;ाा, मुंबई इ. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वखारीउभारल्या नफा प्रचंड मिळत असल्यामुळे त्यांचा भारतातील व्यापार सारखा वाढत होता. काही मालाच्या बाबतीत या व्यापार्यांना १०० टक्के फायदा मिळत होता. पुढे १७१७ साली विल्यम हॅमिल्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशहा फारुक सियर याला एका भयंकर आजारापासून वाचवले या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापार्यांनी घेतला व बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमिज्ञ्ल्त्;ााने वखार स्थापन करण्याचे फर्मान मिळविले.
0
Answer link
वसाहत वादाची व्याख्या लिहून
वसाहतवादाचे तोटे लिहा?
वसाहतवाद म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसऱ्या क्षेत्रात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे, त्या टिकवून ठेवणे, त्यांचा विस्तार करणे होय. जमिनीचे, खनिजांचे, नैसर्गिक संसाधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढवणे हा वसाहतवादाचा उद्देश असतो.
2
Answer link
वसाहतवाद म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसर्या क्षेत्रात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे, त्या टिकवून ठेवणे, त्यांचा विस्तार करणे होय. जमिनीचे, खनिजांचे, नैसर्गिक संसाधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढवणे हा वसाहतवादाचा उद्देश असतो. उदा - इंग्रज