Topic icon

अहंकार

3
मी अहंकारी नाही का हा स्वतः ला प्रश्न विचारल्या सारखे झाला
माणसाला अहंकार कधी होतो त्याने चांगले वा‌ईट कृत्य करतो तेव्हा मीपणा जागृत होतो
उदाहरणार्थ मी असं केलं मी तसं केलं मी सर्व काही केलं आहे तो अहंकार
अहंकार निर्माण करू नये  अहंकार कसा हि असू शकतो माणसाला अहंकार निर्माण होतो 
मीपणाचा अहंकार असू नये स्वतः चा अभिमान गर्व वाटलं पाहिजे
आपला अहंकार आपल्याला जाणवत नाही आपल्या आजूबाजूच्या लोकांना कळत 
पम आपल्याला अहंकार कळतो आपल्या कडून काही गोष्टी व‌ईट घडतात तेव्हा आपला अहंकार कळतो
अहंकार हा आपली उर्जा कमी करत.
स्वतः मी पणा जपावे .

********************************

‘अहंकार’ हा माणसाचा फार मोठा शत्रू. प्रत्येक व्यक्ती अहंकारव्याप्त असते. कुणाला कर्तृत्वाचा अहंवार असतो. तो येता-जाता साऱ्यांना सांगतो, ‘मी शून्यातून जग उभ केलं आहे.’ अरे तू खरंच विश्वमित्र आहेस का? नवीन जग बनविणारा? कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा तर कुणाला सत्तेचा अहंकार. साध्या शब्दात सांगता येईल की अहंकार म्हणजे मद, मस्ती, माज. अहंकारी माणसाजवळ विनम्रता नसते. मी म्हणजे मीच फक्त, हेच त्याच्या नसानसात भरलेलं असतं.
अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. व्यक्ती स्व-भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. हा ‘मी’ इतरांना तुच्छ मानू लागतो. एकटा पडतो. माणूस समाजनिष्ठ प्राणी आहे. एकटा जगू शकत नाही. ‘आम्हाला कोणाची गरज नाही. आमच्याजवळ सारे आहे’ असा अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात. ‘मी’चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणं. अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर रामकर्ता हा जप सतत करावा. मी कोणीच नाही ही भावना असावी. ‘अहं’चा त्याग केला की आपण सोSहं च्या मार्गावरून जातो.‘अहंकाराचा वारा न लागो मनाला‌’ असं समाजावलं की जगणं उज्ज्वल होतं..
उत्तर लिहिले · 12/7/2023
कर्म · 53710
2
मी ( गर्व ) हा शब्द आपला सर्वात मोठा शत्रू आहे त्यामुळे आपल्याला आपल्या एखाद्या यशस्वी कामावर, मोठ्या खरेदीवर गर्व होतो व स्वतःचा मी जागा होतो आणि ईश्वराला नमस्कार करायला ही विसरतो व नकळत त्याच्यापासून दूर जातो,

माणसाला स्वतःचा गर्व खाली आणतो हे कळतं असून ही माणूस त्याचं चुका वारंवार करतो, आणि गर्वाचे घर खाली हा प्रत्यय येतो, म्हणून माणसाने इतकं ही मोठं होऊ नये की गरीबाला तुच्छ समजून त्याच्या दा्रीद्र्याची लक्तरे उघड्यावर फाडू नये किंवा कुणाचे संसार उघड्यावर काढू नये, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नशीबाने मिळते फरक इतकाच की कुणाला आज आत्ता तर कुणाला थोड्या काळाने, मगज्याला आज मिळतं आहे त्याने गर्व करू नये आणि स्वतःला फार बुद्धी वान ताकतवान, हुशार समजून त्या ईश्वर सेवेला विसरू नये कारण मनुष्य निर्मिती करण्याचं मोठं कामं मानवावर सोपवून बुद्धी मात्र स्वतः देतो तो फक्त ईश्वर असतो त्यास कदापि विसरू नये व त्याचे असतीत्व नाकारू नये,

जन्म माणसाच्या हातात तर शेवट त्याच्या मर्जीने होतो तरी लोक त्याला मानण्यास नकार देतात त्यास देव असे म्हणतात आणि हे पटतं असूनही लोक त्या ईश्वराला दूर कोठे तरी सोडतात म्हणजे दुर्लक्षित करतात, निववळ पैसा हमपणा नुसता लोणच्या सारखा मुरतं ठेवल्याने हा प्रकार घडतो ,

तेव्हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू स्व निर्मित गर्व आहे आणि तो माणसाच्या डोक्यात रहातो व मनाची दरवाजे बंद झालेली असते त्यामुळे ती जेव्हा उघडतात तेव्हा सर्व जीवन पूर्णपणे गाडी च्या चाका सारखे खाली जमिनीवर बसलेले असते 🙏🏼
उत्तर लिहिले · 31/12/2021
कर्म · 121765
9
इगो म्हणजे अहंकार. यालाच माज असे म्हणतात.एखाद्या गोष्टीचा अति जास्त गर्व असणे उदा,श्रीमंतीचा अहंकार.एखादा माणूस श्रीमंत असेल तर तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो.फक्त जगात मी एकटाच श्रीमंत आहे असे समजतो त्यामुळे तो त्यापेक्षा खालच्या वर्गाला कमी लेखतो व त्यांना किंमत न देता प्रत्येक गोष्टीमध्ये ते खालच्या वर्गातील आहेत असे दाखवून देतो.
‘ईगो’  (Ego) म्हणजे नक्की काय?  
उल्हास हरी जोशी

एकदा एक कावळा आपल्या पंजात मांसाचा एक भला मोठ्ठा तुकडा घेऊन उडत चालला होता. त्याचा विचार होता की एखाद्या शांत जागी उतरावे आणि तो मांसाचा तुकडा शांतपणे गट्ट करावा. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की काही गिधाडे त्याच्या मागे लागली आहेत. ती गिधाडे बघुन तो कावळा घाबरला. त्याला वाटले की ती गिधाडे त्याला मारण्यासाठीच त्याच्या मागे लागली आहेत. त्या गिधाडांच्या तावडीतुन सुटण्यासाठी तो कावळा आणखी जोरात आणि आणखी उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला. पण त्याने त्याच्या पंजात धरलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे काही शक्य होईना. कावळ्याची चांगलीच दमछाक झाली. त्याला काही फार उंचावरून उडता येईना. एक गरूड ही गंमत बघत होता. शेवटी तो गरूड पक्षी उडत कावळ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘का रे बाबा! काय भानगड आहे? तु एवढा घामाघुम का झाला आहेस?’
तो कावळा म्हणाला, ‘ हे गरूडा! ही गिधाडे केव्हापासुन माझ्या मागे लागली आहेत. ती माझ्या जिवावर टपली आहेत. त्यांच्यापासुन बचाव करण्यासाठी मी अजुन उंचावरून उडायचा प्रयत्न करतो आहे.’
कावळ्याचे हे बोलणे ऐकुन तो गरूड म्हणाला, ‘ अरे ती गिधाडे तुझ्यामागे नाहीत, तर तुझ्या पंजात असलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे लागली आहेत. तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून उडता पण येत नाही. फेकुन दे तो मांसाचा तुकडा आणि बघ काय होते ते!’
कावळ्याने त्याप्रमाणे केले. त्याने तो मांसाचा तुकडा आपल्या पंजामधुन सोडुन दिला. मागे लागलेली सगळी गिधाडे त्या मांसाच्या तुकड्याकडे गेली. मांसाच्या तुकड्याचे ओझे गेल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने उंच भरारी घेतली.

आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक मांसाचा जड तुकडा आयुष्यभर आपल्या पंजात पकडुन आपण जगत असतो. या मांसाच्या तुकड्याचे नाव आहे ‘ईगो’ (Ego) म्हणजेच ‘मी’ पणा किंवा स्वतःवीषयीच्या काही भ्रामक कल्पना.

प्रत्येकाला ईगो हा असतोच. आपल्याला हरभऱ्याच्या  झाडावर चढवणारे अनेक जण भेटत असतात आणि आपण पण खुशी खुशी हरभऱ्याच्या  झाडावर चढत असतो. आपण कोणीतरी खास आहोत, कुणीतरी स्पेशल आहोत, आपण फार हुषार किंवा बुद्धीमान आहोत, आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते, आपण दादा आहोत, आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असतात. आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, घरण्याची अब्रु अशा नावाखाली अनेक जण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. मग या साठी शत्रुत्व आले तरी चालते, माणसे तुटली तरी चालतात, नातेसंबंध संपुष्टात आले तरी त्याची त्यांना पर्वा नसते. त्यांना त्यांचा ‘ईगो’ नावाचा मांसाचा तुकडाच प्राणप्रीय असतो. मग कितीही गिधाडे मागे लागली तरी त्याची यांना पर्वा नसते. गिधाडे उंच उडुन जातात पण हे मात्र मागेच रहातात. पण ज्यांना ‘ईगो’ नावाचा मांसाचा तुकडा सोडणे जमते तेच उंच भरारी घेऊ शकतात.  

एकदा तरी आपला ईगो बाजुला ठेऊन बघा. विसरून बघा. ईगोपासुन सुटका करून बघा!
बघा काय चमत्कार होतो ते!  
अर्थात असे करायचे की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे
उत्तर लिहिले · 13/10/2018
कर्म · 569245