Topic icon

भारतरत्न

0
भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होते. त्यांना 1954 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. ते एक थोर तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ आणि राजकारणी होते.

इतर पुरस्कार विजेते:

  • चक्रवर्ती राजगोपालाचारी (स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल)
  • डॉ. सी. व्ही. रमण (नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ)

संदर्भ: भारतरत्न - विकिपीडिया

उत्तर लिहिले · 10/8/2025
कर्म · 3000
0
भारतरत्न हा आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
उत्तर लिहिले · 29/10/2021
कर्म · 25850
0
आपल्या देशाचा ----------- हा सार्वभौम नागरिक आहे.
उत्तर लिहिले · 26/1/2023
कर्म · 0
3
🏅 *भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला मिळतात 'या' सुविधा*

*🔰📶महा डिजी । भारतरत्न*

💁‍♂️ भारतामध्ये एखाद्या क्षेत्रात भरीव आणि अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला भारतातील सर्वांत मानाचा आणि सर्वोच्च असा 'भारतरत्न' हा सन्मान दिला जातो. पुरस्कार मिळाल्यानंतर सदरील व्यक्तीला खाली नमूद केलेल्या सुविधा मिळतात.

▪️ *VVIP समकक्ष :* भारतरत्नप्राप्त व्यक्तीला Very Very Important Person (VVIP) अर्थात ‘अति अति महत्वाची व्यक्ती’ असा दर्जा असलेल्या समकक्ष दर्जा दिला जातो.

▪️ *संसदेच्या बैठका/चर्चासत्रात सहभाग :* भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला संसद याठिकाणी होणाऱ्या बैठकांमध्ये तसेच चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत मिळते

▪️ *मोफत रेल्वे/विमानप्रवास :* भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला देशभरात कुठेही रेल्वे आणि एयर इंडिया विमानाच्या प्रथम श्रेणीतून मोफत प्रवास करता येतो.

▪️ *Z सुरक्षा (आवश्यकता असल्यास) :* सरकारकडून भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला आवश्यकता असल्यास Z सुरक्षा पुरवली जाते.

▪️ *विदेश तसेच देशान्तर्गत दौरा :* भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्ती विदेशात गेल्यास तेथील भारतीय दूतावासातर्फे शक्य तितक्या सुविधा पुरवल्या जातात. तसेच भारतातही कुठल्याही राज्यात सदरील पुरस्कारप्राप्त व्यक्ती गेल्यास त्या राज्यातील अतिथिगृहाची मोफत सुविधा सदरील व्यक्तींसाठी ते राज्य सरकार देते.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 26/8/2020
कर्म · 569245
5
आतापर्यंत दोन परदेशी व्यक्तींना देण्यात आला आहे १) खान अब्दुल गफार खान (१९८७) २) नेल्सन मंडेला (१९९०)
उत्तर लिहिले · 14/1/2020
कर्म · 16430
5
◆ भारतरत्न पुरस्कार:-
●  हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो
● सुरुवात :- १९५४
● पुरस्कराचे स्वरूप:-
पुरस्कार म्हणून देणार ताम्रपट पिंपळाच्या पानाच्या आकाराचे तांबे वापरून बनविण्यात आलेले असते .ते ५.८ सें.मी. लांबीचे, ४.७ सें.मी. रूंदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे बनविलेले असते.सूर्याच्या चिन्हासह
भारतरत्न असे लिहिलेले असते .त्याच्या पाठीमागील बाजूस अशोक स्तंभ आहे. व त्याला लागून सत्यमेव जयते असा संदेश लिहिलेला आहे.हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जाते.
● नियमात बदल:-
२०११ पर्यंत हा पुरस्कार फक्त कला,साहित्य,विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्याना दिला जात होता.डिसेंबर २०११ मध्ये हा पुरस्कार प्रदान करणाऱ्यासाठी च्या नियमात बदल करण्यात आला.आता हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील कामगिरीसाठी मर्यादित राहिला नाही. कोणत्याही क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो.
● १९७७ ते १९८० च्या दरम्यान या पुरस्कारावर बंदी घालण्यात आली होती.
● १९९२ मध्ये सुभाषचंद्र बोस यांना जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार त्यांच्या नातेवाईकानी नाकारला
● १९९९ मध्ये सर्वाधिक चार व्यक्तीना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला होता
● आतापर्यंत ४८ व्यक्तीना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे
● भारतरत्न पुरस्काराचे प्रथम विजेते (१९५४)
१) सी.राजगोपालचारी २) सर्वपल्ली राधाकृष्ण ३) सी.व्ही.रामन
● आत्तापर्यंत खान अब्दुल गफारखान(पाकिस्तान ) १९८७ व नेल्सन मंडेला (दक्षिण आफ्रिका )१९९० मध्ये या दोन परदेशी व्यक्तीना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
● भारतरत्न पुरस्कार मिळविणारी सर्वात तरुण व्यक्ती :- सचिन तेंडुलकर (२०१३ मध्ये ४० व्या वर्षी)
● हा पुरस्कार आत्तापर्यंत पाच महिलांना मिळाला आहे
१) इंदिरा गांधी २) मदर तेरेसा ३) अरुणा असफअली
४) एम.एस.सुब्बलक्ष्मी ४) लता मंगेशकर
● हा पुरस्कार आत्तापर्यंत ७ पंतप्रधानाना मिळाला
१) पंडीत नेहरू २) लालबहादूर शास्री ३) इंदिरा गांधी
४) मोरारजी देसाई ५) गुलझारीलाल नंदा ६) राजीव गांधी
७) अटलबिहारी वाजपई
● हा पुरस्कार आत्तापर्यंत ६ राष्ट्रपतीना मिळाला
१) डॉ.राजेद्रप्रसाद २)झाकीर हुसेन ३) व्ही.व्ही,गिरी
४) सर्वपल्ली राधाकृष्ण ५) अब्दुल कलाम ६) प्रणव मुखर्जी
●  आतापर्यंत सर्वाधिक भारतरत्न महाराष्ट्र (९),उत्तरप्रदेश (८) तामिळनाडू (७) मधील व्यक्तीना मिळाला
● आत्तापर्यंत 15 व्यक्तीना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे
● नोबेल पुरस्कार प्राप्त भारतरत्न मिळविणाऱ्या व्यक्ते
१) सी.व्ही.रमण २) मदर तेरेसा
३) नेल्सन मंडेला ४) अमर्त्य सेन
● आतापर्यंत महाराष्ट्रातील ९ व्यक्तीना भारतरत्न पुरस्कार प्राप्त
१) महर्षी कर्वे २) पाडुरंग काणे ३) विनोबा भावे
४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर ५) जे.आर.डी.टाटा ६) लतामंगेशकर
७) भीमसेन जोशी ८) सचिन तेंडुलकर ९) नानाजी देशमुख

◆ भारतरत्न'चे सन्मानार्थी
१. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन -१९५४
२. सी राजगोपालचारी - १९५४
३. डॉ. सीव्ही रमण - १९५४
४. डॉ. भगवान दास - १९५५
५. डॉ. एम विश्वेश्वरय्या - १९५५
६. पं. जवाहरलाल नेहरु - १९५५
७. गोविंद वल्लभ पंत - १९५७
८. डॉ. धोंडो केशव कर्वे - १९५८
९. डॉ. बिधान चंद्र रॉय - १९६१
१०. पुरुषोत्तम दास टंडन - १९६१
११. डॉ. राजेंद्र प्रसाद - १९६२
१२. डॉ. झाकिर हुसेन - १९६३
१३. डॉ. पांडुरंग वामन काणे - १९६३
१४. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - १९६६
१५. इंदिरा गांधी - १९७१
१६. वराहगिरी वेंकट गिरी - १९७५
१७. के. कामराज (मरणोत्तर) - १९७६
१८. मदर तेरेसा - १९८०
१९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) -१९८३
२०. खान अब्दुल गफार खान -१९८७
२१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - १९८८
२२. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - १९९०
२३. नेल्सन मंडेला -१९९०
२४. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - १९९१
२५. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - १९९१
२६. मोरारजी देसाई - १९९१
२७. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - १९९२
२८. जे. आर. डी. टाटा - १९९२
२९. सत्यजित रे - १९९२
३०. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - १९९७
३१. गुलझारीलाल नंदा -१९९७
३२. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - १९९७
३३. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - १९९८
३४. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् - १९९८
३५. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - १९९९
३६. रवी शंकर - १९९९
३७. अमर्त्य सेन -१९९९
३८. गोपीनाथ बोरडोलोई‎ (मरणोत्तर) - १९९९
३९. लता मंगेशकर - २००१
४०. बिसमिल्ला खान - २००१
४१. भीमसेन जोशी - २००८
४२. सी.एन.आर.राव - २०१४
४३. सचिन तेंडुलकर - २०१४
४४. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - २०१५
४५. अटलबिहारी वाजपेयी - २०१५
४६. प्रणव मुखर्जी - २०१९
४७. नानाजी देशमुख (मरणोत्तर) - २०१९
४८. भूपेन हजारिका(मरणोत्तर) - २०१९ *स्पर्धा परीक्षा ग्रुप ऑडमिन*
*1)उमेश श्रीखंडे*
*2)सविता भूमे मॅडम*
*3)पूजा दाभाडे मॅडम*
*4)नम्रता मॅडम*
============================                 
                      *संकलन*
                 आर.एम.डोईफोडे
                   शिक्षण अधिकारी
डाॅ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे
=============================
उत्तर लिहिले · 7/4/2019
कर्म · 16010
0

भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी अगोदर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला असणे आवश्यक नाही. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.

पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. अनेक व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार त्यांच्या पद्मविभूषण किंवा इतर पद्म पुरस्कारांनंतर मिळाला आहे, पण हे आवश्यक नाही. काही व्यक्तींना थेट भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे, त्यांना यापूर्वी कोणतेही पद्म पुरस्कार मिळालेले नव्हते.

या संदर्भात अधिक माहितीसाठी, आपण खालील सरकारी संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 3000