Topic icon

भारतीय स्वातंत्र्य

0
15 ऑगस्ट 1956
उत्तर लिहिले · 24/12/2025
कर्म · 0
4
🇮🇳 *15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य का? तारीख, वेळेमागील इतिहास.*

🔰📶 *महा डिजी I स्वातंत्र्यदिन विशेष*

👍 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाची ही तारीख आणि वेळ अचानक ठरलेली नाही. या तारखेमागे आणि वेळेमागेदेखील इतिहास आहे.

✋ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी 1929 साली ब्रिटिश सरकारपासून पूर्णपणे स्वंत्रतेची मागणी केली आणि 26 जानेवारीला स्वांत्र्यदिन साजरा करण्याती घोषणा केली. 1930 नंतरदेखील हा दिवस स्वतंत्रता दिन म्हणून साजराही करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिन होऊ शकला नाही. मग 1950 साली याच दिवशी भारताचं संविधान लागू झालं म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मानला गेला.

📦 1945 साली दुसऱ्या जागतिक युद्धात ब्रिटनची आर्थिक स्थिती खराब झाली होती आणि राजकीय संकटही होतं. 1945 साली झालेल्या मतदानात ब्रिटनची लेबर पार्टी विजयी झाली. लेबर पार्टीने आपलं सरकार बनलं तर ब्रिटिश राजवटीतील देशांना मुक्त केलं जाईल, असं आश्वासन दिलं होतं आणि लेबर पार्टीचं सरकार येतात भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली.

🤝 भारताला हक्क सुपूर्द करण्यासाठी फेब्रुवारी 1947 साली माऊंटबेटन यांची नियुक्ती करण्यात आली. भारताला आपल्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी माऊंटबेटन यांनी एक मसूदा तयार केला.  30 जून 1948 ला सर्व हक्क भारताला सुपूर्द करणार असं या मसुद्यात नमूद होतं. मात्र भारतीय नेत्यांचं यावर एकमत झालं नाही.  त्यांनी जून 1948 ही तारीख ठरवली ज्याला विरोध झाला आणि मग 1947 हेच वर्ष ठरलं.

👌 जून 1947 ठरलं की भारताला ऑगस्टपर्यंत स्वतंत्र करायचं. माऊंटबेटन यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. या तारखेबाबत माऊंटबेटन म्हणाले, 15 ऑगस्ट हीच तारीख ठरवली कारण याचदिवशी दुसरं महायुद्ध संपताना जपानने आत्मसमर्पण केलं होतं. माऊंटबेटन या तारखेला आपल्यासाठी शुभ मानत होते. तर दुसरीकडे भारतातील ज्योतिष तज्ज्ञ या तारखेला भारतासाठी अशुभ मानत होतं. त्यांनी दुसरी तारीख दिली मात्र माऊंटबेटन आपल्या निर्णयावर ठाम होते.

🟠 *मध्यरात्रीच स्वातंत्र्य देण्याचं का ठरलं?* - ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, 15 ऑगस्ट  तारीख भारतासाठी शुभ नव्हती. त्यामुळे एक शुभे वेळ काढण्यात आली. 14  ऑगस्ट 1947 रात्री 11.51 ते रात्री 12 .39 ही वेळ शुभ होती. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री 12 नंतर 15 ऑगस्ट सुरू होतो. मात्र भारतीय पद्धतीनुसार सूर्योदयानुसार तारीख बदलते. त्यामुळे मध्यरात्री 12 ही वेळ निश्चित झाली.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 15/8/2020
कर्म · 569265
1
माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै, 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. 15 ऑगस्ट, 1947 रोजी भारताचे विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील, त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच अधिकार राहणार नाही, अशी तरतूद या कायद्याने केली.
उत्तर लिहिले · 8/12/2019
कर्म · 30
6
*_🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा  🇮🇳_*                  
*_🌠 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव,, ता.हातकणगले.जि.कोल्हापूर_*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=572969879767606&id=100011637976439
..- ._.--.
      '-.,    .'
      _-'  I  '-._    _.._
._.-.'   ❤      ' -'  .-'
'._/| *INDIA*     ''. ;'-
     '.              /
       '.         .'
         \    /
            ' '
_*🇮🇳Independence Day 2019 : ब्रिटीशांनी स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला?    🇮🇳*_

*_तारीख  १५ ऑगस्ट  २०१९_*
      *_वेळ स. 10.51     वाजता_*

नवी दिल्ली : भारत आपला ७३वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला
भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. पण देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली.
*माऊंटबॅटन यांना दिला होता अधिकार*
जेव्हा इंग्रजानी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेही ठरवले की, लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाइसरॉय असतील. ब्रिटीश संसदेने त्यांना ३० जून १९४८ पर्यंत भारताची सत्ता भारतातील लोकांना हस्तांतरित करण्याचा वेळ दिला होता. खरंतर या दिवशीच स्वातंत्र्य का दिले गेले याबाबत अनेक मतमतांतरे बघायला मिळतात.
*नेहरु आणि जिना वाद*
एकीकडे महात्मा गांधी भारत छोडो आंदोलन होतं आणि दुसरीकडे फाळणीवरुन गांधी आणि जिना यांच्यात वाद होते. या दोन कारणांमुळे माऊंटबॅटन यांच्यावरील सत्ता हस्तांतरणाचा दबाव वाढू लागला होता. त्यामुळे त्यांनी आणखी एक वर्ष वाट पाहण्याऐवजी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य बहाल केलं. १५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यामागे हेही एक कारण मानलं जातं.
*या तारखेला मिळणार होते स्वातंत्र्य*
माऊंटबॅटन हे भारतात आल्यानंतर स्वातंत्र्याबाबत अनेक बदल केले गेले. त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची तारीख ३ जून १९४८ ठरवली होती. पण ही तारीख बदलून त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ केली. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय मानला जातो.
*यासाठीही १५ ऑगस्ट दिवस खास*
लॉर्ड माऊंटबॅटन हे १५ ऑगस्टला यासाठीही महत्वाचा दिवस मानत होते, कारण याच दिवशी १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जपानने ब्रिटीश सेनेसमोर शरणागती पत्करली होती.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाची पोस्ट,माऊंटबॅटन यांना ही तारीख यासाठी अधिक लक्षात होती कारण ते त्यावेळी अलायस फोर्सेसचे कमांडर होते.
लॅरी कॉलिंग आणि डोमिनिक लॅपिअर यांच्या 'फ्रिडम अॅट मिड नाइट' या पुस्तकात माऊंटबॅटन यांनी ही तारीख का निवडली याचं कारण सांगितलं आहे. व्हाइसरॉय यांच्यानुसार, 'एका प्रश्नाचं उत्तर देताना मी १५ ऑगस्ट हा दिवस निवडला. मला लोकांना हे दाखवायचे होते की, सगळंकाही माझ्या नियंत्रणात आहे. मला विचारण्यात आले होते की, कोणती तारीख निश्चित केली आहे. त्यावेळी माझ्या डोक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना आला होता. त्यानंतर मी १५ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. याच तारखेला द्वितीय महायुद्धात जपानने ब्रिटीश सेनेसमोर समर्पण केलं होतं'.
*भारत-पाकिस्तान फाळणी*
स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच देशाचे दोन तुकडे करण्यात आले. फाळणीसोबतच भारतातील ५०० पेक्षा जास्त संस्थांनांचंही विभाजन केलं जाणार होतं. ब्रिटीश सरकारने या संस्थानांच्या राजांना संदेश दिला होता की, ते त्यांच्या मतानुसार भारत किंवा पाकिस्तानात जाणे ठरवू शकता.
*इंग्रजांना होती जिनांच्या मृत्यूची भीती*
काही इतिहासकारांचं असं मत आहे की, इंग्रजांनी जिना यांच्या आधारे भारताची फाळणी करण्याचा कट रचला होता. जेणेकरुन दोन्ही देश हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरुन भांडत राहतील. त्यावेळी इंग्रजांना जिना यांच्या आजाराबाबत माहिती मिळाली होती. त्यांना भीती होती की, जर जिना यांचा मृत्यू स्वातंत्र्याच्या घोषणेच्याआधी झाला तर महात्मा गांधी मुस्लिमांना विभाजनाचा रस्ता न निवडण्यासाठी तयार करतील. त्याच कारणाने इंग्रजांनी ३ जून १९४८ ऐवजी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य बहाल केले. नंतर तेच झालं ज्याची इंग्रजांना भीती होती. स्वातंत्र्याच्या काही महिन्यातच टीबी या आजारामुळे मोहम्मद अली जिना यांचा मृत्यू झाला.
*_✍🏼संकलन_*

6
गांधीजींचा मार्ग तुम्हाला आवडो वा ना आवडो, त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान कुणीही नाकारू शकत नाही.  त्यांचा अहिंसेचा मार्ग एवढा लोकांना आपलंसा वाटला की  स्वातंत्र्य चळवळीत तळागाळातील लोक सामील झाले. मिठाचा सत्याग्रह , चंपारण मधील शेतमजुरांचा लढा यासारखे प्रश्न हाती घेऊन त्यांनी स्वातंत्रलढयाची नाळ सर्वसामान्यांपर्यंत जोडली. याच तत्वावर पुढे मंडेला , मार्टिन ल्युथर यांनी आपला लढा उभारला. एक काळ असा होता की गांधीजींचा देश म्हणजे भारत ही आपली जगात ओळख होती.
पण गांधीजी नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालाच नसत किंवा उशिरा मिळालं असत किंवा फारच आधी मिळालं असतं अस म्हणणं चूक आहे. अहिंसेचा विचार न पटणारे हजारो तरुण मातृभू साठी आपलं रक्त सांडायला तयार होते, त्यांची संख्या नक्कीच वाढली असती. आणि पाठ्यपुस्तकातील क्रांतीकारकांना दुय्यम स्थान मिळाले नसते
१९३० च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहरूंना हरवून सुभाष बाबू निवडून आले हॊते, पण गांधीजींना नेहरू अधिक जवळचे वाटत असल्याने त्यांनी सुभाष बाबूंना राजीनामा द्यायला लावला. माझ्यामते ही घटना काँग्रेसची धोरणे आणि त्यानंतरच्या इतिहासावर खुप परिणाम करणारी ठरावी. कदाचित पाहिले पंतप्रधान म्हणून नेहरू पुढे ही आले नसते. सुभाषबाबुनी आपला लढा भरतातूनच चालवला असता आणि त्या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू ही झाला नसता. (याचा अर्थ गांधीजी त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत असा अजिबात होत नाही).
गांधीजी नसते तर पाकिस्तानची निर्मिती ही झाली नसती असं म्हणणं ही चुकीच आहे. परंतु गांधीजींनी दंगलग्रस्त भागाचा दौरा करून जी हिंसा थांबवली तस कुणाला कदाचित करता आलं नसतं.
राजकारणात चालू राहिलेलं धार्मिक जातीय तुष्टीकरण ही कदाचित झालं नसतं. गांधीजींचं नाव घेऊन लबाडीच राजकारण करणारे पुढारीसुद्धा आले नसते
या सगळया झाल्या जर तर च्या गोष्टी. नक्की काय झालं असत हे नियतीच जाणे.
गांधीजींची कधी दलित विरोधी, हिंदू विरोधी , मुस्लिम विरोधी अशी प्रतिमा रंगविण्यात येते, अत्यंत चुकीच्या पद्धतीने टीकाही होते, हे मात्र नक्कीच चुकीच आहे.
उत्तर लिहिले · 14/5/2018
कर्म · 99520