Topic icon

राजकीय व्यक्ती

3
महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारसणीचा पुरस्कृता राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत संतांच्या शिकवणूकीचा मोठा परिणाम आढळून येतो. समाजप्रबोधन करणार्‍या संतांनी जातीय विषमता यांवर नेहमीच आघात केला आहे. मागील सरकारने पुरोगामी विचारसरणीला बाजूला सारुन महाराष्ट्र मोडकडीस आणण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले. सत्ताधार्‍यांवर रिमोट चालवणारे हे विशिष्ट विचारणीचे व महाराष्ट्राचे हित जोपासणारे नसल्याचे महाराष्ट्राची प्रत्येक क्षेत्रात अधोगती झाली होती. जनतेतून याविषयी राग होता मात्र मतपेटीतून तो का व्यक्त होत नव्हता हे न उलगडणारे कोडे आहे. असो, महाराष्ट्राच्या अस्मितेला पोहचणारी हानी थांबविण्यासाठी व खोट्या पक्षाला ..सत्य.. काय असते हे दाखविणारे उद्धव ठाकरे प्रगल्भ ठरले. मित्रत्वाच्या नात्यातून युतीकरून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न होतोय हे त्यांनी वेळीच ओळखून शिवसेना मजबूत करण्यासाठी घेतलेला निर्णय महाराष्ट्राला सुखद होता. प्रादेशिक अस्मिता जपणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांसमवेत महाविकास आघाडी साधत उद्धव ठाकरेंनी राज्यात नवीन सरकारची मोठ बांधली. २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देवून शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला. दिलेला शब्द त्यांनी पाळल्यामुळे शेतकरी या आघाडी सरकारकडून मोठ्या अपेक्षेने बघत आहे. भाजप सरकारने एकतर्फी निर्णय घेत मुंबईतील अनेक उद्योग गुजरातकडे वर्ग केले. सराफाबाजार, कपडाबाजार, जेएनपीटी बंदर, हिरे व्यापार तसेच अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला दक्षणा म्हणून देण्यात आले. बुलेट ट्रेनच्यामाध्यमातून होणारा अन्याय महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावा लागत होता. शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना घालण्यात आलेल्या जाचक अटीमुळे शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली नाही. अनेक शेतकरी जाचक अटींची पूर्तता करू शकत नव्हता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा भ्रमनिरास झाला होता. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने महाविकास आघाडी सरकारच्या निमित्ताने राज्याचा गाडा हाकायला सुरूवात केली आहे. पहिलाच निर्णय शेतकर्‍यांच्या अनेक अडचणी सोडविणारा आहे. जाणता राजा शरद पवार खुद्द या सरकारला मार्गदर्शन करत असल्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता टिकून राहणार यात तिळ मात्र शंका नाही. येत्या काळात सरकारी नोकर्‍यांची दारे बेरोजगार सुशिक्षित तरुणांसाठी उघडी करून राज्यात महानोकर भरती अपेक्षित आहे. तसेच जेएनपीटी व कपडा व्यापार परत गुजरातहून महाराष्ट्रात स्थलांतर करण्यासंदर्भात पाठपुरावा आवश्यक आहे. महाराष्ट्रातील थांबलेली प्रगती पुन्हा नव्या दम्याने सुरू करण्यासाठी विकासकामांचा सपाटा लावला लागणार आहे. जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी साचेबद्ध विकास आराखड्याची आवश्यकता आहे. मुरब्बी राजकारणी, अनुभवी नेतृत्व, कणखर भूमिका यांमुळे हे महाविकास आघाडी सरकार राज्यातील नागरिकांच्या आकांक्षा पूर्णत्वास नेईल अशी अपेक्षा आहे.
उत्तर लिहिले · 2/7/2020
कर्म · 6980
0

2019 मध्ये भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) मध्ये सामील झालेले काही आमदार आणि खासदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:


आमदार:


खासदार:


हे काही प्रमुख नेते आहेत ज्यांनी 2019 मध्ये पक्ष बदलले. आणखी काही नावे असू शकतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2380
0

फेकू हे नाव भारतीय राजकारणी व्यक्ती नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावर विरोधक आणि काही लोकांकडून उपहासाने दिले जाते.

नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2380
0
मी तुमच्या प्रश्नाची थेट उत्तरे देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे ह्या क्षणाची माहिती नाही. तुम्ही चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून किंवा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2380
1
रावसाहेब दानवे पाटील हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आहेत.
उत्तर लिहिले · 3/11/2018
कर्म · 2750
0
प्रश्न समजला नाही व्यवस्थित विचारा आपल्याला काय माहिती हवी आहे

कारण बाबाजी काठोले नावाची कोणी व्यक्ती माझ्या मते तरी BJP मध्ये नाही
उत्तर लिहिले · 15/5/2018
कर्म · 20065
0

चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष (महिला) म्हणून कार्यरत आहेत.

आमदार आहेत का? नाही, चित्रा वाघ आमदार नाहीत.

त्या काय आहेत? चित्रा वाघ या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि त्यांनी अनेक सामाजिक मुद्दे उचलून धरले आहेत.

मतदारसंघ: चित्रा वाघ ह्या विधान परिषद किंवा विधानसभेच्या सदस्य नाहीत त्यामुळे त्यांचा कोणताही मतदारसंघ नाही.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2380