Topic icon

उपजीविका

0
निश्चितच! प्रदेशानुसार आणि गरजेनुसार उपजीविकेच्या साधनांमध्ये फरक पडतो.
प्रदेशानुसार फरक:
  • भौगोलिक परिस्थिती: पर्वतीय प्रदेशात शेती करणे कठीण असल्याने तेथील लोक पशुपालन, पर्यटन, किंवा वनोपजावर अवलंबून असतात. याउलट, मैदानी प्रदेशात सुपीक जमीन असल्याने शेती हा प्रमुख व्यवसाय असतो.
  • हवामान: वाळवंटी प्रदेशात पाण्याची कमतरता असल्यामुळे तेथे उंटपालन, खजूर उत्पादन यांसारखे व्यवसाय केले जातात. जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात भातशेती किंवा मासेमारी केली जाते.
  • नैसर्गिक साधनसंपत्ती: ज्या प्रदेशात खनिज तेल, कोळसा, किंवा इतर खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, तेथे खाणकाम आणि तत्सम उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात.
गरजेनुसार फरक:
  • शहरी आणि ग्रामीण भाग: शहरांमध्ये नोकरीच्या संधी जास्त असल्याने बहुतेक लोक विविध उद्योगांमध्ये काम करतात, तर ग्रामीण भागात शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय अधिक प्रमाणात केले जातात.
  • शिक्षण आणि कौशल्ये: उच्च शिक्षण घेतलेले लोक तांत्रिक किंवा व्यवस्थापकीय नोकऱ्यांमध्ये काम करतात, तर कमी शिक्षण असलेले लोक शारीरिक श्रमावर आधारित कामे करतात.
  • सामाजिक आणि सांस्कृतिक घटक: काही विशिष्ट समाजांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेले व्यवसाय केले जातात. उदाहरणार्थ, काही ठिकाणी विशिष्ट जातीचे लोक विशिष्ट प्रकारचे हस्तकला व्यवसाय करतात.
उदाहरण:
  • महाराष्ट्र: महाराष्ट्रात मुंबई हे मोठे शहर असल्यामुळे येथे अनेक उद्योग आणि व्यवसायाच्या संधी आहेत.
  • कोकण: कोकणात नारळ आणि मासेमारी हे उपजीविकेचे प्रमुख साधन आहे.
  • विदर्भ: विदर्भात कापूस आणि सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणावर होते.
यावरून हे स्पष्ट होते की प्रदेशानुसार आणि गरजेनुसार उपजीविकेच्या साधनांमध्ये बदल होतो.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440
2
पुण्यात मेसचा दर ठीकठिकाणी वेगवेगळा आहे. मी जिथे राहतो तिथे महिन्याला २५०० रु प्रति महिना असा दर आहे... 😕😕😕😕
उत्तर लिहिले · 18/8/2019
कर्म · 1650
9
ह्या दोन्ही संज्ञा आपल्याला सारख्याच वाटतात परंतू ह्यांच्यात फरक आहे.

लॉजिंग ही सेवा व्यक्तिंना थांबण्यासाठी, एक ठराविक काळ राहण्यासाठी दिली जाते. जसे पर्यटक झाले, प्रवासी झाले ज्यांना आरामासाठी, विश्रांतीसाठी शांत रुम गरजेचा असतो अशा वेळेला ते लॉज वापरतात. लॉजिंग सेवा आपलं लक्ष प्रामुख्याने "थांबण्यासाठी" असा ठेवते.

बोर्डींग हा थोडा मोठा स्तर झाला लॉजिंगपेक्षा. बोर्डींग सेवेत आपल्याला थांबता तर येतच पण अजुन बाकीच्या सुविधा पण मिळतात. जसे रुमवर बसल्या बसल्या जेवण, दुरध्वनी, आंघोळी साठी गरम किंवा गार पाणि, टिव्ही, एसी इत्यादी.

थोडक्यात लॉजिंग हा बोर्डींगचा एक भाग झाला.

लॉजिंग कमी वेळेसाठी उपयुक्त असते जसे ४-५ तासा साठीच राहायचं आहे, फक्त १ किंवा २ रात्रच राहायच आहे. बोर्डींग जास्त काळासाठी असते जसे १ आठवडा, ४-५ दिवस. ऐवढा वेळ थांबा असेल तर नक्कीच जेवण, टिव्ही, एसी हॉटेल्समध्ये देतात.
उत्तर लिहिले · 6/12/2018
कर्म · 75305
12
शिक्षित असलेले तरुणाई देखील बेरोजगार आहेतच... अशिक्षित असो वा सुशिक्षित... आजच्या तरुणाई ने व्यवसाय करावा... व्यवसाय कोणता करावा?... हे त्या व्यक्तिवर आणि त्याच्या राहण्याच्या ठिकानावर अवलंबून असते... आपण राहतो त्या ठिकाणी, शहरात अधिक मागणी कोणत्या वस्तु साठी असते, कोणत्या वस्तु अधिक विकल्या जातात...
व्यवसाय कोणताही असो ..., हा शून्य पैशात उभा करता येत नाही... पण साठवनी, जमा केलेले , पैसे व्यवसायसाठी लावू शकता... तत्पूर्वी व्यवसाय बाबतीत सखोल अभ्यास करणे गरजेचे ठरते...
आपल्या गावातील शेती मध्ये जर आपण विकास केला तर भरपूर नफा मिळू शकतो...
जीवनात करण्यासारखे खुप काय असते...?
पण विचार करण्या आधीच नकारात्मक दृष्टीने जेव्हा पाहतो तेव्हा चांगले विचार सुद्धा दुरावतो.., सकारात्मक दृष्टी आत्मसात करा... त्याला कोणते पैसे द्यावे नाही लागत...
जर परिक्षेला बसलेला विद्यार्थी हा फक्त ५०% काढणारा असेल आणि त्याने सकारत्मकतेने विचार केला की मला १००% मिळणार... १००% मिळणार नाहित परंतु मला भेटतील असा दृढ़ विश्वास ठेवून आनंदी राहिला तर त्याला किमान ७१% मिळाले... हे सुद्धा त्यांच्यासाठी अनपेक्षित होतेच की...!
अश्या प्रकारे तुम्ही सकारात्मक रहा... कारण सकारत्मक मुळे आपल्याला चांगले करण्याची ऊर्जा मिळते...
धन्यवाद...!
उत्तर लिहिले · 1/3/2018
कर्म · 458560
0
http://mr.vikaspedia.in/agriculture/fisheries
या लिंक वरती सर्व माहिती मिळेल
उत्तर लिहिले · 13/10/2017
कर्म · 5