Topic icon

प्रसूतीनंतरची काळजी

3
गरोदरपणाचा काळ हा संपूर्णपणे स्त्रीलाच सहन करायचा असला तरी या काळात तिच्या नवऱ्याची सोबत आणि साथ तिला मिळणे खूप गरजेचे असते. या काळात जसे अनेक शारीरिक बदल होत असतात तसेच अनेक मानसिक बदलही होत असतात. शारीरिक बदल हे विविध उपाय करून ठीक केले जातात, पण मानसिक बदल जेव्हा जाणवू लागतात तेव्हा स्त्रीला प्रकर्षाने आपल्या आवडत्या व्यक्तीची आठवण येते. तो व्यक्ती म्हणजे नवरा होय. जर नवरा सोबत असेल तर स्त्री सर्व त्रास सहन करू शकते.

एकंदर पाहता या काळात नवऱ्याने आपल्या गरोदर बायकोची शक्य तितकी काळजी घेणे गरजेचे ठरते. गरोदरपणाच्या काळात नवऱ्याच्या आपल्या बायकोप्रती काही जबाबदाऱ्या असतात आणि त्या प्रत्येक नवऱ्याने पूर्ण करायलाच हव्यात. आज याच लेखातून आम्ही त्या जबाबदाऱ्या नेमक्या कोणत्या आहेत आणि कोणत्या प्रसंगी तुमच्या बायकोला तुमची सर्वाधिक गरज भासते ते सांगणार आहोत.
घरकामे



सध्या स्वत:चा वेगळा संसार थाटण्याचे युग आहे. सर्वच नसले तरी 80% कपल्स हे स्वत:चा वेगळा संसार थाटण्याला प्राधान्य देतात. जेव्हा वेगळा संसार थाटला जातो तेव्हा साहजिकच तो दोघांचा असतो. मदतीला कोणी तिसरी व्यक्ती नसते. कधी कधी अनेक कपल्सना हा गरोदरपणाचा काळ दोघांनाच सावरून घ्यावा लागतो, अशावेळी नवऱ्याची जबाबदारी असते कि त्याने घराची जबाबदारी पुढचे काही महिने स्वत:च्या अंगावर घेऊन आपल्या गरोदर बायकोला शक्य तितका आराम देणे. जेव्हा ती शक्य तितका आराम करेल तेव्हाच ती स्वस्थ आणि निरोगी राहील.



आठवणी जपून ठेवणे



पहिलं बाळंतपण किंवा गरोदरपणाचा काळ हा कोणत्याही स्त्रीसाठी अगदी खास असतो आणि हा काळ अधिक खास व अविस्मरणीय बनवण्याची जबाबदारी हि नवऱ्याची असते. याशिवाय गरोदरपणानंतर आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीचं आगमन होणारं असतं. दोघांचं जग संपून त्यात अजून एक व्यक्ती येणार असतो. त्यामुळे जोवर वेळ आहे तोवर एकांतपण आणि दोघांचं जग कपल्सने पुरेपूर उपभोगणं आणि आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवण्यासाठी त्या सर्व आठवणी जपून ठेवणे हि मुळातच एक आगळीवेगळी गोष्ट आहे. उद्या म्हातारे झाल्यावर या सर्व आठवणीच चेहऱ्यावर गोड हसू फुलवतील.


मानसिक आधार



हे प्रत्येक नवऱ्याचे आद्यकर्तव्यच असते असे म्हटले तरी वावगे ठरू नये. हा काळच अतिशय नाजूक असतो आणि या काळात आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे स्त्रीमध्ये अनेक मानसिक बदल होत असतात. अशावेळी नवऱ्याने तिला शांत करणे, तिला पाठींबा देणे, तिला राग आला असले तर तिचा राग सहन करणे या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. अतिशय कुशलपणे तिचा बदललेला मूड सांभाळण्याचे कौशल्य नवऱ्याला यायला हवे. सतत सकारात्मक गोष्टी करणे, तिला आनंदी कसे ठेवता येईल याचा विचार करणे आणि त्यासाठी झटत राहणे यांसारख्या गोष्टी तिचे मन सांभाळण्यासाठी नवऱ्याने आवर्जून कराव्यात.



डोहाळे पुरवणे
हि जबाबदारी तर तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको. गरोदरपणा म्हटले की डोहाळे आलेच आणि हे डोहाळे पूर्ण करण्याची जबाबदरी प्रामुख्याने नवऱ्याचीच असते. डोहाळे म्हणजे एक प्रकारचे गरोदरपणामुळे होणारे शारीरिक बदल असतात. त्यात स्त्रीचा काही दोष नसतो. त्यामुळे तिचे प्रत्येक डोहाळे पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नवऱ्याने आवर्जून करावा. यातून तिचा हट्ट तर पूर्ण होईलच, पण तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता ते सुद्धा दिसून येईल. डोहाळे पूर्ण झाल्याने आई आणि बाळ दोघे खुश असतात हे विशेष!



रागावर नियंत्रण
गरोदरपणाचा काळ हा मोठा म्हणजेच तब्बल 9 महिन्यांचा असतो. एवढ्या काळात कुठे न कुठे असे प्रसंग येऊ शकतात जिथे नवऱ्याला राग अनावर होऊ शकतो. पण शक्यतो नवरे मंडळींनी हा राग नियंत्रणात ठेवावा. कितीही ताण असेल, तणाव असले तर तो घराबाहेर सोडावा आणि गरोदर पत्नीसमोर आनंदी राहून तिच्या भोवतालीचे वातावरण चांगले व सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा. या काळात झालेली भांडणे गरोदर स्त्री साठी योग्य नाहीत व त्याचा वाईट परिणाम बाळावर सुद्धा होऊ शकतो.


उत्तर लिहिले · 26/11/2021
कर्म · 121765
8
आज केस गळणे ही सामान्य समस्या बनली आहे.ही समस्या कोणत्याही वयात उद्भवू शकते.ही समस्या दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध असतील तरीही ही समस्या दूर होत नाही.या प्रोडक्ट्सचे साइड इफेस्ट होण्याची शक्यता सुध्दा असते.यासाठी काही घरगुती उपाय करणे योग्य ठरते.यासाठी कांदा एक उत्तम पर्याय आहे.
कांदा केसांसाठी नॅचरल कंडिशनर प्रमाणे काम करतो.याच्या नियमित वापराने केसांना चमक येते.कांद्यामध्ये परिपुर्ण प्रमाणात सल्फर असते जे ब्लड सर्कुलेशनला वाढवण्याचे काम करते.यासोबतच कोलोजनसुध्दा सकारात्मक रुपात प्रभावित होते.कोलेजन हे केसांच्या वाढीसाठी जबाबदार कारक आहे.कांद्याचा रस केसांना मजबूती देण्याचे काम करतो.कांद्याचा रस कोंडा दूर करण्यासाठी फायदेशीर असतो.आज आपण केसांसाठी कांद्याचा वापर कसा करावा हे जाणुन घेणार आहोत.

1.कांद्याचा रस आणि मध
जर तुम्हाला केस गळती आणि कोंड्यांची समस्या असेल तर तुम्ही कांद्याच्या रस आणि मध लावणे फायद्याचे असते.हे कोंड्याची समस्या दूर करण्यासोबतच केसांच्या ग्रोथसाठी फायदेशीर असते.कांद्याचा रस आणि मध समान प्रमाणात घेऊन चांगल्या प्रकारे एकत्र करा.हे मिश्रण एक तास तसेच राहू द्या.यानंतर चांगल्या प्रकारे आपल्या कौटीवर लावा.काही वेळानंतर केसांना कोमट पाण्याने धुवून घ्या.
उत्तर लिहिले · 25/8/2017
कर्म · 1210