Topic icon

रक्षाबंधन

0




रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन!

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.

स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.

रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.

बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.




भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्‍या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते.

बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते.

देवासुर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती, असे वेदात सां‍गितले आहे. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूँला राखी पाठवली होती. या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती.

रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते.

'' स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील.

समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

उत्तर लिहिले · 30/8/2023
कर्म · 53710
6



नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.  हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. हा राजस्थानचा प्रमुख सण आहे  या पौर्णिमेला 'पोवती पौर्णिमा' असेही म्हणतात.
कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात
तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले..
भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधावीच; पण तसा भाऊ नेसल तर नात्यांनी असलेल्या भावाला राखी बांधावी.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.

शुभ रक्षाबंधन
सण आजचा वर्षांचा,
आहे रक्षाबंधनाचा … नेत्रांच्या निरांजनाने,
भावास ओवाळण्याचा कृष्ण जसा द्रौपदिस,
तसा लाभला तू मला ओवाळते भाऊराया,
औक्ष माझे लाभो तुला … असा आनंद सोहळा,
तुजवीण सुना सुना … धागा नाही हा नुसता, विश्वास हा तुझ्या - माझ्यातला हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.
रक्षाबंधनचा सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.
इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पध्दत आहे. तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.
राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. राखी पौर्णिमेच्या बऱ्याच अख्यायिका आहेत परंतू त्या माहित करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणांच्या हेतूला, उद्देशालाच महत्व देणार आहोत.
आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.
राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.
एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.
द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम.
स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो.रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.
तूच आमचा त्राता, रक्षणकर्त्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते. आमच्या लहानपणी सकाळी अंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्यायांपुढे उभे राहायचो अन् ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे. तेव्हा काही कळायचे नाही. पण आता वाटतंय की ते इतर सर्व व्याधींपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रीत सुरक्षाकवच हातात बांधत असावेत (हल्लीतर प्रत्येक तीर्थक्षेत्री हातात बांधायचे दोरे मिळतात.)
असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असतांना ह्या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहे?आजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना! यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व या सारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी तुमच्यावरच आह हे ही सूचित होते.
रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग .... रक्षाबंधन
घराच्या गच्चीत रूसून बसलेल्या आपल्या लहान बहिणीची समजूत घालण्यासाठी सर्वांत आधी जात असेल तर तो तिचा भाऊ!  शाळेतून आपल्या मोठ्या ताईला आणण्यासाठी जाणार्‍या लहान भावाचा कोमल हात तिला संरक्षण देतो. अशा या बहिण-भावाचा रक्षाबंधनाचा सण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो. लहान भावाच्या झालेल्या चुका स्वत:वर ओढवून घेणारी ताई आई-बाबाकडून मिळणारा 'प्रसाद' वाचविते. तर आपल्या ताईचे आभार मानण्यासाठी लहान भाऊ तिला आवडणारी वस्तू भेट देतो.
शाळेच्या मुख्याध्यापिका पहिल्या इयत्तेत झोपलेल्या लहानग्याला घेऊन जायला सांगतात तेव्हा त्याची ताई शांत निजलेल्या आपल्या भावाला हळूवार आपल्या वर्गात घेऊन जाते आणि त्याला मांडीवर झोपवून फळ्यावरील लिहिलेले आपल्या वहीत उतरवून घेत असते.  लहान श्रुती रडतच आपल्या मोठ्या भावाच्या वर्गात गेली व तिला चिडवणार्‍या तिच्या वर्गातील मुलांची नावे सांगायला लागली. तिचे डोळे पुसत मधल्या सुटीत त्यांना चांगला मार देऊ सांगताच छोट्या ताईचे रडणे एकदम बंद झाले व ती पुन्हा हसत खेळत आपल्या वर्गात जाऊन बसली. तिच्या मते मोठ्या भावाने दिलेले आश्वासन म्हणजे काम फत्ते असंच ती समजते. शाळेत जाणारी लहान बहिण हसण्या खिदळण्यात केव्हा मोठी होते कळतच नाही. मग तिला आपल्या बाईकवर घेऊन कॉलेजात सोडणारा तिचा भाऊ तिचा 'बॉडीगार्ड'च बनूनच जातो. तिच्या आवडीनिवडींची काळजी घेतो तर तिला संकटामधून आधार देतो.
ताईचे लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो, तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या सरबराईत मग्न असतो. ताई विरहाने धाय मोकलून रडत असताना भावाला लहानपण आठवते. सरबराईत गुंतलेले हात घेऊन तोही अश्रूभरल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो. भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो.
आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे.

उत्तर लिहिले · 2/8/2020
कर्म · 34235
19
आज संपूर्ण भारतामध्ये रक्षाबंधन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे. या सणामागचा इतिहास तुम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? चला तर मग पाहुयात या सणाची सुरुवात व इतिहास..._

*अरे आला अरे आला राखी पुनवेचा सण*

*माऊलीच्या ममतेचं रुप गोजिरं बहिण...*

*जरी वेगळा वेगळा*
*तिचा-तुझा जन्म झाला*

*एक जीव दोन जागी*
*जणू विधात्याने केला*

*सलं विचारावी त्याला ज्याला नाही रे बहिण*

*सोन्या-चांदीची झळाळी*
*तिने बांधल्या धाग्याला*

*जन्मोजन्मीची पुन्याई*
*जणू येतसे फळाला*

*गाठ रेशमी सांगते ठेव ध्यानात वचन*

*काकणांची किणकिण*
*गोड पैंजणांची धून*

*घरा-दारात करीते*
*जणू सुखाचं शिंपण*

*इडा-पिडा दूर लावी तुझं करून औक्षण*

*नको गोडं-धोडं देऊ*
*नको जरतारी साडी*

*नाही मागतं दौलत*
*देरे माया देरे थोडी*

*झणी धावत येईल बघ साद तू देऊन!*



           *॥ रक्षाबंधन ॥*

    _आपला भाऊराया सुखी असावा, त्याने आई-वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा, असे प्रत्येक विवाहित बहिणीला वाटत असते. तर आपली बहीण शिकावी, मोठेपणी चांगल्या घरी जावी, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीबद्दल वाटत असते._

_भाऊ-बहिणीच्या या प्रेमाला उधाण येते ते राखी-पौर्णिमेच्या दिवशी. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भावाच्या आयुष्यात सुख-शांती लाभू दे, अशी प्रार्थना करते. तर भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी राखी बांधून घेतो. राखी बांधल्यानंतर बहीण मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करते._ _तर भाऊ आपल्या ताकदीप्रमाणे बहिणीला पैसे, वस्तू देऊन खुश करीत असतो._

    _हा राखी पौर्णिमेचा सण प्राचीन काळापासून चालत आला असून, पूर्वी हा सण ब्राम्हणांचा सण म्हणून ओळखला जात होता._

    _या दिवशी श्रावणी करणं हा प्रकार असतो. श्रावणी करणं म्हणजेच मन शुद्ध करणं._ _निरनिराळे मंत्र म्हणून गुरुजी होमहवन करतात व जमलेल्या लहान-थोरांना पंचगव्य देतात. प्रत्येक पुरुषाला नवीन यज्ञोपवीत घालायला देतात._

_या सणाबाबत खूप कथा प्रचलीत आहेत. महाभारतात या पवित्र सणाविषयी माहिती मिळते कि, त्या वेळी देव व दानव यांत जबरदस्त युद्ध झाले._

_दानवांकडून देव हरू लागले. इंद्रासहित सर्व देवांना सामना करणं कठीण झालं, तेव्हा गुरु बृहस्पतीने श्रावणातील_ _पौर्णिमेच्या दिवशी 'अपराजिता ' नावाचे रक्ष कवच इंद्राच्या उजव्या हाताला बांधले. तेव्हा देवांना दानवांवर वजय मिळविण्यास वेळ लागला नाही._
    _पुराणकथा अशी आहे कि, देव दानवांकडून पराजित होत होते, तेव्हा इंद्राची पत्नी इंद्राणीने स्वतःच्या पतीला विजय मिळावा म्हणून राखी बांधली होती._ _त्यानंतर इंद्राला युद्धात विजयसुद्धा मिळाला होता._
_पूर्वी राजा युद्धासाठी निघाला असता, त्याच्या रक्षणार्थ पुरोहित_
_त्याच्या हाताला राखी बांधत असे. आता हे काम बहीण करते. राजपूत लोक लढाईवर_ _जाण्यापूर्वी बहिणीकडून स्वतःला ओवाळून घेत व भाऊ सुखरूप घरी यावा म्हणून बहीण राखी बांधत असे._
    _सुरुवातीला हा सण उत्तर प्रदेशापुरताच मर्यादित होता. आता हा सण भारतवर्षात सर्वत्र साजरा होतो._
    _काही ऐतिहासिक घटनासुद्धा या सणाच्या बाबतीत आढळून येतात. गुजरातचा बादशहा बहादुरशहा याने चितोडगडावर चढाई केली, तेव्हा युद्ध होईल अशी परिस्थिती नव्हती. परंतु चितोडगडाच्या राजमाता, कर्णावतीने चतुराई वापरून मोगल सम्राट हुमायूनला एक राखी पाठवली आणि स्वतःचा भाऊ बनवले. हुमायूनने स्वतःचे सैन्य पाठवून चितोडगड वाचवला._
    _दुसरी एक ऐतिहासिक माहिती अशी आहे कि, सिकंदर जेव्हा झेलम नदीच्या किनारी आला, तेव्हा त्याने पहिले कि, एक हिंदू स्त्री नदीकिनारी पूजा करून, राखी अर्पण करीत आहे. तेव्हा सिकंदराने राखीचे महत्व त्या स्त्रीकडून समजून घेतले व राखी बांधून घेतली._
    _बहीण-भावाचे नटे दृढ करण्यासाठी, मित्रत्व, स्नेह व परस्परांतील प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो._


*_🙏पौराणीक संदर्भ_*
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. इतिहासामध्ये लिहिले आहे कि, "युद्धामध्ये इंद्रदेव दैत्यांकडून पराभवाच्या जवळ आला होता, तेव्हा ऋषींनी एक धागा मंत्रून इंद्राच्या पत्नीकडे दिला व तो धागा इंद्राच्या पत्नीने इंद्राला बांधला व इंद्राची रक्षा करण्यासाठी प्रार्थना केली. त्यावर इंद्राचा विजय झाला. आज हा धागा बहिण आपल्या भावाला बांधते पण पूर्वीच्या काळी, एकमेकांची रक्षा करण्यासाठी साठी हा धागा बांधण्यात येत होता.

*_🙏ऐतिहासिक संदर्भ_*
पूर्वीच्या काळात आपल्याला ज्या स्त्रीने राखी बांधली, तिच्या रक्षणार्थप्रसंगी प्राण द्यायचे ही राजपुतांची नीती होती. याची बरीच उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे, तर चितोडवर जेव्हा बहादूरशहाने हल्ला केला, त्या वेळी राणी कर्णावतीने बाबरचा पुत्र हुमायूनला राखी भेट पाठवून आपले व आपल्या राज्याचे रक्षण करण्यास सांगितले. हुमायूनने देखील जाती-धर्म याचा विचार न करता चितोडचे रक्षण केले. तसेच युद्ध टाळण्या साठी अनेक स्त्रिया शत्रूला राखी बांधत असत. त्यामुळे होणारा नरसंहार टळला जात असे असेही अनेक दाखले इतिहासामध्ये आढळतात.

*_🙏रक्षाबंधन सणामागचा उद्देश_*
रक्षाबंधन फक्त बहीण भावापुरते मर्यादित नसून इतिहासात अगदी पत्नीने पतीला,आईने मुलाला व मुलीने वडिलांना राखी बांधल्याची कित्येक उदाहरणे आहेत. समाजातील मुलींची, मग ती बहिण असो, मैत्रीण असो, प्रेयसी असो, बायको असो किंवा अनोळखी मुलगी असो, त्यांची रक्षा करणे व त्यांना अन्यायापासून वाचवणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. असा संदेश या परंपरेमधून समाजाला दिला जातो.

*राखी बांधताना ताम्हण मध्ये कोणत्या गोष्टी असाव्या?*
http://www.uttar.co/answer/5b8212ce16f5a3171b161a02
सर्वात आधी तुम्हाला *रसुल खडकाळे* यांच्या कडून _रक्षाबंधन_ च्या हार्दिक शुभेच्छा
🎗🏵🎗 *रक्षाबंधन : राखी बांधताना ताम्हणमध्ये 'या' ७ वस्तू असाव्यात !*
🎗🏵🎗 🎗🏵🎗 🎗🏵🎗
राखी पौर्णिमा. बहीण-भावाचा पवित्र सण रक्षाबंधन. देशात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.  या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो मिळो म्हणून प्रार्थना करते.  दि. २६ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. राखी बांधताना  ताम्हण किंवा ताटात ७ वस्‍तू आवर्जुन असाव्यात.

*कुंकू :* कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी कुंकू लावणे शुभ मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायू होण्याची कामना करते. 

*अक्षता :* कुंकू लावल्यानंतर कपाळावर तसेच डोक्यावर अक्षता टाकतात.  याचा अर्थ भावावर शुभता बनलेली राहो. म्हणून ताटात अक्षता असाव्यात.

*नारळ :* नारळ म्हणजे श्रीफळ.  श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे फळ देताना बहिणीने प्रार्थना.

*रक्षा सूत्र, राखी :*  रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. या दोषांमुळेच शारीरिक आजार उद्भवतात. मनगटावर रक्षा सूत्र बांधल्याने शरीरात यांचे संतुलन राहते.

*गोड पदार्थ :*  राखी बांधल्यानंतर भावाला गोड खाऊ घातल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो.

आज काल काही नालायक फेसबुक आणि व्हाट्स अँप ला .अश्या पोस्ट टाकत आहेत😡😡😡😡😡

सर्व लग्न झालेल्या साठी खुश खबर

बायका माहेरी जात आहे

रक्षा बंधन येत आहे 

आणि
गल्लीतल्या जुन्या लाफड्या वाल्या ऍटमपण त्यांच्या घरी येत आहेत 😡

त्यांच्यासाठी एक प्रश्न.??

तुमची बहिण पण येत असेल ना रक्षाबंधन ला माहेरी  
आधी तीपण कोणाची तरी ऍटम असेलच कि ..??😡😡

तुमची बायको पण माहेरी जातच असेल ना रक्षाबंधन ला तिचा पण जुना यार असेलच ना माहेरी ..??😡😡

आणि ....!
आई पण मामाचा घरी रक्षाबंधन ला जातच असेल
मग तुमच्या आईची पण तिथे सेटिंग असेलच ना..??😡😡

अरे नालायकांनो कधी अक्कल येईल तुम्हाला..??😡😡😡😡

आपणच आपल्या धर्माचा ,आपल्या सणांचा मजाक करता,🙇‍♂ अहो कधी सुधाराल..??
😡
जर तुमचा कडून कोणाचा सन्मान कारण होत नसेल ,,

तर....!😡😡

अपमान करायचा पण तुम्हाला काही अधिकार नाही,, 😡😡😡                     

🚩धर्म आणि  धार्मिक परंपरांचा सम्मान करा                                           

    🚩जय शिवराय🚩
एक कट्टर शिवभक्त.....

*टीप , हि पोस्ट रक्षाबंधन वर जोक करणाऱ्या नालायकांसाठी*💯
*_❗अभिमानाची गोष्ट म्हणजे हा सण फक्त भारतासारख्या सुसंकृत देशात साजरा केला जातो._*

*॥ रक्षाबंधन या पवित्र पर्वाच्या सर्वांना विचारधारामय शुभेच्छा ॥*

■■■■■■■■■■■■■■■■■■ —

उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 569225
19
🎗🏵🎗 *रक्षाबंधन : राखी बांधताना ताम्हणमध्ये 'या' ७ वस्तू असाव्यात !*
🎗🏵🎗 🎗🏵🎗 🎗🏵🎗
राखी पौर्णिमा. बहीण-भावाचा पवित्र सण रक्षाबंधन. देशात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.  या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो मिळो म्हणून प्रार्थना करते.  दि. २६ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. राखी बांधताना  ताम्हण किंवा ताटात ७ वस्‍तू आवर्जुन असाव्यात.

*कुंकू :* कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी कुंकू लावणे शुभ मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायू होण्याची कामना करते. 

*अक्षता :* कुंकू लावल्यानंतर कपाळावर तसेच डोक्यावर अक्षता टाकतात.  याचा अर्थ भावावर शुभता बनलेली राहो. म्हणून ताटात अक्षता असाव्यात.

*नारळ :* नारळ म्हणजे श्रीफळ.  श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे फळ देताना बहिणीने प्रार्थना.

*रक्षा सूत्र, राखी :*  रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. या दोषांमुळेच शारीरिक आजार उद्भवतात. मनगटावर रक्षा सूत्र बांधल्याने शरीरात यांचे संतुलन राहते.

*गोड पदार्थ :*  राखी बांधल्यानंतर भावाला गोड खाऊ घातल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो.

उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 569225
0
ज़रूर, रक्षा बंधन साठी काही मराठी शेर शायरी:

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

"रेशमाच्या धाग्यात, बहिणीचा असतो प्यार, मिळो भावाला सुख अपरंपार."

"येवो रक्षाबंधन, घेऊन आनंद खास, बहीण-भावाचं नातं, जणू स्वर्गाचा वास."

"भाऊ-बहिणीच्या नात्याचा हा दिवस खास, प्रत्येक क्षणी दोघांनाही एकमेकांचा ध्यास."

"नातं हे रक्षाबंधनाचं, अटूट आणि पवित्र, भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं, जगावेगळं चरित्र."

"राखी बांधते बहीण भावाला, वचन देतो भाऊ बहिणीला, सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी, आयुष्यभर साथ देण्याची तयारी."

"रक्षाबंधनाच्या दिवशी, बहिणीची असते आस, भाऊ देतो तिला, आपल्या प्रेमाचा श्वास."

"नातं हे दोघांचं, जगावेगळं खास, ओवाळणीच्या ताटात, दिसतो प्रेमाचा भास."

"रंगात रंग मिसळले, नातं आणखी गढ, रक्षाबंधनाच्या सणी, मिळो दोघांना आनंद."

"भाऊ आणि बहीण, एकमेकांचे आधार, या नात्याला तोड नाही, हेच जीवनाचे सार."

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040
18
🎉 *रक्षाबंधन! बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन*


👩‍❤️‍👨 *रक्षाबंधन - बहीण-भावाच्या प्रेमाचा गोड दिवस*

*🔰📶Maha Digi | Special*

📌 दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे बहीण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणारा दिवस.

👉🏻 *दिवसाचे महत्व* : या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाची निशाणी म्हणून पवित्र असा धागा बांधते, आणि भावाच्या आयुष्यात सुख-शांती लाभू दे, भावाच्या दीर्घायुष्याची मनोकामना करते. आपल्या बहिणीने समाजात ताठ मानेने जगावे यासाठी भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. भाऊ आपल्या बहिणीला राखी बांधल्यानंतर गिफ्ट देतो. बहीण आपल्या भावाला राखी बांधून तोंड गोड करते.

📍 *राखीचा शब्दशः अर्थ* : राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. हा एक असा सण आहे केवळ भावा-बहिणीच्या रक्ताच्या नात्यातील नव्हे तर इतर जवळच्या नात्यातील भावा-बहिणींसाठी तितकाच महत्त्वपूर्ण आहे. रक्षाबंधन हे असे बंधन आहे जे मन आणि हृदयाला जोडते. जाणून घ्या कधी आहे राखी बांधण्याचा मुहूर्त.

😊 *असा साजरा होतो विविध भागात रक्षाबंधन* :

▪रक्षाबंधन अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण आनंदाने साजरा करतात.
▪उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. उत्तर भारतामध्ये नोकर आपल्या मालकाच्या हाताला राखी बांधण्याची परंपरा आहे.
▪दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो.
▪जैन धर्मामध्ये हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळला जातो. त्या दिवशी जैन मंदिरातून राख्या ठेवलेल्या असतात, जैन मुनी त्यांचे आदराने ग्रहण करतात.



भाऊ- बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन



_आज संपूर्ण भारतामध्ये रक्षाबंधन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे. या सणामागचा इतिहास तुम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? चला तर मग पाहुयात या सणाची सुरुवातइतिहास..._

🧐 *जाणून घ्या सणाचे महत्व* : रक्षाबंधन हा शब्द दोन शब्दांना जोडून बनवण्यात आला आहे. याचा अर्थ आहे रक्षा आणि बंधन. म्हणजे रक्षा बंधनात बांधले जाणे. हा एक असा सण आहे केवळ भावा-बहिणीच्या रक्ताच्या नात्यातील नव्हे तर इतर जवळच्या नात्यातील भावा-बहिणींसाठी तितकाच महत्त्वपूर्ण आहे. रक्षाबंधन हे असे बंधन आहे जे मन आणि हृदयाला जोडते.




*अरे आला अरे आला राखी पुनवेचा सण*

*माऊलीच्या ममतेचं रुप गोजिरं बहिण...*

*जरी वेगळा वेगळा*
*तिचा-तुझा जन्म झाला*

*एक जीव दोन जागी*
*जणू विधात्याने केला*

*सलं विचारावी त्याला ज्याला नाही रे बहिण*

*सोन्या-चांदीची झळाळी*
*तिने बांधल्या धाग्याला*

*जन्मोजन्मीची पुन्याई*
*जणू येतसे फळाला*

*गाठ रेशमी सांगते ठेव ध्यानात वचन*

*काकणांची किणकिण*
*गोड पैंजणांची धून*

*घरा-दारात करीते*
*जणू सुखाचं शिंपण*

*इडा-पिडा दूर लावी तुझं करून औक्षण*

*नको गोडं-धोडं देऊ*
*नको जरतारी साडी*

*नाही मागतं दौलत*
*देरे माया देरे थोडी*

*झणी धावत येईल बघ साद तू देऊन!*


           *॥ रक्षाबंधन ॥*




    _आपला भाऊराया सुखी असावा, त्याने आई-वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा, असे प्रत्येक विवाहित बहिणीला वाटत असते. तर आपली बहीण शिकावी, मोठेपणी चांगल्या घरी जावी, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीबद्दल वाटत असते._

_भाऊ-बहिणीच्या या प्रेमाला उधाण येते ते राखी-पौर्णिमेच्या दिवशी. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भावाच्या आयुष्यात सुख-शांती लाभू दे, अशी प्रार्थना करते. तर भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी राखी बांधून घेतो. राखी बांधल्यानंतर बहीण मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करते._ _तर भाऊ आपल्या ताकदीप्रमाणे बहिणीला पैसे, वस्तू देऊन खुश करीत असतो._

    _हा राखी पौर्णिमेचा सण प्राचीन काळापासून चालत आला असून, पूर्वी हा सण ब्राम्हणांचा सण म्हणून ओळखला जात होता._

    _या दिवशी श्रावणी करणं हा प्रकार असतो. श्रावणी करणं म्हणजेच मन शुद्ध करणं._ _निरनिराळे मंत्र म्हणून गुरुजी होमहवन करतात व जमलेल्या लहान-थोरांना पंचगव्य देतात. प्रत्येक पुरुषाला नवीन यज्ञोपवीत घालायला देतात._

_या सणाबाबत खूप कथा प्रचलीत आहेत. महाभारतात या पवित्र सणाविषयी माहिती मिळते कि, त्या वेळी देव व दानव यांत जबरदस्त युद्ध झाले._

_दानवांकडून देव हरू लागले. इंद्रासहित सर्व देवांना सामना करणं कठीण झालं, तेव्हा गुरु बृहस्पतीने श्रावणातील_ _पौर्णिमेच्या दिवशी 'अपराजिता ' नावाचे रक्ष कवच इंद्राच्या उजव्या हाताला बांधले. तेव्हा देवांना दानवांवर वजय मिळविण्यास वेळ लागला नाही._
    _पुराणकथा अशी आहे कि, देव दानवांकडून पराजित होत होते, तेव्हा इंद्राची पत्नी इंद्राणीने स्वतःच्या पतीला विजय मिळावा म्हणून राखी बांधली होती._ _त्यानंतर इंद्राला युद्धात विजयसुद्धा मिळाला होता._
_पूर्वी राजा युद्धासाठी निघाला असता, त्याच्या रक्षणार्थ पुरोहित_
_त्याच्या हाताला राखी बांधत असे. आता हे काम बहीण करते. राजपूत लोक लढाईवर_ _जाण्यापूर्वी बहिणीकडून स्वतःला ओवाळून घेत व भाऊ सुखरूप घरी यावा म्हणून बहीण राखी बांधत असे._
    _सुरुवातीला हा सण उत्तर प्रदेशापुरताच मर्यादित होता. आता हा सण भारतवर्षात सर्वत्र साजरा होतो._
    _काही ऐतिहासिक घटनासुद्धा या सणाच्या बाबतीत आढळून येतात. गुजरातचा बादशहा बहादुरशहा याने चितोडगडावर चढाई केली, तेव्हा युद्ध होईल अशी परिस्थिती नव्हती. परंतु चितोडगडाच्या राजमाता, कर्णावतीने चतुराई वापरून मोगल सम्राट हुमायूनला एक राखी पाठवली आणि स्वतःचा भाऊ बनवले. हुमायूनने स्वतःचे सैन्य पाठवून चितोडगड वाचवला._
    _दुसरी एक ऐतिहासिक माहिती अशी आहे कि, सिकंदर जेव्हा झेलम नदीच्या किनारी आला, तेव्हा त्याने पहिले कि, एक हिंदू स्त्री नदीकिनारी पूजा करून, राखी अर्पण करीत आहे. तेव्हा सिकंदराने राखीचे महत्व त्या स्त्रीकडून समजून घेतले व राखी बांधून घेतली._
    _बहीण-भावाचे नटे दृढ करण्यासाठी, मित्रत्व, स्नेह व परस्परांतील प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो._


*_🙏पौराणीक संदर्भ_*
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. इतिहासामध्ये लिहिले आहे कि, "युद्धामध्ये इंद्रदेव दैत्यांकडून पराभवाच्या जवळ आला होता, तेव्हा ऋषींनी एक धागा मंत्रून इंद्राच्या पत्नीकडे दिला व तो धागा इंद्राच्या पत्नीने इंद्राला बांधला व इंद्राची रक्षा करण्यासाठी प्रार्थना केली. त्यावर इंद्राचा विजय झाला. आज हा धागा बहिण आपल्या भावाला बांधते पण पूर्वीच्या काळी, एकमेकांची रक्षा करण्यासाठी साठी हा धागा बांधण्यात येत होता.

*_🙏ऐतिहासिक संदर्भ_*
पूर्वीच्या काळात आपल्याला ज्या स्त्रीने राखी बांधली, तिच्या रक्षणार्थप्रसंगी प्राण द्यायचे ही राजपुतांची नीती होती. याची बरीच उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे, तर चितोडवर जेव्हा बहादूरशहाने हल्ला केला, त्या वेळी राणी कर्णावतीने बाबरचा पुत्र हुमायूनला राखी भेट पाठवून आपले व आपल्या राज्याचे रक्षण करण्यास सांगितले. हुमायूनने देखील जाती-धर्म याचा विचार न करता चितोडचे रक्षण केले. तसेच युद्ध टाळण्या साठी अनेक स्त्रिया शत्रूला राखी बांधत असत. त्यामुळे होणारा नरसंहार टळला जात असे असेही अनेक दाखले इतिहासामध्ये आढळतात.

*_🙏रक्षाबंधन सणामागचा उद्देश_*
रक्षाबंधन फक्त बहीण भावापुरते मर्यादित नसून इतिहासात अगदी पत्नीने पतीला,आईने मुलाला व मुलीने वडिलांना राखी बांधल्याची कित्येक उदाहरणे आहेत. समाजातील मुलींची, मग ती बहिण असो, मैत्रीण असो, प्रेयसी असो, बायको असो किंवा अनोळखी मुलगी असो, त्यांची रक्षा करणे व त्यांना अन्यायापासून वाचवणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. असा संदेश या परंपरेमधून समाजाला दिला जातो.

*राखी बांधताना ताम्हण मध्ये कोणत्या गोष्टी असाव्या?*
http://www.uttar.co/answer/5b8212ce16f5a3171b161a02
सर्वात आधी तुम्हाला *रसुल खडकाळे* यांच्या कडून _रक्षाबंधन_ च्या हार्दिक शुभेच्छा
🎗🏵🎗 *रक्षाबंधन : राखी बांधताना ताम्हणमध्ये 'या' ७ वस्तू असाव्यात !*
🎗🏵🎗 🎗🏵🎗 🎗🏵🎗
राखी पौर्णिमा. बहीण-भावाचा पवित्र सण रक्षाबंधन. देशात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.  या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो मिळो म्हणून प्रार्थना करते.  दि. २६ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. राखी बांधताना  ताम्हण किंवा ताटात ७ वस्‍तू आवर्जुन असाव्यात.

*कुंकू :* कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी कुंकू लावणे शुभ मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायू होण्याची कामना करते. 

*अक्षता :* कुंकू लावल्यानंतर कपाळावर तसेच डोक्यावर अक्षता टाकतात.  याचा अर्थ भावावर शुभता बनलेली राहो. म्हणून ताटात अक्षता असाव्यात.

*नारळ :* नारळ म्हणजे श्रीफळ.  श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे फळ देताना बहिणीने प्रार्थना.

*रक्षा सूत्र, राखी :*  रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. या दोषांमुळेच शारीरिक आजार उद्भवतात. मनगटावर रक्षा सूत्र बांधल्याने शरीरात यांचे संतुलन राहते.

*गोड पदार्थ :*  राखी बांधल्यानंतर भावाला गोड खाऊ घातल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो.


🤔 रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काय भेटवस्तू द्यायची हा सगळ्याच भावांना पडणारा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे बहिणीला खूश करण्यासाठी तुम्ही काय काय भेटवस्तू देऊ शकता ते जाणून घ्या.

🎁 *बहिणीला गिफ्ट देण्यासाठी काही खास ऑप्शन्स*

🧭 *घड्याळ* : रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही वेळेचं महत्त्व लक्षात तुमच्या बहिणीला एक छान घड्याळ भेट म्हणून देऊ शकता.

💄 *मेकअप किट* : मुलींना मेकअप करायला खूप आवडतं त्यामुळे बहिणीला मेकअप किट गिफ्ट देण्याचा उत्तम पर्याय आहे.

🌟 *ईयरिंग* : फॅशन म्हटलं की, मुली साधारणतः ट्रेन्डनुसार ज्वेलरी वेअर करतात. सध्या सिल्वर ज्वेलरी ट्रेन्डमध्ये आहे. तुमचं बजेट असेल तर तुम्ही ओरिजनल सिल्वर ज्वेलरी खरेदी करू शकता. अन्यथा बाजारात सिल्वरप्रमाणे दिसणाऱ्या अनेक ज्वेलरी उपलब्ध असतात.

👛 *पर्स* : पर्स ही प्रत्येक मुलीच्या आवडीची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एखादी छानशी हँड बॅग रक्षाबंधनासाठी बहिणीला देण्याचा विचार करू शकता.

📿 *ब्रेसलेट* : रक्षाबंधनच्या काही दिवस आधीच फ्रेंडशिप डे येतो. त्यामुळे बाजारात अनेक फॅन्सी आणि ट्रेन्डी ब्रेसलेट उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या बहिणीला एखादं छानसं ब्रेसलेट देऊ शकता.

👚 *कस्टमाइज टी-शर्ट* : अनेक ऑनलाईन वेबसाइट आहेत तिथे तुम्हाला अगदी स्वस्तात कस्टमाइज टी-शर्ट मिळतील. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टी-शर्ट डिझाइन करू शकता.

👉 *ईअरफोन्स* : गाणी ऐकायला प्रत्येकालाच आवडतं त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला इअरफोन गिफ्ट करू शकता.

👗 *ड्रेस* : स्वत: जवळ कितीही कपडे असले तरी प्रत्येक मुलीला ते कमीच वाटत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीसाठी सुंदर ड्रेस घेऊ शकता.

💍 *गोल्ड ज्वेलरी* : रक्षाबंधनला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही एखादी सोन्याची भेटवस्तू देऊ शकता.
_____________________________________
आज काल काही नालायक फेसबुक आणि व्हाट्स अँप ला .अश्या पोस्ट टाकत आहेत😡😡😡😡😡

सर्व लग्न झालेल्या साठी खुश खबर

बायका माहेरी जात आहे

रक्षा बंधन येत आहे 

आणि
गल्लीतल्या जुन्या लाफड्या वाल्या ऍटमपण त्यांच्या घरी येत आहेत 😡

त्यांच्यासाठी एक प्रश्न.??

तुमची बहिण पण येत असेल ना रक्षाबंधन ला माहेरी  
आधी तीपण कोणाची तरी ऍटम असेलच कि ..??😡😡

तुमची बायको पण माहेरी जातच असेल ना रक्षाबंधन ला तिचा पण जुना यार असेलच ना माहेरी ..??😡😡

आणि ....!
आई पण मामाचा घरी रक्षाबंधन ला जातच असेल
मग तुमच्या आईची पण तिथे सेटिंग असेलच ना..??😡😡

अरे नालायकांनो कधी अक्कल येईल तुम्हाला..??😡😡😡😡

आपणच आपल्या धर्माचा ,आपल्या सणांचा मजाक करता,🙇‍♂ अहो कधी सुधाराल..??
😡
जर तुमचा कडून कोणाचा सन्मान कारण होत नसेल ,,

तर....!😡😡

अपमान करायचा पण तुम्हाला काही अधिकार नाही,, 😡😡😡                     

🚩धर्म आणि  धार्मिक परंपरांचा सम्मान करा                                           

    🚩जय शिवराय🚩
एक कट्टर शिवभक्त.....

*टीप , हि पोस्ट रक्षाबंधन वर जोक करणाऱ्या नालायकांसाठी*💯

*_❗अभिमानाची गोष्ट म्हणजे हा सण फक्त भारतासारख्या सुसंकृत देशात साजरा केला जातो._*

*रक्षाबंधन या पवित्र पर्वाच्या सर्वांना विचारधारामय शुभेच्छा ॥*
उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 569225