Topic icon

अपारंपरिक ऊर्जा

0
भारतातील गोबर गॅस प्रकल्प (Biogas plant) बंद पडण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
  • अनुदान आणि मदतीचा अभाव: सुरुवातीच्या काळात गोबर गॅस प्रकल्पांना सरकारकडून अनुदान (Subsidy) मिळत होते, पण कालांतराने ते कमी झाले किंवा बंद झाले. त्यामुळे लोकांना हे प्रकल्प चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे झाले नाही.

  • तंत्रज्ञानाचा अभाव: गोबर गॅस प्रकल्पांसाठी लागणारे तंत्रज्ञान (Technology) अजूनही पाहिजे तितके विकसित झालेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणीplant मध्ये काही समस्या येतात आणि ते बंद पडतात.

  • कच्च्या मालाची उपलब्धता: गोबर गॅस प्रकल्पासाठी लागणारा महत्वाचा कच्चा माल म्हणजे शेण (Dung). अनेक ठिकाणी जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे शेण पुरेसे मिळत नाही.

  • देखभालीचा अभाव: गोबर गॅस प्रकल्पाची नियमित देखभाल (Maintenance) करणे आवश्यक असते. अनेक लोक याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळेplant खराब होतो आणि बंद पडतो.

  • जागरूकतेचा अभाव: गोबर गॅस वापरण्याचे फायदे आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल लोकांमध्ये पुरेशी जागरूकता नाही. त्यामुळे लोक ते वापरण्यास तयार होत नाहीत.

  • इतर इंधनांची उपलब्धता: LPG गॅस आणि इतर इंधने सहज उपलब्ध असल्यामुळे लोकांना गोबर गॅस वापरण्याची गरज वाटत नाही.
या कारणांमुळे भारतातील अनेक गोबर गॅस प्रकल्प बंद पडले आहेत.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1620
1

https://bit.ly/3kJ8gDi
गोबर गॅस सुमारे 1970 च्या दशकात देशात, राज्यात अनेक ठिकाणी दिसायला लागले. खादी ग्रामोद्योग आयोग या निमसरकारी संस्थेने याचा प्रसार आणि प्रचार अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण देशभर केला. मुळात हा धोरणात्मक निर्णय सरकारी पातळीवर घेतला गेला होता त्याचे खरे कारण ""गोबर गॅस प्लांट'' हे नव्हतेच. उलट जनावरांच्या शेणाची योग्य वासलात लावण्याची एक आदर्श व्यवस्था असे म्हणता येईल. यात मिळणारा गोबर गॅस बोनस होता. पारंपरिक पद्धतीने उघड्यावरच शेण टाकल्यामुळे त्यावर माश्या आणि डास बसतात, शेणाच्या विघटनातून वायू निर्माण होतात. या सर्व प्रकारातून रोगराई पसरते. या सर्वांवर प्रभावी उपाय म्हणजे गोबर गॅस प्लांट.
...असा तयार होतो गोबर गॅस
गोबर गॅस तयार होणं ही एक शेणाच्या नैसर्गिकरीत्या होणाऱ्या विघटनाची पायरी आहे. जनावरांच्या शेणामध्ये त्यांनी खाल्लेला चारा, कडब्याचे अंश असतात. तसेच त्यांच्या पोटातून बाहेर पडणारे विनॉक्सी जिवाणू असतात. हे जिवाणू शेणामध्ये त्यांचे अन्न शोधून उपजीविका करतात. मुळात या जिवाणूचं अन्न काय हे तपासायला लागलो तर लक्षात येतं की हे खातात फक्त पिष्टमय पदार्थ किंवा शर्करा. शेणामध्ये या पदार्थांचं प्रमाण अतिशय अल्प असतं आणि याला कारणही तसंच असतं.      गाई, म्हशींना चारा दिल्यावर तीन पदार्थ बाहेर येतात ते म्हणजे मूत्र, शेण आणि दूध. बैलाच्या बाबतीत त्याची ताकद आपल्या उपयोगाची ठरते. गाई, म्हशींच्या दुधाचं पोषणमूल्य लक्षात घेता, बाहेर पडलेल्या शेणात फक्त चोथाच असतो, हे सहजी पटण्यासारखे आहे. तरी त्याच शेणात हे जिवाणू आपले
अन्न शोधत असतात.
आकडेवारीच्या भाषेत सांगायचे तर एक किलो शेणापासून सुमारे 40 लिटर बायोगॅस तयार होतो तोही 40 दिवसांत म्हणजे विघटनाचा कालावधी सुमारे सहा ते सात आठवड्यांचा. त्यामानाने गोबर गॅस अगदीच कमी, अगदी एल.पी.जी. गॅसच्या भाषेत सांगायचे झाले तर फक्त 18 ग्रॅम गॅस. साधारणपणे प्रति जनावर दररोज सुमारे 10 ते 12 किलो एवढे शेण मिळते आणि त्यापासून गोबर गॅस तयार होतो सुमारे 400 ते 480 लिटर.♍
https://bit.ly/3iBDz0M

1
सौर ऊर्जेला अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत असेही म्हणतात.
उत्तर लिहिले · 16/11/2018
कर्म · 123540
0

भारतात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीजनिर्मितीत राजस्थान राज्याचा प्रथम क्रमांक लागतो.

राजस्थानमध्ये सौर ऊर्जा (Solar energy) निर्मितीची क्षमता सर्वाधिक आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1620
0
मी तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे, परंतु कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा. 'घरगुती 30 युनिट लाईट बनवायची आहे का?' ह्या प्रश्नाचा नेमका अर्थ काय आहे, हे मला समजत नाही आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला 30 युनिट वीज वापरणारी प्रकाश योजना (lighting system) बनवायची आहे, की तुम्हाला 30 सौर ऊर्जेचे (solar energy) युनिट्स लावून वीज तयार करायची आहे, किंवा तुम्हाला तुमच्या घरातील लाईट फिटिंग्ज बदलायची आहेत? कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्टपणे विचाराल, जेणेकरून मी तुम्हाला योग्य माहिती देऊ शकेन.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1620
5
भारतासारख्या विकसनशील देशात, जिथे ऊर्जेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढत आहे तिथे ‘मिथेनची शेती’ आवश्यक आहे. जगात सर्वात जास्त, सुमारे २५ करोड पशू भारतात आहेत. त्यांच्यापासून सुमारे साडेबाराशे करोड टन शेण मिळते. याचा उपयोग करून घेतला तर स्वयंपाकासाठी लागणारे रॉकेल आणि एल.पी.जी. गॅस तसेच वाहतुकीसाठी लागणारे पेट्रोल इ. साठी आपण पर्याय उभा करू शकतो. मिथेन गॅसपासून विजेचीसुद्धा निर्मिती होऊ शकते. ती दोन प्रकारे करता येऊ शकते. हल्ली अनेक खेडोपाडी, ज्यांच्याकडे गुरेढोरे आहेत, त्यांच्याकडे गोबरगॅस प्लँट आहेत. ह्य़ा गोबर गॅसचा उपयोग शेतकरी स्वयंपाक करण्यासाठी तसेच पाणी व इतर पदार्थ गरम करण्यासाठी करतात. जो गॅस गोबर प्लँटमधून मिळतो तोच हा मिथेन गॅस होय.
 प्लँटमधूनदेखील मिथेन गॅस
हा मिथेन गॅस वापरून डीझेल तसेच पेट्रोल इंजिन चालविता येते. प्रथम हे इंजिन डीझेलने किंवा पेट्रोलने चालू करतात. एकदा का हे इंजिन चालू झाले की नंतर ते मिथेन गॅसवर चालू राहते. हा मिथेन गॅस काँप्रेस करून इंजिनमध्ये सोडतात नंतर हे इंजिन गॅसवर चालू राहते. ह्य़ा इंजिनद्वारे वीज तयार करण्याचे जनरेटर फिरविले जाते. जनरेटर फिरविण्यासाठी इंजिन व जनरेटर ह्य़ामध्ये पुली व बेल्ट लावतात. इंजिन चालले की त्याला जोडलेला जनरेटरचा शाप्ट फिरू लागतो. जनरेटरचा शाप्ट फिरू लागला की, जनरेटरचे रोटर जे जनरेटरच्या स्टेटरमध्ये बसविलेले असते ते फिरू लागते व विजेची निर्मिती होते. ह्य़ा विजेचा नंतर आपण वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. ह्य़ा विजेने घरातील दिवे लावता येतात तसेच मोटार पंप चालवून शेतीला पाणी देता येते.
उत्तर लिहिले · 19/5/2017
कर्म · 3745