Topic icon

भगवद्गीता

0
भगवद्गीतेचे पाच मुख्य विषय खालीलप्रमाणे आहेत:
  1. कर्म (Action): कर्म म्हणजे कृती किंवा कर्म करणे. भगवतगीतेनुसार, प्रत्येक व्यक्तीला आपले विहित कर्म फळाची अपेक्षा न करता सतत करत राहिले पाहिजे.
  2. भक्ती (Devotion): भक्ती म्हणजे श्रद्धा आणि प्रेमळ भक्ती. भगवतगीतेत, भगवंताला शरण जाणे आणि त्याच्यावर प्रेम करणे हा भक्तीचा महत्त्वाचा भाग आहे.
  3. ज्ञान (Knowledge): ज्ञान म्हणजे सत्य आणि वास्तविकतेची जाणीव. भगवतगीतेत, आत्म-ज्ञान आणि ब्रह्मा-ज्ञान हे महत्त्वाचे मानले जातात, ज्यामुळे मनुष्य जीवनाच्या अंतिम ध्येयाला प्राप्त करू शकतो.
  4. योग (Yoga): योग म्हणजे 'जोडणे'. भगवतगीतेत, योग म्हणजे आत्माला परमात्म्याशी जोडण्याचा मार्ग. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोग हे योगाचे विविध प्रकार आहेत.
  5. पुरुषोत्तम (The Supreme Being): पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च সত্তा, ज्याला बहुतेकदा भगवान कृष्ण मानले जाते. भगवतगीतेत, पुरुषोत्तमाचे स्वरूप, त्याची भक्ती आणि त्याचे महत्त्व सांगितले आहे.

हे पाच विषय भगवतगीतेच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा आधार आहेत आणि मनुष्याला योग्य जीवन जगण्याची दिशा देतात.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5280
1
गीतेमध्ये सर्वच अध्याय ज्ञान कर्म भक्ती ने भरलेले आहेत,
12 वा अध्याय भक्ताचे जीवन कसे असावे,
16 वा अध्याय माणसात कोणते गुण असावे,

प्रभावी अध्याय आणि श्लोक
15 वा अध्याय आणि 15 वा श्लोक

उत्तर लिहिले · 8/9/2018
कर्म · 5130
4
पूर्ण श्लोक.

ananyas cintayanto mam
ye janah paryupasate
tesam nityabhiyuktanam
yoga-ksemam vahamy aham

अधाय्य ९: श्लोक २२ 

भावार्थ:
अन्यायास अर्थात अन्य कोणीही नाही. चीन्तायतो म्हणजे चिंतन, स्मरण करणे, मम म्हणजे माझ्या, ये म्हणजे ज्याच्या, जनः म्हणजे व्यक्ती, पर्युपस्ते अर्थात पूर्ण समर्पण करून उपासना करणे.

"जी व्यक्ती माझ्या खर्या स्वरूपाला नित्य साक्षी समजून पूर्णपणे समर्पित होऊन माझी उपासना करते, त्या व्यक्तीला मी ज्याची गरज आहे ते प्रदान करतो आणि जे त्याच्च्याकडे कडे आहे ते टिकवून ही ठेवतो...योग-क्षेमम वाहम्य अहम.."

Reference :
https://asitis.com/9/22.html
उत्तर लिहिले · 20/8/2018
कर्म · 75305
27
श्रीमद्भगवद्गीता जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे. स्वामी विवेकानंदांनी परदेशात जी व्याख्याने दिली ती सर्व भगवद्गीतेवर आधारित होती. भगवद्गीता प्रत्येक हिंदूने वाचावी या मताचा मी आहे. गीता प्रत्येक वेळी वाचल्यावर नवीन शिकायला भेटते. पुष्कळ आई-वडील भगवद्गीता मुलांना याकरता वाचायला देत नाहीत कारण त्याची फिलॉसॉफी संन्यासाकडे घेऊन जाणारी आहे. जगात कोणीही गीता संपूर्णपणे समजू शकत नाही. स्वामी विवेकानंदांची व्याख्याने वाचा, तुम्हाला भगवद्गीतेची गरज कळेल.
उत्तर लिहिले · 14/7/2017
कर्म · 17040
2
गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके कोणत्याही धार्मिक पुस्तकालयात, एखाद्या पुस्तकालयात, ऑनलाइनदेखील मिळतील.
उत्तर लिहिले · 25/4/2017
कर्म · 9460