Topic icon

निवडणूका

7
एक सोपे उदाहरण देऊन सांगतो.
असे समजा की आपला देश ही मोठी संस्था आहे आणि ही संस्था चालवण्यासाठी काही कार्यालये या देशात आहेत.
त्यातले दोन प्रमुख कार्यालये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा.
लोकसभा नावाचे कार्यालय चालवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची गरज असते, हे कर्मचारी लोकांमर्फत निवडून दिले जातात, त्यांना आपण खासदार म्हणतो.
लोकसभेवर अंकुश असावा म्हणून आणखी एक कार्यालय असते, ते म्हणजे राज्यसभा. राज्यसभेवर देखील काही कर्मचारी असतात, जे लोकांच्या प्रतिनिधीमार्फत(आमदारांमार्फत) निवडून दिले जातात. आमदार म्हणजे कोण हे खाली आहे.

देश चालवणे आणखी सोयीस्कर व्हावे म्हणून त्याचे विभाग केले जातात, त्यांना आपण राज्य(उदा महाराष्ट्र) म्हणतो. हे राज्य चालवण्यासाठी परत काही कार्यालये राज्यपातळीवर असतात. त्यांना विधानसभा आणि विधानपरिषद म्हणतात.
विधानसभा चालवण्यासाठी जे कर्मचारी लोकांमार्फत निवडून दिले जातात त्यांना आमदार म्हणतात. 

आमदारांचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो. ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील त्याचा मुख्यमंत्री होतो.
खासदारांचा प्रमुख हा पंतप्रधान असतो. ज्या पक्षाचे अधिक खासदार असतील त्याचा पंतप्रधान होतो.

आता कर्मचारी शब्दाच्या जागेवर प्रतिनिधी शब्द टाका, म्हणजे तुम्हाला आणखी समर्पक उत्तर मिळेल.
उत्तर लिहिले · 14/5/2022
कर्म · 283280
0
मला नक्की माहीत नाही. निवडणुकीच्या नियमांनुसार, दोषी ठरलेला कोणताही सदस्य निवडणुकीत भाग घेण्यास अपात्र ठरतो. त्यामुळे, नरेंद्र मोदी 2024 मध्ये निवडणूक लढवू शकतात की नाही हे तपासण्यासाठी, आम्हाला हे पाहावे लागेल की ते खटल्यांमध्ये दोषी ठरले आहेत की नाही आणि न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले आहे की नाही. अधिक माहितीसाठी, तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

निवडणूक आयोगाची वेबसाईट:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040
0

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये निवडणुकीसंबंधी माहिती:

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये साधारणपणे खालील प्रकारच्या निवडणुका होतात:

  1. वर्ग प्रतिनिधी निवड (Class Representative Election): प्रत्येक वर्गातून एक प्रतिनिधी निवडला जातो. हा प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे हित आणि समस्या शिक्षकांपर्यंत पोहोचवतो.
  2. विद्यार्थी परिषद निवड (Student Council Election): काही ITI मध्ये विद्यार्थी परिषद असते. या परिषदेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि इतर सदस्य निवडले जातात. ही परिषद विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करते आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढते.

निवडणूक प्रक्रिया (Election Process):

  1. घोषणा (Announcement): निवडणुकीची तारीख आणि नियमांची घोषणा केली जाते.
  2. नामांकन (Nomination): इच्छुक उमेदवार आपले नामांकन भरतात.
  3. मतदान (Voting): विद्यार्थी मतदान करतात.
  4. निकाल (Result): मतदानानंतर निकाल घोषित केला जातो.

अधिक माहितीसाठी (For More Information):

तुम्ही तुमच्या ITI च्या मुख्यालयात किंवा प्रशासकीय कार्यालयात संपर्क साधून निवडणुकीबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040
0

राम मंदिर निकालाचे श्रेय कोणत्याही एका पक्षाला देणे योग्य नाही. हा निकाल अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आला आहे, ज्यामध्ये अनेक व्यक्ती, संघटना आणि राजकीय पक्षांचा सहभाग होता.

या निकालामध्ये खालील घटकांचा सहभाग होता:

  • न्यायालय: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दीर्घकाळ चाललेल्या खटल्याचा निकाल दिला.
  • राजकीय पक्ष: भारतीय जनता पार्टी (BJP) आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी सतत प्रयत्न केले. BJP Official Website
  • VHP: विश्व हिंदू परिषदेने (VHP) राम मंदिराच्या आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.VHP Official Website
  • इतर संघटना आणि व्यक्ती: अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी या प्रकरणात योगदान दिले.

त्यामुळे, राम मंदिर निकालाचे श्रेय सामूहिक प्रयत्नांना जाते.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040
3
🤔 *लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?*


देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात...

सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात.

तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.

🎯 *कमाल मर्यादा 550* : भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

लेट्सअप
उत्तर लिहिले · 23/5/2019
कर्म · 569225
0

मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) असल्यामुळे, मला निवडणुकीच्या निकालांचा अंदाज लावण्याची क्षमता नाही. निवडणुकीचे निकाल अनेक घटकांवर अवलंबून असतात, जसे की मतदारांचा कल, राजकीय परिस्थिती आणि सामाजिक मुद्दे. त्यामुळे, निश्चितपणे कोणाला बहुमत मिळेल हे सांगणे माझ्यासाठी शक्य नाही.

निवडणुकी संबंधित अधिक माहितीसाठी, आपण निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

https://eci.gov.in/

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040
32
काँग्रेस च्या काळात 1gb डेटा 150 रुपयाला भेटत होत पण आता 5 रुपयाला 1 gb डेटा भेटत आहे म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

ईजराईल कडून बराक मिसाईल सिस्टीम खरेदी केल्या मुळे मोदींना मतदान करायचं आहे...

रशिया कडून s400 मिसाईल सिस्टीम खरेदी केल्या मुळे मोदींना मतदान करायचं आहे...

जात न बघता लाईट मिटर कनेक्शन दिल्या बद्दल मोदींना मतदान करायचं...

गॅस साठी सुद्धा लाईन लावावी लागायची पण आता गावात भेटत आहे गॅस म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

घरकुल साठी जातीची अट रद्द केल्या बद्दल मोदींना मतदान करायचं आहे...

7 कोटी गॅस कनेक्शन गरीब मातांना दिल्या मुळे मतदान मोदींना करायचं आहे...

युरिया साठी शेतकऱ्यांना दोन दोन दिवस लाईन लावावी लागायची पण निमकोटेड युरिया केल्या मुळे मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना युरिया भेटत आहे म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

लोक नाराज होतील हे माहीत असताना सुद्धा देश हितासाठी नोटबंदी केल्या मुळे मोदींना मतदान करायचं आहे....

दिवसाला 90 पैसे भरून 2 लाखाचा विमा भेटत आहे म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

निमकोटेड युरिया करून शेतकऱ्याची युरिया खताची चिंता कमी केली म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

काँग्रेसन 60 वर्षे सत्ता भोगली पण शिवरायांची फोटो राष्ट्रपती भवनात लावली नाही पण मोदींनी लावली म्हणून मोदींना मतदान करायचं आहे....

15 वर्षे मुख्यमंत्री 5 वर्षे पंतप्रधान असताना एकही भ्रष्टाचार केले नाहीत म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...

अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मदत केल्या मुळे मोदींना मतदान करायचं आहे....

देशद्रोही कायदा आणखीन मजबूत करणार म्हणून मोदींना मतदान करायचं...

रोहिग्या, बांग्लादेशी मुसलमानांना परत बांग्लादेशात पाठवायचे आहे म्हणून मोदींना मतदान करायचं आहे...
मुस्लिम बहिणीच्या हितासाठी तीन तलाक बंद केल्या मुळे  मोदींना मतदान करायचं आहे....

पाकिस्तानच्या ताब्यातील अभिनंदनला सोडवून आणल्या बद्दल मोदींना मतदान करायचं आहे...

पाकिस्तानला त्याची औकात दाखवण्यासाठी भारतीय सैनिकांना फ्रीहॅन्ड दिल्यामुळे मोदींना मतदान करायचं आहे...
🙏🙏
उत्तर लिहिले · 21/4/2019
कर्म · 2205