Topic icon

मद्यपान

0
अडचण फक्त दारू पिण्याची आहे, तर दारू सोडवायची असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र.
तेथे जाऊन दारू सोडावा.
उत्तर लिहिले · 8/11/2021
कर्म · 18405
3
ज्याला आपण दारू म्हणतो तो एक प्रकारच्या पेयांचा गट आहे. त्यात बीअरपासून वाईन, रॉम्पेन, व्हिस्की, रम, जिन या प्रकारच्या विदेशी मद्यांबरोबरच संत्री, मोसंबी, फेणी, ताडी, माडी यांसारख्या देशी मद्यांचा समावेश होतो. काही प्रकारची गावठी दारू नवसागर किंवा फ्रेंच पॉलिश यांसारख्या द्रव्यांपासून बनवलेली असते. कोणताही प्रकार असला तरी तिच्यात मद्यार्काचा समावेश असतो. काही गावठी दारूमधला मद्यार्क मिथेनॉल या रसायनाचा असतो. तो अत्यंत विषारी असतो. त्याच्या सेवनामुळे आंधळेपणा येतो. जास्त प्रमाणात त्याचं सेवन झाल्यास मरणही ओढवू शकतं. कायद्यानं मान्यता दिलेल्या देशी किंवा विदेशी दारूमधला मद्यार्क इथेनॉलचा असतो. हे रसायनही तसं विषारी असलं तरी मिथेनॉलसारखं जहाल नाही. त्याचं विघटन करून त्यातला विखार नाहीसा करण्याची क्षमत आपल्या यकृतात असते; पण ही मर्यादित आहे. एका तासात जास्तीत जास्त तीस मिलिलिटर इथेनॉलचा निचरा यकृताकडून होत असतो. त्या संथ वेगानं दारू घेतल्यास ती सहसा चढत नाही. त्यामुळं दारू चढण्याचं प्रमाण हे त्या दारूत इथेनॉलचं प्रमाण किती आहे आणि तिचं सेवन कोणत्या वेगानं होत आहे, यावर अवलंबून असतं. बीअरमध्ये सहसा इथेनॉलचं प्रमाण सहा-सात टक्क्यांहून अधिक असत नाही. म्हणजेच अर्धा लिटर बीअरमध्ये इथेनॉलचं प्रमाण ३५ मिलिलिटर एवढं असतं. एका तासात त्याचा निचरा यकृताकडून होऊ शकतो. त्यापेक्षा अधिक वेगानं दारूचं सेवन केल्यास अतिरिक्त इथेनॉल रक्तात उतरतं. इथेनॉलचे रेणू लहान असल्यामुळं रक्त आणि मेंदू यांच्यामध्ये निसर्गानं जी एक संरक्षक फळी उभी केलेली आहे ती भेदून ते रेणू मेंदूमध्ये प्रवेश करू शकतात. तसं केल्यानं मेंदूतील मज्जापेशी एकमेकींमध्ये संवाद साधण्यासाठी ज्या एका रसायनाचा वापर करत असतात त्या 'गाबा' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या रसायनाशी त्याची प्रक्रिया होऊन मेंदूच्या कामात अडथळा येऊ लागतो. त्याचं काम सैलावतं. खास करून आपल्या सामाजिक वागणुकीचं नियंत्रण करणाऱ्या केंद्राचा ताबा
सुटतो. त्यामुळे मग ती व्यक्ती आपल्यावरची बंधनं झुगारून स्वैर वागणुकीला प्रवृत्त होते. एरवी चारचौघात न केले जाणारे चाळे करण्याकडे त्याची प्रवृत्ती होते. मद्याचं सेवन केल्यापासून ३० सेकंदांतच त्यातला वीस टक्के मद्यार्क रक्तात उतरत असल्यामुळे मेंदूवर त्याचा प्रभाव पडण्यास लगेचच सुरुवात होत असते. मद्यार्काचं रक्तप्रवाहात उतरण्याचं प्रमाण आणि त्याचा यकृताकडून निचरा होण्याचं प्रमाण यांच्यातील समतोलावर, माणसाला दारू किती प्रमाणात चढते हे अवलंबून असतं. हा समतोल फारसा बिघडला नसल्यास दारू फारशी चढत नाही; पण तो जास्तीत जास्त बिघडत चालला तर मग मेंदूचं हालचालींवरचं, मानसिक संतुलनावरचं, वागणुकीवरचं नियंत्रण ढिलं पडायला सुरुवात होते. त्यामुळे वाहन चालवणं किंवा सभ्यतेच्या मर्यादा पाळणं अधिकाधिक अशक्य होऊ लागतं. दारू पिणं थांबवल्यानंतर रक्तात साचून राहिलेल्या मद्यार्काचा संपूर्ण निचरा झाला की माणूस पूर्वपदावर येतो..
उत्तर लिहिले · 18/12/2020
कर्म · 20065
6
*🍾महाराष्ट्रात रोज किती लिटर दारु लागते?*



कोरोना लॉकडाऊनमध्ये दारुविक्रीला परवानगी दिल्यानंतर दारु खरेदीसाठी जी झुंबड उडाली आहे, त्यामुळे या निर्णयावर वेगवेगळ्या दृष्टीकोनातून चर्चा सुरु आहे. दारुविक्रीच्या निर्णयामुळे व्यसनाधिनता वाढेल यापासून ते घरगुती अत्याचारांत वाढ होईल, अशी मतं दारुबंदी समर्थकांनी व्यक्त केली आहेत. तर दारुसाठी उसळलेल्या गर्दीतील दर्दींनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. महसूलवाढीच्या दृष्टीने दारुविक्रीचं समर्थन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचं दारुचं गणित काय आहे? त्याची आकडेवारी जाणून घेऊया.

लॉकडाऊनमुळे तब्बल ४२ ते ४३ दिवसांनी दारुविक्री सुरु झाल्यानंतर सोमवारी १७ कोटी रुपयांची दारु विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मोठा कर आकारूनही राज्यात मोठ्या प्रमाणात दारुविक्री आधीपासूनच होते. ‘राज्यात वर्षभरात ८६.७ कोटी लिटर इतकी दारुची विक्री होते,’ अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी ‘झी २४ तास’ला दिली आहे. ही आकडेवारी पाहता राज्यात दररोज सरासरी २४ लाख लिटर दारु ढोसली जाते. वर्षभरात राज्यात ८६.७ कोटी लिटर दारु विक्री होते, त्यात सर्वाधिक ३५ कोटी लिटर देशी दारुची विक्री होते. तर विदेशी दारु २० कोटी लिटर इतकी विकली जाते. बिअर ३१ कोटी लिटर इतकी विकली जाते. तर वाईन मात्र सर्वात कमी म्हणजे ७० लाख लिटर इतकी विकली जाते.

रोज २४ लाख लिटर दारु विक्री होत असलेल्या महाराष्ट्रात गतवर्षी म्हणजे २०१९-२० या आर्थिक वर्षात १५ हजार ४२८ कोटी इतका महसूल राज्य सरकारला दारु विक्रीतून मिळाला होता. त्यामुळे महिन्याला सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा महसूल राज्याला दारु विक्रीतून मिळतो

*आपल्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की शेअर करा*
उत्तर लिहिले · 5/5/2020
कर्म · 569265
0

वाईन पिण्याचे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे आहेत:

फायदे:
  • हृदयासाठी चांगले: умеренное потребление вина может улучшить здоровье сердца, повышая уровень "хорошего" холестерина и предотвращая образование тромбов. Mayo Clinic

  • अँटिऑक्सिडंट्स: वाईनमध्ये रेझवेराट्रोल (Resveratrol) नावाचे अँटिऑक्सिडंट असते, जे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव करते.

  • स्मरणशक्ती सुधारते: काही अभ्यासांनुसार, умеренное потребление вина может улучшить память и когнитивные функции.

  • तणाव कमी होतो: वाईन प्यायल्याने काही प्रमाणात तणाव कमी होण्यास मदत होते.

तोटे:
  • यकृताचे नुकसान: जास्त प्रमाणात वाईन प्यायल्याने यकृताला गंभीर नुकसान होऊ शकते, जसे की सिरोसिस (Cirrhosis).

  • व्यसन: वाईनचे नियमित सेवन केल्याने त्याचे व्यसन लागू शकते.

  • वजन वाढणे: वाईनमध्ये कॅलरीज जास्त असल्याने वजन वाढू शकते.

  • कर्करोग: जास्त प्रमाणात वाईन प्यायल्याने काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

  • नैराश्य: काही लोकांना वाईन प्यायल्याने नैराश्य येऊ शकते.

निष्कर्ष: वाईन умеренное प्रमाणात पिणे काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते, पण त्याचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे वाईन पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5180
9
उपाय म्हणजे वडिलांना व्यसनमुक्ती दवाखान्यात घेऊन जाणे. व डॉक्टर जे गोळ्या देतील त्या नियमित चालू ठेवा. दारू सुटेल. जर वडील येण्यास तयार नसतील, तर डॉक्टरांना भेटून ही वडिलांना न कळू देता उपचार सुरू करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दारूच्या व्यसनामुळे तुम्ही दुःखी आहात, ते व्यसन स्वतःला लावून घेऊ नका. खूप जण टेन्शनच्या नावाखाली असे व्यसन लावून घेतात. सगळीकडे दुर्लक्ष करून चांगला जॉब मिळविण्यासाठी प्रयत्न करा.
उत्तर लिहिले · 30/1/2020
कर्म · 18405
0

दारूमध्ये इथेनॉल (Ethanol) नावाचा रासायनिक पदार्थ असतो, ज्यामुळे नशा येते. इथेनॉल एक ज्वलनशील आणि रंगहीन द्रव आहे.

दारू प्यायल्यावर शरीरात गरमी येण्याची काही कारणे:

  1. रक्तवाहिन्या विस्तारणे: दारूमुळे रक्तवाहिन्या रुंद होतात, ज्यामुळे त्वचेच्या जवळ रक्त जास्त प्रमाणात येते आणि त्यामुळे गरमी जाणवते.
  2. चयापचय क्रिया: दारूचे पचन करताना शरीर चयापचय क्रिया वाढवते, ज्यामुळे ऊर्जा निर्माण होते आणि गरमी उत्पन्न होते.
  3. मेंदूवर परिणाम: दारू मेंदूतील तापमान नियंत्रण करणाऱ्या भागावर परिणाम करते, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढल्यासारखे वाटते.

इथेनॉल विषयी अधिक माहिती: विकिपीडिया

Disclaimer: अति मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5180
11
तसं पहायलं गेलं तर कोणतीही गोष्ट ज्यात अल्कोहोल असतं ती नुकसानकारकच असते.
पण जर ती गोष्ट योग्य प्रमाणात घेतली तर त्याचे अनेक फायदेही बघायला मिळतात.
अल्कोहोल असलेल्या अशा अनेक गोष्टींपैकी बिअर सुद्धा योग्य प्रमाणात घेतली तर त्याचे तुम्हाला फायदेही होऊ शकतात.
.
बिअरमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी असतं. खासकरून त्या बिअरमध्ये जी फिल्टर केलेली नसते. बिअरमध्ये बी३, बी६ आणि फॉलिक अ‍ॅसिड असतं. बी३ मुळे तुटलेल्या पेशींना मोठा फायदा होतो.
बिअरमध्ये खूप सारं फायबर सुद्धा असतं. ते पोटाला आराम देतं आणि ओव्हरइटिंगवर नियंत्रणही मिळवतं.
.
पण शेवटी व्यसन ते व्यसनच.
एकदा लागलं की लागलंच,त्यामुळे न घेतलेलं कधीपन चांगलं.
.
🙏
उत्तर लिहिले · 4/2/2019
कर्म · 22320