Topic icon

धार्मिक पर्यटन

0

कांदळगावचा रामेश्वर हे एक प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात कांदळगाव नावाच्या गावात आहे.

मंदिराची माहिती:

  • हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे.
  • मंदिरात सुंदर कोरीव काम केलेले आहे.
  • मंदिरात शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आहे.
  • मंदिराच्या परिसरात एक तलाव आहे.

मंदिराचा इतिहास:

या मंदिराची स्थापना पांडवकालीन असल्याचे मानले जाते. कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

मंदिराला भेट देण्याची वेळ:

हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत दर्शनासाठी खुले असते.

जवळपासची ठिकाणे:

  • अलिबाग समुद्रकिनारा
  • कुलाबा किल्ला
  • कर्नाळा पक्षी अभयारण्य

संदर्भ:

उत्तर लिहिले · 21/4/2025
कर्म · 1440
1

धुळे जिल्ह्याहून महाराष्ट्र दर्शनासाठी तुम्ही खालील मार्गांचा अवलंब करू शकता:

पहिला मार्ग: धुळे - नाशिक - त्र्यंबकेश्वर - नाशिक - धुळे (400 किमी)
दुसरा मार्ग: धुळे - नाशिक - त्र्यंबकेश्वर - नाशिक - औरंगाबाद - अजिंठा - धुळे (550 किमी)
तिसरा मार्ग: धुळे - नाशिक - त्र्यंबकेश्वर - नाशिक - औरंगाबाद - अजिंठा - पैठण - धुळे (700 किमी)
यापैकी कोणताही मार्ग निवडताना, तुम्ही तुमच्या वेळेचा आणि बजेटचा विचार करू शकता. जर तुम्ही कमी वेळात जास्त ठिकाणे पाहायची असतील, तर पहिला मार्ग हा सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्ही अधिक वेळ घेऊन जास्त ठिकाणे पाहायची असतील, तर दुसरा किंवा तिसरा मार्ग हा चांगला पर्याय आहे.

तुम्ही ज्या ठिकाणांवर जाणार आहात त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

धुळे: धुळे हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर धुळे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. धुळे हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
नाशिक: नाशिक हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर नाशिक जिल्ह्याचे मुख्यालय आहे. नाशिक हे एक धार्मिक शहर आहे. येथे अनेक तीर्थक्षेत्रे आहेत.
त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर नाशिक जिल्ह्यात आहे. त्र्यंबकेश्वर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या एकत्र येतात.
औरंगाबाद: औरंगाबाद हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर औरंगाबाद जिल्ह्याचे मुख्यालय आहे. औरंगाबाद हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत.
अजिंठा: अजिंठा हे महाराष्ट्र राज्यातील एक गुहा आहे. हे गुहा औरंगाबाद जिल्ह्यात आहे. अजिंठा हे एक प्रसिद्ध बौद्ध लेणी आहे. येथे अनेक सुंदर चित्रे आहेत.
पैठण: पैठण हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर औरंगाबाद जिल्ह्यात आहे. पैठण हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत.
तुम्ही या ठिकाणांवर जाऊन महाराष्ट्र राज्याचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा अनुभवू शकता.
उत्तर लिहिले · 18/8/2023
कर्म · 34255
2
बेळगाव जिल्ह्यातील एकमेव त्रिलिंग मंदिर

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला एक आगळेवेगळे महत्व आहे. या महिन्यात स्वर्गातील देवदेवतांचे दरवाजे खुले असतात. त्यामुळे या महिन्यात भक्तांनी मनोभावे पूजा भक्ती केल्यास पुण्य लाभते व आपल्या मनोकाना पूर्ण होतात, अशी श्रध्दा हिंदू धर्मातील लोकांमध्ये आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात भक्त आपल्या परिसरातील मंदिरांना भेट देवून दर्शन घेत असतात. अनेक भक्तांकडून प्रत्येक सोमावरी व्रत करण्यात येते. चिकोडी शहरातील श्री महादेव मंदिरातही श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भक्त दर्शनाचा लाभ घेत असतात. महादेवाचा वार सोमवार आहे. यानिमित्त शहरातील सुप्रसिध्द श्री महादेव (त्रिलिंग) मंदिराबदल थोडक्यात अख्यायिका...........
रामायण काळापासून अस्तित्वात असलेले श्री महादेव मंदिर चिकोडी शहरातील होसपेठ गल्लीत आहे. हे ऐतिहासिक मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे वर्षभर या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते
श्री राम, लक्ष्मण व सीता वनवासाला जाताना अयोध्येहून दक्षिणेकडे निघाले होते. श्री राम हे शिवभक्त असल्याने ते रोज शिवलिंगाची पूजा करीत असत. वनवासाला जात असताना ते चिकोडी गावावरुन जात होते. त्यावेळी चिकोडी शहराच्या मध्यभागाी सद्या ओढा असलेल्या ठिकाणवरून चिकोत्रा नदी वहात होती.
यावेळी श्री राम, लक्ष्मण व सीता यानी शिवलिंगपूजा करण्यासाठी या नदीच्या काठावरील पश्चिमेकडची जागा निवडली. या ठिकाणी त्यांनी तीन शिवलिंगांची स्थापना करुन पूजा केली. त्यानंतर ते पुढे उमराणीजवळील रामलिंगकोडी, गोकर्ण व रामेश्वर असे भ्रमण करीत पुढे गेले असल्याचा इतिहास सांगितला जातो. त्यांनी शहरातील या नदीच्या काठी तीन लिंग स्थापन केली. तेच आजचे श्री महादेव (त्रिलिंग) मंदिर म्हणून ओळखले जाते.
भगवान श्री रामानी स्थापना केलेल्या या त्रिलिंग शिवलिंगाच्या ठिकाणी त्याकाळच्या जनतेने लहान दगडी मंदिर बांधले. त्यानंतर 1973 साली या परिसरात त्रिलिंग युवक गजानन मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने पहिल्यांदा या मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कार्य पाहून त्याकाळच्या जुन्या मंदिर कमिटीने मंदिराची धुरा तरुण मंडळाकडे सोपविली. पुढे 2001 साली श्री त्रिलिंग गजानन युवक मंडळ व महादेव ट्रस्ट कमिटीची स्थापना झाली. याचवर्षी मंदिरात भव्य असा लक्षदिपोत्सव साजरा करण्यात आला होता.
महादेव मंदिर कमिटीने 2001 साली या मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम हाती घेतले. यासाठी चिकोडी पंचक्रोशीतील जनतेने देणगीच्या स्वरुपात सहकार्य केल्याने भव्य असे नूतन महोदव मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर 5 व 6 ऑगस्ट 2014 रोजी मंदिराचा कळसारोहन, नंदी प्रतिष्ठापना, जिर्णोध्दार कार्यक्रम झाला. तसेच मंदिराच्या आवारात भक्त, लोकप्रतिनिधी व नगरपालिकेच्या मदतीने कल्याण मंडपाची उभारणी केली. या मंदिराची स्वच्छता, धार्मिक पावित्र्य जपण्यावर मंदिरकमिटीने भर दिला आहे. या मंदिरात रोज शिवशंकर शास्त्री हिरेमठ व प्रबय्या हिरेमठ हे पूजा विधी करीत असतात.
या मिंंदरात महाशिवरात्रीनिमित्त प्रत्येकवर्षी मोठी यात्रा भरते. या यात्रेत दर्शनासाठी शहरासह संपूर्ण तालुक्यातील लोक गर्दी करीत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे 3 ते 7 पर्यंत अभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. दिवसभर दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते. सकाळी 8 वा. श्री मूर्तीची वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणून काढण्यात येते. त्यानंतर दिवसभर भाविक शिवनामाचा जप करीत असतात. दुसर्या दिवशी महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेतात.
या मंदिरात मनोभावे पूजा करुन एखादे मागणे मागितल्यास ते पूर्ण होते.जसे नोकरी, व्यवसायातील समस्या, अपत्य न होणे यासारख्या समस्यांचे निवारण झाल्याचे अनुभव भक्त लोक सांगतात.या मंदिरात श्री राम, लक्ष्मण व सीता यांनी स्थापना केलेले त्रिलिंग आहे. एकाच ठिकाणी तीन शिवलिंग दुर्मिळच पहायला मिळत असतात.अशाप्रकारचे त्रिलिंग  संपूर्ण बेळगांव जिल्ह्यात अन्यत्र पहावयास मिळत नाही. तसेच श्रीरामांनी या शिवलिंगाची स्थापना केल्याने या मंदिरास विशेष महत्व आहे.♍
https://bit.ly/341KufO

2
दत्तक्षेत्र – कडगंची गुरूचरित्र लिहिलेले ठिकाण
      _______________
आदिलशहाने स्थापलेले मंदिर

दि १६ आॅगष्ट २०२०
कर्नाटक राज्यात गुलबर्गा पासून २१ कि.मी. वर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले हे दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री नृसिंह- सरस्वतींच्या करुणा पादुकांची इथे स्थापना केलेली आहे. दत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील अत्यंत विलोभनीय मूर्ती इथे विराजमान झालेली दिसते. श्रीदत्तात्रेयांच्या अवतारपरंपरेतील श्रीनृसिंहसरस्वतींचा चरित्र व कार्यविषयक प्रमाणग्रंथ म्हणजे त्याचे शिष्य श्री सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील सत्पुरुष श्री सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा लिहिलेला प्रासादिक आणि उपदेशस्वरूप ग्रंथ होय. सायंदेव हे कडगंचीचे असल्यामुळे श्रीसरस्वती गंगाधर यांनी हा ग्रंथ कडगंची इथेच लिहिला. त्याची मूळ प्रत इथे आहे. सध्या त्यावरच दत्तमंदिर उभे असून ते आता श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान या नावाने परिचित आहे. गुरुचरित्राची मूळ प्रत इथे असल्याने श्रीनृसिंहसरस्वती यांची वाङ्मयमूर्तीच इथे आहे असे समजले जाते. दत्तसंप्रदायामध्ये दत्तगुरूंच्या पादुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीनृसिंहसरस्वतींचे चार पट्टशिष्य होते. सायंदेव, नंदीनामा, नरहरी आणि सिद्धमुनी. नृसिंहसरस्वतींच्या पादुका सायंदेव यांना पूजेसाठी मिळाल्या होत्या. सायंदेव यांच्या कडगंची येथील घरी त्यांच्या वंशजांनीसुद्धा त्या जतन करून ठेवल्या होत्या. त्यांनाच करुणापादुका असे म्हणतात. देवस्थानातील दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ या पादुका ठेवलेल्या आहेत. सायंदेवांच्या राहत्या घराचे पुनरुज्जीवन करून तिथे सध्याचे श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान झाले आहे. श्रीशिवशरणप्पा मादगोंड यांनी अपार कष्ट करून या देवस्थानाचा जीर्णोद्धार केला आहे. जवळच असलेल्या गाणगापूरला निर्गुण पादुका आणि कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत यामुळे ही दोन्ही ठिकाणे दत्तसंप्रदायामध्ये महत्त्वाची ठरली आहेत. दत्तजयंतीच्या निमित्ताने ‘कडगंची कस्तुरी’ नावाची स्मरणिका दर वर्षी इथे प्रकाशित केली जाते. संस्थानची गोशाळा असून भक्तांसाठी यात्रीनिवासाची सोय इथे आहे.
श्री सायंदेव दत्त देवस्थान ट्रस्ट समिती,
श्री क्षेत्र कडगंची, ता.आळंद, जि.गुलबर्गा, कर्नाटक
संपर्क क्र.- (०८४७७) २२६१०३, ९७४०६२५६७६
______________     https://bit.ly/2DXuEbn
विजापूरला दत्ताचे एक पुरातन मंदिर असून ते तिथल्या नृसिंह मंदिर परिसरातच वसलेले आहे. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की, श्रीनृसिंहसरस्वतींचा एक मुसलमान भक्त त्या वेळच्या विजापूरचा बादशहा इब्राहिम अली याने या मंदिराची स्थापना केली आहे. तर काही संदर्भानुसार इब्राहिम अली या मंदिरात दर्शनासाठी येत असे. गुरुचरित्राच्या ९ व्या आणि ४९ व्या अध्यायात एका रजकाची कथा येते, त्यानुसार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा एक रजक भक्त त्यांच्याकडे राजा होण्याची इच्छा व्यक्त करतो. श्रीपाद श्रीवल्लभ त्याला तू पुढील जन्मात राजा होशील असा वर देतात. तोच हा इब्राहिम अली होय, असे मानले जाते. त्याच्या पायाला झालेली जखम श्री नृसिंहसरस्वती यांनी केवळ दृष्टीमात्रे बरी केली आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण करून दिले. नंतर हा बादशाह स्वामींचा अनन्यभक्त झाला अशी ही कथा. आपल्या दर्शनाचा लाभ निरंतर घडावा अशी त्याने स्वामीचरणी मनोभावे प्रार्थना केली. त्याचा सद्भाव पाहून स्वामींनी ती मान्य केली. विजापुराभोवती असलेल्या खंदकाच्या मध्यभागी पश्चिमेस जो पिंपळाचा वृक्ष आहे तिथे किल्ल्यात माझ्या पादुका तुला मिळतील त्यावर मंदिर बांधून माझी सेवा कर असे स्वामींनी त्याला सांगितले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे बादशहास त्या पिंपळवृक्षाखाली पादुका सापडल्या. त्यावर त्याने मंदिर बांधले व श्रींची सेवा केली. पुढे त्या पिंपळवृक्षाला आत घेऊनच नृसिंहाचे देवालय उभारण्यात आले. आणि मंदिरात दत्तमूर्ती बसविण्यात आली. देवालयाला लागून पाण्याचा मोठा खंदक आहे. या खंदकाला देवळाच्या अंगाने एक घाटही बांधण्यात आलाय. या मंदिरात गुरुवारी आणि धार्मिक सणांच्या दिवशी श्री दत्ताचा छबिना काढतात. दत्तजयंती आणि गणेश चतुर्थी हे दोन उत्सव इथे मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. या मंदिराची माहिती असलेले पुरातन शिलालेख विजापूरच्या पूर्व आणि उत्तर दरवाजाजवळ बसवलेले आहेत.
https://bit.ly/2DXuEbn

12
हिंदू धर्मात चार पवित्र क्षेत्रांना चार धाम म्हटलेले आहे व चार धामांची यात्रा सांगितली आहे. ते चार धाम खालीलप्रमाणे-

बद्रीनाथ (उत्तराखंड)
केदारनाथ (उत्तराखंड)
गंगोत्री (उत्तराखंड)
यमुनोत्री (उत्तराखंड)

वैष्णव तीर्थे

आदिगुरू शंकराचार्य यांनी परिभाषित केल्याप्रमाणे तेथे चार वैष्णव तीर्थे आहेत. जिथे प्रत्येक हिंदूला त्याच्या आयुष्यात जाणे आवश्यक आहे, जे हिंदूंना मोक्ष प्राप्त करण्यास मदत करेल. याच्या उत्तरेस बद्रीनाथ, पश्चिमेस द्वारका, पूर्वेस जगन्नाथ पुरी व दक्षिणेस रामेश्वरम् धाम आहे

आदि शंकराचार्यांचे चार मठ भारताच्या चार कोपऱ्यात आहेत. ते असे :-

  • पश्चिम दिशेला शारदा मठ, द्वारका (गुजरात) ... स्थापना युधिष्ठिर संवत् २६४८
  • दक्षिणेला शृंगेरी (चिकमंगलूर), रामेश्वर (वेदान्त मठ तामिळनाडू) ... स्थापना-युधिष्ठिर संवत् २६४८
  • पूर्वेला जगन्नाथपुरी (गोवर्धन मठ, ओरिसा)... स्थापना युधिष्ठिर संवत् २६६५
  • उत्तरेला ज्योतिर्पीठ, (बद्रीनाथ (उत्तराखंड) ... स्थापना-युधिष्ठिर संवत् २६४१ ते २६४५
चार धाम

1. बद्रीनाथ





बद्रीनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. बद्रीनाथ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून व ते राजधानी डेहराडूनच्या ३३५ किमी ईशान्येस स्थित आहे.

आद्य शंकराचार्यांनी ९व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.

2. रामेश्वर





रामनाथस्वामी मंदिर (मराठी लेखनभेद: रामेश्वर ; तमिळ: இராமேஸ்வரம் ;) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम द्वीपावरील रामेश्वरम शहरामधील एक शिवमंदिर आहे. हिंदू मान्यतांनुसार रामाने रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी शंकराची आराधना केली. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते.

3. द्वारका





द्वारकाधीश मंदिर हे भारत देशाच्या गुजरात राज्यातील द्वारका शहरामधील कृष्णाचे एक मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी द्वारकाधीश मंदिर एक आहे. हे मंदिर गुजरातच्या देवभुमी द्वारका जिह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ स्थित आहे. ह्या म्ंदिराचे वय २,२०० -२,०००० वर्षे असावे असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

4.  जगन्नाथपुरी





जगन्नाथ मंदिर (उडिया: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର୍) हे भारत देशाच्या ओरिसा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंगभीमदेव याने केली.



उत्तर लिहिले · 1/8/2020
कर्म · 44255
2
पावसासाठी अनेक ठिकाणी होमहवन केले जातात. होमहवन केल्यानंतर किती पाऊस पडतो हा संशोधनाचा विषय असला तरी मल्हार राग आळवला की पाऊस पडतो म्हणतात़

पण जामखेड तालुक्यातील जवळा येथे नर्तिकांच्या पायातील घुंगरांचा आवाज झाला की हमखास पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे़ म्हणूनच गावात आषाढी एकादशीला नर्तिका पायात घुंगरु चढवतात़
जामखेड तालुक्यातील जवळा येथे आषाढी एकादशी निमित्त रथयात्रा असते. जवळेश्वर रथ तब्बल १०० वर्षांपासूनचा असून, राज्यातील सर्वांत जुना रथ म्हणून याकडे पाहिले जाते. हा रथ भव्य असून, रथ वळविण्यासाठी स्टेअरिंग नसलेला हा एकमेव रथ आहे. वळणाच्या रस्त्यावर रथास मागे पुढे करूनच वळवावे लागते. जवळेश्वर यात्रेमध्ये नृत्यांगना मोठ्या प्रमाणात नृत्य करण्यासाठी येतात. गावातील प्रत्येक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या नर्तिकांच्या पायातील घुंगरु वाजल्यानंतर पाऊस पडतो, अशी आख्यायिका आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे़ मात्र, जवळा येथे अद्याप पाऊस नाही़ दरवर्षी आषाढी एकादशीनंतर जवळा येथे मोठा पाऊस होतो़ आषाढी एकादशीनिमित्त गावात आलेल्या नर्तिकांच्या घुंगरांच्या आवाजामुळेच पाऊस पडतो, अशी येथील पिढीजात धारणा आहे़ त्यामुळे या यात्रेला मोठे महत्व असते़♍
ही रथयात्रा १९ जुलैपर्यंत चालणार आहे. ही रथयात्रा आषाढ शुद्ध एकादशी ते गुरुपौर्णिमा असे ५ दिवस चालते. आषाढी एकादशीच्या दिवशी जवळ्याचे ग्रामदैवत जवळेश्वराची आरती करून रथयात्रेस प्रारंभ होतो. गावातील एकूण १० मंडळांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम रात्रभर चालतो. नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळा पंचक्रोशीतील हजारो लोक येतात. पहिल्या दिवशी सर्व मंडळांच्या नर्तिका जवळेश्वर मंदिरात येऊन जवळेश्वराची आरती करतात. यात्रेमध्ये विद्युत रोषणाई डोळे दिपवणारी असते. शेवटच्या दिवशी म्हणजे ५ व्या दिवशी जवळेश्वराच्या मुकुटाची रथामध्ये प्रतिष्ठापना केली जाते. दुपारी जवळेश्वराची आरती करून मुख्य रस्त्याने मिरवणूक निघते. रथासमोर नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम असतो. रथास मोठमोठे दोर लावून ओढले जाते. रथ ओढण्यास ५० ते ६० लोक लागतात. रथाला नारळाचे तोरण अर्पण करतात. जवळजवळ ३०,४० हजार नारळांचे तोरण रथात असते.
*🔹१०० वर्षांचा रथ*
राज्यातील सर्वांत मोठा साधारण १०० वर्षांपूर्वीचा हा रथ आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला येदू सुरवसे या सुताराने तो तयार केला आहे. त्यामुळे रथात बसण्याचा मान सुरवसे परिवाराला आहे. अजून रथाची कसलीही मोडतोड झालेली नाही. दरवर्षी रथास तेल लावून मगच त्यात मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते.♍
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_289.html

0
_*⭕ शीर्षासन अवस्थेतील हनुमान मूर्ती ⭕*_
जगातील एकमेव मुर्ती_

भारतात सर्वाधिक देवळे हनुमानाची असल्याचे आकडेवारी सांगते. या मंदिरातून हनुमानाच्या बैठ्या, उभ्या मूर्ती दिसतात. अलाहाबाद इथे झोपलेल्या हनुमनाची मूर्ती आहे. मात्र जगातील एकमेव अशी शीर्षासन अवस्थेतील मूर्ती पहायची असेल तर इंदोर उज्जैन रस्त्यावरील सावेर गावाला भेट द्यावी लागेल. या मंदिराला पातळविजय मंदिर म्हणतात.

या मंदिराची अशी कथा सांगितली जाते जेव्हा राम रावण युद्ध सुरु होते तेव्हा रावणाच्या मदतीला आलेल्या अहिरावणाने मायावी शक्तीने राम लक्ष्मण यांना अंधारात पाताळात नेले. तेथे तो त्यांचा बळी देणार होता. मात्र राम लक्ष्मण गायब झाल्याचे व त्यांना पाताळात नेल्याचे समजल्यावर त्यांच्या सुटकेसाठी हनुमान पाताळात निघाले. त्यावेळी त्याचे पाय आकाशाकडे तर डोके जमिनीकडे होते. पाताळात गेल्यावर हनुमानाने अहिरावण याचा वध करून रामलक्ष्मण यांना सोडवून आणले. म्हणजेच त्यांनी पाताळ विजय मिळविला. या विजयाचे प्रतिक म्हणून हि मूर्ती उलट्या अवतारात आहे.या मंदिरात राम लक्ष्मण सीता यांच्या मुर्तीही आहेत. असे सांगतात कि या मंदिरात जे भाविक सलग तीन किंवा ५ मंगळवार दर्शनालायेतात यांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. हे मंदिर १२०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. या आवारात अनेक साधू संतांच्या समाध्या आहेत.