Topic icon

भक्ती

1
बजरंग बाण पाठ साधारणतः मंगलवार आणि शनिवार या दिवसांना अधिक फलदायी मानला जातो.
 * मंगलवार: मंगलवार हा हनुमानजीचा दिवस असल्याने या दिवशी पाठ करणे विशेष शुभ मानले जाते.
 * शनिवार: शनिवार हा शनिदेवचा दिवस आहे आणि हनुमानजी शनिदेवचे भक्त आहेत, म्हणून शनिवारीही पाठ करता येतो.
आपण इतर दिवसांनाही बजरंग बाण पाठ करू शकता. मात्र, मंगलवार आणि शनिवार हे दिवस विशेष महत्वाचे मानले जातात.
पाठ करताना काही गोष्टी लक्षात ठेवा:
 * शांत वातावरण: पाठ करताना शांत आणि शांत वातावरण असावे.
 * शुद्धता: स्नान करून स्वच्छ कपडे घालून पाठ करावा.
 * एकाग्रता: पाठ करताना मनात इतर विचार न आणता एकाग्र रहावे.
 * नियमितता: नियमितपणे पाठ करण्याचा प्रयत्न करावा.
बजरंग बाण पाठ करण्याचे फायदे:
 * मन शांत होते.
 * नकारात्मक विचार दूर होतात.
 * आत्मविश्वास वाढतो.
 * संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते.
जर तुम्हाला बजरंग बाण पाठ करण्याची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊ शकता.
नोट: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणत्याही धार्मिक विधी करण्यापूर्वी आपल्या गुरू किंवा धार्मिक मार्गदर्शकांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
तुम्हाला बजरंग बाण पाठ करण्याच्या बाबतीत आणखी काही प्रश्न असतील तर विचारू शकता.

उत्तर लिहिले · 1/8/2024
कर्म · 6600
0
आद्य आरंभ आई माझी माय माऊली जिच्या ठायी एक तत्व आद्य पूर्ण असा जो ईश्वर ज्याची ओळख करून सहजतेने विशालतेकडे झेपावत जाणं शक्य आहे.
त्याकरिता आपण आपली भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे.
होय , त्यासाठी आई कडून आशिर्वाद घेऊन आत्म तत्व काय आहे, त्याचं शिक्षण झाले तर मला तुम्हांला माहिती मिळेल अशी एक देवता जी विद्या सरस्वती आहे तिच्याकडून जाणकारी प्राप्त होते . मानवाला कान नाक डोळे तोंड पाय  त्वचा  आदि सजग संवेदनशील असे मिळाले आहेत. त्याद्वारे आपल्याला जाणकारी ओळख करून देण्यात हे मन मेंदू मनगट मजबूत करावे लागते. विद्या सरस्वती ही काया मने वाचे आपणांस उघड्या डोळ्यांनी शिक्षण देते. या निसर्गातील पशुपक्षी कीटक झाडे वनस्पती वनराई तसेच हे डोंगर दर्यां निर्झर धबधबे जलप्रवाह नदी ओहळ सागर आकाश आदि द्वारे शिक्षण उपलब्ध आहे.  हे उद् भव पाहून ओळख ही  दृढ विश्वासाने कायमदायम होते आणि मनी समर्थपणे रूजते. कारण देवाचेच देणं जे वर्तमान आज ही आहे पूर्वीही होते व निसर्ग पुढेही तेच चालू ठेवेल. कारण कणाकणात देवकणांची ऊर्जा ताकद शक्ति बळ अजर अमर आहे हा विश्वास आहे.
हे सुज्ञानी लोक जाणतात आणि मग हे विज्ञान नियमांचा आधार घेत आपले कौशल्य वाढीस लागते. हे एकच एक तत्व दृढ आहे तर मग आपण विवेक विचारधारा जपुन काही मिलवर्तन परिवर्तन घडवून आणू शकतो . हा विश्वास स्थिरमनाचा भाग माणसाला स्वस्थ कसा बसू देईल . जर निसर्ग कायमदायम समर्थपणे आपले चक्र सुरू ठेवतोय तर माझी निरिक्षणे नोंदवली पाहिजेत व बदल करता येणार अशी बुद्धी त्यांनेच दिली आहे. तिचा वापर करून मला प्रतिसाद मिळतोय का याचा विचार मागोवा हे ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रज्ञान एकमेकांना पूरक होईल ही जिज्ञासा जागी झाली. यात आर्तता आहे व अर्थार्जन ही आहे . मग आपले ज्ञान तेजाचे प्रतीक हे झळकले पाहिजे अशी निर्मल ओढ लागली. 
ही आर्तता आर्थार्थी जिज्ञासू वृत्तीने ज्ञानी बनली तरच मिलवर्तन एक सद्भाव सद्विचार पुढे परिवर्तन घडुन येईल ही खात्री झाली. यातूनच नवविधा भक्ती भाव मिळत गेला .आणि माणूस या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी करत एकनिष्ठ राहण्याची किमया साधताना तहानभूक विसरला . उपासतापास  सुरू झाले . व्रतवैकल्ये साधनं समोर आली. एक नवीन दृश्य पाहून आनंदित वृत्तीने सर्व मनोकामना संकल्प कृतिशील वाटचालीने निश्चितच पूर्ण होतील हे जाणून तो हरीला भजू लागला . आता हरी हा व्यथा दूर करणारा , हर्ता कर्ता करविता आहे .ही मूळ माऊली आई आहे .आणि आत्मा ईश्वरी देहादेही एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी...अशी ही आठवण ...कधी विसर ना व्हावा...संतसंग देई सदा ...असा भाव... भाव तोचि देव भावेविण देव न कळे नि :संदेह ... ही भावना स्थिर झाली , आणि हृदयांहृदयी हा अंश देवकणं प्रत्येक मानवी हृदयांत 
 लपला आहे तोच आत्मा हा पांडुरंगाचा एक अंश  आहे त्यालाच आपण सतत सक्रीय सहभाग घेऊन कार्यप्रवण करण्यासाठी सतत ध्यानी मनी जागृती स्वप्नी नामामृताने अंभ्यग्यस्नान घालावे लागेल . भजन पूजन कीर्तन सत्संग सेवेने हा अंश चमकदार बनतो व मुखकमलावर एक गोड तेज येते . असा चैतन्य लावण्याचा गाभा प्रकाशित राहील हे पाहिले पाहिजे. आयुष्याचा ताणाबाणा बुनियाद विणं ही रेशीम वस्त्राप्रमाणे मजबूत व्हावी . हातात काम मुखाने राम..
हे विठ्ठल, विठ्ठल जय हरी नाम अमृत कुपी साधुसंतांना सापडली .
म्हणून तो हा विठ्ठल बरवा,तो हा माधव बरवा करीत पायी वारी करत आहे कारण तो देव एक करूनी घ्यावा, त्याशिवाय सुख समाधान नाही. ही खात्री आहे की, विटेवरचा पांडुरंग हा वाटसरूंना , चुकलेल्या लोकांना , थकलेल्या जीवाला, असाह्य वेदनांना पळवून लावणारा तसेच आंधळ्या पांगळ्यांना ही डोंगर पार करायला बळ देतोय ,असा विश्वास वाटतो. 
आणि म्हणूनच जनजागृती व्हावी यासाठी समर्पित भावनेने सेवा देणारे सत्यार्थी भावार्थी आपल्यात सामावून घेत मनं जोडण्याची किमया साधत ही आषाढी एकादशी निमित्त जी वारी आहे तिला एक आगळं वेगळं महत्त्व आहे, देवशयनी एकादशी या व्रताचा ही महिमा आहे, तुझे नाम घेता देवा होई समाधान...असं  ते प्रेमानं जगणं सुंदर करीत पुढे वाट चालत आहे.सर्व दुःख यातना सहन करत तो भजनात किर्तनात एकरसी एकनिष्ठ एकजीवी दैदिप्यमान प्रेम कामगिरी विश्वासाने पार पाडतो आहे.. कारण विठ्ठल मी पाहिला... आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु, हरि पाहिला रे हरि पाहिला रे, सबाह्य अभ्यंतरी व्यापक हा मुरारी...
वि म्हणजे विनाश ना होणारा अटळ अजर अमर अखंड                          एकच एक जो विशुद्ध आहे..
ठ्ठ म्हणजे जिकडे तिकडे चोहीकडे मागे उभा मंगेश पुढे उभा                    मंगेश असा ठासून भरलेला 
ल म्हणजे ज्याला अंत लय नाही असा...हा पांडुरंग 
तो पूर्ण अंश प्रभु परमात्मा आहे..
वारी वारी जन्ममरणांते वारी,हारी पडलो आता संकट निवारी !!!
या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी आहे आणि म्हणूनच या वारीत .... १. कुणालाही निमंत्रण नाही 
२. कुठलीचं भंपकबाजी नाही.
३.कोणाचा कोणावर राग रूसवा नाही 
४. कोण खायला घालेल की नाही हे माहित नाही 
५.खिशात एक रूपया या दमडीची गरज नाही 
६.कुठेही गालबोट लागत नाही 
७.इहलोकी एवढां मोठा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही  नाही 
८. कोठेच कुणाजवळ गर्वाचा किंवा अहंकाराचा लवलेश नाही 
९. असा नेत्रदिपक सोहळा , ऊर भरून आनंद प्रसन्नता लाभणारा सोहळा 
१०. श्रीमंतच नाही तर गर्भश्रीमंतीचा सोहळा,कुबेराला ही लाजवेल असा दिमाखदार सोहळा 
११.   हा सगळा वारीचा अट्टाहास का ?
         तर फक्त....
       मुख दर्शन व्हावे आता, 
        तू सकळं जनांचा दाता  ||
       घे कुशीत या माऊली तुझ्या 
        पायरी ठेवीतो माथा. !!!

या आषाढी एकादशीच्या दिवशी आपले मन नमन करून सहजतेने विशालतेकडे पहात ... देवा तूचि गणेशु, सकलार्थ मति प्रकाशु... भला करो कर्तार,सबका सबविधी हो कल्याण !!!
दुरितांचे तिमीर जावो,विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ...
जो जो वांछिल ते ते लाहो सकळ प्राणिजात  !!
विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय जय राम कृष्ण हरी !!

 
उत्तर लिहिले · 17/7/2024
कर्म · 475
2
श्री गणेशा .. म्हणणं ही खरी रीत आहे.
एकतर विश्वासाने एक तत्व दृढ धरी मना...असा भाव ठेवून नेहमीच्या ठिकाणी, त्या दुकानात जाऊन माल घ्यावा.
दुसरं असं आहे, आपली शेती ,माती आमची मेहनत ,श्रम यांची बांधिलकी प्रेमभाव आहे . नियोजन हवे.पाणी व बी पेरताना योग्य जाणीवेतून सुंदर परिस्थिती वस्तुस्थिती पाहता जमिनीला सुयोग्य घहात पाहिजे ते पाहून , आपली तयारी..बी पेरताना आनंदी मन हवे . 
सर्व मनोकामना संकल्प कृतिशील वाटचालीने निश्चितच पूर्ण होतात . माती परीक्षणानुसार खताची मात्रा द्यावी.सुयोग्य पाणी नियोजन रहावे . 
आणि खात्रीशीर बियाणे उगवण शक्ती आदि अजमवावी .
सगळं काही प्रेमानं केल़ तर सेवा निर्मल महान कार्य करते.
पेरुनि शेता जाईजे... पहा उगवण क्षमता ऊर्जा बलस्थान आहे ते कर्म बोलते आहे... निश्चितच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असतात.. तण खुरपणी कोळपणी कौशल्याने करा . खतमात्रा द्यावी. पाणी पुरवठा पावसाने योग्य हजेरी लावली तर आपले पिक शिवारात उभे राहिल डोलेल वाढेल बिजधारणा वगैरे पोषक वातावरण निर्माण होईल.. ही ईश्वरचरणी प्रार्थना करत रहायचं असतं... शेवटी आधार कोणाचा शोधावा... त्या एकाचा !!
उत्तर लिहिले · 14/6/2024
कर्म · 475
2
.


१.सोहं शब्दाचा मारा केला। विठ्ठल काकुलती आला।।’ या ओळीतील सरळ अर्थ .
उत्तर:
संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्रीविठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडला. श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये, म्हणून त्याच्यावर ‘तू म्हणजे मीच’ या अहंभावाचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की, मी तुझ्या हृदयात राहीन, पण सोहं शब्दांचा मारा थांबव.


२.‘जनी म्हणे बा विठ्ठला। जीवे न सोडी मी तुला ।।’ या ओळींतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट 
उत्तर:
संत जनाबाईंना श्रीविठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा, असे वाटत होते. म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला. शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सोहं शब्दाचा मार दिला. शेवटी श्रीविठ्ठल हृदयातून जाऊ नये; म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली. या शेवटच्या उपायाने तरी श्रीविठ्ठलाने मनात घर करून राहावे, असे संत जनाबाईंना वाटत होते. *
उत्तर लिहिले · 24/7/2023
कर्म · 53710
0

आचार्य विनोबा भावे यांच्या 'गीता प्रवचने' मधील १२ व्या अध्यायातील सगुण-निर्गुण भक्ती:

अर्जुन: अर्जुन म्हणाला, जे भक्त सतत तुमच्या सगुण रूपाची भक्ती करतात आणि जे अक्षर व अव्यक्त अशा निर्गुण स्वरूपाची उपासना करतात, त्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण?

भगवान श्रीकृष्ण: श्रीकृष्ण म्हणाले, ज्यांनी आपले मन माझ्यामध्ये स्थिर केले आहे आणि जे सतत श्रद्धेने युक्त होऊन माझी उपासना करतात, ते मला अधिक प्रिय आहेत. परंतु जे भक्त इंद्रियांना वश करून, सर्वव्यापी, अचल, निराकार अशा अव्यक्त स्वरूपाची उपासना करतात, ते सुद्धा मला प्राप्त होतात.

अव्यक्त स्वरूपाची उपासना करणाऱ्यांना अधिक कष्ट होतात, कारण मनुष्याला देहाभिमानामुळे निराकार स्वरूपाची कल्पना करणे अधिक कठीण जाते. म्हणून सगुण भक्ती सुलभ आहे. जे आपले सर्व कर्म मला अर्पण करून, माझ्यावर निष्ठा ठेवून, अनन्य भक्तीने माझे ध्यान करतात, मी त्या भक्तांना या संसार सागरातून लवकरच मुक्त करतो.

म्हणून, अर्जुना, तू आपले मन आणि बुद्धी माझ्यामध्ये स्थिर कर. त्यामुळे तू निश्चितपणे मला प्राप्त होशील. जर तू आपले मन माझ्यामध्ये स्थिर करू शकत नसेल, तर अभ्यास योगाने मला प्राप्त करण्याची इच्छा धर. जर तू अभ्यास योग करण्यासही असमर्थ असशील, तर माझ्यासाठी कर्मे कर. तू माझ्यासाठी कर्मे करूनही सिद्धी प्राप्त करशील.

जर तू हेही करू शकत नशील, तर आपल्या चित्ताला वश करून, कर्माच्या फळाचा त्याग कर. कारण ज्ञानापेक्षा अभ्यास श्रेष्ठ आहे आणि अभ्यासापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षा कर्म फल त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने शांती प्राप्त होते.

टीप: अचूक माहितीसाठी, तुम्ही 'गीता प्रवचने' हे पुस्तक वाचू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440
0

'टिळा टोपी उचलावी' या अभंगाचा मथितार्थ असा आहे:

मथितार्थ:

  • बाह्य Marks ला महत्व देऊ नका: समाजात काही लोक केवळ बाह्य Marks जसे टिळा, टोपी किंवा विशिष्ट वेशभूषा धारण करून धार्मिक किंवा प्रामाणिक असल्याचा देखावा करतात.
  • अंतर्गत शुद्धता महत्त्वाची: Sant Tukaram Maharaj म्हणतात की केवळ बाह्य Marks दर्शवण्यापेक्षा माणसाने आंतरिक शुद्धता आणि प्रामाणिकपणा जपावा.
  • एकात्मतेचा संदेश: या अभंगातून Sant Tukaram Maharaj यांनी समाजाला एकजूट राहण्याचा आणि बाह्य Marks च्या आधारावर भेदभाव न करण्याचा संदेश दिला आहे.

संदर्भ:

  • [Sant Tukaram Maharajanchi Abhangwani](https://www.santeknath.org/shri-sant-tukaram-maharaj-abhang-9)
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440
1
व्यतिरेक अलंकार
उत्तर लिहिले · 8/10/2022
कर्म · 7460