शिक्षण व्यक्तिमत्व विकास

श्री समर्थ आणि वर्णन केलेली मुलांची दिनचर्या कोणती?

2 उत्तरे
2 answers

श्री समर्थ आणि वर्णन केलेली मुलांची दिनचर्या कोणती?

1
 सद्गगुरू समर्थ रामदास स्वामी यांनी कायम च त्यांच्या साहित्यातून याविषयी मार्गदर्शन हे केले आहे.मुलांच्या दिनचर्ये विषयी सांगायचं झालं तर मुलांनी प्रातःकाळी सूर्योदयाच्या पूर्वी आपल्या सर्व विधी ह्या कराव्यात ,श्री हनुमंताचे स्मरण करून व्यायाम करावा आणि बलदंड देहाची प्राप्ती करावी .जे जे रघुनाथ कृपेने आपल्याला लाभलेले आहे त्याचे त्याला पुन्हा सहीसलामत शरीर माघारी करता यायला हवं असं त्यांचं या पाठीमागील दृष्टीकोन असेल 

समर्थांच्या साहित्यातील काही श्लोक 
बरे दांत घांसोनि तोंडा धुवावे 
कळाहीन घाणेरडे बा नसावे 
सदा सर्वदा यत्न सांडू नको रे 
बहुसाल हा खेळ कामा न ये रे ||

दिसांमाजि काहींतरे तें लिहावे
प्रसंगे अखंडीत वाचीत जावें
वये श्रेष्ठ रे दास्य त्यांचे करावे
बरे बोलणे सत्य जीवीं धरावें।।
आशा अनेक श्लोकांनी समर्थानी केलेला उपदेश हितकारक आहे .समर्थ माउलींनी बलोपासनेच्या माध्यमातून अखंड कार्य सुरू केले होते ते आज ही त्याच वेगाने सुरू आहे ,फक्त आपण आत्मसात करून अंमलात आणण ही येऊ घातलेल्या काळाची गरज आहे .

जय जय रघुवीर समर्थ।।

उत्तर लिहिले · 12/12/2024
कर्म · 120
0

श्री समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या 'मनाचे श्लोक' या रचनेत मुलांची दिनचर्या कशी असावी याबद्दल काही मार्गदर्शन केले आहे. त्या संदर्भात काही माहिती खालीलप्रमाणे:

  1. सकाळी लवकर उठावे:

    मुलांनी सकाळी लवकर उठून देवाचे स्मरण करावे.

  2. आई-वडिलांना व गुरुजनांना वंदन करावे:

    लहान मुलांनी उठल्याबरोबर आई-वडिलांना आणि गुरुजनांना नमस्कार करावा, त्यांचा आदर करावा.

  3. नित्यकर्म आणि अभ्यास:

    सकाळच्या नित्यकर्मांमध्ये स्नान आणि आवश्यक अभ्यास करावा.

  4. सत्य बोलावे:

    नेहमी खरे बोलावे, खोटे बोलणे टाळावे.

  5. चांगल्या मित्रांची संगत:

    चांगल्या मित्रांसोबत मैत्री करावी आणि वाईट सवयींपासून दूर राहावे.

  6. गुरुंचे मार्गदर्शन:

    गुरुजनांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करावे.

  7. सर्वांशी नम्रतेने वागावे:

    सर्वांशी नम्रपणे आणि आदराने वागावे.

  8. दानधर्म करावा:

    शक्य असल्यास दानधर्म करावा, गरजूंना मदत करावी.

या शिकवणींच्या माध्यमातून, समर्थ रामदास स्वामींनी मुलांना एक आदर्श जीवन जगण्याची दिशा दिली आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

कोणत्याही क्षेत्रात कोणासारखे बनावे?
स्वतःचे व्यक्तिमत्व कसे वाढवावे?
स्वयं या पाठातून मानवी जीवन विकासासाठी स्वयं किती उपकारक ठरतो, असे साने गुरुजींनी कसे सांगितले ते थोडक्यात सांगा?
तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत?
मॅच्युअर मुलगी कशी ओळखावी?
वेळेचा सदुपयोग करायला हवा, कारण गेलेला क्षण परत येत नाही, मराठीत अनुवाद करा.
विवेकानंदांचे मते यशस्वी होण्यासाठी आवश्यक दोन गोष्टी कोणत्या?